Shuru
Apke Nagar Ki App…
वायरल न्यूज...... जिल्हाधिकाऱ्याने शाळकरी मुलांना दिल्या धमक्या.....! शिक्षणासंदर्भात मागणी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता मागणीला जोर दे त शाळकरी मुलं व त्यांच्या समवेत शिक्षक वर्ग यांच्या वतीने मागणी संदर्भात घोषणा दिल्या त्यांच्या दालनामध्ये मागणीसाठी शाळकरी मुलांनी जाऊन या समस्या अडचणी आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करत असताना जिल्हाधिकाऱ्यांचा राग अनावरण झाला. त्यांनी शिक्षक वर्गासह शाळकरी मुलांवर रोष व्यक्त करत दमदाटी करून धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.
Shivkumar kale Press reporter
वायरल न्यूज...... जिल्हाधिकाऱ्याने शाळकरी मुलांना दिल्या धमक्या.....! शिक्षणासंदर्भात मागणी मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता मागणीला जोर दे त शाळकरी मुलं व त्यांच्या समवेत शिक्षक वर्ग यांच्या वतीने मागणी संदर्भात घोषणा दिल्या त्यांच्या दालनामध्ये मागणीसाठी शाळकरी मुलांनी जाऊन या समस्या अडचणी आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करत असताना जिल्हाधिकाऱ्यांचा राग अनावरण झाला. त्यांनी शिक्षक वर्गासह शाळकरी मुलांवर रोष व्यक्त करत दमदाटी करून धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.
More news from Maharashtra and nearby areas
- 🌧️ अवकाळी वातावरणाचा तूर पिकावर घाला 🌾 खरीप–रब्बी दोन्ही हंगाम शेतकऱ्यांसाठी अडचणीचे नांदेड जिल्ह्यात सध्या तूर पिकाच्या काढणीला वेग आला असला तरी बदलते व ढगाळ वातावरण शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता अनेक ठिकाणी घाईगडबडीत तूर काढणी सुरू आहे. यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने आधीच मोठे नुकसान सहन करावे लागले. उरलेल्या तुरीकडून शेतकऱ्यांना आशा होती; मात्र प्रत्यक्षात उतारा घटल्याने उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे खरीपातील नुकसान भरून काढणे कठीण बनले आहे. तूर पेरणीपासून काढणी, मळणी, वाळवणे व वाहतुकीपर्यंत प्रति क्विंटल सुमारे ६ हजार रुपये खर्च येत आहे. मात्र सध्या बाजारात मिळणारा कमी दर पाहता खर्चही निघत नसून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता शेतकऱ्यांची भिस्त रब्बी पिकांवर असली तरी ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा, करडई आदी पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. खरीपापाठोपाठ रब्बी हंगामही अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत. 🚜 हवामानातील अनिश्चितता, उत्पादन घट व बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून 📢 शासनाने तातडीने हमीभाव, नुकसानभरपाई व बाजार हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. #नांदेड #तूर_पीक #अवकाळी_पाऊस #शेतकरी_संकट #खरीप_रब्बी कृषी_समस्या हमीभाव नुकसानभरपाई बाजारभाव शेतकरी_आवाज 🚜🌾 https://www.instagram.com/reel/DUX4LU5DF_D/?igsh=MmNtY3U3b2Y2bWQx1
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- वंचित बहुजन आघाडी बिलोली संवाद बैठक, व पक्षप्रवेश सोहळा संपन्न. देगलूर - नांदेड जिल्हा प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचा बिलोलीत येथे कार्यकर्ता संवाद बैठक, व पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला आहे. बडूर रोड येथील तलाठी फार्म हाऊस येथे हा सोहळा पार पडला, वंचित बहुजन आघाडी नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष शंकर महाजन साहेब, व जिल्हा महासचिव रवी पंडित यांच्या,नेतृत्वाखाली बिलोली येथे कार्यकर्ता संवाद बैठकीचा आयोजन करण्यात आले होते,या बैठकीत आंबेडकरवादी चळवळीतील कार्य करणारे शेख आहेमंद साब चेअरमन हिप्परगा थडी,यांचं व त्यांच्या कारकर्ते यांच,वंचित बहुजन आघाडी मध्ये जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आले, व खतगाव येथील लिंगायत समाजाचे नवनाथ अंदुरे यांचे व त्यांचा कार्यकर्ते यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये,रवी पंडित यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आले, व मातंग समाजाचे सामाजिक कार्यकर्ते हरनाळी येथील हनुमंत शिंदे यांचे व त्यांचे कार्यकर्ते सुद्धा, वंचित बहुजन आघाडी मध्ये जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब यांच्या हस्ते पक्ष प्रवेश करण्यात आले, सर्व पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले की आम्ही शंकर महाजन साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला प्रेरित होऊन आम्ही वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश करत आहोत, यावेळी जिल्हाध्यक्ष शंकर महाजन साहेब, व महासचिव रवी पंडित, संघटक संजय टिके साहेब, उपाध्यक्ष विनायक गजभारे यांनी,मार्गदर्शन केले व सर्व कार्यकर्त्यांनी बिलोली तालुक्यामधील, विविध विषयावरती मार्गदर्शन व सूचना जिल्हा पदाधिकारी यांच्यासमोर मांडले,वंचित बहुजन आघाडीने चारही जिल्हा परिषद व आठ पंचायत समिती गणामध्ये मोठ्या,ताकदीने निवडणूक लढण्यासाठी सामोरे जाण्यासाठी बिलोली तालुका वंचित बहुजन आघाडी सक्षम असल्याची,माहिती वंचित बहुजन आघाडी बिलोली तालुक्यातर्फे, जिल्हा पदाधिकारी यांना देण्यात आले यावेळी,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंचित बहुजन आघाडीचे ग्रामीण नेते मारोती एडकेवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव गजानन चिंतले, यांनी केले. यावेळी उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे बिलोली तालुक्यातील पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष धमदीप गावंडे, गजानन चिंतले, मारोती एडकेवार, गंगाधर कांबळे,अमोल शेरे,पप्पू पाटील लाकडे,शिवा शिव शेट्टे,पवन पाटील हिप्परगेकर, सय्यद मुजाहिद,बालाजी एडकेवर,शबर पटेल, गौतम भालेराव, अनिल बुद्धेवार, प्रेम दुगाने, बडूरकर,सय्यद अमीर हुंनगोंदा,गौतम गावंडे, विजय गावंडे, मोईन आटकळीकर व सर्व आजी-माजी पदाधिकारी,व सर्व हितचिंतक वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वच्या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या निवडून येतील आणि त्या देखील प्रचंड बहुमताने येतील असा विश्वास भाजपचे युवा नेते राहुल केंद्रे यांनी व्यक्त केला आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये नरेंद्र मोदी यांनी सरळ शेतकऱ्यांना मदत करण्याची जी भूमिका घेतली ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे डीबीटी च्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसा जमा होतो हे धोरण सरकारने अत्यंत प्रभावीपणे राबवले आहे. राज्यातही देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कुशल पद्धतीने सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या योजना राबवल्या आहेत लोककल्याणकारी योजना राबवत असल्यामुळे लोक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडे आकर्षित होऊ लागले आहेत. विरोधकाकडे कोणतेही मुद्दे नसल्यामुळे ते वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी करत आहेत. त्यांच्याकडे विकासाचे कुठलेही नियोजन नाही किंवा महायुतीने केलेला विकास त्यांना दिसत नाही असाही टोला राहुल केंद्रे यांनी याप्रसंगी लगावला.1
- आमदार संजय बनसोडे यांच्या विकास पर्वावर मतदारांचे शिक्कामोर्तब; निडेबन सर्कलमध्ये युती उमेदवारांचा झंझावात उदगीर: निडेबन जिल्हा परिषद गटात निवडणूक प्रचाराने आता निर्णायक वळण घेतले असून, माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी मतदारसंघात राबवलेल्या दूरदृष्टीपूर्ण विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक आता केवळ औपचारिकता उरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. युतीच्या उमेदवारांना मिळणारा जनप्रतिसाद हा आमदार बनसोडे यांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे. निडेबन सर्कल अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात, वाडी-वस्ती आणि तांड्यांवर डॉ. ज्योतीताई दीपक सोमवंशी व ताई प्रकाश राठोड या घराघरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आमदार संजय बनसोडे यांनी गेल्या काही वर्षांत या भागात रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित जे मूलभूत प्रश्न मार्गी लावले, त्याचा मोठा फायदा या निवडणुकीत उमेदवारांना होताना दिसत आहे. 'विकास केलाय आणि विकासच करणार' हा मंत्र घेऊन फिरणाऱ्या उमेदवारांना ग्रामस्थांकडून औक्षण करून स्वागत केले जात आहे. या प्रचारात जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार डॉ. दीपक सोमवंशी, पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुनीताताई प्रकाश राठोड आणि मनोज चिखले यांनी रॅली आणि पदयात्रांच्या माध्यमातून गावचा कोपरा न कोपरा पिंजून काढला आहे. महिलांचा वाढता सहभाग आणि युवकांचा उत्साह पाहता, विरोधकांचे आव्हान पूर्णपणे फिका पडल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आमदार संजय बनसोडे यांच्या नियोजनबद्ध कामामुळे ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला असून, हीच विकासगंगा पुढे चालू ठेवण्यासाठी जनता पुन्हा एकदा युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे दिसून येत आहे. प्रचाराचा हा धुराळा आणि लोकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता, निडेबन गटात युती ऐतिहासिक विजयाची नोंद करेल, असे संकेत ... Part 61
- जुना गंज ते मन्सूर खान हेवेली ते नावघाट पूल पर्यंत ड्रेनीस व नाली चे पूर्ण पणे काम न करता रोड चे काम चालू केले.1
- सोला बरसं कि बाली उमर को सलाम.. ऐ प्यार 'तेरी पेहली नजर को सलाम...1
- देगलूर शहरात अल्पसंख्यांक शादीखाना ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार देगलूर जिल्हा नांदेड प्रतिनिधी नगर परिषद क्षेत्रात प्रभाग क्र.3 नरंगल रोड देगलुर येथे असलेल्या नगरपालिके मार्फत अल्पसंख्यांक शादीखाना चे ईमारतीचा वापर होत नसल्याने या ईमारती मध्ये शादीखाना ऐवजी भव्य आणी सुसज्य असा उर्दुघर निर्माण करन्यात येणार असुन त्या कामाची सुरूवात करन्यासाठी पाहणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस देगलुरचे नेते मा.लक्ष्मिकांतराव पदमवार,नगराध्यक्षा प्रतीनिधी तथा माजी उपनगराध्यक्ष मा. बालाजीराव टेकाळे ,बाधकाम सभापती मा.सुमंत कांबळे,स्वच्छता विभाग सभापती प्रतिनीधी मा. दिगांबर कौरवार, नगरसेवक सय्यद मोहियोद्दीन नगरसेवक प्रतिनीधि सय्यद सादात,शेख पाशामियॉ,अल्पसंख्यक जिल्हाउपाध्यक्ष खालेद पटेल युवा शहराघ्यक्ष अथर हाश्मी, माजी नगरसेवक मुफ्ती साब,ईदरिस कुरेशी,गजुभाउ कांबळे ,नगर पालिकेचे ईंंजिनीयर देबडवार यांचे सह अनेक जन उपस्थित होते.1