महिला दिनानिमित्त आयोजित अस्मिता लीग धावण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी, दि. १० (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिन निमित्त मुली व महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मेरा युवा भारत परभणी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया अस्मिता लीग धावण्याची स्पर्धा ८ मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेसाठी १३ वर्षांखालील मुली, १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुली तसेच १८ वर्षांवरील मुली व महिला असे तीन वयोगट निश्चित करण्यात आले होते. या स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या शर्यती घेण्यात आल्या. तिन्ही वयोगटातील मुली व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण पोळे, सुयश नाटकर, जिल्हा क्रीडा संघटनेचे सचिव कैलास माने, राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे प्रतिनिधी रणजीत काकडे तसेच मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी शशांक राहुला उपस्थित होते. यावेळी दिपाली मुद्गलकर, सुषमा कुमावत, सारिका टेकाळे, शारदा पांचाळ व ज्योती गाडे यांचीही उपस्थिती होती. स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी खेळाडूंनाही प्रमाणपत्र देण्यात आले.
महिला दिनानिमित्त आयोजित अस्मिता लीग धावण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी, दि. १० (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिन निमित्त मुली व महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मेरा युवा भारत परभणी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया अस्मिता लीग धावण्याची स्पर्धा ८ मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेसाठी १३ वर्षांखालील मुली, १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुली तसेच १८ वर्षांवरील मुली व महिला असे तीन वयोगट निश्चित करण्यात आले होते. या स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या शर्यती घेण्यात आल्या. तिन्ही वयोगटातील मुली व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण पोळे, सुयश नाटकर, जिल्हा क्रीडा संघटनेचे सचिव कैलास माने, राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे प्रतिनिधी रणजीत काकडे तसेच मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी शशांक राहुला उपस्थित होते. यावेळी दिपाली मुद्गलकर, सुषमा कुमावत, सारिका टेकाळे, शारदा पांचाळ व ज्योती गाडे यांचीही उपस्थिती होती. स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी खेळाडूंनाही प्रमाणपत्र देण्यात आले.
- *धार रोड कचरा डेपोच्या जागेवर कचरा टाकने बंद करा धार रोड परिसरातील नागरिकांचे मनपा आयुक्तांना निवेदन*1
- तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.1
- जुने जे प्रकल्प आहेत ते बंद पडले आहेत त्यांना सुरू करण्यात यावे अशी मागणी हिकमत दादा उढान यांनी केली1
- Post by Parmeshor Khoje1
- जालना शहरातील आझाद मैदान परिसरात असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करण मोरे (वय १८, रा. खरपुडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक कोचिंग क्लासच्या इमारतीवर टँकरद्वारे पाणी चढवण्याचे काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काही नागरिकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यातही गर्दी केली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.1
- पुसरा येथील मेंढपाळ बांधव यांना मारहाण. वडवणी प्रतिनिधी- वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ बांधव लहू बीटे आणि बाबा बीटे यांना झालेली मारहाण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. गाडीचे झालेले नुकसान भरून दिल्यानंतरही, केवळ सत्तेच्या किंवा पैशाच्या माजातून गरीब मेंढपाळांना ढोरासारखे मारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. तातडीने गुन्हा दाखल: संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा. पोलीस अधीक्षक हस्तक्षेप: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची स्वतः दखल घेऊन पीडित मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- जय मल्हार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यापेक्षा मोठे आमच्यासाठी कोणीही नाही सर्व महापुरुष हे आमच्यासाठी आमचा मान अभिमान स्वाभिमान आणि सर्व काही आहेत आणि आज बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची खाडाखोड होत असताना आम्ही शांत बसणार नाही अनेक समाज बांधव यांचे मला फोन आले आणि 16 तारखेच्या आंदोलनाला माझी भूमिका काय राहील हे विचारली त्यांना माझे मी मत सांगतोय की मी वैयक्तिक किंवा यशवंत संघर्ष सेना 16 तारखेला मुंबईला जाणार नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे एसटी आरक्षणाची लढाई लढत असताना हे जाणीवपूर्वक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो टाकत नाहीत, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानामध्ये आरक्षण दिले आहे त्याच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावायला लाज वाटते उपकार विसरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावू शकत नाहीत स्व. बी. के. कोकरे साहेब यांना विसरले आपल्याच नेत्यांना शिव्या देणे सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या बांधवाना शिव्या देणे फक्त स्वतःच्या स्टंटबाजीसाठी समाज बांधवांचा जीव धोक्यात घालून आपलाच फोटो टाकून मुंबईला चला आणि परत माघारी फिरा या भूमिकेमुळे1
- सोनपेठ पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या निकिता अवचारे यांची निवड : उपसभापतीपदी पद्मसिंह देशमुख1