यवतमाळ: विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू, वाचवतांना मुलाला लागला शॉक अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे तुटलेल्या वीज केबलचा धोकादायक परिणाम समोर आला असून, विजेच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दिग्रस तालुक्यात घडली आहे. सविता रमेश पवार (वय ५२) वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी फिर्यादी डॉ. जयपाल रमेश पवार (वय ३१) वर्ष रा. तिवरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे परिसरातील विद्युत केबल तुटली होती. त्यामुळे त्यांच्या घरासमोरील ओसरीतील लोखंडी अँगलमध्ये जिवंत विद्युत प्रवाह उतरला होता. फिर्यादीची आई सविता पवार या चुलीवर पाणी गरम करण्यासाठी उठल्या असता त्यांचा ओसरीतील लोखंडी अँगलला स्पर्श झाला. त्याच वेळी त्यांना जबर विद्युत धक्का बसून त्या बेशुद्ध पडल्या. आईला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या मुलगा डॉ. जयपाल पवार यालाही हात लावताच विजेचा धक्का बसला. प्रसंगावधान राखत त्यांनी फ्यूज काढून वीजपुरवठा खंडित केला आणि आईला दिग्रस येथील आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती सविता पवार यांना मृत घोषित केले.
यवतमाळ: विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू, वाचवतांना मुलाला लागला शॉक अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे तुटलेल्या वीज केबलचा धोकादायक परिणाम समोर आला असून, विजेच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दिग्रस तालुक्यात घडली आहे. सविता रमेश पवार (वय ५२) वर्ष असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी फिर्यादी डॉ. जयपाल रमेश पवार (वय ३१) वर्ष रा. तिवरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे परिसरातील विद्युत केबल तुटली होती. त्यामुळे त्यांच्या घरासमोरील ओसरीतील लोखंडी अँगलमध्ये जिवंत विद्युत प्रवाह उतरला होता. फिर्यादीची आई सविता पवार या चुलीवर पाणी गरम करण्यासाठी उठल्या असता त्यांचा ओसरीतील लोखंडी अँगलला स्पर्श झाला. त्याच वेळी त्यांना जबर विद्युत धक्का बसून त्या बेशुद्ध पडल्या. आईला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या मुलगा डॉ. जयपाल पवार यालाही हात लावताच विजेचा धक्का बसला. प्रसंगावधान राखत त्यांनी फ्यूज काढून वीजपुरवठा खंडित केला आणि आईला दिग्रस येथील आरोग्यधाम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती सविता पवार यांना मृत घोषित केले.
- स्थानिक हनुमान जयंतीनिमित्त दारव्हा शहरातील आठवडी बाजार परिसरातील जागृत हनुमान मंदिर येथे दि. १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमात विविध भक्तिगीते, भजन व सुमधुर संगीत सादर करण्यात आले. कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने वातावरण भक्तिमय केले होते. उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा आनंद घेत होते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.1
- Post by Sharad Dayedar1
- उमरखेड : अन्याय, अत्याचार व गोरगरीब जनतेच्या हक्कासाठी लेखणीच्या जोरावर लढणाऱ्या पत्रकारावरच पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल केल्याची धक्कादायक घटना उमरखेड येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. उमरखेड प्रेस क्लबचे अध्यक्ष शामभाऊ धुळे, उपाध्यक्ष गजानन वानखेडे व सचिव सिद्धार्थ दिवेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, धाडस 007 या युट्यूब न्यूज चॅनलचे संपादक अमित वसंतराव देशमुख यांनी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. दि. 10 मार्च 2026 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे उमरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, जुगार, गांजा, गुटखा, मटका व अवैध वाहतूक याबाबत तक्रार करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या संबंधित ठाणेदारांनी आकसापोटी कारवाई केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर दि. 12 मार्च 2026 रोजी रात्री पत्रकार म्हणून माहिती घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलेल्या अमित देशमुख यांच्यावर शासकीय कामात अडथळा व जातीय तेढ निर्माण केल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, हे गुन्हे मध्यरात्री उशिरा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएससीची तयारी करणाऱ्या व समाजहितासाठी कार्य करणाऱ्या एका सुशिक्षित युवकावर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करून त्याचे शैक्षणिक व सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा निषेध करत उमरखेड प्रेस क्लबने मागणी केली आहे की, संबंधित ठाणेदार शंकर पांचाळ यांची तात्काळ खातेनिहाय चौकशी करावी त्यांचे त्वरित स्थानांतरण करण्यात यावे वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून पत्रकार अमित देशमुख यांच्यावर दाखल गुन्हे मागे घ्यावेत पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे जर या प्रकरणात तात्काळ कारवाई झाली नाही, तर पत्रकार संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.2
- यवतमाळ जिल्ह्यातील वडगांव जंगल पोलीसांनी मोठी कारवाई करीत गोवंश तस्करी करणारा ट्रक पकडला. सिनेस्टाईल पाठलाग करून वडगांव जंगल पोलीसांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये १९ गोवंशीय जनावरांची ही सुटका करण्यात आली तर चार जनावरे मृत अवस्थेत आढळून आले. पोलीसांनी २८ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल हा जप्त केला.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Dhanjay surve Surve1
- #bjpnews#news#kinwatnews#nandednews#nandedbjp#1
- Post by Sharad Dayedar1