महिला दिनानिमित्त आयोजित अस्मिता लीग धावण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी, दि. १० (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिन निमित्त मुली व महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मेरा युवा भारत परभणी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया अस्मिता लीग धावण्याची स्पर्धा ८ मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेसाठी १३ वर्षांखालील मुली, १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुली तसेच १८ वर्षांवरील मुली व महिला असे तीन वयोगट निश्चित करण्यात आले होते. या स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या शर्यती घेण्यात आल्या. तिन्ही वयोगटातील मुली व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण पोळे, सुयश नाटकर, जिल्हा क्रीडा संघटनेचे सचिव कैलास माने, राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे प्रतिनिधी रणजीत काकडे तसेच मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी शशांक राहुला उपस्थित होते. यावेळी दिपाली मुद्गलकर, सुषमा कुमावत, सारिका टेकाळे, शारदा पांचाळ व ज्योती गाडे यांचीही उपस्थिती होती. स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी खेळाडूंनाही प्रमाणपत्र देण्यात आले.
महिला दिनानिमित्त आयोजित अस्मिता लीग धावण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद परभणी, दि. १० (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिन निमित्त मुली व महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मेरा युवा भारत परभणी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया अस्मिता लीग धावण्याची स्पर्धा ८ मार्च रोजी जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेसाठी १३ वर्षांखालील मुली, १३ ते १८ वर्षे वयोगटातील मुली तसेच १८ वर्षांवरील मुली व महिला असे तीन वयोगट निश्चित करण्यात आले होते. या स्पर्धेत १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या शर्यती घेण्यात आल्या. तिन्ही वयोगटातील मुली व महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कल्याण पोळे, सुयश नाटकर, जिल्हा क्रीडा संघटनेचे सचिव कैलास माने, राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे प्रतिनिधी रणजीत काकडे तसेच मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी शशांक राहुला उपस्थित होते. यावेळी दिपाली मुद्गलकर, सुषमा कुमावत, सारिका टेकाळे, शारदा पांचाळ व ज्योती गाडे यांचीही उपस्थिती होती. स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी खेळाडूंनाही प्रमाणपत्र देण्यात आले.
- महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद1
- परभणी (प्रतिनिधी) : परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर अनावश्यक ताण निर्माण करणारी पटपडताळणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी शिक्षकांनी आज अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी ढोल वाजवत निषेध नोंदवला.या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते. परीक्षा सुरू असताना पटपडताळणी केल्यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शिक्षकांनाही दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने तणाव वाढत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. “परीक्षा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशा वेळी प्रशासनाने पटपडताळणीसारखी प्रक्रिया राबवू नये. ती तातडीने थांबवून परीक्षा संपल्यानंतरच करावी,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केली.शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला. श1
- मराठी शाळा वाचवा! शिक्षक सेनेचे ढोलबजाव आंदोलन1
- Post by Mohsin ahmed khan1
- मोबाइल चोरी का विरोध करने पर युवक को चाकू मारा; CCTV फुटेज सामने आया छत्रपति संभाजीनगर: मुकुंदवाड़ी इलाके से सामने आई एक चौंकाने वाली घटना में, एक युवक को लुटेरों ने बेरहमी से चाकू मार दिया। युवक ने लुटेरों द्वारा उसका मोबाइल फोन छीनने की कोशिश का विरोध किया था। इस घटना ने शहर में सार्वजनिक सुरक्षा को लेकर चिंताएँ बढ़ा दी हैं।1
- महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अभाविप व विद्यार्थ्यांविषयी केलेल्या अपमानास्पद व धमकीजनक वक्तव्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) जालना शाखेच्या वतीने छेडण्यात आलेल्या “विद्यार्थी आत्मसन्मान आंदोलन” ला मोठा प्रतिसाद मिळाला. दिनांक ११ एप्रिल रोजी ‘पक्षी मित्र अभियान’ या उपक्रमादरम्यान संबंधित प्राचार्यांनी अभाविप व कार्यकर्त्यांविषयी अवमानकारक व अशोभनीय भाषा वापरली होती. तसेच, विद्यार्थ्यांनी याचा निषेध केल्यानंतर “तुमचे शैक्षणिक करिअर उद्ध्वस्त करीन” व “जीवे मारीन” अशा स्वरूपाच्या गंभीर धमक्या दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अभाविपने आक्रमक भूमिका घेत संस्थेच्या अध्यक्षांना निवेदन सादर केले होते. आंदोलनाची चाहूल लागताच प्राचार्य रजेवर निघून गेले असतांना सुद्धा आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता संबंधित प्राचार्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल व्हिडिओ कॉल वरून माफी मागितल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, संस्थेकडून या प्रकरणात उद्या योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचेही समजते. अभाविपची भूमिका पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात आली आहे: • प्राचार्यांची माफी ही सकारात्मक पाऊल असले तरी, केवळ माफी पुरेशी नाही • संबंधित प्राचार्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा • संस्थेकडून ठोस व पारदर्शक कारवाई करण्यात यावी यावेळी अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानावर कुठलाही आघात सहन केला जाणार नाही. आंदोलनानंतर प्राचार्यांनी माफी मागितली, ही बाब लक्षात घेतली आहे; मात्र इतक्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात केवळ माफी पुरेशी ठरत नाही. संस्थेकडून उद्या होणाऱ्या कारवाईकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. जर कारवाई समाधानकारक नसेल, तर अभाविप पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन उभारेल.” अभाविपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी लढा सुरूच राहील आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहील. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे, जालना जिल्हा संयोजक पवन नरवडे, शहर मंत्री गणेश बोंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.1
- हृदयद्रावक व अतिशय दुर्दैवी घटना; पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात आज गुरवारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना हारूनबाग भागात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरल्याने चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुलांना पाण्याची खोली लक्षात न आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मुलांचे बूट, चप्पल आणि गणवेश आढळून आले असून मृत मुलांचे वय ८ ते १२ वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुरू असलेल्या कामामुळे हा खड्डा तयार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महापालिका व पोलीस प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू आहे.1
- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1