Shuru
Apke Nagar Ki App…
"ना पाणी मिळालं, ना शब्द पाळला! पालसिंगनमध्ये जल जीवन मिशनचं काम रामभरोसे; आमदार संदीप क्षीरसागरांनी केवळ जरांगे पाटलांच्या नावावर स्वतःचं राजकारण साधलं?" — माजी सरपंच भीमराव खंडागळे यांचा संतापजनक सवाल.
Hanumant Shinde
"ना पाणी मिळालं, ना शब्द पाळला! पालसिंगनमध्ये जल जीवन मिशनचं काम रामभरोसे; आमदार संदीप क्षीरसागरांनी केवळ जरांगे पाटलांच्या नावावर स्वतःचं राजकारण साधलं?" — माजी सरपंच भीमराव खंडागळे यांचा संतापजनक सवाल.
More news from Maharashtra and nearby areas
- Post by Sanjhsuyog News Channel1
- "ना पाणी मिळालं, ना शब्द पाळला! पालसिंगनमध्ये जल जीवन मिशनचं काम रामभरोसे; आमदार संदीप क्षीरसागरांनी केवळ जरांगे पाटलांच्या नावावर स्वतःचं राजकारण साधलं?" — माजी सरपंच भीमराव खंडागळे यांचा संतापजनक सवाल.1
- ------- पाटोदा (प्रतिनिधी) :- पाटोदा शहरातील महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पावन वास्तव्याने धन्य झालेल्या श्रीकृष्ण मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भक्तनिवास वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या वेळी बोलताना आमदार धस म्हणाले की सन २०१९-२० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मा.ना श्री.देवेंद्रजी फडणवीस व पर्यटन मंत्री मा.श्री.जयकुमारजी रावल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागाच्या विशेष योजनेतून मंजूर ₹२.५१ कोटी निधीतून सुसज्ज हॉल, निवासी खोल्या, टॉयलेट-बाथरूम सुविधा, संरक्षण भिंत, पाणी फिल्टर आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. नानासाहेब डिडुळ, सतीश बप्पा जाधव व सहकाऱ्यांनी अत्यंत गुणवत्तापूर्ण काम करून पाटोद्यात एक सुंदर वास्तू साकारली आहे. महानुभाव पंथाची समता, साधेपणा व सर्वसमावेशकता अधोरेखित करत, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी मराठीतील ‘लीळाचरित्र’ च्या माध्यमातून दिलेला सामाजिक संदेश आज ही प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. पाटोदा हे त्यांच्या वास्तव्याने पवित्र स्थळ असून, या ठिकाणाचा विकास आणि भक्तांच्या सोयीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी आमदार सुरेश आण्णा धस यांनी व्यक्त केला. राज्य शासनाकडून महानुभव पंथ व श्री चक्रधर स्वामी मंदिर विकासासाठी मोठा निधी मंजूर झाल्याने भविष्यात पाटोदा शहराला धार्मिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमास विविध मान्यवर, महंत, पदाधिकारी व महानुभव पंथीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- Post by रुद्रशिव1
- जालन्यात बौद्ध जयंती निमित्त कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामुहिक वाचन प्रतिनिधी जालना . जालना शहरातील महाप्रजापती बौद्ध विहार जयनगर येथे दिनांक 1 मे 2026 रोजी बौद्ध जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड .प्रकाश आंबेडकर यांच्या अहवानाला प्रतिसाद देत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामुहिक वाचन करण्यात आले याप्रसंगी एम .व्ही चौधरी, सिध्दार्थ इंगळे, विलास दाभाडे,मैनाबाई खंडागळे आदीं प्रमुख उपस्थित होते .यावेळी उपासक शेषराव रनविर, किरण इंगळे,वामनराव दांडगे, साहेबराव साळवे, सिध्दार्थ पाईकराव,भुपेश पारधे, भाऊसाहेब दिवेकर,किरण कोळे, प्रशांत खंडागळे,येतेस सुकधाने, युवराज रनविर, किरण साळवे यांच्यासह महिलांचा मोठा सहभाग होता कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन सुरेश सुकधाने यांनी मानले.2
- Post by Latur 241
- मंठा तालुक्यातील टकले पोखरी येथे शॉर्टसर्किटमुळे शेतात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. टकले पोखरी येथील शेतकरी मनोहर लिंबाजी टकले यांच्या गट क्रमांक 135 मधील शेतात अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आगीने काही वेळातच विकराळ रूप धारण करत शेतातील साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत तुषार संच, ठिबक संच तसेच पेरणीसाठी नुकतेच आणलेले सुमारे 35 बॅग रासायनिक खत जळून पूर्णतः नष्ट झाले. याशिवाय शेतीसाठी वापरण्यात येणारे अवजारे, पेट्रोल फवारणी यंत्र आणि पत्र्याचे शेडही आगीत जळून खाक झाले आहे. या आगीमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानीचा आकडा मोठ्या प्रमाणावर असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांनी तत्काळ मदत करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून पंचनामा करून शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.1
- Post by Sanjhsuyog News Channel1