उद्घाटनापूर्वीच बस स्थानक गळू लागले; १३ कोटींवर पाणी?प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर उद्घाटनापूर्वीच बस स्थानक गळू लागले; १३ कोटींवर पाणी?.. बीड शहरात नव्याने उभारण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे बस स्थानक उद्घाटनापूर्वीच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नुकत्याच झालेल्या पावसात बस स्थानकाच्या छतावरील विद्युत दिव्यांमधून थेट पाणी गळू लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या बस स्थानकात पावसाचे पाणी थेट लाईट्समधून खाली येत असल्याने बसची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. करंट लागण्याच्या भीतीमुळे प्रवाशांना बसण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, याच पावसात शहरात नव्याने बसवण्यात आलेले काही सिग्नलही कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील विविध विकासकामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, एकामागून एक निकृष्ट कामे उघडकीस येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नवीन कामांचे टेंडर मिळताच काही ठेकेदार आणि संबंधित यंत्रणा आर्थिक लाभाकडे अधिक लक्ष देतात, मात्र कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच बस स्थानकातील तांत्रिक त्रुटी तात्काळ दुरुस्त करून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
उद्घाटनापूर्वीच बस स्थानक गळू लागले; १३ कोटींवर पाणी?प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर उद्घाटनापूर्वीच बस स्थानक गळू लागले; १३ कोटींवर पाणी?.. बीड शहरात नव्याने उभारण्यात आलेले कोट्यवधी रुपयांचे बस स्थानक उद्घाटनापूर्वीच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. नुकत्याच झालेल्या पावसात बस स्थानकाच्या छतावरील विद्युत दिव्यांमधून थेट पाणी गळू लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुमारे १३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या बस स्थानकात पावसाचे पाणी थेट लाईट्समधून खाली येत असल्याने बसची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. करंट लागण्याच्या भीतीमुळे प्रवाशांना बसण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, याच पावसात शहरात नव्याने बसवण्यात आलेले काही सिग्नलही कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील विविध विकासकामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, एकामागून एक निकृष्ट कामे उघडकीस येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नवीन कामांचे टेंडर मिळताच काही ठेकेदार आणि संबंधित यंत्रणा आर्थिक लाभाकडे अधिक लक्ष देतात, मात्र कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच बस स्थानकातील तांत्रिक त्रुटी तात्काळ दुरुस्त करून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
- समृद्धी महामार्ग भीषण अपघात हृदयद्रावक व्हिडिओ - मृतांची संख्या आठवर... जालना जिल्ह्यातील जामवाडी शिवारात समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. नागपूरहून मुंबईकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात ७ महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता, तर ४ महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान, जखमींपैकी आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता ८ झाली असल्याची माहिती सूत्रांनी रात्री उशिरा दिली.1
- समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी.. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली1
- विठाबाई नारायणगावकर तमाशा महिला कलावंताना जबर मारहाण.घारगाव पोलिस स्टेशनला कलावंत आक्रमक.1
- अशोक खरात के ऑफिस से मिला 20 फीट लंबा सांप, रिमोट से होता था कंट्रोल महाराष्ट्र के नासिक में खुद को 'गॉडमैन' बताने वाले अशोक खरात के मामले में चौंकाने वाला खुलासा हुआ है. उसके ऑफिस से 20 फीट लंबा रिमोट कंट्रोल से चलने वाला सांप बरामद किया गया है, जिसका इस्तेमाल वह लोगों को अपनी कथित अलौकिक शक्तियों का विश्वास दिलाने के लिए करता था. इस खुलासे के बाद मामले ने और गंभीर रूप ले लिया है. दुष्कर्म के आरोपों में घिरे अशोक खरात को कोर्ट ने 14 दिन की न्यायिक हिरासत में भेज दिया है. सत्र न्यायाधीश बी. एन. इचपुरानी की अदालत ने उसे 14 अप्रैल तक जेल में रखने का आदेश दिया है. फिलहाल उसे नासिक रोड सेंट्रल जेल में रखा जाएगा.1
- समृद्धी महामार्ग रस्त्यावर झालेल्या अपघातात बदनापूर तालुक्यातील केलीगव्हाण व खादगाव येथील कामगारांना घेऊन जाणाऱ्या छोटा हत्ती या वाहनस एका दुसऱ्या वाहनाने जोराची धडख दिल्याने सात जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.5
- माननीय पोलीस अधीक्षक आंटी करप्शन ब्युरो संभाजीनगर येथे सुद्धा तक्रार दाखल आहे परंतु ही सुद्धा तक्रार दाबल्या गेलेली आहे त्यामुळे आपल्या मुंबई कार्यालाला याप्रकरणी माहिती देण्यात आली असून पाचोड पोलीस स्टेशनचे चार अधिकारी त्वरित सस्पेंड करा व सीबीआय चौकशी करा असे या ठिकाणी बरेच प्रकरण दाबलेले आहेत या पाठीमागे जो प्रकरण दाबतो त्याचे नाव समोर आणा त्याची मी कुंडली ओपन करतो सध्या रनिंग प्रकरण दाबणाऱ्या अधिकारी किशोर शिंदे जमादार वडजी बीट विमा मांडा चौकी नंबर दोन रामबा राहते पोलीस उपनिरीक्षक सध्या पाचोड पोलीस स्टेशन आणि महत्वाचे म्हटले तर सिनिअर ऑफिसर ने या अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या कुणाच्या आणि यांनी प्रकरण निकाली काढले कसे हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे सिन्नर ऑफिसर एपीआय सचिन पंडित यांच्या स्वाक्षरी शिवाय दिलेल्या पत्रावर कारवाई करण्याऐवजी खोटे अहवाल यांनी सर्वांनी मिळून वरिष्ठांना पाठवले पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब आव्हाड यांना याप्रकरणी इतर अधिकाऱ्यांनी सहमत दर्शवून गंभीर गुन्ह्यांमध्ये वाचवण्यास मदत केली त्यामुळे खालील कलम अंतर्गत यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा #पोलीसानी प्रकरण दाबण्याचा किंवा तपासात करण्यात हलगर्जीपणा (Police Inaction/Suppression) केल्यास, संबंधित #अधिकाऱ्यांवर फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) कलम १६६, IPC कलम १६७, १७७ किंवा २१७-२२१ नुसार कारवाई होऊ शकते. तसेच, भ्रष्टाचाराचा संशय असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत अधिकाऱ्यावर कार्य होऊ शकते -------------------------------------------------------------------- पोलीस स्टेशनचे ए पी आय सचिन पंडित साहेब तुमची माझी वैयक्तिक दुश्मनी नाही परंतु आपल्या पोलीस स्टेशनला माझे पेंटिंग अर्ज पोलीस उपनिरीक्षक रामबाहते वडजी गावची जमादार किशोर शिंदे यांनी गेली 2021 पासून माझे गंभीर प्रकरण दाबले आहे संपादक सुभाष मस्के पैठण न्युज ऑनलाईन संपादक पत्रकार असोसिएशन प्रेस मीडिया मेंबर संपर्क 88301067731
- ___ जिल्हाधिकारी श्री.विवेक जॉन्सन यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी सुरू असून, आतापर्यंत ५८४५ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. या पैकी प्रतिनिधिक स्वरूपात १० कामगारांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पुढील तीन महिन्यांत सर्व उसतोड कामगारांचे सर्वेक्षण व नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे.बीड जिल्ह्यातील सर्व उसतोड कामगारांनी स्थानिक स्तरावर संबंधित संस्थेशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.1
- जालना - सोलार कंपनीविरोधात शेतकऱ्यांचा संताप; दोन वर्षांपासून तक्रारी प्रलंबित.. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोडखा येथील शेतकरी उमेश ढेरे या शेतकऱ्यांनी जिके सोलार कंपनीविरोधात गंभीर तक्रारी केल्या असून, गेल्या दोन वर्षांपासून या तक्रारींकडे कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. कंपनीकडून बसविण्यात आलेल्या सोलार यंत्रणेत बिघाड असूनही दुरुस्ती होत नाही, तसेच कंपनीचे फोनही लागत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.1