वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील मौजे मानोली ते मोतसावंगा रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत एका चारचाकी वाहनासह गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिगंबर रमेश पवार (वय ३७ वर्षे, रा. भिलडोंगर, ता. मानोरा, जि. वाशीम, ह.मु. शिवाजी नगर, वाशीम) आणि प्रवीण भगवानदास वर्मा (वय ५० वर्षे, रा. सोनखास, ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) यांचा समावेश आहे. काही इसम चारचाकी वाहनातून बेकायदेशीरपणे मद्याची अवैध वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, अमरावती विभागाचे विभागीय उप आयुक्त डॉ. पराग नवलकर तसेच वाशीमच्या अधीक्षक श्रीमती सिमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील मौजे मानोली ते मोतसावंगा रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत एका चारचाकी वाहनासह गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिगंबर रमेश पवार (वय ३७ वर्षे, रा. भिलडोंगर, ता. मानोरा, जि. वाशीम, ह.मु. शिवाजी नगर, वाशीम) आणि प्रवीण भगवानदास वर्मा (वय ५० वर्षे, रा. सोनखास, ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) यांचा समावेश आहे. काही इसम चारचाकी वाहनातून बेकायदेशीरपणे मद्याची अवैध वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, अमरावती विभागाचे विभागीय उप आयुक्त डॉ. पराग नवलकर तसेच वाशीमच्या अधीक्षक श्रीमती सिमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक परिसरामध्ये वन्यप्राण्यांच्या धुमाकुळामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात सापडला असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असताना, आता खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांची वन्यप्राणी प्रचंड नासाडी करत आहेत. दाताडा बुद्रुक आणि परिसरात सध्या नीलगाईंच्या कळपांनी उच्छाद मांडला असून त्यांच्यामुळे कोवळ्या सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. पिकांचे होणारे हे मोठे नुकसान पाहता, वन विभागाने या प्रकरणात तात्काळ दखल घेऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी आता शेतकरी वर्गातून केली जात आहे।1
- हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्वतः मुलांसोबत बसून अभ्यास करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. केवळ शिक्षणाचे महत्त्व न सांगता, स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून अभ्यास करत त्यांनी कृतीतून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. "मेंढपाळांच्या हातातील काठीसोबत त्यांच्या हातात पुस्तक आणि पेनही असले पाहिजे" या ध्येयाने प्रेरित होऊन वैजनाथ पावडे यांनी आपल्या निवासस्थानी या मुलांसाठी मोफत शिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाविषयी मोठा उत्साह निर्माण झाला असून पालकांमध्येही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. वंचित मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यामुळे धनगर समाजातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.1
- अकोला जिल्ह्यातील पातुर येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वतः काढलेले एक चित्र सादर करण्यात आले आहे. या निमित्ताने स्वामी विवेकानंदांना अभिवादन करत, प्रत्येकाचे विचार हे स्वामी विवेकानंद यांच्यासारखेच असायला हवेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहें।1
- जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे एकूण १०३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.1
- हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन औलिया (रहमतुल्ला अलैह) यांच्या १०४ व्या वार्षिक 'उर्स-ए-पाक'च्या शुभप्रसंगी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील ताजबाग शरीफला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सरकार ताज यांच्या पवित्र दर्गावर नतमस्तक होऊन आदरांजली वाहिली. केंद्रीय मंत्र्यांच्या या भेटीदरम्यान 'उर्स-ए-पाक'चे संपूर्ण आध्यात्मिक वातावरण आणि तेथे उपस्थित असलेली भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 'अझीम नझा' (Azeem Naza) या विशेष कार्यक्रमाचे दृश्यही यावेळी अनुभवायला मिळाले।1
- महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.1
- देशपातळीवरील 'नीट' आणि राज्यातील 'टीईटी' परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी शनिवारी ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया' बुलढाणा जिल्हा कमिटीच्या वतीने खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणांविरोधात आणि भ्रष्टाचाराविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. आंदोलनाचा भाग म्हणून संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रतिमा असलेले पोस्टर्स फाडून आपला तीव्र आक्रोश व निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एसएफआय विद्यार्थी संघटनेने पेपरफुटीच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व एस.एफ.आय. राज्य कमिटी सदस्य रितेश चोपडे आणि जिल्हा सचिव आदित्य इंगळे यांनी केले. या तीव्र निदर्शन आंदोलनात जिल्हा कमिटी सदस्य प्रवीण वाकुडकर, सुनील चोपडे, आनंदा थोरात, प्रथमेश आडोळकर, किशोर इंगळे यांच्यासह गिरीश उमाळे, योगेश सोनवणे, शुभम मुंडे आणि इतर अनेक विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला।4
- संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सध्या पाऊस गायब झाला असून, विश्रांती घेतलेला हा पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार आणि कधी परतणार याविषयी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे।1