logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन महिला मेळावा २०२६ भव्य शुभारंभ कोल्हापूर ०३

6 hrs ago
user_E city news network
E city news network
Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
6 hrs ago

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन महिला मेळावा २०२६ भव्य शुभारंभ कोल्हापूर ०३

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • शिंगणापूर बंधाऱ्यात बुडून राधानगरी तालुक्यातील दुर्गमनवाड येथील 38 वर्षीय अरुण धोंडीराम गुरव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्योतिबा यात्रेवरून परतत असताना ते अंघोळ व Swimming साठी बंधाऱ्यात उतरले होते. मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. घटनेनंतर Disaster Management Team आणि स्थानिक प्रशासनाने तब्बल 24 तास Search Operation राबवले. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. या Rescue Operation मध्ये सहभागी सर्व पथक सदस्यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. उन्हाळ्यात नदी, बंधारा किंवा धरण परिसरात जाताना काळजी घ्या, Safety Rules पाळा आणि पाण्याचा अंदाज नसल्यास आत उतरू नका.
    2
    शिंगणापूर बंधाऱ्यात बुडून राधानगरी तालुक्यातील दुर्गमनवाड येथील 38 वर्षीय अरुण धोंडीराम गुरव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्योतिबा यात्रेवरून परतत असताना ते अंघोळ व Swimming साठी बंधाऱ्यात उतरले होते. मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली.
घटनेनंतर Disaster Management Team आणि स्थानिक प्रशासनाने तब्बल 24 तास Search Operation राबवले. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.
या Rescue Operation मध्ये सहभागी सर्व पथक सदस्यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. उन्हाळ्यात नदी, बंधारा किंवा धरण परिसरात जाताना काळजी घ्या, Safety Rules पाळा आणि पाण्याचा अंदाज नसल्यास आत उतरू नका.
    user_Raviraj kamble
    Raviraj kamble
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • कोल्हापूर ०३
    1
    कोल्हापूर ०३
    user_E city news network
    E city news network
    Local News Reporter करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • कोल्हापूर श्री अंबाबाई रथोत्सव सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाखो भाविकांनी दर्शन घेतले आकर्षक विद्युत रोषणाई, आतिषबाजी आणि रांगोळीची सजावट या सर्व गोष्टींनी महाद्वार रोड उजळून निघाला
    2
    कोल्हापूर 
श्री अंबाबाई रथोत्सव सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाखो भाविकांनी दर्शन घेतले 
आकर्षक विद्युत रोषणाई, आतिषबाजी आणि रांगोळीची सजावट या सर्व गोष्टींनी महाद्वार रोड उजळून निघाला
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • इचलकरंजीतील गाजलेल्या सूत चोरी प्रकरणात चार आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पुराव्याअभावी कोर्टाचा मोठा निर्णय. संपूर्ण प्रकरण जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
    1
    इचलकरंजीतील गाजलेल्या सूत चोरी प्रकरणात चार आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पुराव्याअभावी कोर्टाचा मोठा निर्णय. संपूर्ण प्रकरण जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
    user_News reporter मुबारक शेख
    News reporter मुबारक शेख
    हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • चंदगड प्रतिनिधी : संजय आगाशे चंदगड तालुक्यात वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवी गंभीर स्वरूप धारण करत आहेत.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.रानडुक्कर हत्ती,माकड गवे,मोर आदी वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांवर हल्ले करने,शेती पिकांचे नुकसान करने ही नित्याचीच बाब झाली आहे.जंगली जनावरांच्या त्रासाने शेतकरी त्रस्त झाला आहे.एवढंच नव्हे तर जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची मदतही शेतकऱ्यांना मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कागदाची जुळवाजूळव करावी लागते.या सर्व गोष्टीने त्रस्त होऊन शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. पश्चिम भागातील वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढू लागला आहे.परिणामी शेतकऱ्यांचे उभे पीक उध्वस्त होत असून अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे काही शेतकरी मानसिक तणावाखाली असून प्रशासनाकडून ठोस उपाय योजना होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.दरम्यान सरकारच्या धोरणावरही शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.वाढते कर्ज घटते उत्पन्न आणि वन्य प्राण्यांचा त्रास हा तिहेरी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयावर धडक देत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत.त्यामध्ये वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीसाठी तात्काळ वाढीव आर्थिक भरपाई द्यावी रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांच्या नियंत्रणाखाली प्रभावी उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना संरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत पिक विमा योजना प्रभावीपणे राबवून 15 दिवसात नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास किमान एक लाख रुपये अनुदान द्यावे.वन्य प्राण्यांसाठी जंगलातही प्राणी व जाण्याची व्यवस्था करावी रानडुक्कर मारण्यास परवानगी द्यावी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे प्रशासने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे यावेळी कृष्णा पाटील,नितीन पाटील,अँड.संतोष मळवीकर,चंद्रशेखर गावडे,बबनराव देसाई,अशोक पेडणेकर,शंकर मनवाडकर,विठ्ठल तेजम,गोविंद गुडूळकर,तानाजी पवार आदी उपस्थिती होती.
    1
    चंदगड प्रतिनिधी : संजय आगाशे
चंदगड तालुक्यात वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवी गंभीर स्वरूप धारण करत आहेत.शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.रानडुक्कर हत्ती,माकड गवे,मोर आदी वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांवर हल्ले करने,शेती पिकांचे नुकसान करने ही नित्याचीच बाब झाली आहे.जंगली जनावरांच्या त्रासाने शेतकरी त्रस्त झाला आहे.एवढंच नव्हे तर जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची मदतही शेतकऱ्यांना मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कागदाची जुळवाजूळव करावी लागते.या सर्व गोष्टीने त्रस्त होऊन शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. पश्चिम भागातील वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढू लागला आहे.परिणामी शेतकऱ्यांचे उभे पीक उध्वस्त होत असून अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे काही शेतकरी मानसिक तणावाखाली असून प्रशासनाकडून ठोस उपाय योजना होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.दरम्यान सरकारच्या धोरणावरही शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.वाढते कर्ज घटते उत्पन्न आणि वन्य प्राण्यांचा त्रास हा तिहेरी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.सोमवार दिनांक 13 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयावर धडक देत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत.त्यामध्ये वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीसाठी तात्काळ वाढीव आर्थिक भरपाई द्यावी रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांच्या नियंत्रणाखाली प्रभावी उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना संरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत पिक विमा योजना प्रभावीपणे राबवून 15 दिवसात नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास किमान एक लाख रुपये अनुदान द्यावे.वन्य प्राण्यांसाठी जंगलातही प्राणी व जाण्याची व्यवस्था करावी रानडुक्कर मारण्यास परवानगी द्यावी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाकडे प्रशासने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे यावेळी कृष्णा पाटील,नितीन पाटील,अँड.संतोष मळवीकर,चंद्रशेखर गावडे,बबनराव देसाई,अशोक पेडणेकर,शंकर मनवाडकर,विठ्ठल तेजम,गोविंद गुडूळकर,तानाजी पवार आदी उपस्थिती होती.
    user_Sanjay Aagashe
    Sanjay Aagashe
    Librarian चांदगड, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • सांगोला येथील सूर्योदय मोबाईल शॉपी येथील चोरी प्रकरणी पोलिसांनी आरोपींना पकडत मुद्देमाला सह केले अटक.
    1
    सांगोला येथील सूर्योदय मोबाईल शॉपी येथील चोरी प्रकरणी पोलिसांनी आरोपींना पकडत मुद्देमाला सह केले अटक.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी हडपसर येथे 5 एप्रिल 2026 या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! सभेच्या प्रचारासाठी 3 एप्रिलला हडपसर येथे भव्य वाहनफेरी ! विक्रम शिंदे (भोर )दि.3 पुणे : आज गोहत्या, लव्ह जिहाद, जिहादी आतंकवाद, देवतांचे विडंबन करणे यांसारखी असंख्य संकटे हिंदूंवर वारंवार येत आहेत. पुण्यातील बांगलादेशी घुसखोरांचे वाढते प्रमाण आपल्या सुरक्षिततेसमोर मोठे आव्हान उभे करत आहे.आपले शहर आणि संस्कृती आज धोक्यात आली आहे. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाज्वल्य स्वाभिमान मनात जागृत करून या सर्व अन्यायकारक संकटांना 'हिंदु संघटन' हेच एकमेव चोख उत्तर आहे. हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 5 एप्रिल 2026 या दिवशी सायंकाळी 6 वाजता मारुतीराव काळे शाळेचे मैदान, काळे पडळ, हडपसर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी हिंदुत्वाची बुलंद तोफ भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे मान्यवर उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती श्री. पराग गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, श्री. सुनील घनवट, सी.ए. श्री. सर्वेश मेहेंदळे, वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, श्री. पराग गोखले, रुद्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमित गायकवाड उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना श्री. सुनील घनवट म्हणाले की, हिंदू धर्मविरोधी कथानक रचून 'हलाल जिहाद'सारख्या माध्यमांतून एक समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. विविध प्रकारचे जिहाद, देशाची सुरक्षा आणि 'वक्फ बोर्डा'च्या माध्यमातून अद्यापही ताब्यात असलेल्या मंदिरांच्या जमिनी, तसेच वर्तमान काळात भारताला 'हिंदु राष्ट्र' घोषित करणे या मुख्य मागण्यांविषयी सभेमध्ये सर्वांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी नमूद केले की, अशा सभांच्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणावर जागृती होत असून सर्वांनी धर्मकार्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. समाज धर्मशिक्षित व्हावा, हाच संस्थेचा उद्देश असून सर्व हिंदूंनी या सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. सी.ए.श्री.सर्वेश मेहेंदळे यांनी सांगितले की, आज देश आणि धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी संघटन हाच एकमेव मार्ग आहे. आम्ही सर्व संघटना यामध्ये सक्रिय असून सर्व हिंदुत्ववाद्यांनी पूर्ण ताकदीनिशी या सभेला उपस्थित रहावे. सभेच्या नियोजनाविषयी माहिती देताना श्री. पराग गोखले यांनी सांगितले की, सभेच्या ठिकाणी क्रांतिकारक, राष्ट्रपुरुष, गोरक्षण आणि हिंदूंवरील अत्याचारांविषयी माहिती देणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तसेच युवकांसाठी आणि मुलांसाठी बालसंस्कार कक्षासह विविध धर्मग्रंथ व आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शनही कार्यक्रमस्थळी असेल. सभेच्या निमित्ताने आतापर्यंत पुणे शहरासह बारामती, दौंड, सासवड, जुन्नर, यवत, पारगाव अशा 100 हून अधिक गावांमध्ये व्यापक प्रसार करण्यात आला आहे. विविध तरुण मंडळे, महिला गट आणि ग्रामस्थांच्या शेकडो बैठका, रामनवमी उत्सव, हस्तपत्रके, होर्डिंग्ज आणि सामाजिक माध्यमांच्या द्वारे सभेचा संदेश घराघरांत पोहोचवण्यात आला आहे. सभेच्या निमित्ताने जनमानसात जागृती व्हावी या उद्देशाने समितीच्या वतीने 3 एप्रिल या दिवशी सायंकाळी 4.30 वाजता भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी भेकराईनगर PMT बस डेपो येथून प्रारंभ होऊन पापडेवस्ती, काळेपडळ, ससाणेनगर, पुरोहित स्वीट चौक मार्गे जाऊन मारुतीराव काळे विद्यालयाच्या मैदानावर विसर्जित होईल.
    1
    ‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी हडपसर येथे 5 एप्रिल 2026 या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
सभेच्या प्रचारासाठी 3 एप्रिलला हडपसर येथे भव्य वाहनफेरी !
विक्रम शिंदे  (भोर )दि.3 पुणे : आज गोहत्या, लव्ह जिहाद, जिहादी आतंकवाद, देवतांचे विडंबन करणे यांसारखी असंख्य संकटे हिंदूंवर वारंवार येत आहेत. पुण्यातील बांगलादेशी घुसखोरांचे वाढते प्रमाण आपल्या सुरक्षिततेसमोर मोठे आव्हान उभे करत आहे.आपले शहर आणि संस्कृती आज धोक्यात आली आहे. अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाज्वल्य स्वाभिमान मनात जागृत करून या सर्व अन्यायकारक संकटांना 'हिंदु संघटन' हेच एकमेव चोख उत्तर आहे. हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 5 एप्रिल 2026 या दिवशी सायंकाळी 6 वाजता मारुतीराव काळे शाळेचे मैदान, काळे पडळ, हडपसर येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. 
या सभेसाठी हिंदुत्वाची बुलंद तोफ भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह, सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे मान्यवर उपस्थित हिंदूंना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती श्री. पराग गोखले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, श्री. सुनील घनवट, सी.ए. श्री. सर्वेश मेहेंदळे, वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा समन्वयक ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, श्री. पराग गोखले, रुद्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. अमित गायकवाड उपस्थित होते.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना श्री. सुनील घनवट म्हणाले की, हिंदू धर्मविरोधी कथानक रचून 'हलाल जिहाद'सारख्या माध्यमांतून एक समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. विविध प्रकारचे जिहाद, देशाची सुरक्षा आणि 'वक्फ बोर्डा'च्या माध्यमातून अद्यापही ताब्यात असलेल्या मंदिरांच्या जमिनी, तसेच वर्तमान काळात भारताला 'हिंदु राष्ट्र' घोषित करणे या मुख्य मागण्यांविषयी सभेमध्ये सर्वांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. 
सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी नमूद केले की, अशा सभांच्या माध्यमातून समाजात मोठ्या प्रमाणावर जागृती होत असून सर्वांनी धर्मकार्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. समाज धर्मशिक्षित व्हावा, हाच संस्थेचा उद्देश असून सर्व हिंदूंनी या सभेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. 
सी.ए.श्री.सर्वेश मेहेंदळे यांनी सांगितले की, आज देश आणि धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी संघटन हाच एकमेव मार्ग आहे. आम्ही सर्व संघटना यामध्ये सक्रिय असून सर्व हिंदुत्ववाद्यांनी पूर्ण ताकदीनिशी या सभेला उपस्थित रहावे.
सभेच्या नियोजनाविषयी माहिती देताना श्री. पराग गोखले यांनी सांगितले की, सभेच्या ठिकाणी क्रांतिकारक, राष्ट्रपुरुष, गोरक्षण आणि हिंदूंवरील अत्याचारांविषयी माहिती देणारे फलक प्रदर्शन लावण्यात येणार आहे. तसेच युवकांसाठी आणि मुलांसाठी बालसंस्कार कक्षासह विविध धर्मग्रंथ व आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शनही कार्यक्रमस्थळी असेल. सभेच्या निमित्ताने आतापर्यंत पुणे शहरासह बारामती, दौंड, सासवड, जुन्नर, यवत, पारगाव अशा 100 हून अधिक गावांमध्ये व्यापक प्रसार करण्यात आला आहे. विविध तरुण मंडळे, महिला गट आणि ग्रामस्थांच्या शेकडो बैठका, रामनवमी उत्सव, हस्तपत्रके, होर्डिंग्ज आणि सामाजिक माध्यमांच्या द्वारे सभेचा संदेश घराघरांत पोहोचवण्यात आला आहे.
सभेच्या निमित्ताने जनमानसात जागृती व्हावी या उद्देशाने समितीच्या वतीने 3 एप्रिल या दिवशी सायंकाळी 4.30 वाजता भव्य वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेरी भेकराईनगर PMT बस डेपो येथून प्रारंभ होऊन पापडेवस्ती, काळेपडळ, ससाणेनगर, पुरोहित स्वीट चौक मार्गे जाऊन मारुतीराव काळे विद्यालयाच्या मैदानावर विसर्जित होईल.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.