नाशिकरोडमध्ये..................... ईद-ए-मिलाद उत्साहात : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलादचा सण नाशिकरोड परिसरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विविध मंडळांचे आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात सणाची जय्यत तयारी करण्यात आली होती. ठिकठिकाणी स्वागत कमानी, हिरवे पताके, झेंडे, आकर्षक विद्युत रोषणाई तसेच विविध देखावे उभारण्यात आले होते. बुधवारी सकाळी सुभाष रोड येथील गोसावीवाडी भागातील टायटॅनिक पॉईंट येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, संजय पिसे आदींनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. हिंद सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष निजाम सय्यद, माजी नगरसेवक अस्लम मणियार, तहसीन खान, मुन्ना अन्सारी, हनीफ शेख, इम्रान शेख, जावेद शेख, नदीम शेख, आरिफ शेख, वसीम शेख, साजिद शेख, सलीम शेख आदी उपस्थित होते. मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिटको पॉईंट, मुक्तीधाम, सत्कार पॉईंट, देवळाली गाव आणि विहितगाव मार्गे देवळाली गावातील गाडेकर मैदान येथे पोहोचली. तेथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मौलाना हाफिज तैसीन राजा यांच्या मार्गदर्शनाखाली देशात अमन-शांती कायम राहावी तसेच विविध जाती-धर्मांतील ऐक्य आणि बंधुभाव अबाधित राहावा, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. मौलाना हाजी इम्तियाज सय्यद, मौलाना अफसर, मोहम्मदिया सोशल ग्रुपचे हाजी इम्तियाज सय्यद, बबलू खान, इम्रान शेख, सिकंदर खान, समीर सय्यद, अजीम खान, नावेद पटेल, शदाब शेख, अमजद शेख, फारूक पटेल, राजू तांबोळी, सर्फराज शेख आदी उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. मिरवणुकीदरम्यान विविध सामाजिक व राजकीय मंडळांच्या वतीने चित्ररथांचे स्वागत करण्यात आले. मुस्लिम बांधवांना मिठाई तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. नगरसेवक योगेश गाडेकर, केशव पोरजे, कैलास मुदलियार, नगरसेविका रुचिरा साळवे, सीमा ताजने, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रिपाइंचे समीर शेख, रामबाबा पठारे, भारत निकम, आकाश भालेराव, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, विशाल गांगुर्डे, संतोष पाटील, बंटी कोरडे, शाम गोहाड, मंगेश लांडगे आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. या मिरवणुकीत हिंद सोशल ग्रुप, अंजुमन मोहम्मदिया ग्रुप, ख्वाजाजी के दिवाणे फ्रेंड सर्कल, चांद तारा ग्रुप, जम जम फाउंडेशन, सादिक हुसेनी ग्रुप, चिस्तिया फ्रेंड सर्कल, गुलाम-ए-नबी ग्रुप, रिजवी सोशल ग्रुप, उम्मत फाउंडेशन, गुलशन फ्रेंड सर्कल, अंजुमन हनफिया ग्रुप, हुसैनी फ्रेंड सर्कल आदी मंडळांनी सहभाग घेतला.
नाशिकरोडमध्ये..................... ईद-ए-मिलाद उत्साहात : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलादचा सण नाशिकरोड परिसरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विविध मंडळांचे आकर्षक चित्ररथ सहभागी झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात सणाची जय्यत तयारी करण्यात आली होती. ठिकठिकाणी स्वागत कमानी, हिरवे पताके, झेंडे, आकर्षक विद्युत रोषणाई तसेच विविध देखावे उभारण्यात आले होते. बुधवारी सकाळी सुभाष रोड येथील गोसावीवाडी भागातील टायटॅनिक पॉईंट येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी पोलिस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलिस आयुक्त अद्विता शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
जितेंद्र सपकाळे, संजय पिसे आदींनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. हिंद सोशल वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष निजाम सय्यद, माजी नगरसेवक अस्लम मणियार, तहसीन खान, मुन्ना अन्सारी, हनीफ शेख, इम्रान शेख, जावेद शेख, नदीम शेख, आरिफ शेख, वसीम शेख, साजिद शेख, सलीम शेख आदी उपस्थित होते. मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिटको पॉईंट, मुक्तीधाम, सत्कार पॉईंट, देवळाली गाव आणि विहितगाव मार्गे देवळाली गावातील गाडेकर मैदान येथे पोहोचली. तेथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मौलाना हाफिज तैसीन राजा यांच्या मार्गदर्शनाखाली देशात अमन-शांती
कायम राहावी तसेच विविध जाती-धर्मांतील ऐक्य आणि बंधुभाव अबाधित राहावा, यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. मौलाना हाजी इम्तियाज सय्यद, मौलाना अफसर, मोहम्मदिया सोशल ग्रुपचे हाजी इम्तियाज सय्यद, बबलू खान, इम्रान शेख, सिकंदर खान, समीर सय्यद, अजीम खान, नावेद पटेल, शदाब शेख, अमजद शेख, फारूक पटेल, राजू तांबोळी, सर्फराज शेख आदी उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. मिरवणुकीदरम्यान विविध सामाजिक व राजकीय मंडळांच्या वतीने चित्ररथांचे स्वागत करण्यात आले. मुस्लिम बांधवांना मिठाई तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. नगरसेवक योगेश गाडेकर, केशव पोरजे, कैलास मुदलियार, नगरसेविका
रुचिरा साळवे, सीमा ताजने, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रिपाइंचे समीर शेख, रामबाबा पठारे, भारत निकम, आकाश भालेराव, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, विशाल गांगुर्डे, संतोष पाटील, बंटी कोरडे, शाम गोहाड, मंगेश लांडगे आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. या मिरवणुकीत हिंद सोशल ग्रुप, अंजुमन मोहम्मदिया ग्रुप, ख्वाजाजी के दिवाणे फ्रेंड सर्कल, चांद तारा ग्रुप, जम जम फाउंडेशन, सादिक हुसेनी ग्रुप, चिस्तिया फ्रेंड सर्कल, गुलाम-ए-नबी ग्रुप, रिजवी सोशल ग्रुप, उम्मत फाउंडेशन, गुलशन फ्रेंड सर्कल, अंजुमन हनफिया ग्रुप, हुसैनी फ्रेंड सर्कल आदी मंडळांनी सहभाग घेतला.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रतिनिधी समाधान शिरसाठ मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेतर्फे सन 2003 साली नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचे कालांतराने ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. सदर कृषी महाविद्यालय हे नुकतेच दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील महाविद्यालयाची मुख्य इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृह अशा तीनही भव्य इमारतींचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे, अशी माहिती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे व सर्व शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार आमदार, नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव आणि मविप्र समाज समस्त कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक व विद्यार्थी यांची उपस्थिती असेल. नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्याची कृषी शिक्षणाची गरज व निकड या बाबींचा विचार करून मविप्र संस्थेने १ नोव्हेंबर २००३ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता कृषी शिक्षणाची कवाडे खुली केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा व विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष काम करता यावे, या उद्देशाने शहरातील कृषी महाविद्यालय दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतरित करण्यात आले. तब्बल १४ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या याच प्रशस्त अशा महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तसेच १४ एकर कॅम्पसमध्ये प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे सुसज्ज वसतीगृह उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये प्राचार्य कार्यालय, प्रशासकीय विभाग, सुसज्ज असे भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, सर्व १० विभागांच्या सुसज्ज, अद्ययावत परिपूर्ण अशा प्रयोगशाळा व शिक्षण साहित्य साधनांनीयुक्त व्याख्यान कक्ष, स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा, वायफाय व इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. चार वर्षांच्या बीएससी कृषी पदवी असलेल्या या कृषी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष १२० विद्यार्थी इतकी आहे. याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय व इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयसुद्धा सुरू आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी महाविद्यालयातील सर्व सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता तपासून महाविद्यालयास सन २०२२-२३ मध्ये ‘अ’ दर्जा प्रदान केला आहे. तसेच, सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’ यांच्यातर्फे महाविद्यालयास ‘कृषीभूषण-२०२४’ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘KRUSHITHON 2024’ मध्ये ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १० विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक व ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रात संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, यावर महाविद्यालयाचा जास्त भर आहे. शिक्षण संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांचा कृषी व आर्थिक विकास साधने हेच कृषी महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.2
- लासलगावात शेतकरी आक्रमक! ‘कांदा एक्स्प्रेस’ रोखली; सडलेल्या कांद्यावरून अधिकाऱ्यांना घेतले धारेवर नाशिक जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला आहे. एनसीसीएफ (NCCF) च्या कांदा खरेदी धोरणाविरोधात आणि कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट ‘कांदा एक्स्प्रेस’ अडवून रेल्वे रोको आंदोलन केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत लासलगाव स्थानकात कांदा घेऊन जाणारी ट्रेन अडवली. मध्य प्रदेशातून आणलेला आणि निकृष्ट/सडलेला कांदा दिल्लीला पाठवला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. शेतकर्यांच्या घरात चांगल्या दर्जाचा कांदा पडून असताना सडलेला कांदा का खरेदी केला जातोय, असा सवाल करत आंदोलकांनी एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना जागेवरच धारेवर धरले. आंदोलनादरम्यान गणेश निंबाळकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले "गेली पाच वर्षे प्रशासनाचा कारभार अपारदर्शक आहे. एनसीसीएफने कांदा खरेदी केंद्रे कुठे सुरू केली? हा कांदा कोणत्या शेतकऱ्यांकडून खरेदी केला? याची कोणतीही माहिती दिली जात नाही. शेतकऱ्यांच्या घरात फेब्रुवारी-मार्चमधील कांदा अजून सुरक्षित आहे, मग यांचा अवघ्या १५ दिवसांत खरेदी केलेला कांदा कसा सडला? दिल्लीला चांगलाच कांदा गेला पाहिजे, हीच आमची मागणी आहे." शेतकऱ्यांची मुख्य मागणी • सडलेला आणि निकृष्ट दर्जाचा कांदा दिल्लीला पाठवणे तत्काळ थांबवावे. • स्थानिक शेतकऱ्यांच्या घरातील चांगल्या दर्जाचा कांदा रास्त भावाने खरेदी करण्यात यावा. • कांदा खरेदी केंद्रांची आणि प्रक्रियेची माहिती पूर्णपणे पारदर्शक करावी.3
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक2
- शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य1
- दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .1
- माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा2
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक2
- बिहार गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है। इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें। S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें। गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है। इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें। S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें।1