नांदेड (बिलोली): बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील मांजरा नदी पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. शासनाने दिलेल्या परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात रेती उपसा होत असून, दररोज रात्री-दिवस शेकडो हायवा व टिप्परच्या साहाय्याने तसेच पाच ते सहा मशीनद्वारे लाखो ब्रास रेती काढली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सगरोळी, गंजगाव आणि येसगी परिसरात मागील काही दिवसांपासून लाल रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत. शासनाने घालून दिलेल्या मर्यादा ओलांडून बेसुमारपणे रेती काढली जात असल्याचा आरोप होत असून ही रेती बिलोली, देगलूर, मुखेड, नायगाव, धर्माबाद, उमरी, भोकर या भागांसह तेलंगणा व कर्नाटक राज्यातही विक्रीसाठी पाठवली जात असल्याची चर्चा जनसामान्यात आहे. दरम्यान, रात्रंदिवस अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास असून अनेकजण रात्री उशिरापर्यंत या मार्गावरून ये-जा करतात. मात्र ओव्हरलोड रेती वाहतूक करणारे हायवा चालक वेगाने वाहने चालवत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून स्थानिक वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत काही नागरिकांनी संबंधित तहसीलदार व प्रशासनाला अवैध रेती उपशाची माहिती दिल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत असल्याची चर्चा असून स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनीही या विषयाकडे लक्ष देऊन अधिवेशनात प्रश्न उपस्थित करावा व अवैध रेती माफियांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे."ताज्या स्थानिक अपडेटसाठी Follow करा आणि Share करायला विसरू नका! #NandedNews #NaygaonKunturUmri #BreakingNanded" #Nanded #NandedNews #MarathwadaNews #NandedUpdates #LocalNews
नांदेड (बिलोली): बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील मांजरा नदी पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. शासनाने दिलेल्या परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात रेती उपसा होत असून, दररोज रात्री-दिवस शेकडो हायवा व टिप्परच्या साहाय्याने तसेच पाच ते सहा मशीनद्वारे लाखो ब्रास रेती काढली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सगरोळी, गंजगाव आणि येसगी परिसरात मागील काही दिवसांपासून लाल रेतीचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू असल्याचे नागरिक सांगत आहेत. शासनाने घालून दिलेल्या मर्यादा ओलांडून बेसुमारपणे रेती काढली जात असल्याचा आरोप होत असून ही रेती बिलोली, देगलूर, मुखेड, नायगाव, धर्माबाद, उमरी, भोकर या भागांसह तेलंगणा व कर्नाटक राज्यातही विक्रीसाठी पाठवली जात असल्याची चर्चा जनसामान्यात आहे. दरम्यान, रात्रंदिवस अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास असून अनेकजण रात्री उशिरापर्यंत या मार्गावरून ये-जा करतात. मात्र ओव्हरलोड रेती वाहतूक करणारे हायवा चालक वेगाने वाहने चालवत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून स्थानिक वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत काही नागरिकांनी संबंधित तहसीलदार व प्रशासनाला अवैध रेती उपशाची माहिती दिल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत असल्याची चर्चा असून स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनीही या विषयाकडे लक्ष देऊन अधिवेशनात प्रश्न उपस्थित करावा व अवैध रेती माफियांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे."ताज्या स्थानिक अपडेटसाठी Follow करा आणि Share करायला विसरू नका! #NandedNews #NaygaonKunturUmri #BreakingNanded" #Nanded #NandedNews #MarathwadaNews #NandedUpdates #LocalNews
- Post by Nanded_71
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Today One Live1
- प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या तब्बल १२ बैठकांनंतरही दिव्यांगांचे प्रश्न सुटत नसल्याने आता दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ आक्रमक झाले आहे प्रशासना कडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या दिव्यांगांनी आता थेट जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्व-इच्छा मरणाची' परवानगी मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे1
- अखंड हरिनाम सप्ताह मौजे सुगाव ता देगलूर दि. 10-03-2026 रोज मंगळवार किर्तनकार : श्री ह.भ.प. डॉ. जलाल महाराज सय्यद करंजीकर ह.भ.प. कैलास महाराज पौळ परभणी ह.भ.प. देविदास पावडे हिंगोली भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोष आहे4
- मुखेड नगर परिषदेने रमजान ईद च्या वेळेपूर्वीच संपूर्ण कब्रस्तान परिसराची स्वच्छता करावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशव्यवस्थेसाठी नवीन पथदिव्य बसवण्यात यावे व दुरुस्ती करावी या मागणीसाठी मुखेड नगर परिषद येथे आज नपाचे os गिरी साहेब यांना निवेदन देण्यात आले या वेळी निवेदन देताना भाई आसद बल्खी,भाई पांडुरंग लंगेवाड ,रऊफ मुल्ला,यासिर अराफत आदी उपस्थित होते2
- Post by Nanded_71