Shuru
Apke Nagar Ki App…
अनेक पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा कुदळवाडीमध्ये कोणासाठी...? पुन्हा "रात्रीस खेळ चाले" होणार का?
MAHARASHTRA MANTHAN
अनेक पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा कुदळवाडीमध्ये कोणासाठी...? पुन्हा "रात्रीस खेळ चाले" होणार का?
More news from महाराष्ट्र and nearby areas
- अनेक पोकलेन, जेसीबी आणि शेकडो पोलिसांचा फौजफाटा कुदळवाडीमध्ये कोणासाठी...? पुन्हा "रात्रीस खेळ चाले" होणार का?1
- तळेगाव एमआयडीसीत आठव्या मजल्यावरून उडी; ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू... मावळ पुणे :- मावळमधील तळेगाव एमआयडीसी परिसरात अर्बन लाईफ टॉवर सोसायटीत एका ३५ वर्षीय महिलेने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.प्रतिभा शंकर असे मृत महिलेचे नाव असून, पतीसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.या प्रकरणात घरगुती वादाचे नेमके कारण काय होते आणि महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले होते का, याचा तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.... : लक्ष्मण कांबळे,पोलीस उपनिरीक्षक तळेगाव MIDC #तळेगाव #मावळ #तळेगावएमआयडीसी #अर्बनलाईफटॉवर #महिलेचामृत्यू #घरगुतीवाद #पोलीसतपास #पुणेबातम्या #Talegaon #Maval #TalegaonMIDC #UrbanLifeTower #WomanDeath #DomesticDispute #PoliceInvestigation #PuneNews1
- पुण्यात वादळी वाऱ्यामुळे पुणे मेट्रोच्या बांधकामावरील पत्रे उडून गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मेट्रोच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- "धक्कादायक! झोपेत असताना छातीत दोन गोळ्या झाडून केला खून; उमदी पोलिसांनी शिताफीने आरोपींना पकडले." सांगली/जत: जत तालुक्यातील संख येथे मध्यरात्री झोपेत असलेल्या व्यक्तीवर गोळ्या झाडून करण्यात आलेल्या निर्घृण खुनाचा छडा उमदी पोलिसांनी अवघ्या तीन तासांत लावला आहे. कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसताना केवळ गोपनीय बातमीदाराच्या मदतीने पोलिसांनी कौशल्याने तपास चक्र फिरवत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. नेमकी घटना काय? संख (ता. जत) येथील संतोष शिवाप्पा बिरादार (वय ४२) हे १० मे २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० ते १ च्या सुमारास आपल्या कुटुंबासह घराच्या व्हरांड्यात झोपले होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी अचानक अग्निशस्त्राचा वापर करून बिरादार यांच्या छातीत दोन गोळ्या झाडल्या. या भीषण हल्ल्यात बिरादार यांचा मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी अंधाराचा फायदा घेऊन शेतातून पलायन केले होते. तपासाची चक्रे अन् ३ तासांत अटक घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (जत) श्री. सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) संदीप कांबळे व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सपोनि संदीप कांबळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक संशयित संख ते दरीबडची रस्त्यावर आहे. माहिती मिळताच पोलिसांनी दोन पथके तयार करून सापळा रचला आणि आरोपी रोहित ऊर्फ नागेश बाळू जगदाळे (वय २२) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने महांतेश मल्लय्या स्वामी (वय ३५, रा. दरीबडची) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या पथकामार्फत महांतेश स्वामी याला जाडरबोबलाद ते माडग्याळ रोडवरील एका शेतातून अटक केली. गुन्ह्याची नोंद आणि आरोपी याप्रकरणी मयताची मुलगी श्रवंती संतोष बिरादार (वय १६) हिने फिर्याद दिली असून, उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. १३८/२०२६ नुसार बीएनएस कलम १०३(१), ३(५) आणि आर्म्स ॲक्ट ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले आरोपी: १) महांतेश मल्लय्या स्वामी (वय ३५, रा. दरीबडची, जत) २) रोहित ऊर्फ नागेश बाळू जगदाळे (वय २२, रा. विश्रामबाग, सांगली) यांनी बजावली कामगिरी ही यशस्वी कारवाई सपोनि संदीप कांबळे, पोउपनि बंडू साळवे, पोउनि दिनेश घसाडे, पोउनि सिद्धेश्वर गायकवाड, संतोष माने, लक्ष्मण बंडगर, कावेरी मोटे, महादेव मडसनाळ, संजय पांढरे, परशराम देशमुखे, माळी, छाया बाबर, रेणुका कुंभरे, सोपान भंडे आणि सुदर्शन खोत यांच्या पथकाने केली आहे. काहीही पुरावा नसताना अत्यंत कमी वेळेत खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि संदीप कांबळे करत आहेत.1
- नसरापूर अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात काढला मोर्चा ; नागरिक मोठ्या संख्येने सहभागी विक्रम शिंदे /भोर दि.१० नसरापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातील बालगंधर्व चौकातून मूक मोर्चा काढण्यात आला. “चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे” आणि आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात पीडित मुलीचे आई-वडीलही सहभागी झाले होते. पुणे शहरातील विविध भागांतून नागरिक, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संताप व्यक्त केला.1
- एका युझरने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत 'कृष्णावतारम' नावाच्या एका सिनेमासाठी व्हायरल लूक तयार केला आहे. चॅटजीपीटीने बनवलेल्या या आकर्षक डिझाइनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने कला क्षेत्रात काय नवं घडू शकतं, यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला जात आहे.1
- इंडियन्स सोशल मुव्हमेंटचे माध्यमातून मध्यवर्ती रुग्णालय समोर हस्ताक्षर अभियान इंडियन्स सोशल मुव्हमेंटचे माध्यमातून मध्यवर्ती रुग्णालय समोर हस्ताक्षर अभियान1
- पुणे जिल्ह्यातील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलाला मोठे भगदाड पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या पुलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती व स्ट्रक्चरल ऑडिट न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.1