Shuru
Apke Nagar Ki App…
https://www.vyasnagarinews.com/2026/03/blog-post_09.html
सुरेश जगन्नाथ पाटील.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Kishor k Patil Patil2
- सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे मका गंजीला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे शेतातील मक्काच्या गंजीला अचानक आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमसरी येथील शेतकरी पुंडलिक शामराव बावस्कर यांच्या गट नं. ३१४, क्षेत्र १.३१, शिवना शिवारातील शेतात झाकून ठेवलेल्या मक्काच्या गंजीला दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंजीतील मोठ्या प्रमाणात मका जळून खाक झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेमुळे शेतकरी पुंडलिक बावस्कर यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.1
- या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी आमदार Bacchu Kadu यांना फोन करून संवाद साधल्याचे दिसत आहे. या संभाषणात शिंदे यांनी बच्चू कडू यांना सांगितले की, “तुमच्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली,” अशी दखल त्यांनी घेतल्याचे व्हिडिओमध्ये ऐकायला मिळते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. दरम्यान हा फोन कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.1
- चिखलीत न्याय मिळेना! लेकीच्या आत्महत्येला जबाबदार आरोपी मोकाट; पित्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा..! बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका तरुणीने लग्नाचे आमिष आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, मात्र दीड महिना उलटूनही मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत, आता पीडित मुलीच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्रा घेतला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. हे पत्र आहे एका हतबल पित्याचं, ज्याने आपल्या लेकीला गमावलं आहे. चिखली तालुक्यातील केळवद येथील रुपाली रामदास सरकटे या तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येला पाटोदा येथील तन्मय विजय गवई हा जबाबदार असल्याचा आरोप तिचे वडील रामदास दामोदर सरकटे यांनी केला आहे. आरोपी तन्मय गवई याने रुपालीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. मात्र, महावितरणमध्ये नोकरी लागताच त्याने रुपालीला लग्नास नकार दिला. वारंवार होणारा मानसिक त्रास आणि फसवणुकीमुळे खचलेल्या रुपालीने अखेर मृत्यूला कवटाळले. पीडित कुटुंबाचा असा आरोप आहे की, ४५ दिवस उलटूनही चिखली पोलीस आरोपीला अटक करण्यात अपयशी ठरले आहेत. आरोपी उजळ माथ्याने फिरत असून, पोलीस विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा खळबळजनक दावा या निवेदनात करण्यात आला आहे. न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या सरकटे कुटुंबीयांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ०६ मार्च २०२६ पासून पीडितेचे वडील आणि इतर नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'आमरण उपोषणाला' बसले आहेत. आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी, हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. एकीकडे महिला सुरक्षेच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे आरोपी दीड-दीड महिना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार असतात. आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक या प्रकरणाची काय दखल घेतात आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.1
- कापसाच्या भावात वाढ न झाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल.1
- रिपोर्टर मुजीब शेख1
- #jalna#marathinews#1
- जळगाव शहरात अवैध शस्त्रांच्या विक्रीवर लगाम घालत जिल्हापेठ पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत सात संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून सहा गावठी पिस्तुल, दहा जिवंत काडतुसे आणि एक होंडा युनिकॉर्न दुचाकी असा सुमारे तीन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक 44/2026 नुसार शस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3 आणि 25 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे यश रामदास नमदेव याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतरच्या चौकशीत अवैध शस्त्र विक्रीच्या साखळीबाबत माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी केतन भालेराव, गौरव साळुंखे, समाधान निकम, विकास काकडे, जगदीश महाजन आणि कैलास माळी यांनाही ताब्यात घेतले. दरम्यान, तपासादरम्यान काही आरोपींवर इतर पोलीस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करत आहेत.1