इंदिराबाई पांडे लेआऊट मधील सन्मान हॉटेल ते लताबाई शिंदे तसेच व कालुशाबाबा दर्गा ते आनंदी चौक पर्यंतचा रस्ता व नाली तसेच ईलेक्ट्रीक पोल टाकुन देणे बाबत इंदिराबाई पांडे लेआऊट मधील सन्मान हॉटेल ते लताबाई शिंदे तसेच व कालुशाबाबा दर्गा ते आनंदी चौक पर्यंतचा रस्ता व नाली तसेच ईलेक्ट्रीक पोल टाकुन देणे बाबत रिसोड , शहरातील इंदिराबाई पांडे लेआऊट मधील रस्ता आम्ही खालील सह्या करणार व परीसरातील रहिवाशी अशी विनंती करतो की, गेल्या कित्येत वर्षापासुन सदर भागात रस्ता तयार करुन मिळणे बाबत नगर परीषद प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिले परंतु अद्यापही या बाबत नगर परीषद बांधकाम विभागाने कोणतीच दखल न घेतल्यामुळे कित्येक वर्षापासुन या भागातील नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी या बाबत नगर परीषद प्रशासनाने लक्ष देऊन सदर भागातील दोन्ही रस्ते व ईलेक्ट्रीक पोल टाकुन देण्यात यावे या बाबतचे निवेदन या परिसरातील नागरीकांनी मुख्याधीकारी न.प. यांना २७ जुलै रोजी दिले. दिलेल्या निवेदनावर या परीसरातील नागरीक कैलास शिंगणे, सारंग जिरवणकर, अमर सानप, अक्षय जिरवणकर, अनिल तायडे, संजय गुजरे, अविनाश कायंदे, दादाराव वाळके, प्रदिप टेकाळे, विठ्ठल आंधळे यांच्या सह ४० ते ५० नागरीकांच्या स्वाक्षर्या आहेत.
इंदिराबाई पांडे लेआऊट मधील सन्मान हॉटेल ते लताबाई शिंदे तसेच व कालुशाबाबा दर्गा ते आनंदी चौक पर्यंतचा रस्ता व नाली तसेच ईलेक्ट्रीक पोल टाकुन देणे बाबत इंदिराबाई पांडे लेआऊट मधील सन्मान हॉटेल ते लताबाई शिंदे तसेच व कालुशाबाबा दर्गा ते आनंदी चौक पर्यंतचा रस्ता व नाली तसेच ईलेक्ट्रीक पोल टाकुन देणे बाबत रिसोड , शहरातील इंदिराबाई पांडे लेआऊट मधील रस्ता आम्ही खालील सह्या करणार व परीसरातील रहिवाशी अशी विनंती करतो की, गेल्या कित्येत वर्षापासुन सदर भागात रस्ता तयार करुन मिळणे बाबत नगर परीषद प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिले परंतु अद्यापही या बाबत नगर परीषद बांधकाम विभागाने कोणतीच दखल न घेतल्यामुळे कित्येक वर्षापासुन या भागातील नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी या बाबत नगर परीषद प्रशासनाने लक्ष देऊन सदर भागातील दोन्ही रस्ते व ईलेक्ट्रीक पोल टाकुन देण्यात यावे या बाबतचे निवेदन या परिसरातील नागरीकांनी मुख्याधीकारी न.प. यांना २७ जुलै रोजी दिले. दिलेल्या निवेदनावर या परीसरातील नागरीक कैलास शिंगणे, सारंग जिरवणकर, अमर सानप, अक्षय जिरवणकर, अनिल तायडे, संजय गुजरे, अविनाश कायंदे, दादाराव वाळके, प्रदिप टेकाळे, विठ्ठल आंधळे यांच्या सह ४० ते ५० नागरीकांच्या स्वाक्षर्या आहेत.
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिनके परिवार ने देश के लिए बलिदान दिया, उन पर सत्ता के लालच का आरोप हास्यास्पद है - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ1
- बुलढाणा :-आमदार संजय गायकवाड व नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन; येळगाव धरण १०० टक्के भरल्याने बुलढाण्यात आनंदोत्सव!1
- वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे मंगरूळपीर शहरालगतच्या मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या सुमारे ४० फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या एका ३५ वर्षीय महिलेला मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढले. २९ जुलै रोजी दुपारी घडलेल्या या घटनेत बचाव पथकाने दाखविलेल्या धाडसामुळे महिलेला जीवनदान मिळाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपना राठोड (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. पंचशील नगर, मंगरूळपीर) या २९ जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास मंगरूळपीर शहरालगत मानोली रोडवरील सोनखास शेतशिवारात वीटभट्टीजवळ असलेल्या विहिरीत पडल्या. विहीर खोल आणि कोरडी असल्याने परिस्थिती गंभीर होती. घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना मिळताच घटनास्थळी गर्दी झाली. या घटनेची माहिती मंगरूळपीर पोलीस ठाण्याला देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्याशी संपर्क साधला आणि तातडीने बचाव पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या सहकाऱ्यांना बचावासाठी रवाना केले. गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर हे आवश्यक शोध व बचाव साहित्य घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचले. पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता संबंधित विहीर सुमारे ४० फूट खोल आणि पूर्णपणे कोरडी असल्याचे दिसून आले. विहिरीच्या तळाशी महिला पडलेली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बचाव पथकाने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनची तयारी सुरू केली. जवान गोपाल गिरे यांनी पथक प्रमुख दीपक सदाफळे यांना फोनवरून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संपूर्ण बचाव मोहिमेचे नियोजन करण्यात आले. विहिरीची खोली आणि परिस्थिती लक्षात घेऊन अत्यंत सावधगिरीने ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. वायर रोपच्या सहाय्याने जवान उतरला विहिरीत क्षणाचाही विलंब न करता जवान गोपाल गिरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वायर रोपच्या सहाय्याने सुमारे ४० फूट खोल विहिरीत प्रवेश केला. विहिरीच्या तळाशी पोहोचल्यानंतर त्यांनी महिलेला धीर दिला. बचावादरम्यान कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून महिलेला सुरक्षेसाठी हेल्मेट घालण्यात आले. त्यानंतर खाट आणि आवश्यक बचाव साहित्याच्या सहाय्याने महिलेला सुरक्षितपणे वर आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अत्यंत काळजीपूर्वक आणि समन्वयाने राबविण्यात आलेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर दुपारी सुमारे पाच वाजताच्या सुमारास महिलेला विहिरीतून जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर महिलेला पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. बचाव पथकाच्या साहसाचे नागरिकांकडून कौतुक या बचाव मोहिमेदरम्यान मंगरूळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके, पोलीस कर्मचारी प्रमोद थोरवे, धनंजय पवार यांच्यासह गावातील नागरिक आणि महिलेचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. महिला सुखरूप बाहेर आल्यानंतर उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. वेळेचे महत्त्व ओळखून पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी जीव धोक्यात घालून केलेल्या धाडसी बचावकार्यामुळे एका महिलेचे प्राण वाचले. जवान गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल आणि दत्ता मानेकर यांनी दाखविलेल्या साहसाचे स्थानिक नागरिकांनी विशेष कौतुक केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनमुळे महिलेला जीवनदान मिळाले असून, संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या तत्पर आणि साहसी कार्याची परिसरात प्रशंसा होत आहे.4