logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान इनाम जमिनी आणि मंदिरांच्या अन्य जमिनी कुळांना किंवा वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासाठी नवीन कायदा प्रस्तावित येत आहे. या धोरणाला महाराष्ट्र मंदिर महासंघाने कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यांनी ही कृती हिंदू देवस्थानांचे अस्तित्व संपवून भूमाफियांचे खिसे भरण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त करत, शासनाने हा बेकायदेशीर आणि अन्यायकारक मसुदा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर मंदिरांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी सविस्तर भूमिका मांडताना श्री. सुनील घनवट यांनी स्पष्ट केले की, भारतीय कायद्यानुसार हिंदू देवता (मूर्ती) ही एक ‘कायदेशीर व्यक्ती’ असल्याने देवस्थानच्या मालमत्तेचा मूळ मालक ‘देव’ असतो. महाराष्ट्र राज्य सरकार, ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०’ अन्वये केवळ नियामक, प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारांच्या माध्यमातून सार्वजनिक मंदिरांवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे विश्वस्तांना व शासनाला देवस्थानांच्या मूळ मालकाची जमीन परस्पर त्रयस्थांना किंवा वहिवाटदारांना वाटण्याचा कोणताही अधिकार नाही. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या प्रस्थापित निकालांनुसार देवस्थान जमिनींवर कुळांना मालकी हक्क सांगता येत नाही. असे असतानाही हा कायदा आणणे हे संविधानाच्या कलम २५, २६ आणि ३००-अ मधील मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंदिर महासंघाचे श्री. निळकंठ चौधरी यांनी मंदिर आणि वक्फ प्रॉपर्टीबाबत शासनाच्या दुजाभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासनाने १३ एप्रिल २०१६ रोजी परिपत्रक काढून वक्फ मालमत्तांच्या ७/१२ उताऱ्यावर "वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार" अशी नोंद घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना, हिंदू देवस्थानांच्या जमिनी वहिवाटदारांच्या घशात का घातल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. हा राज्यघटनेच्या समानतेच्या (कलम १४) तत्त्वाचा उघड भंग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’मधील कलम ८८ ब/ १२९ ब नुसार देवस्थान जमिनींना कुळ कायद्यातून आधीच संरक्षण मिळाले आहे. या मूळ कायद्याचे संरक्षण डावलून, विकासाच्या नावाखाली मोक्याच्या जमिनी बिल्डर आणि भूमाफियांच्या घशात घालण्याचा हा छुपा प्रयत्न असून, ज्यामुळे मंदिरांची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र मंदिर महासंघाने शासनाकडे ५ प्रमुख मागण्या केल्या आहेत: १. देवस्थान इनाम व देवस्थानच्या जमिनी कुळे/वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासंदर्भातील प्रस्तावित कायद्याचा मसुदा तात्काळ आणि कायमस्वरूपी मागे घ्यावा. २. वक्फ प्रमाणे संरक्षण देऊन हिंदू देवस्थानांच्या सर्व जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर "देवस्थान प्रतिबंधित सत्ता प्रकार - अहस्तांतरणीय" अशी स्पष्ट नोंद घेण्याचे परिपत्रक शासनाने तात्काळ काढावे. ३. गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात कठोर 'अँटी लँड ग्रॅबिंग कायदा' लागू करावा आणि देवस्थान जमीन हडपणाऱ्यांना १४ वर्षे सश्रम कारावास आणि अजामीनपात्र शिक्षेची तरतूद करावी. ४. मागील २५ वर्षांतील सर्व देवस्थान जमिनींचे हस्तांतरण, बोगस नोंदी आणि अतिक्रमणांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावी. ५. देवस्थान जमिनींबाबत महसूली आणि दिवाणी न्यायालयांत प्रलंबित असलेले वाद त्वरित निकाली काढण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करून ६ महिन्यात खटले निकाली काढावेत. यावेळी स्वामी नारायण मंदिराचे श्री. नयन स्वामी महाराज यांनी मंदिरांच्या मालकीच्या अनेक एकर जमिनी हडपण्याचा उद्देश असलेल्या वहिवाटदारांवर कर्नाटक, गुजरात प्रमाणे कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी सांगितले की, देवस्थान जमिनी केवळ महसुली दप्तरातील आकडेवारी नसून, त्या महाराष्ट्राच्या संस्कृती, श्रद्धा आणि समाजजीवनाचा मूळ आधार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शासनाने धर्मदाय मालमत्तांचे ‘विश्वस्त’ म्हणून रक्षण करावे आणि मंदिराच्या कारभारात प्रशासकीय हस्तक्षेप करू नये. या वस्तुनिष्ठ आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून हा कायदा लादण्याचा प्रयत्न झाल्यास, राज्यभरातील सकल हिंदू समाज, सर्व मंदिरे, भाविक, पुरोहित, पुजारी आणि विविध हिंदू, सामाजिक व आध्यात्मिक संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन करतील, असा त्यांनी इशारा दिला. त्यांनी हिंदुत्ववादी शासनाने मंदिरांच्या मागण्यांचा तातडीने विचार करण्याची मागणी केली.

14 hrs ago
user_Kiran Mali
Kiran Mali
Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
14 hrs ago

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान इनाम जमिनी आणि मंदिरांच्या अन्य जमिनी कुळांना किंवा वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासाठी नवीन कायदा प्रस्तावित येत आहे. या धोरणाला महाराष्ट्र मंदिर महासंघाने कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यांनी ही कृती हिंदू देवस्थानांचे अस्तित्व संपवून भूमाफियांचे खिसे भरण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त करत, शासनाने हा बेकायदेशीर आणि अन्यायकारक मसुदा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर मंदिरांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी सविस्तर भूमिका मांडताना श्री. सुनील घनवट यांनी स्पष्ट केले की, भारतीय कायद्यानुसार हिंदू देवता (मूर्ती) ही एक ‘कायदेशीर व्यक्ती’ असल्याने देवस्थानच्या मालमत्तेचा मूळ मालक ‘देव’ असतो. महाराष्ट्र राज्य सरकार, ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०’ अन्वये केवळ नियामक, प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारांच्या माध्यमातून सार्वजनिक मंदिरांवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे विश्वस्तांना व शासनाला देवस्थानांच्या मूळ मालकाची जमीन परस्पर त्रयस्थांना किंवा वहिवाटदारांना वाटण्याचा कोणताही अधिकार नाही. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या प्रस्थापित निकालांनुसार देवस्थान जमिनींवर कुळांना मालकी हक्क सांगता येत नाही. असे असतानाही हा कायदा आणणे हे संविधानाच्या कलम २५, २६ आणि ३००-अ मधील मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंदिर महासंघाचे श्री. निळकंठ चौधरी यांनी मंदिर आणि वक्फ प्रॉपर्टीबाबत शासनाच्या दुजाभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासनाने १३ एप्रिल २०१६ रोजी परिपत्रक काढून वक्फ मालमत्तांच्या ७/१२ उताऱ्यावर "वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार" अशी नोंद घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना, हिंदू देवस्थानांच्या जमिनी वहिवाटदारांच्या घशात का घातल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. हा राज्यघटनेच्या समानतेच्या (कलम १४) तत्त्वाचा उघड भंग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’मधील कलम ८८ ब/ १२९ ब नुसार देवस्थान जमिनींना कुळ कायद्यातून आधीच संरक्षण मिळाले आहे. या मूळ कायद्याचे संरक्षण डावलून, विकासाच्या नावाखाली मोक्याच्या जमिनी बिल्डर आणि भूमाफियांच्या घशात घालण्याचा हा छुपा प्रयत्न असून, ज्यामुळे मंदिरांची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र मंदिर महासंघाने शासनाकडे ५ प्रमुख मागण्या केल्या आहेत: १. देवस्थान इनाम व देवस्थानच्या जमिनी कुळे/वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासंदर्भातील प्रस्तावित कायद्याचा मसुदा तात्काळ आणि कायमस्वरूपी मागे घ्यावा. २. वक्फ प्रमाणे संरक्षण देऊन हिंदू देवस्थानांच्या सर्व जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर "देवस्थान प्रतिबंधित सत्ता प्रकार - अहस्तांतरणीय" अशी स्पष्ट नोंद घेण्याचे परिपत्रक शासनाने तात्काळ काढावे. ३. गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात कठोर 'अँटी लँड ग्रॅबिंग कायदा' लागू करावा आणि देवस्थान जमीन हडपणाऱ्यांना १४ वर्षे सश्रम कारावास आणि अजामीनपात्र शिक्षेची तरतूद करावी. ४. मागील २५ वर्षांतील सर्व देवस्थान जमिनींचे हस्तांतरण, बोगस नोंदी आणि अतिक्रमणांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावी. ५. देवस्थान जमिनींबाबत महसूली आणि दिवाणी न्यायालयांत प्रलंबित असलेले वाद त्वरित निकाली काढण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करून ६ महिन्यात खटले निकाली काढावेत. यावेळी स्वामी नारायण मंदिराचे श्री. नयन स्वामी महाराज यांनी मंदिरांच्या मालकीच्या अनेक एकर जमिनी हडपण्याचा उद्देश असलेल्या वहिवाटदारांवर कर्नाटक, गुजरात प्रमाणे कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी सांगितले की, देवस्थान जमिनी केवळ महसुली दप्तरातील आकडेवारी नसून, त्या महाराष्ट्राच्या संस्कृती, श्रद्धा आणि समाजजीवनाचा मूळ आधार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शासनाने धर्मदाय मालमत्तांचे ‘विश्वस्त’ म्हणून रक्षण करावे आणि मंदिराच्या कारभारात प्रशासकीय हस्तक्षेप करू नये. या वस्तुनिष्ठ आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून हा कायदा लादण्याचा प्रयत्न झाल्यास, राज्यभरातील सकल हिंदू समाज, सर्व मंदिरे, भाविक, पुरोहित, पुजारी आणि विविध हिंदू, सामाजिक व आध्यात्मिक संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन करतील, असा त्यांनी इशारा दिला. त्यांनी हिंदुत्ववादी शासनाने मंदिरांच्या मागण्यांचा तातडीने विचार करण्याची मागणी केली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • औरंगाबाद जिल्ह्यातील सावळदबारा येथील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. इंधन तुटवड्याच्या अफवा पसरल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
    1
    औरंगाबाद जिल्ह्यातील सावळदबारा येथील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. इंधन तुटवड्याच्या अफवा पसरल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यात डिझेल भरण्याच्या कारणावरून एका पेट्रोल पंपावर हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये 'इंधन टंचाईमुळे हा प्रकार घडला की लोकांच्या संयमाचा अंत झाला?' असा प्रश्न निर्माण झाला आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यात डिझेल भरण्याच्या कारणावरून एका पेट्रोल पंपावर हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये 'इंधन टंचाईमुळे हा प्रकार घडला की लोकांच्या संयमाचा अंत झाला?' असा प्रश्न निर्माण झाला आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या डिझेलची तीव्र टंचाई जाणवत आहे, ज्याचा थेट परिणाम महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर, विशेषतः गुंठेवारी भागांत टँकरद्वारे होणाऱ्या पुरवठ्यावर झाला आहे. टँकर चालकांना डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपांवर तीन ते चार तास उभे राहावे लागत आहे, ज्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या डिझेल टंचाईमुळे महापालिकेचे १०५ टँकर प्रभावित झाले असून, अनेक गुंठेवारी वसाहतींमधील नागरिकांना पाणी मिळू शकले नाही. 'नो नेटवर्क' भागांमध्ये टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा डिझेलच्या उपलब्धतेवर अवलंबून असल्याने, नागरिकांनी आगाऊ शुल्क भरूनही पाणी मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी दररोज सुमारे २ हजार लिटर डिझेलची आवश्यकता असून, दोन्ही कंत्राटदारांनी महापालिकेकडे मागणी केली आहे की, महापालिकेने स्वतःच्या पंपावरून डिझेल उपलब्ध करून द्यावे.
    4
    छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या डिझेलची तीव्र टंचाई जाणवत आहे, ज्याचा थेट परिणाम महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर, विशेषतः गुंठेवारी भागांत टँकरद्वारे होणाऱ्या पुरवठ्यावर झाला आहे.

टँकर चालकांना डिझेल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपांवर तीन ते चार तास उभे राहावे लागत आहे, ज्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या डिझेल टंचाईमुळे महापालिकेचे १०५ टँकर प्रभावित झाले असून, अनेक गुंठेवारी वसाहतींमधील नागरिकांना पाणी मिळू शकले नाही. 'नो नेटवर्क' भागांमध्ये टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा डिझेलच्या उपलब्धतेवर अवलंबून असल्याने, नागरिकांनी आगाऊ शुल्क भरूनही पाणी मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी दररोज सुमारे २ हजार लिटर डिझेलची आवश्यकता असून, दोन्ही कंत्राटदारांनी महापालिकेकडे मागणी केली आहे की, महापालिकेने स्वतःच्या पंपावरून डिझेल उपलब्ध करून द्यावे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    40 min ago
  • कोल्हापूर येथे सुरू असलेल्या उपोषण आंदोलनादरम्यान, कलेक्टर कार्यालयाकडून उपोषणकर्त्यांना कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. कलेक्टर कार्यालयाच्या या भूमिकेनंतर, आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी तात्काळ या निर्णयाबाबत जाब विचारला. उपोषण आंदोलनकर्त्यांना कलेक्टर कार्यालयाकडून सुविधा नाकारण्यात आल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले.
    1
    कोल्हापूर येथे सुरू असलेल्या उपोषण आंदोलनादरम्यान, कलेक्टर कार्यालयाकडून उपोषणकर्त्यांना कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. कलेक्टर कार्यालयाच्या या भूमिकेनंतर, आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी तात्काळ या निर्णयाबाबत जाब विचारला. उपोषण आंदोलनकर्त्यांना कलेक्टर कार्यालयाकडून सुविधा नाकारण्यात आल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांसाठी काही आदेश दिले आहेत.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांसाठी काही आदेश दिले आहेत.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे नगरपरिषदेच्या कचरा डेपोला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.
    1
    बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे नगरपरिषदेच्या कचरा डेपोला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सिंदखेड राजा तालुक्यातील किनगावं राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोयनदेव गावामध्ये अवैध देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
    1
    सिंदखेड राजा तालुक्यातील किनगावं राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोयनदेव गावामध्ये अवैध देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मागील पाच वर्षांत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली मोठे सकारात्मक बदल घडून आले आहेत. पूर्वी अत्यंत नाजूक आणि दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या या विभागाला माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मंडलेचा यांनी नवी दिशा दिली. या काळात महानगरपालिका रुग्णालयांचे नूतनीकरण करण्यात आले असून, ६ ठिकाणी ऑपरेशन थिएटरचे आधुनिकीकरण करून लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वीपणे सुरू करण्यात आल्या आहेत; गेल्या सहा महिन्यांत एकूण ३१३ लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. आरोग्य केंद्रांना आधुनिक स्वरूप प्राप्त झाले असून, आरोग्य अधिकाऱ्यांसाठी नवीन खुर्च्या, फर्निचर आणि रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. आगामी काळात स्त्रीरोगतज्ज्ञ (गायनॅकॉलॉजिस्ट) आणि सर्जन ही पदे भरली जाऊन लहान-मोठ्या शस्त्रक्रिया तसेच सिझेरियन सेक्शन (C-Section) सेवाही सुरू केल्या जाणार आहेत. डब्ल्यूएचओ कन्सल्टंट डॉ. मुजीब यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या लसीकरणानंतर पॅरासिटामॉल ड्रॉप्स उपलब्ध करून देण्याच्या आणि ए.एन.एम. व आशा सेविकांचा फोन नंबर पालकांना देण्याच्या दोन्ही उपयुक्त प्रथांची राज्यस्तरीय बैठकींमध्ये प्रशंसा केली असून, ही आरोग्य सेवेतील उल्लेखनीय बाब असल्याचे म्हटले आहे. आरोग्य विभागासाठी आवश्यक असलेली सुमारे ८४ लाख रुपयांची वैद्यकीय यंत्रसामग्री सीएसआर निधीतून, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यांसारख्या विविध बँकांच्या सहकार्याने उपलब्ध करून घेण्यात आली. यात सोनोग्राफी मशीन, ४ थॅलेसेमिया टेस्टिंग मशीनसह ८००० टेस्टिंग कार्ड्स, डिफिब्रिलेटर मशीन, डिजिटल बेबी वेट अँड हाइट मशीन, १०० मरकरी फ्री बी.पी. अपॅरेटस, सेंट्रिफ्यूज मशीन, कॉम्प्रेसरसह डेंटल चेअर, डेंटल आरव्हीजी आणि बॉयल्स मशीन यांसारख्या आधुनिक उपकरणांचा समावेश आहे, ज्यामुळे आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढली आहे. तसेच, मेल्ट्रॉन हॉस्पिटलचे एमआयडीसीकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी मोठा पाठपुरावा करण्यात आला आणि बायोमेडिकल वेस्ट प्लांटसाठी कोणतीही पीएमसी (PMC) नसतानाही आरोग्य विभागाने यशस्वीपणे टेंडर प्रक्रिया राबवून एजन्सीची नियुक्ती केली. आरोग्य सेवेतील या महत्त्वपूर्ण योगदानाच्या पार्श्वभूमीवर, डॉ. पारस मंडलेचा यांच्या निरोप समारंभाचे दि. २२/०५/२०२६ रोजी सायंकाळी आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत आयोजन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. कविता मंडलेचा, डॉ. उज्वला भामरे, डॉ. मनीषा भोंडवे यांच्यासह अनेक आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत मनोगत व्यक्त केले. याव्यतिरिक्त, दि. २३/०५/२०२६ रोजी सकाळी सिद्धार्थ उद्यान येथे मलेरिया विभागामार्फतही त्यांचा निरोप समारंभ पार पडला, जिथे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धती, नेतृत्व आणि योगदानाचे कौतुक केले. त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच उपस्थितांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. कविता मंडलेचा, डॉ. सय्यद सुमैय्या, डॉ. आदित्यकुमार जोशी, श्रीमती मनीषा ठाकरे, मिलिंद जबांगी, दिगंबर कोथळकर, निखिल ठाकरे, दानिश सिद्दीकी तसेच मलेरिया पर्यवेक्षक आणि फवारणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    2
    छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मागील पाच वर्षांत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वाखाली मोठे सकारात्मक बदल घडून आले आहेत. पूर्वी अत्यंत नाजूक आणि दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या या विभागाला माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मंडलेचा यांनी नवी दिशा दिली.

या काळात महानगरपालिका रुग्णालयांचे नूतनीकरण करण्यात आले असून, ६ ठिकाणी ऑपरेशन थिएटरचे आधुनिकीकरण करून लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वीपणे सुरू करण्यात आल्या आहेत; गेल्या सहा महिन्यांत एकूण ३१३ लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. आरोग्य केंद्रांना आधुनिक स्वरूप प्राप्त झाले असून, आरोग्य अधिकाऱ्यांसाठी नवीन खुर्च्या, फर्निचर आणि रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. आगामी काळात स्त्रीरोगतज्ज्ञ (गायनॅकॉलॉजिस्ट) आणि सर्जन ही पदे भरली जाऊन लहान-मोठ्या शस्त्रक्रिया तसेच सिझेरियन सेक्शन (C-Section) सेवाही सुरू केल्या जाणार आहेत. डब्ल्यूएचओ कन्सल्टंट डॉ. मुजीब यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या लसीकरणानंतर पॅरासिटामॉल ड्रॉप्स उपलब्ध करून देण्याच्या आणि ए.एन.एम. व आशा सेविकांचा फोन नंबर पालकांना देण्याच्या दोन्ही उपयुक्त प्रथांची राज्यस्तरीय बैठकींमध्ये प्रशंसा केली असून, ही आरोग्य सेवेतील उल्लेखनीय बाब असल्याचे म्हटले आहे.

आरोग्य विभागासाठी आवश्यक असलेली सुमारे ८४ लाख रुपयांची वैद्यकीय यंत्रसामग्री सीएसआर निधीतून, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यांसारख्या विविध बँकांच्या सहकार्याने उपलब्ध करून घेण्यात आली. यात सोनोग्राफी मशीन, ४ थॅलेसेमिया टेस्टिंग मशीनसह ८००० टेस्टिंग कार्ड्स, डिफिब्रिलेटर मशीन, डिजिटल बेबी वेट अँड हाइट मशीन, १०० मरकरी फ्री बी.पी. अपॅरेटस, सेंट्रिफ्यूज मशीन, कॉम्प्रेसरसह डेंटल चेअर, डेंटल आरव्हीजी आणि बॉयल्स मशीन यांसारख्या आधुनिक उपकरणांचा समावेश आहे, ज्यामुळे आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढली आहे. तसेच, मेल्ट्रॉन हॉस्पिटलचे एमआयडीसीकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी मोठा पाठपुरावा करण्यात आला आणि बायोमेडिकल वेस्ट प्लांटसाठी कोणतीही पीएमसी (PMC) नसतानाही आरोग्य विभागाने यशस्वीपणे टेंडर प्रक्रिया राबवून एजन्सीची नियुक्ती केली.

आरोग्य सेवेतील या महत्त्वपूर्ण योगदानाच्या पार्श्वभूमीवर, डॉ. पारस मंडलेचा यांच्या निरोप समारंभाचे दि. २२/०५/२०२६ रोजी सायंकाळी आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत आयोजन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. कविता मंडलेचा, डॉ. उज्वला भामरे, डॉ. मनीषा भोंडवे यांच्यासह अनेक आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत मनोगत व्यक्त केले. याव्यतिरिक्त, दि. २३/०५/२०२६ रोजी सकाळी सिद्धार्थ उद्यान येथे मलेरिया विभागामार्फतही त्यांचा निरोप समारंभ पार पडला, जिथे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धती, नेतृत्व आणि योगदानाचे कौतुक केले. त्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच उपस्थितांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. कविता मंडलेचा, डॉ. सय्यद सुमैय्या, डॉ. आदित्यकुमार जोशी, श्रीमती मनीषा ठाकरे, मिलिंद जबांगी, दिगंबर कोथळकर, निखिल ठाकरे, दानिश सिद्दीकी तसेच मलेरिया पर्यवेक्षक आणि फवारणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    42 min ago
  • छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखा पोलिसांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश तस्करांविरोधात जिल्हाभरात कारवाई करत विविध गुन्हे दाखल केले आहेत. ही मोहीम जिल्ह्यातील सर्व भागांत राबवण्यात आली.
    1
    छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखा पोलिसांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश तस्करांविरोधात जिल्हाभरात कारवाई करत विविध गुन्हे दाखल केले आहेत. ही मोहीम जिल्ह्यातील सर्व भागांत राबवण्यात आली.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.