परभणी लोकसभा संपर्कप्रमुखपदी भास्करराव आंबेकर यांची नियुक्ती परभणी (प्रतिनिधी) – शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये राज्यभर संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा संपर्कप्रमुख पदांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार परभणी लोकसभा संपर्कप्रमुखपदी जालना येथील शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्करराव आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंबेकर यांनी मराठवाड्यात शिवसेना वाढीसाठी अर्जुन खोतकर यांच्या समवेत कार्य करत गावोगावी संघटना बळकट केली आहे. तसेच सर्वसामान्यांमध्ये पक्षाचे विचार रुजविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. या नियुक्तीबद्दल भास्करराव आंबेकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती शिवसेना महानगरप्रमुख माणिक पोंढे पाटील यांनी दिली.
परभणी लोकसभा संपर्कप्रमुखपदी भास्करराव आंबेकर यांची नियुक्ती परभणी (प्रतिनिधी) – शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये राज्यभर संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा संपर्कप्रमुख पदांच्या नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार परभणी लोकसभा संपर्कप्रमुखपदी जालना येथील शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्करराव आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंबेकर यांनी मराठवाड्यात शिवसेना वाढीसाठी अर्जुन खोतकर यांच्या समवेत कार्य करत गावोगावी संघटना बळकट केली आहे. तसेच सर्वसामान्यांमध्ये पक्षाचे विचार रुजविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. या नियुक्तीबद्दल भास्करराव आंबेकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती शिवसेना महानगरप्रमुख माणिक पोंढे पाटील यांनी दिली.
- मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली. या प्रकरणी विश्वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक जालना आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे. पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.1
- भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।7
- जालन्यात कन्हैया नगर परिसरातील भीषण अपघात: भरधाव आयशर झाडावर आदळला; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा..1
- हिंगोली | प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते. दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे, जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.1
- Post by वैजनाथ पावडे1
- भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक1
- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर2
- जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.1