ऊस हार्वेस्टर मालकाकडून शेतकऱ्यावर अमानुष मारहाण ऊस हार्वेस्टर मालकाकडून शेतकऱ्यावर अमानुष मारहाण ! घनसावंगी तालुक्यातील घटना.. पैसे देऊनही रोख मागणी; डोळ्याखाली गंभीर दुखापत - केवळ एनसीआर नोंदीवर प्रकरण मिटवण्याचा आरोप ओमप्रकाश उढाण जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शेवगळ येथे ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचे पैसे दिल्यानंतरही रोख रकमेची मागणी करत शेतकऱ्यावर अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे ४.४५ वाजता घडली. या प्रकरणी शेतकरी गौतम हरिदास अटकळ (वय ३५, रा. शेवगळ, ता. घनसावंगी, जि. जालना) यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, अटकळ यांच्या शेवगळ शिवारातील गट क्रमांक ३१ मध्ये ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मशीन कार्यरत होते. संबंधित मशीन मालक सुदर्शन उद्धव शिंदे (रा. चापडगाव, ता. घनसावंगी) यांनी हार्वेस्टर खर्चाच्या नावाखाली नगदी रकमेची मागणी केली. अटकळ यांनी कारखान्याकडूनच कंत्राटदाराला संपूर्ण देयक दिले जाते, तसेच उचल रक्कम ऊस बिलातून वजा केली जाते; मग रोख पैसे का? असा प्रश्न उपस्थित केला. फोनपे व्यवहार न झाल्याने शेतकऱ्याने खिशातील १,००० रुपये रोख दिले व उर्वरित रक्कम देण्याचे सांगितले. यावरून वाद वाढला आणि आरोपीने शिवीगाळ करत शेतकऱ्याला जमिनीवर पाडून पोट, छाती व तोंडावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीमध्ये डोळ्याखाली गंभीर जखम होऊन रक्तस्राव झाला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घटनेवेळी उपस्थित असलेल्या भास्कर शेषराव लोंढे यांनाही शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. याबाबत घनसावंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम 115(2), 352 आणि 351(2) अन्वये असंज्ञेय अपराध (NCR) नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. माहिती रात्री ९.३६ वाजता पोलीस ठाण्यात प्राप्त झाली. मात्र जखम, धमकी आणि मारहाणीचे स्वरूप गंभीर असताना केवळ एनसीआरवर प्रकरण मर्यादित ठेवणे हे आश्चर्यकारक असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.. ऊस तोडणी व हार्वेस्टर खर्चाबाबत कारखान्याकडून कंत्राटदाराला थेट देयक दिले जाते, अशी पद्धत असताना शेतकऱ्यांकडून रोख रकमेची मागणी कोणाच्या अधिकाराने केली जाते, हा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित साखर कारखान्याने याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. घटनेमुळे शेवगळ परिसरात संतापाचे वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्रशासनाने तत्काळ ठोस कारवाई करून शेतकऱ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रतिक्रिया :- हा केवळ पैशांचा प्रश्न नाही; हा शेतकऱ्याच्या सन्मानाचा प्रश्न आहे. प्रशासनाने तात्काळ योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करावी. कारखाना प्रशासनाने करार व देयकांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी. शेतकऱ्यांकडून होणारी बेकायदेशीर वसुली त्वरित थांबवावी, - रामप्रसाद खरात, प्रदेश सरचिटणीस, राजीव गांधी पंचायत राज संघटना
ऊस हार्वेस्टर मालकाकडून शेतकऱ्यावर अमानुष मारहाण ऊस हार्वेस्टर मालकाकडून शेतकऱ्यावर अमानुष मारहाण ! घनसावंगी तालुक्यातील घटना.. पैसे देऊनही रोख मागणी; डोळ्याखाली गंभीर दुखापत - केवळ एनसीआर नोंदीवर प्रकरण मिटवण्याचा आरोप ओमप्रकाश उढाण जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील शेवगळ येथे ऊस तोडणीसाठी हार्वेस्टरचे पैसे दिल्यानंतरही रोख रकमेची मागणी करत शेतकऱ्यावर अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे ४.४५ वाजता घडली. या प्रकरणी शेतकरी गौतम हरिदास अटकळ (वय ३५, रा. शेवगळ, ता. घनसावंगी, जि. जालना) यांनी घनसावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, अटकळ यांच्या शेवगळ शिवारातील गट क्रमांक ३१ मध्ये ऊस तोडणीसाठी हार्वेस्टर मशीन कार्यरत होते. संबंधित मशीन मालक सुदर्शन उद्धव शिंदे (रा. चापडगाव, ता. घनसावंगी) यांनी हार्वेस्टर खर्चाच्या नावाखाली नगदी रकमेची मागणी केली. अटकळ यांनी कारखान्याकडूनच कंत्राटदाराला संपूर्ण देयक दिले जाते, तसेच उचल रक्कम ऊस बिलातून वजा केली जाते; मग रोख पैसे का? असा प्रश्न उपस्थित केला. फोनपे व्यवहार न झाल्याने शेतकऱ्याने खिशातील १,००० रुपये रोख दिले व उर्वरित रक्कम देण्याचे सांगितले. यावरून वाद वाढला आणि आरोपीने शिवीगाळ करत शेतकऱ्याला जमिनीवर पाडून पोट, छाती व तोंडावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीमध्ये डोळ्याखाली गंभीर जखम होऊन रक्तस्राव झाला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घटनेवेळी उपस्थित असलेल्या भास्कर शेषराव लोंढे यांनाही शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. याबाबत घनसावंगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत कलम 115(2), 352 आणि 351(2) अन्वये असंज्ञेय अपराध (NCR) नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. माहिती रात्री ९.३६ वाजता पोलीस ठाण्यात प्राप्त झाली. मात्र जखम, धमकी आणि मारहाणीचे स्वरूप गंभीर असताना केवळ एनसीआरवर प्रकरण मर्यादित ठेवणे हे आश्चर्यकारक असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.. ऊस तोडणी व हार्वेस्टर खर्चाबाबत कारखान्याकडून कंत्राटदाराला थेट देयक दिले जाते, अशी पद्धत असताना शेतकऱ्यांकडून रोख रकमेची मागणी कोणाच्या अधिकाराने केली जाते, हा प्रश्न उपस्थित होत आहे. संबंधित साखर कारखान्याने याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. घटनेमुळे शेवगळ परिसरात संतापाचे वातावरण असून शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. प्रशासनाने तत्काळ ठोस कारवाई करून शेतकऱ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रतिक्रिया :- हा केवळ पैशांचा प्रश्न नाही; हा शेतकऱ्याच्या सन्मानाचा प्रश्न आहे. प्रशासनाने तात्काळ योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करावी. कारखाना प्रशासनाने करार व देयकांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी. शेतकऱ्यांकडून होणारी बेकायदेशीर वसुली त्वरित थांबवावी, - रामप्रसाद खरात, प्रदेश सरचिटणीस, राजीव गांधी पंचायत राज संघटना
- अंबड–घनसावंगी मार्गावर ऊसाचे ट्रॅक्टर पलटी; जिनिंगसमोर उस सांडल्याने वाहतूक ठप्प.. घनसावंगी ते अंबड मुख्य रस्त्यावर सूतगिरणीच्या पुढे जिनिंग जवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना आज १८ फेब्रुवारी बुधवारी सायंकाळी घडली. या अपघातामुळे संपूर्ण रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद झाला असून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या1
- *जालना* हिजाब घालून काही परीक्षार्थी विद्यार्थिनी परीक्षा केंद्रावर आल्याने गोंदळ... जालना शहरातील परीक्षा केंद्रावरील प्रकार.. समाज व धर्म पाहून विद्यार्थ्यांवर दबाव तंत्र वापरू नका.. एमआयएम पदाधिकाऱ्याचा बारावी परीक्षा केंद्रावरील शिक्षकांना व जिल्हाधिकाऱ्यांना विनंती..1
- बच्चा चोरीची घटना CCTV कैमऱ्यात कैद1
- मंठा येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तारीख 17, फेब्रुवारी वार मंगळवार रोजी छत्रपती संभाजी राजे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकशी भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी नृत्य पथकाच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या गौरवशाली गीतावर नृत्य सादर करण्यात आले.1
- छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती; संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती निमित्त रक्तदान शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले रक्तदान हे जीवनदान रक्तदान प्रतिज्ञा वाढवणे जरुरी असून गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे असे प्रतिपादन तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी केले. शिवसेना (शिंदे) गट व शिवमुद्रा प्रतिष्ठान मंठा तालुका वतीने येथील प्रल्हादराव बोराडे कॉम्प्लेक्स येथे दिनांक १९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ वी जयंती निमित्ताने आणि संत सेवालाल महाराज यांच्या २८७ व्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना बोराडे म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते कारण ते एखाद्याला नवीन जीवन देऊ शकते एका वेळेच्या रक्तदानातून तीन जणांचे प्राण वाचू शकतात.१८ ते ६५ व्ययोगटातील निरोगी व्यक्तीने दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकते ज्यामुळे रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते हृदयविकाराचा धोका कमी होतो रक्तदान हे सुरक्षित असून यातून कोणतेही कायमस्वरूपी नुकसान होत नाही या उलट रक्तदानातून मानवता निर्माण होते असे बोराडे म्हणाले. यावेळी आदर्श ब्लड सेंटरच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले एकुण 96 रक्त दात्यांनी रक्तदान केले.यावेळी रामराव वरकड, योगेश पाटील अवचार,भगवान गायकवाड,दिपक गायकवाड, एडवोकेट राजेश खरात, डॉक्टर संतोष पवार, अक्षय दीप वाघमारे, भीमराव वाघ, दिलीपराव हिवाळे, दत्तात्रय बोराडे, अमोल विरकर, बाळासाहेब देशमुख, माऊली वायाळ, शैलेश मोरे, रतन कळणे, पप्पू बोराडे, गोपीनाथ डेंगळे, विलास बनसोडे, पांडुरंग बोराडे, नाना बोराडे, नाथा दिवटे, विनोद खरात, पिराजी पवळे, सतीश वायाळ, राम वरकुटे, रवी डहाळे, पवन मगर, अलीम कुरेशी, पवन वाघमारे, लिंबाजी बोराडे, भगवान बोराडे, दत्ता खरात, विष्णूपंत मोरे, भरत नरोटे, राम नरोटे उपस्थित होते..1
- मुंबई की एक्ट्रेस प्रिया बक्शी को 14 फरवरी 2026 की रात बांद्रा में एक ऑटो ड्राइवर के हाथों डरावने पल का सामना करना पड़ा। ड्राइवर ने कथित तौर पर अनजान रास्ता पकड़ लिया और प्रिया ने वीडियो बनाकर अपनी घबराहट जाहिर की। उन्होंने सुरक्षा को लेकर सवाल उठाए और नॉर्थ इंडियन होने पर भेदभाव का आरोप लगाया।1
- सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती रा.प. पाथरी आगार1
- पोलीस ठाणे तीर्थपुरी हद्दीत डिजे-मुक्त शिवजयंती साजरी होणार ! सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांचे आवाहन; १८ फेब्रुवारी रोजी शांतता बैठक संपन्न ओमप्रकाश उढाण १९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे तीर्थपुरी येथे १८ फेब्रुवारी रोजी शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गावांमध्ये डिजे-मुक्त शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण सर्वांनी डीजे मुक्त शिवजयंती साजरी करावी. शिवजयंती उत्सव हा केवळ उत्साहाचा नव्हे तर समाजप्रबोधनाचा सण आहे. समाजहिताचे उपक्रम हाती घेऊन सर्व कुटुंबांना पाहता येतील, प्रेरणादायी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्यांनी पुढे नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या जीवनात जपलेले शौर्य, न्यायप्रियता, स्त्रीसन्मान, संघटन कौशल्य आणि स्वराज्याची भावना यांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. त्यांच्या विचारांनुसार कृती केल्यासच शिवजयंती साजरी करण्याचा खरा अर्थ साध्य होईल. लहान बालकांमध्येही शिवचरित्राचे बाळकडू रुजवून ते आचरणात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, असे आवाहन त्यांनी केले. शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीस गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिवजयंती कमिटी सदस्य, व्यापारी बंधु, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.1