शिरूर/पुणे ती आली… तिने पाहिलं… अलगद उचललं… आणि घेऊन गेली! एकीकडे बिबट्याची दहशत, दुसरीकडे टाकळी भीमात सुखद पुनर्मिलन पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात जिथे रोज बिबट्याच्या हालचालींमुळे शेतकरी आणि नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत,मात्र याच शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा परिसरात निसर्गाने एक वेगळाच दिलासा देणारा क्षण दाखवला... रात्र शांत होती… शेतशिवारात अंधार पसरलेला होता… आणि अचानक ती आली… थांबली. पाहिलं. क्षणभर आजूबाजूला नजर फिरवली… आणि मग अलगद आपल्या बछड्याला उचललं. थोडं पुढे नेलं. पुन्हा परत आली. दुसरं पिल्लू उचललं. आणि अंधारात नाहीशी झाली. हा प्रसंग कुठल्याही चित्रपटातील नव्हता.तर शिरूर वनविभाग आणि निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या प्रयत्नातून घडलेला निसर्गाचा जिवंत क्षण होता. शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा येथे उसतोड सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. त्यानंतर वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या वतीने या बछड्यांना सुरक्षित ठेवण्यात आले. बछड्यांना हात न लावता, परिसरात रात्री शांतता राखत त्यांच्या आईला परत येण्याची संधी देण्यात आली.त्या ठिकाणी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात रात्रीच्या सुमारास बिबट मादी येऊन आपल्या दोन्ही बछड्यांना सुरक्षितपणे उचलून सुरक्षितस्थळी घेऊन जात असल्याचे स्पष्टपणे कैद झाले. एकीकडे रोज बिबट्याची दहशत, शेतशिवारात भीतीचे वातावरण,आणि दुसरीकडे कोणताही संघर्ष न होता, कोणतीही हानी न होता घडलेले हे सुखद पुनर्मिलन. या घडलेल्या प्रसंगातून समाजाला एक महत्त्वाचा संदेश मात्र मिळतो, घाई, गोंधळ आणि अनावश्यक हस्तक्षेप टाळला, तर निसर्गही आपली जबाबदारी स्वतः पार पाडतो.. टाकळी भीमाच्या शेतशिवारात त्या रात्री केवळ बिबट मादीच आपल्या बछड्यांसह निघून गेली नाही,तर भीतीच्या वातावरणात आशेचा एक क्षण मागे ठेवून गेली,असेच म्हणावे लागेल.
शिरूर/पुणे ती आली… तिने पाहिलं… अलगद उचललं… आणि घेऊन गेली! एकीकडे बिबट्याची दहशत, दुसरीकडे टाकळी भीमात सुखद पुनर्मिलन पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यात जिथे रोज बिबट्याच्या हालचालींमुळे शेतकरी आणि नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत,मात्र याच शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा परिसरात निसर्गाने एक वेगळाच दिलासा देणारा क्षण दाखवला... रात्र शांत होती… शेतशिवारात अंधार पसरलेला होता… आणि अचानक ती आली… थांबली. पाहिलं. क्षणभर आजूबाजूला नजर फिरवली… आणि मग अलगद आपल्या बछड्याला उचललं. थोडं पुढे नेलं. पुन्हा परत आली. दुसरं पिल्लू उचललं. आणि अंधारात नाहीशी झाली. हा प्रसंग कुठल्याही चित्रपटातील नव्हता.तर शिरूर वनविभाग आणि निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या प्रयत्नातून घडलेला निसर्गाचा जिवंत क्षण होता. शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा येथे उसतोड सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. त्यानंतर वनविभाग व निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या वतीने या बछड्यांना सुरक्षित ठेवण्यात आले. बछड्यांना हात न लावता, परिसरात रात्री शांतता राखत त्यांच्या आईला परत येण्याची संधी देण्यात आली.त्या ठिकाणी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात रात्रीच्या सुमारास बिबट मादी येऊन आपल्या दोन्ही बछड्यांना सुरक्षितपणे उचलून सुरक्षितस्थळी घेऊन जात असल्याचे स्पष्टपणे कैद झाले. एकीकडे रोज बिबट्याची दहशत, शेतशिवारात भीतीचे वातावरण,आणि दुसरीकडे कोणताही संघर्ष न होता, कोणतीही हानी न होता घडलेले हे सुखद पुनर्मिलन. या घडलेल्या प्रसंगातून समाजाला एक महत्त्वाचा संदेश मात्र मिळतो, घाई, गोंधळ आणि अनावश्यक हस्तक्षेप टाळला, तर निसर्गही आपली जबाबदारी स्वतः पार पाडतो.. टाकळी भीमाच्या शेतशिवारात त्या रात्री केवळ बिबट मादीच आपल्या बछड्यांसह निघून गेली नाही,तर भीतीच्या वातावरणात आशेचा एक क्षण मागे ठेवून गेली,असेच म्हणावे लागेल.
- काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद https://dailynewspost24.com/?p=54154
- सांगलीत सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून भोसकून निर्घृण खून;1
- भोरला ट्रॅफिक जाम ; रविवार सुट्टी आणि मांढरदेवी यात्रेमूळे वाहनांच्या लांबच लांब रांगा विक्रम शिंदे /भोर दि.11 भोर - कापूरव्होळ मार्गावर बुववासाहेबवाडी ते भोर आणि पुढे रामबाग ते चौपाटी दरम्यान सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भोरमार्गे वाई तालुक्यातील मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शना खाली ट्रॅफिक पोलीस सुनील चव्हाण कर्तव्यावर असून वाहतूक नियमन करण्याचे काम बिनचूक करत आहेत.1
- सावधान ! नायलॉन मांजा विकणाऱ्यांचे धाबे दणाणले; येवल्यात शहर पोलिसांकडून १०४ रोलचा साठा जप्त. प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1
- हेडलाइन: वार्ड क्रमांक 95 से शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट के उम्मीदवार एडवोकेट हरी शास्त्री को मिला ज़बरदस्त जनसमर्थन विस्तृत समाचार: मुंबई के वार्ड क्रमांक 95 में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट के उम्मीदवार एडवोकेट हरी शास्त्री को जनता का भारी समर्थन मिलता नज़र आ रहा है। चुनावी जनसंपर्क अभियान के दौरान एडवोकेट हरी शास्त्री ने वार्ड के विभिन्न इलाकों का दौरा कर स्थानीय नागरिकों से सीधा संवाद किया और उनकी समस्याओं को गंभीरता से सुना। इस दौरान स्थानीय नागरिकों ने सड़क, पानी, साफ़-सफाई, स्वास्थ्य सेवाएं और युवाओं के रोजगार जैसे मुद्दों को प्रमुखता से सामने रखा। एडवोकेट हरी शास्त्री ने सभी समस्याओं के समाधान का भरोसा दिलाते हुए कहा कि जनता की आवाज़ को मनपा और सदन तक मजबूती से पहुंचाना ही उनकी पहली प्राथमिकता होगी। जनता ने उनके सरल स्वभाव, साफ़ छवि और सामाजिक कार्यों के अनुभव की सराहना करते हुए खुलकर समर्थन जताया। कई नागरिकों ने कहा कि एडवोकेट हरी शास्त्री ही ऐसे उम्मीदवार हैं जो वार्ड के विकास को नई दिशा दे सकते हैं। पूरे वार्ड में चुनाव को लेकर उत्साह का माहौल है और जिस तरह से लोगों का समर्थन मिल रहा है, उससे यह साफ़ दिखाई दे रहा है कि वार्ड 95 में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट की स्थिति मज़बूत होती जा रही है। जनसमर्थन के इस बढ़ते कारवां से चुनावी मुकाबला और भी दिलचस्प बन गया है।1
- SpiceJet Faces Serious Allegations as Passenger Files ₹1 Crore Defamation Complaint in Varanasi #SpiceJet #SpiceJetNews #FlightDiversion #AviationNews #PassengerRights #AirlineNegligence #MentalHarassment #DefamationCase #VaranasiNews #LucknowAirport #BreakingNews #IndianAviation #स्पाइसजेट #यात्रीअधिकार #एयरलाइनलापरवाही #वाराणसीखबर #लखनऊ #ब्रेकिंगन्यूज़ #यात्रीपरेशान #हककीआवाज़ #SpiceJetFlight #SG329 #VaranasiBreaking1
- “प्रभाग २८ चा विकास, विश्वास आणि हक्क – मशाल चिन्हासोबत Please Subscribe My Channel Mi Marathi India1
- Post by विशेष तपास न्युज1