logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ESMA लागू; गॅस-इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धपरिस्थितीचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशात घरगुती एलपीजी, नैसर्गिक वायू तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात अत्यावश्यक सेवा पुरवठा अधिनियम (ESMA) लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अत्यावश्यक सेवांचा पुरवठा अखंड सुरू ठेवण्यासाठी विशेष अधिकार प्रशासनाला मिळणार आहेत. गॅस, पेट्रोलियम आणि इतर महत्त्वाच्या सेवांमध्ये संप, कामबंद किंवा साठेबाजीमुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी हा कायदा प्रभावी ठरतो. ESMA कायदा नेमका काय? ESMA चे अधिकृत नाव ‘Essential Services Maintenance Act, 1971’ असे आहे. हा कायदा अत्यावश्यक सेवांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी लागू करण्यात आला आहे. दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या सेवा आणि वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या कायद्याच्या माध्यमातून संप किंवा कामबंद झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश देता येतात. तसेच आवश्यक वस्तूंची साठेबाजी, काळाबाजार आणि सेवा खंडित करण्यावरही कठोर कारवाईची तरतूद आहे. कोणत्या सेवा ESMAच्या कक्षेत? या कायद्याच्या कक्षेत रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य सेवा, स्वच्छता व्यवस्था, जलपुरवठा, बँकिंग सेवा, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सेवा, पेट्रोलियम, कोळसा, वीज, पोलाद तसेच खनिज उत्पादन आणि वितरणाशी संबंधित संस्था येतात. याशिवाय सार्वजनिक वाहतूक, दळणवळण आणि अन्नधान्य पुरवठ्याशी संबंधित सरकारी संस्थांनाही हा कायदा लागू होतो. कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई ESMA लागू असताना अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांनी संप किंवा कामबंद केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. संबंधित कर्मचारी, युनियन नेते किंवा अधिकारी यांना अटक करण्याचीही तरतूद आहे. पूर्वी एक हजार रुपयांपर्यंत असलेला दंड आता वाढवून तीन लाख रुपयांपर्यंत करण्यात आला असून कारावासाचीही शिक्षा होऊ शकते. गॅस उत्पादन वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारने तेल शुद्धीकरण कारखाने आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. प्रमुख हायड्रोकार्बन प्रवाह एलपीजी पूलमध्ये वळवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच काही क्षेत्रांना नैसर्गिक वायूचा पुरवठा प्राधान्याने करण्याची योजना आखण्यात आली आहे. महाराष्ट्रात ‘मेस्मा’ कायदा महाराष्ट्रात याच धर्तीवर ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम’ लागू आहे. 2023 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनंतर हा कायदा Maharashtra Essential Services Maintenance Act, 2023 (MESMA) म्हणून लागू करण्यात आला आहे. आरोग्य सेवा, वीज, एसटी, औषध दुकाने, शिक्षण तसेच इतर अत्यावश्यक सेवांमध्ये खंड पडू नये, यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

7 hrs ago
user_Sanjay  Chandgude
Sanjay Chandgude
Local News Reporter Indapur, Pune•
7 hrs ago
944234ca-9f36-48da-8c98-d3691228629e

युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ESMA लागू; गॅस-इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धपरिस्थितीचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशात घरगुती एलपीजी, नैसर्गिक वायू तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात अत्यावश्यक सेवा पुरवठा अधिनियम (ESMA) लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अत्यावश्यक सेवांचा पुरवठा अखंड सुरू ठेवण्यासाठी विशेष अधिकार प्रशासनाला मिळणार आहेत. गॅस, पेट्रोलियम आणि इतर महत्त्वाच्या सेवांमध्ये संप, कामबंद किंवा साठेबाजीमुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी हा कायदा प्रभावी ठरतो. ESMA कायदा नेमका काय? ESMA चे अधिकृत नाव ‘Essential Services Maintenance Act, 1971’ असे आहे. हा कायदा अत्यावश्यक सेवांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी लागू करण्यात आला आहे. दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेल्या महत्त्वाच्या सेवा आणि वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या कायद्याच्या माध्यमातून संप किंवा कामबंद झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश देता येतात. तसेच आवश्यक वस्तूंची साठेबाजी, काळाबाजार आणि सेवा खंडित करण्यावरही कठोर कारवाईची तरतूद आहे. कोणत्या सेवा ESMAच्या कक्षेत? या कायद्याच्या कक्षेत रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य सेवा, स्वच्छता व्यवस्था, जलपुरवठा, बँकिंग सेवा, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित सेवा, पेट्रोलियम, कोळसा, वीज, पोलाद तसेच खनिज उत्पादन आणि वितरणाशी संबंधित संस्था येतात. याशिवाय सार्वजनिक वाहतूक, दळणवळण आणि अन्नधान्य पुरवठ्याशी संबंधित सरकारी संस्थांनाही हा कायदा लागू होतो. कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई ESMA लागू असताना अत्यावश्यक सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांनी संप किंवा कामबंद केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. संबंधित कर्मचारी, युनियन नेते किंवा अधिकारी यांना अटक करण्याचीही तरतूद आहे. पूर्वी एक हजार रुपयांपर्यंत असलेला दंड आता वाढवून तीन लाख रुपयांपर्यंत करण्यात आला असून कारावासाचीही शिक्षा होऊ शकते. गॅस उत्पादन वाढवण्याचे निर्देश केंद्र सरकारने तेल शुद्धीकरण कारखाने आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. प्रमुख हायड्रोकार्बन प्रवाह एलपीजी पूलमध्ये वळवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच काही क्षेत्रांना नैसर्गिक वायूचा पुरवठा प्राधान्याने करण्याची योजना आखण्यात आली आहे. महाराष्ट्रात ‘मेस्मा’ कायदा महाराष्ट्रात याच धर्तीवर ‘महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम’ लागू आहे. 2023 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनंतर हा कायदा Maharashtra Essential Services Maintenance Act, 2023 (MESMA) म्हणून लागू करण्यात आला आहे. आरोग्य सेवा, वीज, एसटी, औषध दुकाने, शिक्षण तसेच इतर अत्यावश्यक सेवांमध्ये खंड पडू नये, यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    user_युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by कर्जत लाईव्ह
    1
    Post by कर्जत लाईव्ह
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    1
    मंगळवेढा : सरकारने दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली आहे मात्र सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली आहे. मंगळवेढा येथे सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पत्रकारांशी बोलत होते.
    user_Rahul S
    Rahul S
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते
    1
    सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे  सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही.
यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
    1
    सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • आखरी सच बोलणे वाला जोतिषी मिल गया भाई लोग
    1
    आखरी सच बोलणे वाला जोतिषी मिल गया भाई लोग
    user_Mahadev Shinde
    Mahadev Shinde
    Advertising Photographer उस्मानाबाद, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.19 तालुक्यातील नाझरे गावात शेकडो वर्षांपासून सोंगांच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची सेवा करण्याची अनोखी परंपरा आजही जपली जात आहे. पूर्वजांच्या श्रद्धेतून सुरू झालेली ही परंपरा पिढ्यान् पिढ्या ग्रामस्थांकडून जोपासली जात आहे. होळी नंतर सलग सात दिवस यात्रेपर्यंत गावात विविध सोंगं घेऊन उत्सव साजरा केला जातो. गावातील खेळगडी वेगवेगळी वेशभूषा परिधान करून वाद्यांच्या तालावर गावभर फिरतात. त्यानंतर चौकाचौकात ढोल-ताशांच्या गजरात सोंगांचे सादरीकरण करत ग्रामस्थांचे मनोरंजन केले जाते. या परंपरेमागे एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी खेळगड्यांचा वंश वाढत नसल्याने गावच्या पूर्वजांनी ग्रामदैवत भैरवनाथाला नवस केला होता. त्यानुसार धुलवडीच्या दिवशी होळीची शिळी पोळी घरोघरी मागून ती ओढ्याजवळ जाऊन खाणे तसेच गावातून वेगवेगळ्या सोंगांचे सादरीकरण करत छबिना काढण्याची प्रथा सुरू झाली. हा नवस फेडत आजही ग्रामस्थ सोंगांच्या माध्यमातून भैरवनाथ देवाची सेवा करत ही शेकडो वर्षांची परंपरा जिवंत ठेवत आहेत.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.19 तालुक्यातील नाझरे गावात शेकडो वर्षांपासून सोंगांच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची सेवा करण्याची अनोखी परंपरा आजही जपली जात आहे. पूर्वजांच्या श्रद्धेतून सुरू झालेली ही परंपरा पिढ्यान् पिढ्या ग्रामस्थांकडून जोपासली जात आहे.
होळी नंतर सलग सात दिवस यात्रेपर्यंत गावात विविध सोंगं घेऊन उत्सव साजरा केला जातो. गावातील खेळगडी वेगवेगळी वेशभूषा परिधान करून वाद्यांच्या तालावर गावभर फिरतात. त्यानंतर चौकाचौकात ढोल-ताशांच्या गजरात सोंगांचे सादरीकरण करत ग्रामस्थांचे मनोरंजन केले जाते.
या परंपरेमागे एक आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी खेळगड्यांचा वंश वाढत नसल्याने गावच्या पूर्वजांनी ग्रामदैवत भैरवनाथाला नवस केला होता. त्यानुसार धुलवडीच्या दिवशी होळीची शिळी पोळी घरोघरी मागून ती ओढ्याजवळ जाऊन खाणे तसेच गावातून वेगवेगळ्या सोंगांचे सादरीकरण करत छबिना काढण्याची प्रथा सुरू झाली. हा नवस फेडत आजही ग्रामस्थ सोंगांच्या माध्यमातून भैरवनाथ देवाची सेवा करत ही शेकडो वर्षांची परंपरा जिवंत ठेवत आहेत.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    user_युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.