मावळमध्ये वनसंपदेची निर्घृण कत्तल; अजिवलीत अनधिकृत वृक्षतोडीचा मोठा प्रकार उघड... मावळ पुणे :- मावळ तालुक्यातील अजिवली येथे वनसंपदेची निर्घृण कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेकडो वर्षे जुनी झाडे मुळासकट उखडून टाकत पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे... मावळ तालुक्यातील वडगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत अजिवली गावातील गट क्रमांक ४०७ मध्ये अनधिकृत वृक्षतोडीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी तानाजी लायगुडे यांच्या मालकीच्या जमिनीत घुसखोरी करून शेकडो झाडे मुळासकट उखडून टाकण्यात आली.या झाडांमध्ये आंबा, चिक्कू, जांभूळ, आईन आणि कोळशी यांसारखी सुमारे शंभर वर्षे जुनी झाडे होती. मात्र कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रस्त्याच्या कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप आहे.तोडलेली झाडे जाळून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे परिसरातील समृद्ध वनसंपदा अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे.या प्रकरणी तानाजी लायगुडे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस, वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालय आणि मावळ तहसील कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, ना वन विभागाची परवानगी घेण्यात आली, ना जमीनमालकाला कोणतीही माहिती देण्यात आली.प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात चोरी, मालमत्तेचे नुकसान आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे लागू होऊ शकतात. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.... अजिवली हे गाव पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात वसलेले असून, निसर्गसंपन्न म्हणून ओळखले जाते. अशा ठिकाणी झालेली ही वृक्षतोड केवळ पर्यावरणालाच नव्हे, तर स्थानिकांच्या भावनांनाही मोठा धक्का देणारी ठरली आहे.वन अधिकारी प्रकाश शिंदे यांनीही ही बाब गंभीर असल्याचे सांगत दोषींना शोधून कडक कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत. आता ‘लाकूडतोड्या पुष्पा’वर नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहें... अजिवलीतील या वृक्षतोड प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होणार का? आणि निसर्गाची ही हानी भरून काढण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... : तानाजी लायगुडे ( शेतकरी) #अजिवली #मावळ #वृक्षतोड #वनसंपदा #पर्यावरण #बेकायदेशीर_वृक्षतोड #पवना_बॅकवॉटर #शेतकरी_न्याय #वनविभाग #पर्यावरण_संरक्षण #Ajivali #Maval #Deforestation #IllegalTreeCutting #Environment #ForestDestruction #PawnaBackwaters #SaveNature #FarmerJustice #EnvironmentalProtection
मावळमध्ये वनसंपदेची निर्घृण कत्तल; अजिवलीत अनधिकृत वृक्षतोडीचा मोठा प्रकार उघड... मावळ पुणे :- मावळ तालुक्यातील अजिवली येथे वनसंपदेची निर्घृण कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेकडो वर्षे जुनी झाडे मुळासकट उखडून टाकत पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे... मावळ तालुक्यातील वडगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत अजिवली गावातील गट क्रमांक ४०७ मध्ये अनधिकृत वृक्षतोडीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी तानाजी लायगुडे यांच्या मालकीच्या जमिनीत घुसखोरी करून शेकडो झाडे मुळासकट उखडून टाकण्यात आली.या झाडांमध्ये आंबा, चिक्कू, जांभूळ, आईन आणि कोळशी यांसारखी सुमारे शंभर वर्षे जुनी झाडे होती. मात्र कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रस्त्याच्या कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप आहे.तोडलेली झाडे जाळून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे परिसरातील समृद्ध वनसंपदा अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे.या प्रकरणी तानाजी लायगुडे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस, वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालय आणि मावळ तहसील कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, ना वन विभागाची परवानगी घेण्यात आली, ना जमीनमालकाला कोणतीही माहिती देण्यात आली.प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात चोरी, मालमत्तेचे नुकसान आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे लागू होऊ शकतात. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.... अजिवली हे गाव पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात वसलेले असून, निसर्गसंपन्न म्हणून ओळखले जाते. अशा ठिकाणी झालेली ही वृक्षतोड केवळ पर्यावरणालाच नव्हे, तर स्थानिकांच्या भावनांनाही मोठा धक्का देणारी ठरली आहे.वन अधिकारी प्रकाश शिंदे यांनीही ही बाब गंभीर असल्याचे सांगत दोषींना शोधून कडक कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत. आता ‘लाकूडतोड्या पुष्पा’वर नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहें... अजिवलीतील या वृक्षतोड प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होणार का? आणि निसर्गाची ही हानी भरून काढण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... : तानाजी लायगुडे ( शेतकरी) #अजिवली #मावळ #वृक्षतोड #वनसंपदा #पर्यावरण #बेकायदेशीर_वृक्षतोड #पवना_बॅकवॉटर #शेतकरी_न्याय #वनविभाग #पर्यावरण_संरक्षण #Ajivali #Maval #Deforestation #IllegalTreeCutting #Environment #ForestDestruction #PawnaBackwaters #SaveNature #FarmerJustice #EnvironmentalProtection
- मावळ पुणे :- मावळ तालुक्यातील अजिवली येथे वनसंपदेची निर्घृण कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेकडो वर्षे जुनी झाडे मुळासकट उखडून टाकत पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे... मावळ तालुक्यातील वडगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत अजिवली गावातील गट क्रमांक ४०७ मध्ये अनधिकृत वृक्षतोडीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी तानाजी लायगुडे यांच्या मालकीच्या जमिनीत घुसखोरी करून शेकडो झाडे मुळासकट उखडून टाकण्यात आली.या झाडांमध्ये आंबा, चिक्कू, जांभूळ, आईन आणि कोळशी यांसारखी सुमारे शंभर वर्षे जुनी झाडे होती. मात्र कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रस्त्याच्या कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप आहे.तोडलेली झाडे जाळून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे परिसरातील समृद्ध वनसंपदा अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे.या प्रकरणी तानाजी लायगुडे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस, वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालय आणि मावळ तहसील कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, ना वन विभागाची परवानगी घेण्यात आली, ना जमीनमालकाला कोणतीही माहिती देण्यात आली.प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात चोरी, मालमत्तेचे नुकसान आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे लागू होऊ शकतात. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.... अजिवली हे गाव पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात वसलेले असून, निसर्गसंपन्न म्हणून ओळखले जाते. अशा ठिकाणी झालेली ही वृक्षतोड केवळ पर्यावरणालाच नव्हे, तर स्थानिकांच्या भावनांनाही मोठा धक्का देणारी ठरली आहे.वन अधिकारी प्रकाश शिंदे यांनीही ही बाब गंभीर असल्याचे सांगत दोषींना शोधून कडक कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत. आता ‘लाकूडतोड्या पुष्पा’वर नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहें... अजिवलीतील या वृक्षतोड प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होणार का? आणि निसर्गाची ही हानी भरून काढण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... : तानाजी लायगुडे ( शेतकरी) #अजिवली #मावळ #वृक्षतोड #वनसंपदा #पर्यावरण #बेकायदेशीर_वृक्षतोड #पवना_बॅकवॉटर #शेतकरी_न्याय #वनविभाग #पर्यावरण_संरक्षण #Ajivali #Maval #Deforestation #IllegalTreeCutting #Environment #ForestDestruction #PawnaBackwaters #SaveNature #FarmerJustice #EnvironmentalProtection1
- भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ ह्या आज बारामती मध्ये आल्या होत्या.. करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे ब1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- धुळे जिल्हा पोलीस घटकाने कारवाई केलेला अंमली पदार्थ मुद्देमाल केला नाश1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- विक्रम शिंदे /भोर दि.18 पुणे-सातारा महामार्गावर कापूरव्होळ(ता.भोर) हद्दीत विना नंबरचे डंपर खडी सांडवत बेधडक धावत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून, रस्त्यावर साचलेल्या खडीमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. नंबर प्लेट नसल्याने कारवाई अडचणीत येत असून, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व महामार्ग पोलिसांच्या दुर्लक्षाबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. संबंधित यंत्रणांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे1
- #voteforVahiniDada #voteforajitdada1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1