Shuru
Apke Nagar Ki App…
Sharad Dayedar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Sharad Dayedar1
- स्थानिक हनुमान जयंतीनिमित्त दारव्हा शहरातील आठवडी बाजार परिसरातील जागृत हनुमान मंदिर येथे दि. १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमात विविध भक्तिगीते, भजन व सुमधुर संगीत सादर करण्यात आले. कलाकारांनी आपल्या सुरेल आवाजाने वातावरण भक्तिमय केले होते. उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाचा आनंद घेत होते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.1
- Post by Amravati News Update1
- Post by Dhanjay surve Surve1
- जळका पटाचे येथे गाड्या ओढण्याची अनोखी धार्मिक परंपरा भक्तिभावात संपन्न प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे धामणगांव रेल्वे तालुक्यातील जळका (पटाचे) येथे हनुमान जयंतीच्या पौर्णिमेनिमित्त दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा भव्य गाड्या ओढण्याचा धार्मिक सोहळा यंदाही भक्तिभाव व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही अनोखी परंपरा आजही गावकऱ्यांनी श्रद्धेने जपून ठेवली असून या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला गावातील आराध्य दैवत श्री लक्ष्मी माता व तेलंगा माता देवस्थान परिसरात विशेष धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. चैत्र महिन्यातील या पवित्र रात्री पारंपरिक बंडीगाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडतो. गावातीलच नव्हे तर परिसरातील तसेच दूरवर वास्तव्यास असलेले ग्रामस्थही या दिवशी खास गावात येऊन उत्सवात सहभागी होतात. या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे गाड्यांना कोणत्याही प्रकारचे बैल किंवा यंत्रसामग्री जोडलेली नसते. दहा ते त्यापेक्षा अधिक बंड्या एकमेकांना बांधून त्यावर मोठ्या संख्येने भाविक बसवले जातात. प्रत्येक बंडीवर सुमारे २५ ते ३० तसेच काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक भाविक बसलेले असतानाही गाड्या पुढे सरकत असल्याने हा सोहळा पाहणाऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरतो. गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार भगत श्री पंडित दामाजी कंगाले यांच्या अंगात देवीचा संचार होऊन गाड्या पुढे सरकतात, अशी मान्यता आहे. पिढ्यान्पिढ्या त्यांच्या कुटुंबीयांनी देवीची सेवा केल्यामुळे ही दैवी शक्ती त्यांच्या परिवाराला लाभल्याचा भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ परंपरा नसून श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक मानला जातो. उत्सवानिमित्त लक्ष्मी माता व तेलंगा माता पूजन, धार्मिक विधी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर समिती व भक्तगण यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. हनुमान जयंतीनंतरच्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावातील सर्व समाजबांधव एकत्र येऊन उत्सव साजरा करतात, ही या परंपरेची खरी ताकद आहे. श्रद्धा, परंपरा आणि ग्रामएकतेचे प्रतीक असलेली जळका पटाचे येथील गाड्या ओढण्याची अनोखी प्रथा आजही भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे.1
- खामगाव: हवामान खात्याने ३० मार्च २६ पासून राज्यात काही दिवस ढगाळ हवामान व वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. अंदाजानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. तर शहरातही काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडत होता. वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू होता. तर काही भागायत विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना उकाळ्याचा त्रास सहन करावा लागत होता. टिळक राष्ट्रीय विद्यालयाजवळील झाड वादळी वाऱ्यामुळे 30 मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रस्त्यावर पडले होते. मात्र 3 दिवस उलटूनही झाड रस्त्यावरच पडले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.1
- Post by JKV NEWS 241
- Post by Sharad Dayedar1