उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश; १० मार्चपासून नवे वेळापत्रक लागू परभणी (प्रतिनिधी) : मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी परभणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत १० मार्चपासून बदल करण्यात येणार असल्याचे आदेश शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार एका सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १.०० अशी राहणार असून सकाळी ११.०० ते ११.३० या वेळेत तीस मिनिटांची मधली सुट्टी देण्यात येणार आहे. दुबार पद्धतीने (दोन सत्रात) भरणाऱ्या शाळांनी कार्यालयीन तास पूर्ण होतील याची दक्षता घेऊन मुख्याध्यापकांनी स्थानिक परिस्थितीनुसार वेळ निश्चित करावी व त्याबाबतचे नियोजन संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ (RTE Act 2009) नुसार विद्यार्थ्यांसाठी नियोजित अध्यापनाच्या तासांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची स्पष्टता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिली आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश; १० मार्चपासून नवे वेळापत्रक लागू परभणी (प्रतिनिधी) : मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी परभणी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या वेळेत १० मार्चपासून बदल करण्यात येणार असल्याचे आदेश शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार एका सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १.०० अशी राहणार असून सकाळी ११.०० ते ११.३० या वेळेत तीस मिनिटांची मधली सुट्टी देण्यात येणार आहे. दुबार पद्धतीने (दोन सत्रात) भरणाऱ्या शाळांनी कार्यालयीन तास पूर्ण होतील याची दक्षता घेऊन मुख्याध्यापकांनी स्थानिक परिस्थितीनुसार वेळ निश्चित करावी व त्याबाबतचे नियोजन संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ (RTE Act 2009) नुसार विद्यार्थ्यांसाठी नियोजित अध्यापनाच्या तासांमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची स्पष्टता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिली आहे.
- Post by Ramesh Mulgir1
- महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद1
- यादरम्यान ६० किलोमीटर मध्ये शिरपूर आणि खलघाट (सेंदवा) असे दोन टोल आहेत. या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता. अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतींने अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून '२६ लाखाच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा' करून निषेध नोंदवला. यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.1
- महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार हिकमत उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिकमत दादा उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जोरदार मागणी केली. घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित केले. नदीजोड प्रकल्पांतर्गत वैतरणा व उल्हास खोऱ्यातील वाढीव पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. मात्र असे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत स्थानिक लघु सिंचन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “२५-३० वर्षांपूर्वी उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (KT Weirs) आज जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही पाणी साठत नाही. या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जायकवाडी धरणातून वाहून जाणारे पाणी अडवले, तर परिसरातील ३० ते ३५ गावांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो,” असे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हतवन प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. रस्त्यांच्या विषयावर बोलताना आमदार हिकमत दादा उढाण यांनी मुंबईसारख्या शहरांना माेठ्या प्रमाणात निधी तर ग्रामीण भागासाठी तुलनेने कमी निधी मिळत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग यांसारखे मोठे प्रकल्प महत्त्वाचे असले तरी ग्रामीण भागातील ओडीआर (ODR) व एमडीआर (MDR) रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी भरीव निधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले; मात्र यासाठी करण्यात आलेली साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना आमदार उढाण यांनी साखर कारखान्यांवरील २५ किलोमीटर हवाई अंतराच्या नियमावर जोरदार टीका केली. “जगात असा कोणताही उद्योग नसेल जिथे नवीन युनिट सुरू करण्यासाठी इतके कडक निर्बंध असतील. या नियमामुळे ज्या भागात ऊस उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणी नवीन कारखाने उभे राहू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांची कोंडी होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा २५ किमीचा नियम रद्द करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच ऊस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांवरील काटामारी रोखण्यासाठी सरकारने डिजिटल काटे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार हिकमत दादा उढाण यांनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांवर सभागृहात व्यापक चर्चा झाली1
- अयोग्य मार्गदर्शनामुळे बांबू शेती करूण शेतकऱ्यावर आर्थिक संकट आले1
- अंबलटेक गावाचा विकास आणखीन नाही.चांगला रस्ता होता ते खंदून टाकला आहे. नवीन रस्ता करतो म्हणून आणखीन केला नाही जिथे रस्ता चांगला आहे तिथेच रस्ता करीत आहेत .दारासमोर गोट्यात सरपंचाच्या आणि सदस्याच्या गोट्यामध्ये काँक्रीट टाकून काम चालू आहे मंदिर पाशी आणि वरी आणखीन रस्ता नाही?2
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- जायकवाडी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन; गणवेश,भत्ते व वेळेवर पगाराची मागणी1