logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सणोत्सव भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब'; वृंदा करमरकर सोमवारीय 'काव्य त्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण 'सणोत्सव भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब'; वृंदा करमरकर सोमवारीय 'काव्य त्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आणि समृद्ध परंपरांनी सजलेली आहे. या संस्कृतीचे जिवंत प्रतिबिंब आपल्या सण-उत्सवांतून दिसून येते. वर्षभर येणारे विविध सणोत्सव म्हणजे केवळ आनंदाचे क्षण नसून, ते भारतीय समाज जीवनाला एकत्र बांधणारे सांस्कृतिक दुवे आहेत. विविध धर्म, जाती, भाषा, प्रांत आणि संस्कृती यांचा सुंदर संगम भारतीय समाजात पाहायला मिळतो. या विविधतेला एकत्र बांधून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य सणोत्सव करतात. म्हणूनच भारतीयांच्या जीवनात सणोत्सवांना अनन्य साधारण महत्त्व आहे. गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया, नागपंचमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, मकरसंक्रांत, होळी, ईद, ख्रिसमस अशा विविध सणांमधून भारताची धार्मिक व सांस्कृतिक विविधता अनुभवता येते. प्रत्येक सणामागे एखादी ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक किंवा नैसर्गिक पार्श्वभूमी दडलेली आहे. सणांच्या निमित्ताने घरांची स्वच्छता, सजावट, रांगोळ्या, पारंपरिक खाद्यपदार्थ, नवीन वस्त्रप्रावरणे आणि आप्तेष्टांच्या भेटीगाठीमुळे वातावरणात उत्साह निर्माण होतो. भारतीय सणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा ऋतूचक्राशी असलेला जवळचा संबंध. भारतीय सणोत्सवांचा कृषी परंपरेशीही घनिष्ठ संबंध आहे. भारताची संस्कृती दीर्घकाळ कृषिप्रधान राहिल्यामुळे पेरणी, पिकांची वाढ, कापणी आणि नवीन धान्याचे आगमन यांचा आनंद सणांमधून व्यक्त होतो. महाराष्ट्रातील 'पोळा' हा शेतकरी आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा महत्त्वाचा सण आहे. सणोत्सव हे भारतीय संस्कृती, परंपरा, निसर्ग आणि सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब आहेत. सण म्हणजे केवळ धार्मिक विधी किंवा मनोरंजन नव्हे, तर समाजातील माणसांना एकत्र आणणारा, नात्यांमध्ये प्रेम व आपुलकी निर्माण करणारा आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणारा उत्सव होय. सणोत्सवांमुळे लोककला, लोकपरंपरा, खाद्य संस्कृती, वेशभूषा आणि सामाजिक ऐक्य यांचे संवर्धन होते. अशा प्रकारे ऋतू, निसर्ग, कृषी आणि मानवी जीवन यांना जोडणारा सांस्कृतिक सेतू म्हणजे सणोत्सव होय. परंपरेचा सन्मान राखत आधुनिक मूल्यांचा स्वीकार केल्यास सणोत्सवांचे सांस्कृतिक महत्त्व अधिक समृद्ध होईल. आजच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी 'सणोत्सव' हा अगदी योग्य विषय दिल्याबद्दल त्यांचे कौतुक. शिलेदारांनी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. मला काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परिक्षण लिखाणाची संधी दिल्याबद्दल राहुलसरांचे मनापासून आभार ! वृंदा (चित्रा) करमरकर मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक सांगली जिल्हा सांगली ©मराठीचे शिलेदार समूह

7 hrs ago
user_Pallavi Patil, निवासी संपादक
Pallavi Patil, निवासी संपादक
Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
7 hrs ago
81e2f224-77b8-419c-a8ce-835e28d06cf2

सणोत्सव भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब'; वृंदा करमरकर सोमवारीय 'काव्य त्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण 'सणोत्सव भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब'; वृंदा करमरकर सोमवारीय 'काव्य त्रिवेणी' स्पर्धेचे परीक्षण भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आणि समृद्ध परंपरांनी सजलेली आहे. या संस्कृतीचे जिवंत प्रतिबिंब आपल्या सण-उत्सवांतून दिसून येते. वर्षभर येणारे विविध सणोत्सव म्हणजे केवळ आनंदाचे क्षण नसून, ते भारतीय समाज जीवनाला एकत्र बांधणारे सांस्कृतिक दुवे आहेत. विविध धर्म, जाती, भाषा, प्रांत आणि संस्कृती यांचा सुंदर संगम भारतीय समाजात पाहायला मिळतो. या विविधतेला एकत्र बांधून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य सणोत्सव करतात. म्हणूनच भारतीयांच्या जीवनात सणोत्सवांना अनन्य साधारण महत्त्व आहे. गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया, नागपंचमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, मकरसंक्रांत, होळी, ईद, ख्रिसमस अशा विविध सणांमधून भारताची धार्मिक व सांस्कृतिक विविधता अनुभवता येते. प्रत्येक सणामागे एखादी ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक किंवा नैसर्गिक पार्श्वभूमी दडलेली आहे. सणांच्या निमित्ताने घरांची स्वच्छता, सजावट, रांगोळ्या, पारंपरिक खाद्यपदार्थ, नवीन वस्त्रप्रावरणे आणि आप्तेष्टांच्या भेटीगाठीमुळे वातावरणात उत्साह निर्माण होतो. भारतीय सणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा ऋतूचक्राशी असलेला जवळचा संबंध. भारतीय सणोत्सवांचा कृषी परंपरेशीही घनिष्ठ संबंध आहे. भारताची संस्कृती दीर्घकाळ कृषिप्रधान राहिल्यामुळे पेरणी, पिकांची वाढ, कापणी आणि नवीन धान्याचे आगमन यांचा आनंद सणांमधून व्यक्त होतो. महाराष्ट्रातील 'पोळा' हा शेतकरी आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा महत्त्वाचा सण आहे. सणोत्सव हे भारतीय संस्कृती, परंपरा, निसर्ग आणि सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब आहेत. सण म्हणजे केवळ धार्मिक विधी किंवा मनोरंजन नव्हे, तर समाजातील माणसांना एकत्र आणणारा, नात्यांमध्ये प्रेम व आपुलकी निर्माण करणारा आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करणारा उत्सव होय. सणोत्सवांमुळे लोककला, लोकपरंपरा, खाद्य संस्कृती, वेशभूषा आणि सामाजिक ऐक्य यांचे संवर्धन होते. अशा प्रकारे ऋतू, निसर्ग, कृषी आणि मानवी जीवन यांना जोडणारा सांस्कृतिक सेतू म्हणजे सणोत्सव होय. परंपरेचा सन्मान राखत आधुनिक मूल्यांचा स्वीकार केल्यास सणोत्सवांचे सांस्कृतिक महत्त्व अधिक समृद्ध होईल. आजच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या काव्य त्रिवेणी स्पर्धेसाठी आदरणीय राहुल सरांनी 'सणोत्सव' हा अगदी योग्य विषय दिल्याबद्दल त्यांचे कौतुक. शिलेदारांनी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. मला काव्यत्रिवेणी स्पर्धेचे परिक्षण लिखाणाची संधी दिल्याबद्दल राहुलसरांचे मनापासून आभार ! वृंदा (चित्रा) करमरकर मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक सांगली जिल्हा सांगली ©मराठीचे शिलेदार समूह

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh [14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं? नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं। [14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई
    1
    दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh 
[14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं?
नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं।
[14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर
    1
    Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर
Wardha News | Rohit Pawar in Wardha Today to meet family of Late Bhagwan Dhurve. रोहित पावर आज वर्धा दौरे पर
    user_Public Press (Journalist)
    Public Press (Journalist)
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • कु.रविना रवी रंगारी हिचा सत्कार एकोडी येथील रहिवासी कु.रविना रवि रंगारी ही पवित्र पोर्टल अंतर्गत रयत शिक्षण संस्था सातारा येथे क्रीडा शिक्षकम्हणून नियुक्ती झाली त्या करिता नवनिकेतन नाट्य कला संच एकोडी च्या वतीने घरी जाऊन रविना चा स्मृती चिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. रविना ही अत्यंत मेहनती मुलगी लहानपनापासून क्रीडा क्षेत्राची आवड, धनुर्विद्या तिचा आवडता खेळ व त्या खेळात ती राष्ट्रीय पातळीपर्यत खेडायला गेली आई वडिलांचे संस्कार , कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने बोलणे हा तिचा स्वभाव सर्वांना आवडत असतो त्या निमित्ताने तिच्या मेहनतीने जिद्द चिकाटीने तिने पवित्र पोर्टल अंतर्गत सातारा येथे क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. सत्कार करतांना नवनिकेतन नाट्य कला संचाचे पदाधिकारी कलावंत ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुकराम बन्सोड, कमलाकर चांदेवार,एकनाथ कोटांगले, फिरोज कोटांगले, टिकाराम द्रगकर, राधेश्याम चौधरी,अमित भैसारे,कैलास जांभूळकर,कार्तिक मेश्राम, संदिप कोटांगले, पूरणदास निपाने, रंजना रंगारी, रवीकुमार रंगारी उपस्थित होते.
    1
    कु.रविना रवी रंगारी  हिचा सत्कार 

एकोडी येथील रहिवासी कु.रविना रवि रंगारी
ही पवित्र पोर्टल अंतर्गत रयत शिक्षण संस्था सातारा येथे क्रीडा शिक्षकम्हणून नियुक्ती झाली
त्या करिता नवनिकेतन नाट्य कला संच एकोडी च्या वतीने घरी जाऊन रविना चा स्मृती चिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

रविना ही अत्यंत मेहनती मुलगी लहानपनापासून क्रीडा क्षेत्राची आवड, धनुर्विद्या तिचा आवडता खेळ व त्या खेळात ती राष्ट्रीय पातळीपर्यत खेडायला गेली  आई वडिलांचे संस्कार , कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने बोलणे हा तिचा स्वभाव सर्वांना आवडत असतो त्या निमित्ताने  तिच्या मेहनतीने जिद्द चिकाटीने तिने पवित्र पोर्टल अंतर्गत सातारा येथे क्रीडा शिक्षक म्हणून नियुक्ती झाली.
  सत्कार करतांना नवनिकेतन
नाट्य कला संचाचे पदाधिकारी कलावंत ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, सुकराम बन्सोड, कमलाकर चांदेवार,एकनाथ कोटांगले, फिरोज कोटांगले, टिकाराम द्रगकर, राधेश्याम चौधरी,अमित भैसारे,कैलास जांभूळकर,कार्तिक मेश्राम, संदिप कोटांगले, पूरणदास निपाने, रंजना रंगारी, रवीकुमार रंगारी उपस्थित होते.
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे : जुना धामणगांव येथील दलित वस्तीच्या मुख्य मार्गावरील नालीची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नालीमध्ये पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर नालीतील घाण पाणी, गाळ व कचरा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, नालीचे घाण पाणी व गाळ रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नाली व परिसरात पाणी व कचरा साचत असल्याने साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, नालीची योग्य साफसफाई, दुरुस्ती व पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता नालीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती आणि पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल
जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल
प्रतिनिधी : संतोष वाघमारे
धामणगांव रेल्वे :
जुना धामणगांव येथील दलित वस्तीच्या मुख्य मार्गावरील नालीची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नालीमध्ये पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर नालीतील घाण पाणी, गाळ व कचरा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, नालीचे घाण पाणी व गाळ रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नाली व परिसरात पाणी व कचरा साचत असल्याने साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, नालीची योग्य साफसफाई, दुरुस्ती व पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता नालीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती आणि पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    11 hrs ago
  • डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व कर्णकर्कश आवाजावर बंदी असताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पुसद वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात डीजेचे १० मोठे स्पीकर बॉक्स व बँजोचे साहित्य जप्त केले १४ सप्टेंबर रोजी दुपारी नवीन पुसद येथील एका मंडळाकडे डीजे वाजविण्यासाठी जात असताना एमएच २९ एम बारा ७१ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. चालक नारायण पांढरे व मालक नरेश खंडागळे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
    1
    डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई 
डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त,
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व कर्णकर्कश आवाजावर बंदी असताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पुसद वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात डीजेचे १० मोठे स्पीकर बॉक्स व बँजोचे साहित्य जप्त केले १४ सप्टेंबर रोजी दुपारी नवीन पुसद येथील एका मंडळाकडे डीजे वाजविण्यासाठी जात असताना एमएच २९ एम बारा ७१ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. चालक नारायण पांढरे व मालक नरेश खंडागळे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Wardha District Prime News Today | वर्धा जिले की आज की महत्पूर्ण ख़बरें.............................. Wardha District Prime News Today | वर्धा जिले की आज की महत्पूर्ण ख़बरें..............................
    1
    Wardha District Prime News Today | वर्धा जिले की आज की महत्पूर्ण ख़बरें..............................
Wardha District Prime News Today | वर्धा जिले की आज की महत्पूर्ण ख़बरें..............................
    user_Public Press (Journalist)
    Public Press (Journalist)
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • धान उत्पादक शेतकऱ्यांच्या २० हजार रुपयांच्या बोनसचा प्रश्न अधांतरी; शासन निर्णयानंतरही मदत खात्यात जमा नाहीच गोंदिया/भंडारा: महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेला प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस नऊ महिने उलटूनही बँक खात्यात जमा न झाल्याने विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाकडून धान उत्पादकांना हेक्टरी २०,००० रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने १८०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूदही केली होती, मात्र प्रत्यक्षात ही रक्कम अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. प्रहार संघटनेचे आंदोलन व शेतकऱ्यांची मागणी बोनसची हक्काची रक्कम तात्काळ खात्यात वर्ग करण्यात यावी, यासाठी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत 'प्रहार जनशक्ती संघटने'च्या वतीने निदर्शने व आंदोलने करण्यात आली आहेत. शासनाने शासन निर्णय (GR) काढून निधी निश्चित केल्यानंतरही वितरण प्रक्रिया थांबल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सध्या या बोनसबाबत राजकीय क्षेत्रात दोन वेगळे प्रवाह पाहायला मिळत आहेत: * निधीच्या कमतरतेची भीती: राज्य सरकारकडून राबवली जाणारी कर्जमाफी, 'लाडकी बहीण योजना', 'पीएम किसान' आणि 'नमो शेतकरी महासन्मान निधी' या योजनांमुळे तिजोरीवर भार असून यंदा धान बोनस मिळणार नाही, असा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. * महायुतीचा दावा: महायुतीतील लोकप्रतिनिधी आणि घटक पक्षांचे नेते मात्र हा बोनस शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळेल, अशी भूमिका मांडत आहेत. इतर प्रलंबित समस्या आणि ई-पीक पाहणी धान बोनसच्या मुद्द्यासोबतच ग्रामीण भागातील खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे. याशिवाय, शासनाच्या नवीन अपडेटनुसार शेतकऱ्यांना स्वतःच्या 'फार्मर आयडी' (Farmer ID) द्वारे 'ई-पीक पाहणी'ची नोंदणी करावी लागणार आहे. शासनाने दिलेला शब्द पाळून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम तात्काळ जमा करावी, अशी आग्रही मागणी आता झाडीबोली पट्ट्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
    1
    धान उत्पादक शेतकऱ्यांच्या २० हजार रुपयांच्या बोनसचा प्रश्न अधांतरी; शासन निर्णयानंतरही मदत खात्यात जमा नाहीच
गोंदिया/भंडारा:
महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेला प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस नऊ महिने उलटूनही बँक खात्यात जमा न झाल्याने विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाकडून धान उत्पादकांना हेक्टरी २०,००० रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने १८०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूदही केली होती, मात्र प्रत्यक्षात ही रक्कम अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही.
प्रहार संघटनेचे आंदोलन व शेतकऱ्यांची मागणी
बोनसची हक्काची रक्कम तात्काळ खात्यात वर्ग करण्यात यावी, यासाठी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत 'प्रहार जनशक्ती संघटने'च्या वतीने निदर्शने व आंदोलने करण्यात आली आहेत. शासनाने शासन निर्णय (GR) काढून निधी निश्चित केल्यानंतरही वितरण प्रक्रिया थांबल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा
सध्या या बोनसबाबत राजकीय क्षेत्रात दोन वेगळे प्रवाह पाहायला मिळत आहेत:
* निधीच्या कमतरतेची भीती: राज्य सरकारकडून राबवली जाणारी कर्जमाफी, 'लाडकी बहीण योजना', 'पीएम किसान' आणि 'नमो शेतकरी महासन्मान निधी' या योजनांमुळे तिजोरीवर भार असून यंदा धान बोनस मिळणार नाही, असा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे.
* महायुतीचा दावा: महायुतीतील लोकप्रतिनिधी आणि घटक पक्षांचे नेते मात्र हा बोनस शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळेल, अशी भूमिका मांडत आहेत.
इतर प्रलंबित समस्या आणि ई-पीक पाहणी
धान बोनसच्या मुद्द्यासोबतच ग्रामीण भागातील खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला आहे. याशिवाय, शासनाच्या नवीन अपडेटनुसार शेतकऱ्यांना स्वतःच्या 'फार्मर आयडी' (Farmer ID) द्वारे 'ई-पीक पाहणी'ची नोंदणी करावी लागणार आहे.
शासनाने दिलेला शब्द पाळून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात बोनसची रक्कम तात्काळ जमा करावी, अशी आग्रही मागणी आता झाडीबोली पट्ट्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी परिसरातील विहिरीत आढळल्या मृतदेह
    1
    कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी परिसरातील विहिरीत आढळल्या मृतदेह
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन; गणेश मंडळाच्या बॅन्जोवर पोलिसांची कारवाई
    1
    ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन; गणेश मंडळाच्या बॅन्जोवर पोलिसांची कारवाई
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.