हॉटेल व्यावसायिकांना गॅस नाकारल्यास कठोर पावलं - उदय सामंत... पिंपरी चिंचवड : - अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा... एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.... #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat
हॉटेल व्यावसायिकांना गॅस नाकारल्यास कठोर पावलं - उदय सामंत... पिंपरी चिंचवड : - अशोक खरात प्रकरणावरही उदय सामंत स्पष्ट; गैरवापर थांबवण्याचा इशारा... एमएनजीएल गॅस पुरवठ्यावरून राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी कडक इशारा दिलाय. हॉटेल आणि उद्योजकांना गॅस पुरवठा जाणीवपूर्वक थांबवला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतरही गॅस पुरवठ्यात दिरंगाई होत असल्याची तक्रार समोर येत आहे. कृत्रिम तुटवडा निर्माण केल्यास सरकार कठोर पावलं उचलेल, असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान, अशोक खरात प्रकरणावर बोलताना सामंत म्हणाले, काही नेत्यांशी फोनवर बोलणं झालं असलं तरी कुणीही त्यांच्या कृत्याचं समर्थन केलेलं नाही. या प्रकरणात गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती थांबवण्याची भूमिका शिवसेनेची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.... #पिंपरीचिंचवड #एमएनजीएल #गॅसपुरवठा #उदयसामंत #हॉटेलव्यवसाय #उद्योजक #गॅसतुटवडा #सरकारइशारा #कारवाई #शिवसेना #अशोकखरात #PimpriChinchwad #MNGL #GasSupply #UdaySamant #HotelBusiness #Entrepreneurs #GasShortage #GovernmentWarning #StrictAction #ShivSena #AshokKharat
- गावठी पिस्टलचा (अग्रिशस्त्राचा) वापर करून खूनाचा प्रयत्न करणा-या फरार आरोपीला अटक करून त्याचेकडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र) जप्त करून त्याला जेरबंद करण्यात आले.1
- Post by Sachin Waghe1
- BARAMATI ELECTION : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.. बिचुकले यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या आहेत. बारामतीच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे..1
- रायगड - अमुलकुमार जैन मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे जवळील सुकेळी खिंडीत ३ एप्रिल रोजी पहाटे ‘ओमकार ट्रॅव्हल्स’ची बस (क्र. एमपी 13 झेडपी 4545) पलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत नाईम निजाम शेख (33, कामोठे) व नीलम विभुते (40, पनवेल) यांचा मृत्यू झाला, तर 21 प्रवासी जखमी झाले. बस मुंबईहून गोव्याकडे जात असताना वळणावर चालक हेमंत पाटील (रा. कणकवली) याचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. जखमींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून एमजीएम कामोठे, अपोलो व रोहा रुग्णालयात हलवण्यात आले. मृतांवर रोहा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी स्मायली वाडकर (पनवेल) यांच्या तक्रारीवरून नागोठणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.4
- ठाणे:मुरबाड तालुक्यातील टोकावडे मोरोशी, शिरोशी ,धसई विभागात गुरुवारी (तारीख २ एप्रिल) सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वारा वादळ व पाऊस पडला यामुळे या विभागातील विट उत्पादक, भाजीपाला व आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडून मोरेश्वर मोरे (खेड ) प्रकाश पवार (टोकावडे ) सुभाष भोईर (सोनावळे ) ह्या व इतर आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे तसेच वीट उत्पादकांचे मातीच्या विटा भिजल्याने व भाजीपाला उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी सांगितले आहे - वरील सर्व नुकसानीची माहिती तात्काळ व्हाट्सअपद्वारे ठाणे जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, मुरबाड कृषी अधिकारी संदीप केणे, तहसीलदार अभिजीत देशमुख ,नायब तहसीलदार अमोल शिंदे यांना प्रकाश पवार यांनी व्हाट्सअप व फोनद्वारे कळवून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे मागणी केली आहे.4
- चोंढे बु.ता.शहापुर येथे हनुमान जयंती उत्साहात संपन्न ,सर्व ग्रामस्थ ऐकञ येवून हनुमान जयंतीचा कार्यक्रम अगदी यशस्वीपणे सर्व तरुन वर्गाने पार पाडला या कार्यक्रमात सकाळी हनुमंताचे अभिषेक,रामनाम जप, सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाला.या पालखी सोहळ्यात राम,लक्षमण ,सिता,व हनुमान यांचे देखावे हे कार्यक्रमाचे केंद्र बिंदु ठरले.व संपुर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमासाठी आलेले सर्व नागरीकांना सुंदर भोजन व्यवस्था केली होती तसेच खातळेकर महाराज आळंदी यांची किर्तन सेवा ,व ग्रामस्थांचे जागर भजन होवून कार्यक्रमाची सांगता झाली.3
- JAY PAWAR ON PLANE CRASH : अजितदादांच्या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित होत असतानाच त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे.. या अपघाताचा अंतिम अहवाल आल्यानंतर भुमिका स्पष्ट करु असं सांगतानाच त्यांनी संबंधित विमान कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय..1
- ठाणे:शहापूर तालुक्यातील मौजे नांदगाव येथे हनुमान जन्मोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रथमच संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन हनुमान जन्मोत्सव साठी मोठी तयारी केली होती ,प्रत्येक घराच्या समोर रांगोळ्या काढून ,रस्ते सुंदर पद्धतीने स्वच्छ केले होते. सकाळी अभिषेक व रात्री पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते, यावेळी गावातील बाळ गोपाळ यांनी राम सीता लक्ष्मण ,हनुमंत व वानर सेनेचे मुखवटे धारण करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील सर्व देवस्थानाची भेट घेऊन पालखी सोहळ्याची हनुमान मंदिर येथे सांगता करण्यात आली. या सोहळ्यास गावातील अबाल वृद्ध तरुण व बाहेरगावी असलेले असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोहळा अभूतपूर्वक करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या सर्व तरुण वर्गाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.1
- सैयद अरशद रिज़वी पहुंचे टीएमसी स्कूल लोगों को S.I.R की जानकारी देने BNN NEWS1