सोयाबीन सुकले, शेतकऱ्यांचे स्वप्नही भंगले! रिसोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आर्त हाक” “सोयाबीन सुकले, शेतकऱ्यांचे स्वप्नही भंगले! रिसोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आर्त हाक” शेतकऱ्यांची मागणी—‘हेक्टरी १ लाखांची मदत द्या!’ रिसोड:- रिसोड तालुक्यात पावसाने मागील दीड महिन्यापासून दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक भागांत सोयाबीनसह इतर पिके पाण्याअभावी करपून गेली. असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून यंदाचा हंगाम अक्षरशः निघुन गेला आहे. शेतकऱ्याने शेतात लावलेला खर्च सुद्धा निघालेला नाही, त्यामुळे रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना किमान १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांना निर्णायक अवस्थेत पाण्याचा ताण बसला. शेतातील सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे सुकून गेली आहेत. काही ठिकाणी तर संपूर्ण पिकचं उध्वस्त झाला आहे. त्यामुळे 80 टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यातून शेतकऱ्याचा खर्च सुद्धा निघणार नाही. तसेच बियाणे, खत, मशागत, मजुरी आणि औषधांवर मोठा खर्च करूनही हातात काहीच उरणार नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर आणि आता पावसाच्या दडीमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडला आहे. *पंचनामे करून तातडीने मदत द्या* पावसाअभावी बाधित झालेल्या गावांमध्ये प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पिकांचे पंचनामे करावेत. केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच पीकविमा नुकसानभरपाई, कर्जाच्या परतफेडीबाबत सवलत आणि आगामी हंगामासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचीही मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. “आता मदत मिळाली नाही तर पुढचा हंगाम कसा करायचा?” हा प्रश्न तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी १ लाख रुपयांची मदत मंजूर करावी, अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत. प्रतिक्रिया:- हरिभाऊ नारायण बाजड (शेतकरी) शेतकऱ्याची आर्त हाक “पेरणीपासून आतापर्यंत मोठा खर्च केला. पिके चांगली येतील, कर्ज फेडता येईल आणि घरखर्च भागेल, अशी अपेक्षा होती. मात्र पाऊस नसल्याने सोयाबीन पूर्णपणे सुकत आहे. आता हातात उत्पादन येण्याची शक्यता कमी झाली आहे. शासनाने परिस्थितीची तातडीने पाहणी करून रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपयांची मदत द्यावी.”
सोयाबीन सुकले, शेतकऱ्यांचे स्वप्नही भंगले! रिसोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आर्त हाक” “सोयाबीन सुकले, शेतकऱ्यांचे स्वप्नही भंगले! रिसोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची आर्त हाक” शेतकऱ्यांची मागणी—‘हेक्टरी १ लाखांची मदत द्या!’ रिसोड:- रिसोड तालुक्यात पावसाने मागील दीड महिन्यापासून दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक भागांत सोयाबीनसह इतर पिके पाण्याअभावी करपून गेली. असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातून यंदाचा हंगाम अक्षरशः निघुन गेला आहे. शेतकऱ्याने शेतात लावलेला खर्च सुद्धा निघालेला नाही, त्यामुळे रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना किमान १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांना निर्णायक अवस्थेत पाण्याचा ताण बसला. शेतातील सोयाबीनची पाने पिवळी पडून झाडे सुकून गेली आहेत. काही ठिकाणी तर संपूर्ण पिकचं उध्वस्त झाला आहे. त्यामुळे 80 टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यातून शेतकऱ्याचा खर्च सुद्धा निघणार नाही. तसेच बियाणे, खत, मशागत, मजुरी आणि औषधांवर मोठा खर्च करूनही हातात काहीच उरणार नाही, अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित दर आणि आता पावसाच्या दडीमुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडला आहे. *पंचनामे करून तातडीने मदत द्या* पावसाअभावी बाधित झालेल्या गावांमध्ये प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पिकांचे पंचनामे करावेत. केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करावे, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबतच पीकविमा नुकसानभरपाई, कर्जाच्या परतफेडीबाबत सवलत आणि आगामी हंगामासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचीही मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. “आता मदत मिळाली नाही तर पुढचा हंगाम कसा करायचा?” हा प्रश्न तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी १ लाख रुपयांची मदत मंजूर करावी, अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत. प्रतिक्रिया:- हरिभाऊ नारायण बाजड (शेतकरी) शेतकऱ्याची आर्त हाक “पेरणीपासून आतापर्यंत मोठा खर्च केला. पिके चांगली येतील, कर्ज फेडता येईल आणि घरखर्च भागेल, अशी अपेक्षा होती. मात्र पाऊस नसल्याने सोयाबीन पूर्णपणे सुकत आहे. आता हातात उत्पादन येण्याची शक्यता कमी झाली आहे. शासनाने परिस्थितीची तातडीने पाहणी करून रिसोड तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी किमान १ लाख रुपयांची मदत द्यावी.”
- आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- घरोघरी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमण , गणेश उत्सव साजरा1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .1
- सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त1
- बुलढाणा:-गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी देऊळघाटमध्ये पोलिसांचे शक्तीप्रदर्शन; चोख बंदोबस्तासह काढला जोरदार रूटमार्च1
- बुलढाणा जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन खामगाव: बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, या मुख्य मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार पाटील यांनी खामगाव तालुक्यातील अटाळी येथे टावरवर चढून ‘शोले’ स्टाईल आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यात ७ आमदार, १ खासदार आणि ३ मंत्री (केंद्रीय मंत्री, पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री) असूनही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले, ही दुर्दैवाची बाब आहे. सरकारला आमच्या थडग्यावर राज्य करायचे आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली असून शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. स्थानिक तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांनी आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक मध्यस्थीचे व प्रशासकीय स्तरावर १००% प्रयत्न करण्याचे लिखित आश्वासन दिले. प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला नाही, तर आमदार आकाश फुंडकर यांच्या घरावर थेट घुसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.3
- शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे; शेतकरी वर्ग आक्रमक प्रस्तावित शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी वर्ग आक्रमक झाले असल्याचे दिसून आले चोंडी येथे शेतकरी बांधवांनी तिव्र विरोध दर्शविला1