राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने प्राचार्य अनिल देशमुख सन्मानित शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे एस. एस. शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अनिल देशमुख यांना “एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य” यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ (सर), मुंबईचे नगरसेवक अंकुश कदम, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे, जिल्हा प्रमुख मनीष काळजे, प्रकाश नांगरे, महेश चिवटे, मंगेश चिवटे यांच्या हस्ते देशमुख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्रीशैल पाटील यांच्यासह किलजे सर, कलशेट्टी सर, बिराजदार सर, व्ही. के. देशमुख सर, जाधव सर, बाळासाहेब कुळकर्णी सर, घुगरे सर, होटकर सर, मठपती सर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य अनिल देशमुख यांच्या शैक्षणिक नेतृत्वामुळे संस्थेचा शैक्षणिक दर्जा उंचावला असून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, शिस्त व नैतिक मूल्ये रुजविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल शिक्षण क्षेत्रातून व विविध स्तरांवरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने प्राचार्य अनिल देशमुख सन्मानित शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे एस. एस. शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अनिल देशमुख यांना “एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य” यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात प्रा. डॉ. बापूसाहेब आडसुळ (सर), मुंबईचे नगरसेवक अंकुश कदम, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे, जिल्हा प्रमुख मनीष काळजे, प्रकाश नांगरे, महेश चिवटे, मंगेश चिवटे यांच्या हस्ते देशमुख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्रीशैल पाटील यांच्यासह किलजे सर, कलशेट्टी सर, बिराजदार सर, व्ही. के. देशमुख सर, जाधव सर, बाळासाहेब कुळकर्णी सर, घुगरे सर, होटकर सर, मठपती सर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य अनिल देशमुख यांच्या शैक्षणिक नेतृत्वामुळे संस्थेचा शैक्षणिक दर्जा उंचावला असून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, शिस्त व नैतिक मूल्ये रुजविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला. या सन्मानाबद्दल शिक्षण क्षेत्रातून व विविध स्तरांवरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
- लातूर जिल्ह्यातील जवळगा वाडीत पाणी असूनही हँडपंप गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. दुरुस्ती न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे.2
- ज्ञानेश्वर विद्यालयाचा दहावी बोर्ड परीक्षेचा ९७.५७% दमदार निकाल लातूर, दि. 11 (प्रतिनिधी):- लातूर शहरातील शाहू चौक परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाने यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेचा एकूण निकाल तब्बल ९७.५७ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी आदर्श युवराज कांबळे आणि स्नेहा चक्रधर कारभारी या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वैष्णवी पानहळवे हिने ९९.६० टक्के गुण मिळवत द्वितीय, तर सृष्टी चव्हाण हिने ९९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील ४२ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांची संस्थाअध्यक्ष विक्रम गोजमगुंडे, उपाध्यक्ष प्रल्हाद दूडीले, सचिव डी.एन. शेळके, कोषाध्यक्ष विनायक पिनाटे, सहसचिव विठ्ठल इगे, संचालक प्रा. प्रकाशराव शिंगाडे, नाथराव कोल्हे माधवराव गोलावार अनिरुद्ध शेळके हरिचंद्र निर्मित डॉक्टर सोपानराव जटाळ चंदुलाल बलवा यांच्यासह प्राचार्य संजय मलवाडे उप प्राचार्य माधव क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत बैनगिरे, पूनम पाटील, संजय कासले, परीक्षा प्रमुख सुधाकर बुरगे, लिपिक अजय अरदवाड आदींनी कौतुक केले आहे. ज्ञानेश्वर विद्यालयाच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.1
- 📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात. अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू. 📍उदगीर च्या बामणी पाटी जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात. अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू. मृत्यू झालेला तरुण हैद्राबाद येथील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न1
- चित्रपट कलावंत विजय थलपतिया यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना लाखोंच्या जनतेसमोर पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.1
- सांगली जिल्ह्यात एका महावितरण कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्येमागचे कारण अद्याप गूढ आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.1
- प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया। 'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें', #pmmodi #devendrafadnavis #maharashtra #primenews83 #breakingnews #hindinews प्रधानमंत्री मोदी की अपील पर देवेंद्र फडणवीस की प्रतिक्रिया। 'जरूरत पड़ने पर ही ईंधन का इस्तेमाल करें',1
- Post by नागनाथ ससाने1
- लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याप्रकरणी न्यायालयाने तीन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित कुटुंबाला उशिरा का होईना न्याय मिळाला आहे.1