मालेगाव नाका परिसरातील रस्त्यावरील खड्डे ठरत आहेत अपघातांचे कारण मालेगाव नाका परिसरातील रस्त्यावरील खड्डे ठरत आहेत अपघातांचे कारण रोज घडत आहेत छोटे-मोठे अपघात; वाहनधारकांसह नागरिकांचा जीव धोक्यात त्वरित दुरुस्तीची स्थानिकांची मागणी रिसोड : रिसोड–लोणार मार्गावरील मालेगाव नाका परिसरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने तसेच एसटी बसची वाहतूक होत असते. मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्या मुळे हा मार्ग अपघातांना निमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. सदरचा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून मालेगाव नाका एक प्रमुख चौक बनलेला आह रिसोड येथून सदर रस्त्यावरून अकोला, छत्रपती संभाजीनगर परभणी आदि महानगराकडे वाहतूक ची वर्दळ असते. सदर चौकात वाहने पास करत असताना या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. रस्ता काम करत असताना रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजक लाईन मध्ये खचका पडल्याने सुद्धा अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. सदर खचक्याचे अंदाज घेत नसल्याने वाहन धारकाचे तोल जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे.विशेषतः पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत असून, अनेकांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक बनले आहे.स्थानिक नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी जोरदार मागणी केली आहे. एखादा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता प्रशासनाने त्वरित कारवाई करून नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक आणि वाहनधारक व्यक्त करत आहेत. रस्त्याच्या दुभाजक लाईन मध्ये लेव्हलिंग केली नसल्याने या ठिकाणी खचका पडलेला आहे व या ठिकाणी काही छोटे-मोठे खड्डे सुद्धा पडले असल्याने दररोज दुचाकी व चार चाकी वाहनाचे चे अपघात होत चाललेले आहे. सद्यस्थितीत अद्याप मोठी दुखापत किंवा मोठी दुर्घटना झाली नसली तरी किरकोळ मार लागून नागरिकांना दुखापत होऊन वाहनांची सुद्धा नुकसान झालेले आहे.मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन हे खड्डे बुजवावेत शेख अल्तमश स्थानिय नागरिक
मालेगाव नाका परिसरातील रस्त्यावरील खड्डे ठरत आहेत अपघातांचे कारण मालेगाव नाका परिसरातील रस्त्यावरील खड्डे ठरत आहेत अपघातांचे कारण रोज घडत आहेत छोटे-मोठे अपघात; वाहनधारकांसह नागरिकांचा जीव धोक्यात त्वरित दुरुस्तीची स्थानिकांची मागणी रिसोड : रिसोड–लोणार मार्गावरील मालेगाव नाका परिसरातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने तसेच एसटी बसची वाहतूक होत असते. मात्र रस्त्यावर पडलेल्या खड्या मुळे हा मार्ग अपघातांना निमंत्रण देत असल्याचे चित्र आहे. सदरचा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असून मालेगाव नाका एक प्रमुख चौक बनलेला आह रिसोड येथून सदर रस्त्यावरून अकोला, छत्रपती संभाजीनगर परभणी आदि महानगराकडे वाहतूक ची वर्दळ असते. सदर चौकात वाहने पास करत असताना या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. रस्ता काम करत असताना रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजक लाईन मध्ये खचका पडल्याने सुद्धा अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. सदर खचक्याचे अंदाज घेत नसल्याने वाहन धारकाचे तोल जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे.विशेषतः पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत असून, अनेकांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक बनले आहे.स्थानिक नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी जोरदार मागणी केली आहे. एखादा मोठा अपघात होण्याची वाट न पाहता प्रशासनाने त्वरित कारवाई करून नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक आणि वाहनधारक व्यक्त करत आहेत. रस्त्याच्या दुभाजक लाईन मध्ये लेव्हलिंग केली नसल्याने या ठिकाणी खचका पडलेला आहे व या ठिकाणी काही छोटे-मोठे खड्डे सुद्धा पडले असल्याने दररोज दुचाकी व चार चाकी वाहनाचे चे अपघात होत चाललेले आहे. सद्यस्थितीत अद्याप मोठी दुखापत किंवा मोठी दुर्घटना झाली नसली तरी किरकोळ मार लागून नागरिकांना दुखापत होऊन वाहनांची सुद्धा नुकसान झालेले आहे.मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन हे खड्डे बुजवावेत शेख अल्तमश स्थानिय नागरिक
- वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती घोटा देवी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी 👏👏👏👏 (प्रतिनिधी): हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत आदरपूर्वक व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वैजनाथ पावडे यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी व मेंढपाळ समाजातील मुलांना या दोन्ही महान विभूतींच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, "महान पुरुषांचे विचार, त्याग, शिक्षणप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. चांगले संस्कार, शिक्षण आणि समाजहिताची भावना जोपासून आपणही समाजसुधारक म्हणून कार्य केले, तर आपल्या जीवनालाही खरा अर्थ प्राप्त होईल. जयंती व पुण्यतिथी हे केवळ स्मरणाचे दिवस नसून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा देणारे दिवस आहेत." यावेळी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आश्रमातील विद्यार्थी, मेंढपाळ समाजातील मुले तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही महान व्यक्तींच्या विचारांचे पालन करून शिक्षण, शिस्त आणि समाजसेवा यांचा संकल्प केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि महान व्यक्तींच्या विचारांबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.1
- बारिश में मौत बनकर खड़ा जर्जर बिजली का पोल, शिकायत के बाद भी नहीं जागा बिजली विभाग बार्शिटाकली | प्रतिनिधि बार्शिटाकली तहसील के दोनद बु. गांव में बिजली विभाग की गंभीर लापरवाही सामने आई है। गांव में लगा एक बिजली का पोल नीचे से पूरी तरह सड़ चुका है। लगातार हो रही बारिश और तेज़ हवाओं के चलते यह पोल कभी भी गिर सकता है, जिससे बड़ा हादसा होने की आशंका जताई जा रही है। गांव निवासी गणेश नागे ने इस खतरनाक स्थिति की शिकायत बिजली विभाग से कर तत्काल नया पोल लगाने की मांग की है। बावजूद इसके अब तक विभाग की ओर से कोई कार्रवाई नहीं की गई है। इससे ग्रामीणों में नाराजगी के साथ-साथ भय का माहौल भी बना हुआ है। ग्रामीणों का कहना है कि जर्जर पोल के आसपास से प्रतिदिन स्कूली बच्चे, किसान और अन्य राहगीर गुजरते हैं। यदि समय रहते इसे नहीं बदला गया तो किसी भी क्षण जनहानि हो सकती है। ग्रामीणों ने बिजली विभाग से तत्काल जर्जर पोल बदलने की मांग की है। अब देखना यह होगा कि विभाग समय रहते कार्रवाई करता है या फिर किसी बड़े हादसे के बाद ही जिम्मेदारों की नींद खुलेगी1
- जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ1
- बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे मंगरूळपीर शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या सुमारे ४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. २९ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत बचाव पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेला जीवनदान मिळाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपना राठोड (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, मंगरूळपीर) या २९ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंगरूळपीर शहरालगत मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि कोरडी असल्याने परिस्थिती गंभीर होती. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी रवाना केले. गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर हे आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे ४० फूट खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याचे दिसून आले. विहिरीच्या तळाशी महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू केली. जवान गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण बचाव मोहिमेचे नियोजन करण्यात आले. विहिरीची खोली आणि परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वायर रोपच्या सहाय्याने जवान उतरला विहिरीत क्षणाचाही विलंब न करता जवान गोपाल गिरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वायर रोपच्या सहाय्याने सुमारे ४० फूट खोल विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला धीर दिला. बचावादरम्यान कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून महिलेला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यात आले. त्यानंतर खाट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या सहाय्याने महिलेला सुरक्षितपणे वर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास महिलेला विहिरीतून जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर महिलेला पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बचाव पथकाच्या साहसाचे नागरिकांकडून कौतुक या बचाव मोहिमेदरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, पोलीस कर्मचारी प्रमोद थोरवे, धनंजय पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलेचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. महिला सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वेळेचे महत्त्व ओळखून पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. जवान गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर यांनी दाखविलेल्या साहसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे महिलेला जीवनदान मिळाले असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर आणि साहसी कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.4