भोकरदन नगराध्यक्षांच्या 'होमग्राउंड'वरच अस्वच्छतेचे साम्राज्य; विकासाच्या गप्पा हवेतच? भोकरदन नगराध्यक्षांच्या 'होमग्राउंड'वरच अस्वच्छतेचे साम्राज्य; विकासाच्या गप्पा हवेतच? भोकरदन (प्रतिनिधी):विश्वास धसाळ एकिकडे भोकरदन शहराला स्मार्ट बनवण्याच्या आणि कोट्यवधींच्या विकासकामांच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात परिस्थिती मात्र 'दिवाखाली अंधार' अशी असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः भोकरदन नगरपालिकेच्या नगराध्यक्षा समरीन मिर्झा यांच्या स्वतःच्या प्रभागात आणि 'होमपीच'वरच कचरा व सांडपाण्याचे प्रचंड साम्राज्य पसरल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. गल्लीत कचरा, सांडपाण्याचे लोट उपलब्ध छायाचित्रांवरून हे स्पष्ट दिसते की, शहरातील अनेक अंतर्गत गल्ल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. घरांच्या मधल्या बोळीत आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढिग साचले आहेत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी योग्य निचरा नसल्याने हे पाणी रस्त्यावर साचत आहे, ज्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यापूर्वीच जर ही परिस्थिती असेल, तर पावसाळ्यात या भागात आजारांचे थैमान माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा केंद्र आणि राज्य सरकारकडून 'स्वच्छ भारत अभियाना'साठी नगरपालिकेला मोठा निधी दिला जातो. मात्र, नगराध्यक्षांच्या प्रभागातच कचरा व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला असल्याचे चित्र आहे. प्लॅस्टिक कचरा, घरातील टाकाऊ वस्तू आणि साचलेले सांडपाणी यामुळे डेंग्यू, हिवताप यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. विकासाचा केवळ 'डोलारा'? शहरात मोठ्या रस्त्यांचे आणि सुशोभीकरणाचे काम सुरू असले तरी, सामान्य माणसाच्या आरोग्याशी निगडित असणाऱ्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. "आमच्या गल्लीत नगरपालिकेचे कर्मचारी कधी फिरकतात, हे आम्हालाच माहित नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली. नगराध्यक्षांचे स्वतःचे निवासस्थान आणि त्यांचा बालेकिल्ला असलेल्या भागात जर अशी अस्वच्छता असेल, तर इतर शहराची काय अवस्था असेल, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नागरिकांच्या प्रमुख मागण्या: साचलेला कचरा तात्काळ उचलण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. तुंबलेल्या नाल्यांची आणि सांडपाण्याच्या मार्गांची सफाई करावी. नियमितपणे घंटागाडी प्रभागात येईल याची खात्री करावी. परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात यावी. प्रशासनाला इशारा: जर येत्या काही दिवसांत या कचराकुंडी झालेल्या गल्ल्यांची साफसफाई झाली नाही, तर स्थानिक नागरिक नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. आता तरी नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी या गंभीर समस्येकडे लक्ष देतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भोकरदन नगराध्यक्षांच्या 'होमग्राउंड'वरच अस्वच्छतेचे साम्राज्य; विकासाच्या गप्पा हवेतच? भोकरदन नगराध्यक्षांच्या 'होमग्राउंड'वरच अस्वच्छतेचे साम्राज्य; विकासाच्या गप्पा हवेतच? भोकरदन (प्रतिनिधी):विश्वास धसाळ एकिकडे भोकरदन शहराला स्मार्ट बनवण्याच्या आणि कोट्यवधींच्या विकासकामांच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात परिस्थिती मात्र 'दिवाखाली अंधार' अशी असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः भोकरदन नगरपालिकेच्या नगराध्यक्षा समरीन मिर्झा यांच्या स्वतःच्या प्रभागात आणि 'होमपीच'वरच कचरा व सांडपाण्याचे प्रचंड साम्राज्य पसरल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. गल्लीत कचरा, सांडपाण्याचे लोट उपलब्ध छायाचित्रांवरून हे स्पष्ट दिसते की, शहरातील अनेक अंतर्गत गल्ल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. घरांच्या मधल्या बोळीत आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढिग साचले आहेत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी योग्य निचरा नसल्याने हे पाणी रस्त्यावर साचत आहे, ज्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यापूर्वीच जर ही परिस्थिती असेल, तर पावसाळ्यात या भागात आजारांचे थैमान माजण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा केंद्र आणि राज्य सरकारकडून 'स्वच्छ भारत अभियाना'साठी नगरपालिकेला मोठा निधी दिला जातो. मात्र, नगराध्यक्षांच्या प्रभागातच कचरा व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला असल्याचे चित्र आहे. प्लॅस्टिक कचरा, घरातील टाकाऊ वस्तू आणि साचलेले सांडपाणी यामुळे डेंग्यू, हिवताप यांसारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे. विकासाचा केवळ 'डोलारा'? शहरात मोठ्या रस्त्यांचे आणि सुशोभीकरणाचे काम सुरू असले तरी, सामान्य माणसाच्या आरोग्याशी निगडित असणाऱ्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. "आमच्या गल्लीत नगरपालिकेचे कर्मचारी कधी फिरकतात, हे आम्हालाच माहित नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली. नगराध्यक्षांचे स्वतःचे निवासस्थान आणि त्यांचा बालेकिल्ला असलेल्या भागात जर अशी अस्वच्छता असेल, तर इतर शहराची काय अवस्था असेल, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नागरिकांच्या प्रमुख मागण्या: साचलेला कचरा तात्काळ उचलण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. तुंबलेल्या नाल्यांची आणि सांडपाण्याच्या मार्गांची सफाई करावी. नियमितपणे घंटागाडी प्रभागात येईल याची खात्री करावी. परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात यावी. प्रशासनाला इशारा: जर येत्या काही दिवसांत या कचराकुंडी झालेल्या गल्ल्यांची साफसफाई झाली नाही, तर स्थानिक नागरिक नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. आता तरी नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी या गंभीर समस्येकडे लक्ष देतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
- गंगापूर वैजापूर रोड शिंगी पाटी येथे टू व्हीलर चा अपघात अपघातात एक जण गंभीर जखमी ही माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे व अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन रुग्णास गंगापूर घाटी येथे दाखल केले जखमीचे नाव शंकर विनायकराव वाघ वय 30 वर्ष रा. शिंगी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- सिल्लोड येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ निवेदन सिल्लोड, ता. — अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आज लहुजी क्रांती सेना, सिल्लोड तालुका तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. सिल्लोड तहसीलचे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातीतील घटकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे, तसेच आरक्षणाचा लाभ सर्व स्तरांपर्यंत समान प्रमाणात पोहोचावा, यासाठी उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित लहुजी क्रांती सेना प्रदेश अध्यक्ष अशोक कांबळे, मराठवाडा अध्यक्ष सखाराम अहिरे, जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, उपाध्यक्ष बाबुराव अहिरे युवा जिल्हाध्यक्ष फकीरचंद तांबे, युवा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव अहिरे, युवा तालुकाध्यक्ष किशोर भिसे, शिवदास दणके , विष्णू साळवे ज्ञानेश्वर अहिरे किसन सौदागर संजय मोरे, राजू कांबळे,संजय गायकवाड सोनू सुरडकर संतोष कांबळे आनंद गायकवाड, रघुनाथ अहिरे, संजय निकाळजे, गणपत गायकवाड सुभाष निकाळजे तसेच लहुजी क्रांती सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.1
- गंगापूर-वैजापूर रोडवरील शिंगी पाटी येथे दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात शंकर विनायकराव वाघ (वय 30, रा. शिंगी, ता. गंगापूर) हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे आणि अनिकेत मुळक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीस उपचारासाठी गंगापूर घाटी येथे दाखल केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या जखमीवर उपचार सुरू असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.1
- छत्रपती संभाजीनगर विमानतळ परिसरात भीषण आग छत्रपती संभाजीनगरातील विमानतळ परिसरात आज बुधवारी भीषण आग लागली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत1
- Post by Raghunath Aghao1
- Post by Mushraf Tadvi1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग.... भाजप आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत ANC : भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. भाजपाने काल विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव या यादीत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यानंतर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत मराठी कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी… अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे… जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही…” या ओळींतून केनेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाली होती. बाईट : आमदार संजय केणेकर3