logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

16 hrs ago
user_Gopal. salame
Gopal. salame
Farmer नरखेड, नागपूर, महाराष्ट्र•
16 hrs ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Gopal. salame
    2
    Post by Gopal. salame
    user_Gopal. salame
    Gopal. salame
    Farmer नरखेड, नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by The Indian Matrimony
    1
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Registry Office नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नागपूर जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज वृत्तसेवा नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    1
    नागपूर जिल्हा प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर: (दि १८) नक्षी येथील विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    3 hrs ago
  • Post by JKV NEWS 24
    1
    Post by JKV NEWS 24
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    1
    Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    user_Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Nagpur (Urban), Maharashtra•
    21 hrs ago
  • कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | #KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur
    1
    कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | 
#KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • काळ पुढे सरकत जातो. जबाबदाऱ्या वाढत जातात. जीवनाच्या व्यापात दिवस निघून जातात. पण मनाच्या एका कोपऱ्यात मैत्री मात्र शांतपणे थांबून राहते' फक्त पुन्हा एकदा हाक येण्याची वाट पाहत… आणि अशीच एक हाक आली.. चला.. अंकुर व्हॅली येथे . 'दे धमाल… बेमिसाल… गेट टुगेदर!' साठी. जवळजवळ चार दशकांनंतर कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय चे माजी विद्यार्थी ‘आनंद मेळावा’ या नावाखाली पुन्हा एकत्र आले. ही भेट केवळ पुनर्भेट नव्हती; ती विस्मरणात गेलेल्या आठवणींची पुनःप्रत्ययाची पर्वणी होती. ती काळाच्या पडद्याआड हरवलेल्या क्षणांची पुनर्भेट होती. अहमदनगरपासून काही अंतरावर, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भाळवणी येथील 'अंकुर व्हॅली'मध्ये जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आगमनाच्या क्षणीच गुलाबपुष्प देऊन झालेले स्वागत मनाला स्पर्शून गेले. त्या सुगंधी क्षणांनी मेळाव्याच्या आनंदाला पहिल्याच भेटीत सुंदर सुरुवात दिली. धुळीत हरवलेली पायवाट आज पुन्हा हसत भेटली; वय वाढलं, काळ बदलला, पण मैत्री तशीच राहिली. रुपेरी केसांची छटा अलगद डोकावत होती, मेकअप मागचं वय हलकेच स्मित करत होतं; पण मन मात्र पुन्हा कॉलेजच्या दिवसांत रमलं होतं. एकेक आठवण उलगडत गेली, हास्याच्या लहरींमध्ये भूतकाळ वर्तमानात येऊन विसावला. या सुंदर मेळाव्यामागे ग्रुप ॲडमिन संजय भैलुमे यांची शोधक वृत्ती, जिद्द आणि आपुलकी होती. एकेक मित्र शोधत त्यांनी तब्बल १३५ माजी विद्यार्थ्यांना एकाच स्नेहसूत्रात गुंफले आहे. त्यातील आम्ही 33 सदस्य आज इथे जमलो होतो. त्यांना साथ देणारे सुरेश साळुंके, आप्पासाहेब होले , दत्ता नेवसे, सुनील चाफे, रंगनाथ सुपेकर, रावसाहेब साळवे, , सुरेंद्र चव्हाण, शोभा महामुनी,शकुंतला जेवरे यांचे आणि उपस्थित सर्वांचेच..परिश्रम या यशामागे मोलाचे ठरले. प्रसंग क्षणभर आठवणी जीवनभर जपून ठेवण्यासाठी आशा गिरमे,अनिता व्यवहारे यांनी सर्वांचे हसरे चेहरे बोलके डोळे आपल्या मोबाईलमध्ये एका क्लिक ने जपून ठेवले.. दादा पाटील महाविद्यालयातून ज्ञानरूपी शिक्षणाची शिदोरी घेऊन आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालो. गुरुजनांचे संस्कार, आई-वडिलांची पुण्याई आणि स्वतःच्या कष्टांची जोड देत प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिक वाटचाल केली. शिक्षण, नोकरी, संसार या त्रिसूत्रीत आयुष्य गुंतलं होतं; स्वतःसाठी वेळ कमी पडत गेला,पण मैत्री मात्र मनात जपली गेली. “तेव्हाचा मी आणि आजचा मी” असं मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने संघर्ष, कर्तृत्व आणि समाधानाचा प्रवास उलगडला. संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत साठीकडे झुकलेलं वय.. पण मन मात्र अजूनही तरुण! हसताना नकळत डोळ्यांच्या कडेला ओल आली; आठवणी बोलक्या झाल्या; आज पुन्हा एकदा आपण ‘आपले’ झालो. या आनंद मेळाव्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे मित्र–मैत्रिणींसोबत त्यांच्या पती-पत्नींचाही सहभाग. गप्पा, गाणी, नृत्य, मिश्किल टोमणे आणि मनमोकळं हास्य या साऱ्यांनी वातावरण भारावून गेलं. मैत्री जेव्हा कुटुंबांपर्यंत पोहोचते, तेव्हा नात्यांना नवं बळ मिळतं. हसण्यातून हसू वाढतं, आणि आयुष्य अधिक हलकं होतं. या प्रसंगी कर्जतवरून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्वांना "प्रफुल्लित मने" हे ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी पुस्तक भेट दिले. ही भेट म्हणजे केवळ पुस्तक नव्हते; तर विचारांची, प्रेरणेची आणि सकारात्मकतेची शिदोरी होती. निरोपाच्या क्षणी आप्पासाहेब होले यांनी एक छोटीशी ऑफिशियल बॅग देऊन आदरपूर्वक निरोप दिला. त्या क्षणातही आपुलकीची ऊब होती. 'अंकुर व्हॅलीचे निसर्गरम्य वातावरण, आपुलकीचे आदरातिथ्य, सुग्रास भोजन आणि उत्तम व्यवस्था' या सर्वांनी आनंद द्विगुणित केला. हा मेळावा म्हणजे केवळ भेट नव्हती; तो काळाशी केलेला संवाद होता. मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे. ती जुनी होत नाही; ती फक्त नव्याने उमलत राहते. मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे. ती जुनी होत नाही.. ती फक्त नव्याने उमलत राहते… असे आनंद मेळावे पुन्हा पुन्हा घडत राहोत… मैत्रीचा हा स्नेहसोहळा असाच दरवेळी फुलत राहो. हा अनुभव, हा आनंद पुन्हा पुन्हा मिळत राहो आणि लवकरच पुन्हा भेटण्याचा सुंदर योग यावा… हीच मनापासून इच्छा...!
    2
    काळ पुढे सरकत जातो.
जबाबदाऱ्या वाढत जातात.
जीवनाच्या व्यापात दिवस निघून जातात.
पण मनाच्या एका कोपऱ्यात
मैत्री मात्र शांतपणे थांबून राहते'
फक्त पुन्हा एकदा हाक येण्याची वाट पाहत…
आणि अशीच एक हाक आली..
चला.. अंकुर व्हॅली येथे .
'दे धमाल… बेमिसाल… गेट टुगेदर!' साठी. 
जवळजवळ चार दशकांनंतर
कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय चे माजी विद्यार्थी
‘आनंद मेळावा’ या नावाखाली पुन्हा एकत्र आले.
ही भेट केवळ पुनर्भेट नव्हती;
ती विस्मरणात गेलेल्या आठवणींची पुनःप्रत्ययाची पर्वणी होती.
ती काळाच्या पडद्याआड हरवलेल्या क्षणांची पुनर्भेट होती.
अहमदनगरपासून काही अंतरावर,
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या भाळवणी येथील 'अंकुर व्हॅली'मध्ये
जेव्हा आम्ही एकमेकांना भेटलो,
तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद
ओसंडून वाहत होता.
आगमनाच्या क्षणीच
गुलाबपुष्प देऊन झालेले स्वागत
मनाला स्पर्शून गेले.
त्या सुगंधी क्षणांनी
मेळाव्याच्या आनंदाला पहिल्याच भेटीत सुंदर सुरुवात दिली.
धुळीत हरवलेली पायवाट
आज पुन्हा हसत भेटली;
वय वाढलं, काळ बदलला,
पण मैत्री तशीच राहिली.
रुपेरी केसांची छटा अलगद डोकावत होती,
मेकअप मागचं वय हलकेच स्मित करत होतं;
पण मन मात्र पुन्हा कॉलेजच्या दिवसांत रमलं होतं.
एकेक आठवण उलगडत गेली,
हास्याच्या लहरींमध्ये भूतकाळ वर्तमानात येऊन विसावला.
या सुंदर मेळाव्यामागे
ग्रुप ॲडमिन संजय भैलुमे यांची शोधक वृत्ती, जिद्द आणि आपुलकी होती.
एकेक मित्र शोधत त्यांनी तब्बल १३५ माजी विद्यार्थ्यांना
एकाच स्नेहसूत्रात गुंफले आहे. त्यातील आम्ही 33 सदस्य आज इथे जमलो होतो. 
त्यांना साथ देणारे
सुरेश साळुंके, आप्पासाहेब होले , दत्ता नेवसे,
सुनील चाफे, रंगनाथ सुपेकर, रावसाहेब साळवे,
, सुरेंद्र चव्हाण, शोभा महामुनी,शकुंतला जेवरे 
यांचे   आणि उपस्थित सर्वांचेच..परिश्रम या यशामागे मोलाचे ठरले.
प्रसंग क्षणभर आठवणी जीवनभर जपून ठेवण्यासाठी आशा गिरमे,अनिता व्यवहारे यांनी सर्वांचे हसरे चेहरे बोलके डोळे आपल्या मोबाईलमध्ये एका क्लिक ने जपून ठेवले..
दादा पाटील महाविद्यालयातून
ज्ञानरूपी शिक्षणाची शिदोरी घेऊन
आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालो.
गुरुजनांचे संस्कार,
आई-वडिलांची पुण्याई
आणि स्वतःच्या कष्टांची जोड देत
प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिक वाटचाल केली.
शिक्षण, नोकरी, संसार
या त्रिसूत्रीत आयुष्य गुंतलं होतं;
स्वतःसाठी वेळ कमी पडत गेला,पण मैत्री मात्र मनात जपली गेली.
“तेव्हाचा मी आणि आजचा मी”
असं मनोगत व्यक्त करताना
प्रत्येकाने संघर्ष, कर्तृत्व आणि समाधानाचा प्रवास उलगडला.
संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत
साठीकडे झुकलेलं वय..
पण मन मात्र अजूनही तरुण!
हसताना नकळत डोळ्यांच्या कडेला ओल आली;
आठवणी बोलक्या झाल्या;
आज पुन्हा एकदा
आपण ‘आपले’ झालो.
या आनंद मेळाव्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे
मित्र–मैत्रिणींसोबत त्यांच्या पती-पत्नींचाही सहभाग.
गप्पा, गाणी, नृत्य, मिश्किल टोमणे
आणि मनमोकळं हास्य
या साऱ्यांनी वातावरण भारावून गेलं.
मैत्री जेव्हा कुटुंबांपर्यंत पोहोचते,
तेव्हा नात्यांना नवं बळ मिळतं.
हसण्यातून हसू वाढतं,
आणि आयुष्य अधिक हलकं होतं.
या प्रसंगी कर्जतवरून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी
उपस्थित सर्वांना "प्रफुल्लित मने" हे
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी पुस्तक भेट दिले.
ही भेट म्हणजे केवळ पुस्तक नव्हते;
तर विचारांची, प्रेरणेची आणि सकारात्मकतेची शिदोरी होती.
निरोपाच्या क्षणी
आप्पासाहेब होले यांनी
एक छोटीशी ऑफिशियल बॅग देऊन
आदरपूर्वक निरोप दिला.
त्या क्षणातही आपुलकीची ऊब होती.
'अंकुर व्हॅलीचे निसर्गरम्य वातावरण,
आपुलकीचे आदरातिथ्य,
सुग्रास भोजन आणि उत्तम व्यवस्था'
या सर्वांनी आनंद द्विगुणित केला.
हा मेळावा म्हणजे केवळ भेट नव्हती;
तो काळाशी केलेला संवाद होता.
मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे.
ती जुनी होत नाही; ती फक्त नव्याने उमलत राहते.
मैत्री ही वेळ, अंतर आणि वय यांच्या पलीकडचं नातं आहे.
ती जुनी होत नाही..
ती फक्त नव्याने उमलत राहते…
असे आनंद मेळावे पुन्हा पुन्हा घडत राहोत…
मैत्रीचा हा स्नेहसोहळा असाच दरवेळी फुलत राहो.
हा अनुभव, हा आनंद पुन्हा पुन्हा मिळत राहो
आणि लवकरच पुन्हा भेटण्याचा सुंदर योग यावा… हीच मनापासून इच्छा...!
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.