दिवेघाटात महिलेची निर्घृण हत्या; लैंगिक संबंधास नकार दिल्याने तरुणाचा संताप, फुरसुंगी पोलिसांकडून आरोपी अटकेत जनसंघर्ष न्युज नेटवर्क पुणे, ता.८ : हडपसर–सासवड रस्त्यावरील दिवेघाटाच्या पायथ्याशी ३ मार्च रोजी सापडलेल्या अर्धनग्न महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा फुरसुंगी पोलिसांनी केला असून या प्रकरणी २९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. लैंगिक संबंधास नकार दिल्याने संतापाच्या भरात आरोपीने महिलेची दगडाने ठेचून व गळा आवळून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. माहिती मिळताच फुरसुंगी पोलीस व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे काही दिवसांतच या खुनाचा छडा लावला. तपासादरम्यान प्रकाश बिभीषण माने (वय २९) याला ताब्यात घेण्यात आले. तो एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो गेल्या काही दिवसांपासून त्या महिलेवर नजर ठेवून असल्याचे आढळले. संबंधित महिला दिवेघाटाच्या पायथ्याशी झोपत असायची. ३ मार्च रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपीने महिलेशी जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने विरोध करताच आरोपी संतापला. महिलेनं आरडाओरडा सुरू केल्याने घाबरलेल्या आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून मारहाण केली व गळा आवळून तिची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांच्या पथकाने केली. आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून मृत महिलेची ओळख पटविणे व पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दिवेघाटात महिलेची निर्घृण हत्या; लैंगिक संबंधास नकार दिल्याने तरुणाचा संताप, फुरसुंगी पोलिसांकडून आरोपी अटकेत जनसंघर्ष न्युज नेटवर्क पुणे, ता.८ : हडपसर–सासवड रस्त्यावरील दिवेघाटाच्या पायथ्याशी ३ मार्च रोजी सापडलेल्या अर्धनग्न महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा फुरसुंगी पोलिसांनी केला असून या प्रकरणी २९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. लैंगिक संबंधास नकार दिल्याने संतापाच्या भरात आरोपीने महिलेची दगडाने ठेचून व गळा आवळून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. माहिती मिळताच फुरसुंगी पोलीस व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे काही दिवसांतच या खुनाचा छडा लावला. तपासादरम्यान प्रकाश बिभीषण माने (वय २९) याला ताब्यात घेण्यात आले. तो एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो गेल्या काही दिवसांपासून त्या महिलेवर नजर ठेवून असल्याचे आढळले. संबंधित महिला दिवेघाटाच्या पायथ्याशी झोपत असायची. ३ मार्च रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपीने महिलेशी जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने विरोध करताच आरोपी संतापला. महिलेनं आरडाओरडा सुरू केल्याने घाबरलेल्या आरोपीने तिच्या डोक्यात दगड घालून मारहाण केली व गळा आवळून तिची हत्या केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट सहाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व त्यांच्या पथकाने केली. आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून मृत महिलेची ओळख पटविणे व पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- Post by Vijay Meher1
- Post by कर्जत लाईव्ह1
- सांगोल तालुका वाटंबरे येथील खंडोबा देवाची यात्रेत 18 कडीवर लंगर तुटतात यात्रेची सांगता झाली.1
- शिरूर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24} तालुक्यातील पूर्व भागात पिंपळसुटी येथे दोन पिंजऱ्यात दोन बिबटे जे्रबंद झाले आहेत. शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यांत काही नागरिकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मानव व पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने शिरूर तालुक्यातील बिबट्यांच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पिंजरे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ३५ हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले असून, सर्व बिबट्यांची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वन विभागाची सतर्कता अद्याप कायम आहे. दरम्यान, काल पिंपळसुटी येथे लावलेल्या दोन पिंजऱ्यात दोन बिबट जेरबंद झाले .नर बिबटया व मादी बिबट्या दीड वर्षाचे असून दोन्ही बिबटे माणिकडोह या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत.ही दोन्ही बिबटे एकाच मादीचे पिल्ले असून त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यात जे्रबंद करण्यात आले होते नंतर यादोन्ही बिबट्याना एकाच पिंजऱ्यात ठेवण्यात आले. या दोन्ही बिबटयाना माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका वनाधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली. बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यातून निर्माण होणारा मानवी संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी रात्रीच्या वेळी शेतात किंवा मोकळ्या परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी.4
- विक्रम शिंदे /भोर दि.४ मोसे खोर्यातील ऐतिहासिक श्री शिरकाई देवी यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला असून भोरचे आमदार शंकर मांडेकर यांनी शिरकोली (ता. राजगड) येथील मंदिराला भेट देत देवीचे दर्शन घेतले.तसेच शिरकोली देवस्थान साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले.यावेळी , अमोलदादा नलावडे (सभापती कृषी व पशुसंवर्धन, जि.प. पुणे), किरण राऊत(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस राजगड) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थितीत होते .1
- पिंपरी चिंचवड : - अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा... एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.... #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat1
- Post by Vijay Meher1