पांडाणेच्या देवनदीच्या पुलावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक दिंडोरी तालुक्यातील वनी ते सापुतारा रस्त्यावरील असलेल्या पांडाने गावाच्या देव नदीच्या पुलावरती मोटरसायकल व चार चाकी अपघात झाला असुन एक ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत .वणी-सापुतारा रस्त्यावर पांडाणेच्या देवनदीच्या पुलावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली. मोटरसायकल क्रमांक एमएच-१५ जेव्ही-१२५९ क्रमांकाची दुचाकी व एमएच-४१ एझेड-३४९८ क्रमांकाची कार या दोन्ही वाहनाची पांडाणे गावाजवळ समोरासमोर झाली. धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे . सदर अपघात झाल्यानंतर पांडाणे येथील ग्रामस्थ व रस्त्याने जाणारे प्रवासी यांनी जखमींना त्वरित मदत करून त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवले जखमी डॉक्टर रुग्णांवरती उपचार सुरू असून वणी पोलीस स्टेशनला अपघात त्याची नोंद करण्याचे काम सुरू आहे .
पांडाणेच्या देवनदीच्या पुलावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक दिंडोरी तालुक्यातील वनी ते सापुतारा रस्त्यावरील असलेल्या पांडाने गावाच्या देव नदीच्या पुलावरती मोटरसायकल व चार चाकी अपघात झाला असुन एक ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत .वणी-सापुतारा रस्त्यावर पांडाणेच्या देवनदीच्या पुलावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली. मोटरसायकल क्रमांक एमएच-१५ जेव्ही-१२५९ क्रमांकाची दुचाकी व एमएच-४१ एझेड-३४९८ क्रमांकाची कार या दोन्ही वाहनाची पांडाणे गावाजवळ समोरासमोर झाली. धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे . सदर अपघात झाल्यानंतर पांडाणे येथील ग्रामस्थ व रस्त्याने जाणारे प्रवासी यांनी जखमींना त्वरित मदत करून त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवले जखमी डॉक्टर रुग्णांवरती उपचार सुरू असून वणी पोलीस स्टेशनला अपघात त्याची नोंद करण्याचे काम सुरू आहे .
- भाविकांच्या सुविधेसाठी व्हिआयपी दर्शन ठराविक वेळेत विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांची माहिती अध्यक्षांचे जिल्हाधिकारी नाशिक यांना पत्र नाशिक :- त्रंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने जिल्हाधिकारी नाशिक यांना पत्राद्वारे माहिती कळवली.त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदीर दर्शन बद्दल मोठी अपडेट व्हिआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय, ठराविक वेळेत दर्शन घेता येणार1
- शेतकरी अन् दूध विक्रेत्याच्या वेशात रचला सापळा; २.८० लाखांच्या मुद्देमालासह ३ चोरट्यांना ठोकल्या बेड्या नाशिकरोड पोलिसांनी एकलहरा रोड भाजीपाला मार्केटमध्ये शेतकरी, दूध विक्रेता आणि मजुराची वेशभूषा करून रचलेल्या सापळ्यात तीन सराईत चोरटे रंगेहाथ जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून २ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या सूचनेनुसार गुन्हेगार व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी व घनदाट आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरूण गाडेकर, रोहीत शिंदे, गोकुळ कासार, योगेश रानडे हे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी गुन्हे शोध पथकातील पोलिस हवालदार विशाल पाटील व पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, २० ते २५ वयोगटातील तीन संशयित तरुण चोरीचा माल विक्री करण्यासाठी सिन्नर फाटा, एकलहरे रोडवरील भाजीपाला मार्केट येथे येत आहेत. आरोपी अत्यंत चलाख असल्याने, चोरीचा मुद्देमाल सुरक्षित जप्त करणे आणि चोरट्यांना रंगेहाथ पकडणे हे पोलिसांपुढे आव्हान होते. त्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ शेतकरी, दूध विक्रेते आणि मजुरांची वेशभूषा करून भाजी मार्केट परिसरात गुप्तपणे सापळा रचला. रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींवरून ३ संशयित आले. त्यांच्याजवळ टीव्ही आणि एसी दिसून आल्याने अन् त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, वेशभूषेत असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता चौहूबाजूंनी झेप घेत त्यांना ताब्यात घेतले. सोहील नासीर कुरेशी (वय २०, रा. सिद्धार्थ नगर, एकलहरा गेट, सामनगाव), चेतन उत्तम तांबे (वय २०, रा. सिद्धार्थ नगर, नाशिकरोड), सूरज सोपान पवार (वय २०, रा. सिद्धार्थ नगर, एकलहरा गेट, सामनगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांकडे चौकशी केली असता, त्यांनी हा टीव्ही आणि एसी एकलहरे कॉलनीतून चोरल्याची अन् तो विकण्यासाठी आल्याची कबुली दिली. नाशिकरोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. संशयितांकडून एसी व कॉम्प्रेसर मशीन, एलजी ४२ इंची टीव्ही, दोन मोटारसायक असा एकूण २,८०,००० मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास हवालदार भामरे आणि नाना पानसरे करत आहेत.4
- *येवल्याच्या पैठणीचा राष्ट्रीय गौरव.....मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पैठणी पर्यटन केंद्र, क्लस्टरच्या माध्यमातून पैठणी उद्योगाला नवी दिशा *येवला,दि.११ ऑगस्ट:-* महाराष्ट्राच्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेची जगभर ओळख निर्माण करणाऱ्या येवला पैठणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात आयोजित १२व्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘संत कबीर हातमाग पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय हातमाग पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आले. याच ऐतिहासिक सोहळ्यात महाराष्ट्राची अस्मिता आणि येवल्याच्या समृद्ध हातमाग परंपरेचे प्रतीक असलेल्या येवला पैठणीच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले. येवला पैठणीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे येवल्याच्या विणकर बांधवांच्या पिढ्यान्पिढ्यांच्या मेहनतीला मिळालेली राष्ट्रीय पावती आहे. येवला पैठणी ही केवळ एक साडी नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची, कलात्मकतेची आणि कुशल हातांची ओळख आहे. हातमागावर अत्यंत बारकाईने, संयमाने आणि कौशल्याने विणली जाणारी पैठणी आज देशाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. राष्ट्रपती भवनातून येवला पैठणीच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी होणे हा संपूर्ण येवल्याच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण आहे. येवल्याच्या हातमाग व्यवसायाला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. विणकर समाजातील कारागीरांनी आपल्या पूर्वजांकडून मिळालेली विणकामाची कला जपत ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविली आहे. पैठणीतील पारंपरिक नक्षीकाम, मोर, कमळ, आसावली, नारळी, मुनीया यांसारख्या विविध कलाकुसरीमुळे येवला पैठणीला देशभरात विशेष ओळख मिळाली आहे. विणकरांच्या हातातील कौशल्य, डिझाइनमधील बारकावे, रंगांची निवड आणि पारंपरिक तंत्राचा आधुनिक बाजारपेठेशी केलेला मेळ यामुळे येवला पैठणीने देशाच्या वस्त्रोद्योगात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आता या पैठणीचे चित्र टपाल तिकिटाच्या माध्यमातून देशभर पोहोचणार असल्याने येवला आणि येवला पैठणीची राष्ट्रीय ओळख आणखी भक्कम होणार आहे. येवल्याची ओळख देशाच्या वस्त्रोद्योगाच्या नकाशावर अधिक ठळक व्हावी आणि पैठणी उद्योगाला आधुनिक काळानुसार नवी दिशा मिळावी, यासाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ सातत्याने प्रयत्नशील आहेत. पैठणी हा येवल्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असून या उद्योगाशी हजारो विणकर, कारागीर, व्यापारी आणि विविध घटक जोडलेले आहेत. त्यामुळे पैठणी उद्योगाचा विकास म्हणजे केवळ एका पारंपरिक कलेचा विकास नसून हजारो कुटुंबांच्या रोजगाराला आणि आर्थिक स्थैर्याला बळ देणे आहे. याच दृष्टिकोनातून येवल्यातील पैठणी उद्योगाला आधुनिक सुविधा, बाजारपेठ, पर्यटन आणि रोजगाराशी जोडण्यासाठी विविध उपक्रमांना चालना देण्याचे काम मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. येवल्यात पैठणी पर्यटन केंद्र उभारण्याच्या माध्यमातून पैठणी विणकामाची प्रत्यक्ष प्रक्रिया पर्यटकांना अनुभवता यावी, पैठणी निर्मितीचा इतिहास आणि परंपरा समजावी तसेच स्थानिक कारागिरांना थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने प्रयत्न सुरू आहेत. पैठणी पर्यटन केंद्रामुळे येवल्याला केवळ पैठणी खरेदीचे केंद्र म्हणून नव्हे, तर ‘पैठणी नगरी’ म्हणून पर्यटनाच्या नकाशावर विकसित करण्यास मोठी मदत होत आहे. देश-विदेशातील पर्यटक येवल्यात आले, त्यांनी हातमागावर पैठणी तयार होताना पाहिली, कारागिरांशी संवाद साधला आणि थेट पैठणी खरेदी केली, तर त्याचा थेट फायदा विणकर व कारागिरांना होत आहे. पैठणी उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी पैठणी क्लस्टरची निर्मिती हा महत्त्वाचा टप्पा आहे. विणकरांना आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, डिझाइन विकास, कच्चा माल, उत्पादन, पॅकेजिंग आणि बाजारपेठ यांची सांगड घालून पैठणी उद्योग अधिक सक्षम करण्याचा मंत्री छगन भुजबळ यांचा प्रयत्न आहे. क्लस्टरच्या माध्यमातून स्थानिक विणकरांना संघटित स्वरूपात सुविधा मिळाल्यास उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यासोबतच नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील. पारंपरिक पैठणीचे जतन करताना आधुनिक ग्राहकांच्या आवडीनुसार नवीन डिझाइन व उत्पादन विकसित करण्यासही यामुळे चालना मिळणार आहे. येवल्यातील हातमाग कामगार आणि विणकरांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. विणकरांचे आर्थिक सक्षमीकरण, कौशल्यविकास, आधुनिक साधनसामग्री, प्रशिक्षण, कर्ज सुविधा, विमा आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत आहे.‘विणकर टिकला तर पैठणी टिकेल आणि पैठणी टिकली तर येवल्याची सांस्कृतिक ओळख टिकेल’, या भावनेतून विणकरांच्या अडचणी सोडवून त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रातून येवला पैठणीच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी झाल्यामुळे येवला पैठणीची राष्ट्रीय पातळीवरील ब्रँड ओळख आणखी मजबूत होणार आहे. या गौरवाचा उपयोग पैठणीला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी करणे गरजेचे आहे. ई-कॉमर्स, डिजिटल मार्केटिंग, प्रदर्शन, फॅशन डिझायनर्सशी सहकार्य, पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सवांच्या माध्यमातून येवला पैठणीला नव्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने मिळालेला हा सन्मान येवला पैठणी उद्योगाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल. आज राष्ट्रपती भवनात येवला पैठणीचा गौरव झाला असला तरी त्यामागे येवल्यातील असंख्य विणकर कुटुंबांच्या कष्टाचा, त्यागाचा आणि कौशल्याचा मोठा वाटा आहे. उन्हाळा-पावसाची तमा न बाळगता हातमागावर तासन्तास बसून कलाकुसर करणाऱ्या विणकरांच्या हातांना मिळालेला हा सन्मान आहे.राष्ट्रपती भवनातून जारी झालेले टपाल तिकीट म्हणजे येवला पैठणीच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणारा क्षण आहे. या राष्ट्रीय गौरवामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता, येवल्याची पैठणी परंपरा आणि विणकरांच्या कष्टाला देशभर नवी ओळख मिळणार आहे. आता या गौरवाला विकासाची जोड देत पैठणी पर्यटन केंद्र, पैठणी क्लस्टर, आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ विणकरांपर्यंत पोहोचवून येवला पैठणी उद्योगाला देशातील अग्रगण्य हातमाग उद्योग म्हणून विकसित करण्याची गरज आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना या राष्ट्रीय गौरवाची जोड मिळाल्याने येवल्याच्या पैठणी उद्योगाच्या विकासाला निश्चितच नवी ऊर्जा मिळणार आहे.1
- *भुसावळ मध्ये राहणाऱ्या तृतीय पंथीयांना गुंडांकडून मारहाण व दहा हजार रुपये हप्त्याची मागणी* *तृतीयपंथी यांच्या घरचा दरवाजा तोडून मारहाण* *भुसावळ मध्ये राहणाऱ्या तृतीय पंथीयांना गुंडांकडून मारहाण व दहा हजार रुपये हप्त्याची मागणी* *तृतीयपंथी यांच्या घरचा दरवाजा तोडून मारहाण* *भुसावळ मध्ये राहणाऱ्या तृतीयपंथी चाहत पाटील यांना व त्यांच्या सोबत राहणाऱ्या तृतीय पंथी सहकार्याला चाकूने भोसकून जीवे मारण्याच्या प्रयत्न या संदर्भात बाजारपेठ पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेलेल्या तृतीय पंथी यांना भुसावळ बाजार पेठ पोलिस स्टेशन मध्य धुंद अवस्थेत असलेले च अधिकारी यांनी सहकार्य न करता गुंडांची पाठराखन केल्याने, चाहत तृतीयपंथी न्याय मागण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे साहेब यांच ऑफिस गाठलं परंतु ऑफिस मध्ये अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी जिल्हा अधिकारी नियोजन भावनात चाललेल्या कार्यक्रम मध्ये असलेले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब यांच्याकडे न्याय मागायला आले असता पोलिसांनी त्यांना पोलीस अधीक्षक श्रीकांत जी धिवरे साहेबांना भेटू न देता ओढतान करून बाहेर काढल्याने न्याय न मिळाल्यास पेट्रोल टाकून जीवन संपवेल असं चहात तृतीयपंथीयांनी बोलताना सांगितलं पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे साहेब भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष1
- आदिवासी संस्कृतीचा जल्लोष; जव्हारमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा पारंपरिक तारपा नृत्य, ढोल-ताशांचा गजर अन् पद्मश्री भिकल्या लाडक्या घिंडा यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक आदिवासी संस्कृतीचा जल्लोष; जव्हारमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा पारंपरिक तारपा नृत्य, ढोल-ताशांचा गजर अन् पद्मश्री भिकल्या लाडक्या घिंडा यांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक दिव्य भारत बीएसएम न्यूज मोखाडा / प्रतिनिधी : अशोक मालक) जव्हार : आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला, लोकजीवन आणि सामाजिक एकजूट यांचा उत्स्फूर्त जागर घडवत जव्हार शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य मिरवणूक आणि पारंपरिक कलांचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेतील नागरिक, तारपा नृत्य करणारे युवक-युवती, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण जव्हार शहराला आदिवासी संस्कृतीचे रंग लाभले होते. जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी समाजाच्या हक्कांबरोबरच त्यांच्या संस्कृती, भाषा, परंपरा, कला आणि जीवनपद्धतीचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश देणारा महत्त्वाचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर जव्हारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक वेशभूषेतून संस्कृतीचे दर्शन जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जव्हार शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान केली होती. महिलांनी पारंपरिक दागिने व वेशभूषा परिधान करून सहभाग नोंदविला, तर युवक-युवतींनीही पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून आदिवासी संस्कृतीचा अभिमान व्यक्त केला. मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्यांचा निनाद, ढोल-ताशांचा गजर आणि तारपाच्या तालाने वातावरण भारावून गेले होते. तारपाच्या तालावर युवक-युवतींसह महिला व पुरुषांनी उत्स्फूर्तपणे नृत्य सादर केले. पारंपरिक नृत्य आणि वाद्यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या लोककलेचे प्रभावी दर्शन नागरिकांना घडले. तारपा नृत्याने वेधले नागरिकांचे लक्ष आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक जीवनात पारंपरिक नृत्य आणि वाद्यांना विशेष महत्त्व आहे. याच परंपरेचा जागर करत मिरवणुकीमध्ये तारपा नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. तारपाच्या तालावर एकसंधपणे सादर होणाऱ्या नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घेतला. नव्या पिढीला आपल्या पारंपरिक कला आणि संस्कृतीची ओळख व्हावी, तसेच आधुनिकतेच्या प्रवाहातही आपल्या सांस्कृतिक मुळांशी नाते कायम राहावे, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पद्मश्री भिकल्या लाडक्या घिंडा यांच्या स्मृतींना अभिवादन या सोहळ्यात आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि संस्कृतीच्या जतनासाठी योगदान देणाऱ्या थोर व्यक्ती, समाजसुधारक आणि महनीय व्यक्तींच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. विशेषतः पद्मश्री भिकल्या लाडक्या घिंडा यांच्या पुतळ्याची पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. पद्मश्री भिकल्या लाडक्या घिंडा यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्यातून आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरा, लोककला आणि सामाजिक जाणीव यांना मिळालेल्या प्रेरणेचे स्मरण यावेळी करण्यात आले. पुतळ्याच्या मिरवणुकीत महिला, पुरुष, युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामुळे मिरवणुकीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. विविध पारंपरिक कलांचे सादरीकरण, घोषणांनी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. नव्या पिढीला संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न आदिवासी समाजाची संस्कृती ही केवळ परंपरांचा संग्रह नसून ती निसर्गाशी असलेले नाते, सामूहिक जीवनपद्धती, लोककला, लोकगीत, नृत्य, बोलीभाषा आणि सामाजिक मूल्ये यांचा समृद्ध वारसा आहे. आधुनिक काळात बदलत्या जीवनशैलीमुळे पारंपरिक कला आणि प्रथा हळूहळू मागे पडत असताना अशा सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त होते. जागतिक आदिवासी दिनाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला. युवक-युवती आणि लहान मुलांचा कार्यक्रमातील सहभाग हा विशेष आकर्षणाचा विषय ठरला. एकजुटीचे दर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने जव्हारमधील आदिवासी समाजाची सांस्कृतिक आणि सामाजिक एकजूटही प्रकर्षाने दिसून आली. विविध स्तरांतील नागरिकांनी एकत्र येऊन जागतिक आदिवासी दिन साजरा केला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याने कार्यक्रमाला व्यापक लोकसहभाग लाभला. मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांनी मोठ्या उत्सुकतेने पारंपरिक नृत्य, वेशभूषा आणि सांस्कृतिक सादरीकरणाचा आनंद घेतला. पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचणाऱ्या नागरिकांमुळे शहरातील वातावरणात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आदिवासी अस्मितेचा जागर जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी समाजाच्या अस्मितेचा, अधिकारांचा आणि सांस्कृतिक वारशाचा जागर करणारा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. जव्हारमध्ये झालेल्या या सोहळ्यातूनही आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरेचा अभिमान व्यक्त करण्यात आला. आपली संस्कृती, भाषा, लोककला आणि परंपरा जपणे ही प्रत्येक पिढीची जबाबदारी आहे. त्यासाठी नव्या पिढीने आपल्या सांस्कृतिक वारशाशी जोडले जाणे आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांमुळे तरुण पिढीमध्ये आपल्या संस्कृतीविषयी अभिमान निर्माण होतो आणि पारंपरिक कला पुढे नेण्यासाठी प्रेरणा मिळते. जव्हार शहरात दिवसभर उत्साहाचे वातावरण जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जव्हार शहरात दिवसभर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. पारंपरिक वेशभूषा, नृत्य, वाद्यांचा गजर आणि नागरिकांचा मोठा सहभाग यामुळे शहराला जणू सांस्कृतिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या सोहळ्यामुळे जव्हारच्या आदिवासी संस्कृतीची समृद्ध परंपरा, लोककला आणि सामाजिक एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित झाली. आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत त्याचा वारसा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने आवश्यकता असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने जव्हारमध्ये झालेला हा सांस्कृतिक सोहळा आदिवासी अस्मिता, परंपरा आणि एकजुटीचा उत्स्फूर्त उत्सव ठरला. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” प्रतिनिधी :अशोक मालक2
- नाशिक मध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा कला संस्कृतीचे दर्शन नाशिकमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; पारंपरिक कला-संस्कृतीचे अनोखे दर्शन नाशिक : जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक शहरातील विविध ठिकाणी आदिवासी संस्कृतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.नगरसेवक किरण भाऊ राजवाडे यांचे संपर्क कार्यालया लगत सिहस्थनगर सिडको येथे ठाकर समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात परंपरा, संस्कृती आणि लोककलेचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी जननायक बिरसा मुंडा, स्वातंत्र्यसेनानी राघोजी भांगरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ठाकर समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून लोकनृत्य, पारंपरिक गीत आणि विविध सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले. जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेले आदिवासी समाजाचे अतूट नातेही या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले. आयोजक नगरसेवक किरण भाऊ राजवाडे यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. आदिवासी समाजाची समृद्ध कला, परंपरा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. नाशिक प्रतिनिधी — सचिन देवरे.2
- विंचूरमध्ये संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न निफाड तालुक्यातील विंचूर येथील श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिरात संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. ३ ते १० ऑगस्टदरम्यान आयोजित या सप्ताहात अखंड हरिनाम, महिलांचे भजन, हरिपाठ तसेच कीर्तनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे किरण नवले दांपत्याच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर ह.भ.प. संगीतामाई गुंजाळ (लासलगाव) यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी संत नामदेव महाराजांच्या पालखीची भव्य दिंडी काढण्यात आली. या दिंडीत ह.भ.प. सुवर्णाताई जमदाडे यांच्या ज्ञानराज वारकरी संस्थेतील ६० विद्यार्थ्यांसह शिंपी समाज बांधव, वारकरी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीमुळे विंचूर परिसर भक्तिमय झाला होता. हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त शिंपी समाज तसेच विंचूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. श्री संत नामदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने किरण नवले यांनी उपस्थित भाविक, वारकरी, ग्रामस्थ व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.3
- पांडाणेच्या देवनदीच्या पुलावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक दिंडोरी तालुक्यातील वनी ते सापुतारा रस्त्यावरील असलेल्या पांडाने गावाच्या देव नदीच्या पुलावरती मोटरसायकल व चार चाकी अपघात झाला असुन एक ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत .वणी-सापुतारा रस्त्यावर पांडाणेच्या देवनदीच्या पुलावर सायंकाळी साडेचारच्या सुमारास कार आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळून खाक झाली. मोटरसायकल क्रमांक एमएच-१५ जेव्ही-१२५९ क्रमांकाची दुचाकी व एमएच-४१ एझेड-३४९८ क्रमांकाची कार या दोन्ही वाहनाची पांडाणे गावाजवळ समोरासमोर झाली. धडक एवढी जोरदार होती की, या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे . सदर अपघात झाल्यानंतर पांडाणे येथील ग्रामस्थ व रस्त्याने जाणारे प्रवासी यांनी जखमींना त्वरित मदत करून त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवले जखमी डॉक्टर रुग्णांवरती उपचार सुरू असून वणी पोलीस स्टेशनला अपघात त्याची नोंद करण्याचे काम सुरू आहे .1