logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*नाशिक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळ्यात मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन* *नाशिक, दि.१ ऑगस्ट:-* साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते एका युगाचे नाव होते. त्यांनी आपल्या लेखणीच्या आणि शाहिरीच्या माध्यमातून वंचित, शोषित, कष्टकरी, भटक्या-विमुक्त, दलित आणि बहुजन समाजाच्या वेदनांना शब्द दिले. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून सामाजिक न्याय, समता, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनाच्या विचारांचे प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक येथे आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके, उत्सव समिती अध्यक्ष विनायक पांडे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सुहास फरांदे, सुधाकर बडगुजर, शाम बडोदे, शाहू खैरे, सुरेश पाटील, आर. डी. धोंगडे, आदिती पांडे, राहुल शेलार, मयुरी पवार, संध्या कुलकर्णी, विश्वास कांबळे, भारत जाधव तसेच स्मारकाचे वास्तुविशारद शाम लोंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी स्वतः शिक्षणासाठी संघर्ष केला. उपासमार, दारिद्र्य आणि अपार हालअपेष्टा सहन करत त्यांनी आपल्या लेखनातून समाजातील तळागाळातील माणसांचे जीवन जगासमोर मांडले. त्यांच्या साहित्यामध्ये कृत्रिमता नव्हती, तर वास्तव होते; कल्पनाविलास नव्हता, तर कष्टकरी माणसांच्या जीवनातील वेदना, संघर्ष आणि स्वाभिमान होता. अण्णाभाऊ साठे यांनी उच्चारलेले "ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. गोरगरिबांच्या श्रमिकांच्या खांद्यावर उभी आहे," हे वाक्य आजही श्रमाला प्रतिष्ठा देणारे आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवणारे आहे. या एका वाक्यात त्यांनी श्रमिकांच्या योगदानाचा सर्वोच्च गौरव केला असून, समाजाचा खरा आधार हा श्रम करणारा सामान्य माणूस असल्याचे अधोरेखित केले आहे. यावेळी मंत्री भुजबळ यांनी स्मशानभूमीत राखेचे काम करणाऱ्या मातंग समाजातील महिलांच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधले. या महिलांना त्यांच्या श्रमाचा योग्य सन्मान, आवश्यक सुविधा आणि न्याय मिळावा, यासाठी महानगरपालिकेने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी ३५ हून अधिक कादंबऱ्या, असंख्य कथा, पोवाडे, लावण्या, शाहिरी, लोकनाट्य आणि गीते लिहून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या 'फकिरा' या कादंबरीचा रशियन भाषेत झालेला अनुवाद हा मराठी साहित्याच्या जागतिक गुणवत्तेचा सन्मान आहे. त्यांच्या साहित्याने केवळ मनोरंजन केले नाही, तर समाजपरिवर्तनाची मशाल पेटवली असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, त्यांच्या शाहिरीने महाराष्ट्र जागा झाला, त्यांच्या गीतांनी कष्टकरी वर्गाला संघर्षाची प्रेरणा दिली, त्यांच्या पोवाड्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य निर्माण केले आणि त्यांच्या लावण्यांनी समाजातील विसंगतींवर प्रभावी भाष्य केले. त्यामुळेच अण्णाभाऊ साठे यांना 'लोकशाहीर' ही उपाधी जनतेने बहाल केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव" या ओळीतून अण्णाभाऊ साठे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आपल्या शाहिरीतून जनमानसात पोहोचवले. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश त्यांनी आयुष्यभर दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले. त्यांनी आपल्या ज्वलंत शाहिरी, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्यांच्या माध्यमातून गावोगावी फिरून संयुक्त महाराष्ट्राची जनजागृती केली. त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे सामान्य जनतेमध्ये मराठी अस्मिता आणि लढ्याची जिद्द निर्माण झाली. "माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतिया काहिली" हे त्यांचे अजरामर गीत वरकरणी विरहगीत वाटत असले तरी त्यामध्ये मुंबईपासून वेगळ्या झालेल्या महाराष्ट्राची वेदना आणि मराठी अस्मितेचे प्रतीकात्मक चित्रण असल्याचे मंत्री भुजबळ यांनी नमूद केले. तसेच अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक हे पुढील पिढ्यांना त्यांच्या संघर्षमय जीवनाची, साहित्यसंपदेची आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांची प्रेरणा देणारे केंद्र ठरेल. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करणे आणि समतेच्या समाजनिर्मितीसाठी त्यांचे कार्य पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

4 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
4 hrs ago
6ab6550b-6e4b-4dcc-ab20-836e423dce01

*नाशिक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळ्यात मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन* *नाशिक, दि.१ ऑगस्ट:-* साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते एका युगाचे नाव होते. त्यांनी आपल्या लेखणीच्या आणि शाहिरीच्या माध्यमातून वंचित, शोषित, कष्टकरी, भटक्या-विमुक्त, दलित आणि बहुजन समाजाच्या वेदनांना शब्द दिले. अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक ही केवळ वास्तू नसून सामाजिक न्याय, समता, श्रमप्रतिष्ठा आणि परिवर्तनाच्या विचारांचे प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिक येथे आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके, उत्सव समिती अध्यक्ष विनायक पांडे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सुहास फरांदे, सुधाकर बडगुजर, शाम बडोदे, शाहू खैरे, सुरेश पाटील, आर. डी. धोंगडे,

aa51de77-1886-4ba6-aa7e-565e5f9de2fb

आदिती पांडे, राहुल शेलार, मयुरी पवार, संध्या कुलकर्णी, विश्वास कांबळे, भारत जाधव तसेच स्मारकाचे वास्तुविशारद शाम लोंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी स्वतः शिक्षणासाठी संघर्ष केला. उपासमार, दारिद्र्य आणि अपार हालअपेष्टा सहन करत त्यांनी आपल्या लेखनातून समाजातील तळागाळातील माणसांचे जीवन जगासमोर मांडले. त्यांच्या साहित्यामध्ये कृत्रिमता नव्हती, तर वास्तव होते; कल्पनाविलास नव्हता, तर कष्टकरी माणसांच्या जीवनातील वेदना, संघर्ष आणि स्वाभिमान होता. अण्णाभाऊ साठे यांनी उच्चारलेले "ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नाही, तर कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. गोरगरिबांच्या श्रमिकांच्या खांद्यावर उभी आहे," हे वाक्य आजही श्रमाला प्रतिष्ठा देणारे आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवणारे आहे. या एका वाक्यात त्यांनी श्रमिकांच्या योगदानाचा सर्वोच्च गौरव केला असून, समाजाचा खरा आधार हा श्रम करणारा सामान्य माणूस असल्याचे अधोरेखित केले आहे. यावेळी मंत्री भुजबळ यांनी स्मशानभूमीत राखेचे काम करणाऱ्या मातंग समाजातील महिलांच्या

7e1922ae-10af-45fb-b2df-f5dd3234e94c

प्रश्नाकडेही लक्ष वेधले. या महिलांना त्यांच्या श्रमाचा योग्य सन्मान, आवश्यक सुविधा आणि न्याय मिळावा, यासाठी महानगरपालिकेने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी ३५ हून अधिक कादंबऱ्या, असंख्य कथा, पोवाडे, लावण्या, शाहिरी, लोकनाट्य आणि गीते लिहून मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या 'फकिरा' या कादंबरीचा रशियन भाषेत झालेला अनुवाद हा मराठी साहित्याच्या जागतिक गुणवत्तेचा सन्मान आहे. त्यांच्या साहित्याने केवळ मनोरंजन केले नाही, तर समाजपरिवर्तनाची मशाल पेटवली असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, त्यांच्या शाहिरीने महाराष्ट्र जागा झाला, त्यांच्या गीतांनी कष्टकरी वर्गाला संघर्षाची प्रेरणा दिली, त्यांच्या पोवाड्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य निर्माण केले आणि त्यांच्या लावण्यांनी समाजातील विसंगतींवर प्रभावी भाष्य केले. त्यामुळेच अण्णाभाऊ साठे यांना 'लोकशाहीर' ही उपाधी जनतेने बहाल केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव" या ओळीतून अण्णाभाऊ साठे यांनी

0d9737cb-1d89-4e86-b8e3-ff1fb1d08d87

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आपल्या शाहिरीतून जनमानसात पोहोचवले. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश त्यांनी आयुष्यभर दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले. त्यांनी आपल्या ज्वलंत शाहिरी, पोवाडे, लावण्या आणि लोकनाट्यांच्या माध्यमातून गावोगावी फिरून संयुक्त महाराष्ट्राची जनजागृती केली. त्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे सामान्य जनतेमध्ये मराठी अस्मिता आणि लढ्याची जिद्द निर्माण झाली. "माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतिया काहिली" हे त्यांचे अजरामर गीत वरकरणी विरहगीत वाटत असले तरी त्यामध्ये मुंबईपासून वेगळ्या झालेल्या महाराष्ट्राची वेदना आणि मराठी अस्मितेचे प्रतीकात्मक चित्रण असल्याचे मंत्री भुजबळ यांनी नमूद केले. तसेच अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक हे पुढील पिढ्यांना त्यांच्या संघर्षमय जीवनाची, साहित्यसंपदेची आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांची प्रेरणा देणारे केंद्र ठरेल. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करणे आणि समतेच्या समाजनिर्मितीसाठी त्यांचे कार्य पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा येडशी | प्रतिनिधी सुभान शेख धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आज (31 जुलै) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यासाठी दर्गा परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भाग तसेच परराज्यातूनही हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रद्धा, भक्ती, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा ऊरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हजरत जमादार बाबा रहे यांच्या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांची अखंड श्रद्धा लाभलेली आहे. त्यामुळे हा ऊरूस केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऊरूसाच्या पहिल्या दिवशी 31 जुलै रोजी पारंपरिक संदल मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दर्गा परिसरात विशेष रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 1 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, कव्वालीची रंगतदार मैफल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कव्वालांच्या जुगलबंदीची विशेष मैफल रंगणार आहे. भोकरदनचे प्रसिद्ध कव्वाल आसिफ अली आणि मिरजच्या प्रसिद्ध कव्वाल रेश्मा ताज यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली कव्वालीची जुगलबंदी होणार असून, या मैफलीची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सूफी परंपरेतील भक्तिगीते आणि आध्यात्मिक संदेशांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेणार असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन बंधुभावाचा संदेश देणार आहेत. ऊरूसाच्या निमित्ताने परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, धार्मिक साहित्याची विक्री, खेळणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकानेही उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे. 2 ऑगस्ट रोजी जियारत कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक दर्ग्यात दर्शन घेऊन चादर अर्पण करतील तसेच देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल. ऊरूसाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक आणि ऊरूस समितीचे सदस्य भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहेत. हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाची अनेक दशकांची परंपरा असून, या सोहळ्यामुळे धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले. विविध धर्मीय नागरिक या ऊरूसात सहभागी होऊन परस्परांतील प्रेम, बंधुता आणि एकतेचे दर्शन घडवितात, ही या सोहळ्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. ऊरूस समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम, कव्वालीची मैफल, महाप्रसाद आणि जियारतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा तीन दिवसीय ऊरूस येडशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार असून भाविकांसाठी तो एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.
    2
    येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा
येडशीच्या हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आजपासून प्रारंभ; तीन दिवस भक्ती, कव्वाली आणि धार्मिक सलोख्याचा सोहळा
येडशी | प्रतिनिधी सुभान शेख 
धाराशिव तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडशी येथील हजरत जमादार बाबा रहे यांच्या पवित्र ऊरूसास आज (31 जुलै) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यासाठी दर्गा परिसर आकर्षक सजावटीने उजळून निघाला असून जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भाग तसेच परराज्यातूनही हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत. श्रद्धा, भक्ती, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा ऊरूस दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
हजरत जमादार बाबा रहे यांच्या दर्ग्याला विविध धर्मीय भाविकांची अखंड श्रद्धा लाभलेली आहे. त्यामुळे हा ऊरूस केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. या तीन दिवसांच्या कालावधीत धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ऊरूसाच्या पहिल्या दिवशी 31 जुलै रोजी पारंपरिक संदल मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात येणार आहे. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये, धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून जाणार असून भाविक मोठ्या श्रद्धेने या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. दर्गा परिसरात विशेष रोषणाई आणि सजावट करण्यात आली असून भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
1 ऑगस्ट रोजी ऊर्स शरीफ, कव्वालीची रंगतदार मैफल आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सुप्रसिद्ध कव्वालांच्या जुगलबंदीची विशेष मैफल रंगणार आहे. भोकरदनचे प्रसिद्ध कव्वाल आसिफ अली आणि मिरजच्या प्रसिद्ध कव्वाल रेश्मा ताज यांच्यात भक्तिरसाने ओतप्रोत भरलेली कव्वालीची जुगलबंदी होणार असून, या मैफलीची भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. सूफी परंपरेतील भक्तिगीते आणि आध्यात्मिक संदेशांनी सजलेली ही मैफल रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविक घेणार असून, समाजातील सर्व स्तरातील नागरिक एकत्र येऊन बंधुभावाचा संदेश देणार आहेत. ऊरूसाच्या निमित्ताने परिसरात विविध खाद्यपदार्थांची दुकाने, धार्मिक साहित्याची विक्री, खेळणी तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांची दुकानेही उभारण्यात आल्याने यात्रेचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे.
2 ऑगस्ट रोजी जियारत कार्यक्रमाने या धार्मिक सोहळ्याची सांगता होणार आहे. या दिवशी भाविक दर्ग्यात दर्शन घेऊन चादर अर्पण करतील तसेच देशात शांतता, सौहार्द आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात येईल.
ऊरूसाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक आणि ऊरूस समितीचे सदस्य भाविकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार आहेत.
हजरत जमादार बाबा रहे यांच्या ऊरूसाची अनेक दशकांची परंपरा असून, या सोहळ्यामुळे धार्मिक ऐक्य, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे भाविकांनी सांगितले. विविध धर्मीय नागरिक या ऊरूसात सहभागी होऊन परस्परांतील प्रेम, बंधुता आणि एकतेचे दर्शन घडवितात, ही या सोहळ्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत.
ऊरूस समितीने जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील भाविकांना या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रम, कव्वालीची मैफल, महाप्रसाद आणि जियारतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. श्रद्धा, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारा हा तीन दिवसीय ऊरूस येडशी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करणार असून भाविकांसाठी तो एक अविस्मरणीय आध्यात्मिक पर्व ठरणार आहे.
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; त्र्यंबकेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरणत्र्यंबकेश्वर:नाशिक जिल्ह्याचा मानबिंदू आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगावचे सुपुत्र आदरणीय श्री. संतोष खोरगडे साहेब हे मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण 'सचिव' या सर्वोच्च पदावरून ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या गौरवशाली कामगिरीमुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुका आणि नाशिक जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री. खोरगडे साहेब यांनी आपल्या ध्येयवादी प्रशासकीय कारकिर्दीच्या जोरावर आपल्या जन्मभूमीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केले. त्यांनी प्रशासनात बजावलेली उल्लेखनीय सेवा आणि त्यांचे मार्गदर्शन येथील तरुण पिढीसाठी व मातीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.त्यांच्या या गौरवशाली निवृत्तीनिमित्त आणि भावी आयुष्यासाठी नाशिक जिल्हा पत्रकार व लाईव्ह महाराष्ट्र टाइम्सचे तळोदा वृत्तांकन प्रतिनिधी श्री. भगवान आचारी (मु.पो. अस्वली हर्ष, ता. त्र्यंबकेश्वर) यांनी खोरगडे साहेबांना पुढील आनंदी, सुदृढ आणि दीर्घायुषी सेवानिवृत्त जीवनाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
    2
    टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
टाकेदेवगावचे सुपूत्र मंत्रालयाचे सचिव संतोष खोरगडे साहेब ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; 
त्र्यंबकेश्वर तालुक्यात आनंदाचे वातावरणत्र्यंबकेश्वर:नाशिक जिल्ह्याचा मानबिंदू आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगावचे सुपुत्र आदरणीय श्री. संतोष खोरगडे साहेब हे मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण 'सचिव' या सर्वोच्च पदावरून ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर सन्मानाने सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या या गौरवशाली कामगिरीमुळे संपूर्ण त्र्यंबकेश्वर तालुका आणि नाशिक जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री. खोरगडे साहेब यांनी आपल्या ध्येयवादी प्रशासकीय कारकिर्दीच्या जोरावर आपल्या जन्मभूमीचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्ज्वल केले. त्यांनी प्रशासनात बजावलेली उल्लेखनीय सेवा आणि त्यांचे मार्गदर्शन येथील तरुण पिढीसाठी व मातीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरेल, अशा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.त्यांच्या या गौरवशाली निवृत्तीनिमित्त आणि भावी आयुष्यासाठी नाशिक जिल्हा पत्रकार व लाईव्ह महाराष्ट्र टाइम्सचे तळोदा वृत्तांकन प्रतिनिधी श्री. भगवान आचारी (मु.पो. अस्वली हर्ष, ता. त्र्यंबकेश्वर) यांनी खोरगडे साहेबांना पुढील आनंदी, सुदृढ आणि दीर्घायुषी सेवानिवृत्त जीवनाच्या मनःपूर्वक व हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
    user_श्री.भगवान आचारी
    श्री.भगवान आचारी
    त्र्यंबक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • वणी ता दिंडोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी दिंडोरी तालुक्यातील वनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आबा कड ; किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी ;रवी भाऊ सोनवणे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रेड पीएसआय सोनवणे व पोलीस हवालदार बागुल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . यावेळेस महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रथमच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याने कार्यकर्त्यांचे वनी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किरण गांगुर्डे यांनी कौतुक केले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागर जनस्थान साठी शामराव सोनवणे दिंडोरी
    1
    वणी ता दिंडोरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
दिंडोरी तालुक्यातील वनी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आबा कड ; किरण गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते सागर चौधरी ;रवी भाऊ सोनवणे पोलीस प्रशासनाच्या वतीने ग्रेड पीएसआय सोनवणे व पोलीस हवालदार बागुल आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते . यावेळेस महामानवांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावर्षी प्रथमच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केल्याने कार्यकर्त्यांचे वनी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य किरण गांगुर्डे यांनी कौतुक केले यावेळेस परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जागर जनस्थान साठी शामराव सोनवणे दिंडोरी
    user_आई सत्पशृंगी
    आई सत्पशृंगी
    Photographer दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी शासकीय आश्रमशाळा सराड येथे भेट देऊन शाळेच्या इमारतीची तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पाहणी केली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शासकीय आश्रमशाळा सराड येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांचे निवासस्थान तसेच इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षक व शाळा प्रशासनाकडून माहिती घेतली.यावेळी सुरगाण्याचे तहसीलदार रामजी राठोड, सराडचे सरपंच नामदेव भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये यांच्यासह ग्रामस्थ व संबंधित अधिकारी उपस्थित होते भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका यावेळी खासदार भगरे यांनी व्यक्त केली. भूकंपाच्या धक्क्यानंतर खासदारांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्याने विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांमध्ये काही प्रमाणात दिलासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    1
    भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर खासदार भास्कर भगरे यांची सराड आश्रमशाळेत पाहणी
बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी शासकीय आश्रमशाळा सराड येथे भेट देऊन शाळेच्या इमारतीची तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची पाहणी केली.
भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शासकीय आश्रमशाळा सराड येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार भगरे यांनी शाळेत प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांचे निवासस्थान तसेच इमारतीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शिक्षक व शाळा प्रशासनाकडून माहिती घेतली.यावेळी सुरगाण्याचे तहसीलदार रामजी राठोड, सराडचे सरपंच नामदेव भोये, जनार्दन भोये, हरिभाऊ भोये यांच्यासह ग्रामस्थ व संबंधित अधिकारी उपस्थित होते
भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका यावेळी खासदार भगरे यांनी व्यक्त केली.
भूकंपाच्या धक्क्यानंतर खासदारांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्याने विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांमध्ये काही प्रमाणात दिलासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे येवल्यात दिमाखात लोकार्पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी येवला शहरात उभारण्यात आलेल्या 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारका'चे लोकार्पण राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. हे स्मारक केवळ वास्तू नसून सामाजिक न्याय, समता आणि श्रमिकांच्या सन्मानाची प्रेरणाभूमी ठरेल, असे प्रतिपादन मंत्री भुजबळ यांनी केले. ​लोकार्पण सोहळ्यात बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे," हा अण्णाभाऊंचा विचार आजही दिशादर्शक आहे. अण्णाभाऊंनी आपल्या ज्वलंत शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजवली आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचवले. त्यांचे 'माझी मैना गावावर राहिली' हे गीत मराठी अस्मितीचे प्रतीक आहे. ​तसेच, ३५ हून अधिक कादंबऱ्या लिहून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या प्रसिद्ध 'फकिरा' कादंबरीचा रशियन भाषेतील अनुवाद हा मराठी साहित्याचा जागतिक सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. ​प्रमुख उपस्थिती: या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जि.प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे येवल्यात दिमाखात लोकार्पण
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी येवला शहरात उभारण्यात आलेल्या 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारका'चे लोकार्पण राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. हे स्मारक केवळ वास्तू नसून सामाजिक न्याय, समता आणि श्रमिकांच्या सन्मानाची प्रेरणाभूमी ठरेल, असे प्रतिपादन मंत्री भुजबळ यांनी केले.
​लोकार्पण सोहळ्यात बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की, "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे," हा अण्णाभाऊंचा विचार आजही दिशादर्शक आहे. अण्णाभाऊंनी आपल्या ज्वलंत शाहिरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजवली आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनमानसात पोहोचवले. त्यांचे 'माझी मैना गावावर राहिली' हे गीत मराठी अस्मितीचे प्रतीक आहे.
​तसेच, ३५ हून अधिक कादंबऱ्या लिहून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या प्रसिद्ध 'फकिरा' कादंबरीचा रशियन भाषेतील अनुवाद हा मराठी साहित्याचा जागतिक सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.
​प्रमुख उपस्थिती:
या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जि.प. अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    23 min ago
  • केशव सृष्टी तर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केशव सृष्टीतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे शैक्षणिक साहित्य मध्ये मुलांना सुंदर अशी पुस्तक ठेवण्यासाठी बॅग वह्या अशा प्रकारचे साहित्य देण्यात आलेले आहे समाजाची बांधिलकी राखत गोरगरिबांची आदिवासींची मुलं पुढे जाऊयात हा त्यांचा आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्याची कमी पडू नये असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे
    3
    केशव सृष्टी तर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केशव सृष्टीतर्फे जिल्हा परिषद केंद्र शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आलेले आहे शैक्षणिक साहित्य मध्ये मुलांना सुंदर अशी पुस्तक ठेवण्यासाठी बॅग वह्या अशा प्रकारचे साहित्य देण्यात आलेले आहे समाजाची बांधिलकी राखत गोरगरिबांची आदिवासींची मुलं पुढे जाऊयात हा त्यांचा आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्याची कमी पडू नये असा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे
    user_Ravindra Laxman pardhi
    Ravindra Laxman pardhi
    Teacher वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया 🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया
    2
    🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया 
🅱️सुवर्णपदक विजेता दिलीप गावीत ची मुलाखत! पहा विजेता होतानाचा एक क्षण 🌷👍 सौजन्य सोसिशल मीडिया
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन जिल्हा परिषद शाळे मध्ये मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले. संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.
    1
    श्रमजीवी संघटनेचा पंचायत समिती जव्हार कार्यालयावर ताटली आंदोलन 
जिल्हा परिषद शाळे मध्ये
 मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत नाही  

जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी शिक्षक कमी तर  शिक्षकांना अतिरिक्त प्रशासनाने दिलेली कामे याचा फटका विदयार्थ्यांच्या शिक्षणावर होतो. अशातच जि. प. शाळांना मिळणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य पुरवठा होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा निषेधार्थ श्रमजीवी संघटनाच्या वतीने ताटली आंदोलन करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित गायकवाड,गोविंद गावित ता. संघटक,संतोष धिंढा तालूका सचिव यांच्या नेतृत्वात निघालेल्या ताटली आंदोलनात, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे,माणुसकीची भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा अशा घोषणा देत कार्यकर्ते व हजारो पालक व विध्यार्थी सहभागी झाले.
संघटण्याच्या म्हणण्यानुसार धान्य नियमित मिळत नसल्याने त्या ठिकाणी बचत गट किंवा वैयक्तिक महिला यांना पोषण आहार स्वखर्चाने धान्य विकत घेऊन शिजवून दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून प्रशासनाने तातडीने माध्यान्ह भोजन योजनेचे धान्य पुरवठा सुरळीत चालू करावा नाहीतर या पुढचे आंदोलन अधिक तीव्र करनार अशा इशारा संघटनेच्या वतीन देण्यात आला.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.