Shuru
Apke Nagar Ki App…
खूप आभाळ आलेली आहे पाऊस येण्याची खूप चान्सेस आहेत कृपया रानातून घराकडे येणे पाऊस येणार आहे
सुंदर भाऊसाहेब सोळंके
खूप आभाळ आलेली आहे पाऊस येण्याची खूप चान्सेस आहेत कृपया रानातून घराकडे येणे पाऊस येणार आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Balaji Vedpathak1
- ___ जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- लातूरच्या विवेकानंद चौकातील अर्धवट बांधलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून दारुड्याचा धिंगाणा; पोलिसांनी समजूत काढून उतरवले खाली. गुरुवार दि. 02 एप्रिल 2026. लातूर शहरातील विवेकानंद चौक येथे लातूर शहर महानगरपालिकेच्या ताब्यातील पाण्याच्या टाकीचे गुत्तेदाराने बांधकाम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित गुत्तेदाराने काम अपूर्ण ठेवून माघार घेतल्याने ही टाकी सध्या उघडी पडली असून, त्या ठिकाणी कोणतेही संरक्षणात्मक कंपाउंड नसल्यामुळे कोणीही सहजपणे टाकीवर चढू शकत आहे. पूर्व भागातील नागरिकांना पाणीटंचाई भासत असल्याने नवीन पाण्याची टाकी उभारण्याचे काम महानगरपालिकेने एका गुत्तेदाराला दिले होते. मात्र, काम अर्धवट सोडल्याने ही टाकी धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी तरुण मंडळी तसेच इतर नागरिक विनाकारण वर-खाली करत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, आज एका अज्ञात तरुणाने दारूच्या नशेत या अर्धवट टाकीवर चढून गोंधळ घातला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच विवेकानंद पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दारुड्या इसमाची समजूत काढून संबंधित तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवले. या घटनेमुळे अर्धवट बांधकामामुळे निर्माण झालेला धोका पुन्हा एकदा समोर आला असून, महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना कराव्यात तसेच अपूर्ण काम पूर्ण करून नागरिकांचा जीवित धोका टाळावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.1
- मल्हार योद्धा अनिल गोयकर यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 26 लोकप्रतिनिधींचा सत्काराचा अभूतपूर्व सोहळा लातूरात संपन्न1
- समृद्धी महामार्ग भीषण अपघात हृदयद्रावक व्हिडिओ - मृतांची संख्या आठवर... जालना जिल्ह्यातील जामवाडी शिवारात समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात ७ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता, तर ४ महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान, जखमींपैकी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता ८ झाली असल्याची माहिती सूत्रांनी रात्री उशिरा दिली.1
- धावत्या ऑटोने घेतला पेट परभणीच्या वसमत रोडवरील घटना...1
- परभणी शहरातील वसमत रोडवर पेट घेतलेला ऑटो आगीत जळून खाक1
- कर वसुलीत महापालिकेची धडाकेबाज कामगिरी एका दिवसात ४ कोटींचा रेकॉर्ड; लातूर महापालिकेची ७५ कोटींची ऐतिहासिक झेप...! व्यापाऱ्यांनी कर भरूना, सहकार्याचे आवाहन. शूरू ॲप, मराठी न्यूज. बुधवार दि. 01 एप्रिल 2026. लातूर महानगरपालिकेकडून एका दिवसात तब्बल ४ कोटी रुपयांचा कर संकलन करण्यात आला असून, एकूण वसुलीचा आकडा ७५ कोटींहून अधिक पार करण्यात यश आले आहे. या यशामागे महापालिकेचे कर्मचारी आणि सर्व संबंधितांनी घेतलेली अथक मेहनत कारणीभूत ठरली असल्याचे उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी सांगितले. महानगरपालिका प्रशासनाने ठेवलेले कर वसुलीचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले असून, आगामी काळातही कर वसुलीची मोहीम अधिक गतीने सुरू ठेवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शहरातील व्यापाऱ्यांनी स्वखुशीने कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे आणि अनावश्यक कारवाई टाळावी, असे आवाहनही उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी केले.1