बियाणी नगर येथे २० लाखांच्या निधीतून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन हिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत मंजूर झालेल्या २० लाख रुपयांच्या निधीतून हिंगोली शहरातील बियाणी नगर परिसरातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. शिवसेना गटनेते श्रीराम बांगर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून येथील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांकडून रस्त्याच्या कामाची मागणी करण्यात येत होती. आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे काम मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी शिलचंद्र देशमुख, नगरसेवक उमेश गुठ्ठे, नगरसेवक रत्नाकर बांगर, श्रीनिवास कंठे, शंकर कंठे, मूंदडा, राजेश उत्रतवार, बन्सी सारस्वत, शिवा गुठ्ठे, राहुल बांगर, दर्शीत अग्रवाल, मुंढे ताई, अभिषेक देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
बियाणी नगर येथे २० लाखांच्या निधीतून रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन हिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत मंजूर झालेल्या २० लाख रुपयांच्या निधीतून हिंगोली शहरातील बियाणी नगर परिसरातील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. शिवसेना गटनेते श्रीराम बांगर यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून येथील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. अनेक
दिवसांपासून या भागातील नागरिकांकडून रस्त्याच्या कामाची मागणी करण्यात येत होती. आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे काम मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी शिलचंद्र देशमुख, नगरसेवक उमेश गुठ्ठे, नगरसेवक रत्नाकर बांगर, श्रीनिवास कंठे, शंकर कंठे, मूंदडा, राजेश उत्रतवार, बन्सी सारस्वत, शिवा गुठ्ठे, राहुल बांगर, दर्शीत अग्रवाल, मुंढे ताई, अभिषेक देशमुख यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
- शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसची संघर्ष पदयात्रा; कळमनुरी ते हिंगोली गांधी चौकात समारोप1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- अमरण उपोषणाचा दुसरा दिवस भानेगाव येथील विविध प्रश्नांवर न्याय मिळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सुरू केलेल्या अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. भानेगाव येथील जल जीवन मिशन (JJM) व पाणीपुरवठा कामातील अनियमितता, बनावट कागदपत्रे व सह्या, सन 2021–23 मधील ग्रामपंचायत विकास कामांची चौकशी, जि.प. प्राथमिक शाळेतील कामांची चौकशी, तसेच माजी मुख्याध्यापक चौकशीत दोषी आढळूनही कारवाई न झाल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पूरामुळे बंद होणारा गावाचा जीवनावश्यक रस्ता पुनर्वसन जागेतून तात्काळ खुला करावा व बेलगव्हाण–भानेगाव पांदन रस्ता तात्काळ सुरू करावा, या मागण्यांसाठी उपोषण सुरू असल्याचे सांगण्यात आले.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Nanded_71
- Post by Today One Live1
- प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे 'यशवंत चव्हाण लॉ कॉलेज ते भाग्यनगर' रस्ता दुर्घटनेचा व सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्यावरचा सापळा ; नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल नांदेड: शहरातील यशवंत चव्हाण लॉ कॉलेजपासून भाग्यनगर रोडपर्यंतच्या रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेल्या डांबरामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहे. विशेष म्हणजे, 'युवराज न्यूज चॅनल'सह विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन आणि नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सुस्त असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा टांगणीला या परिसरात अनेक नामांकित शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन क्लासेस आहेत. त्यामुळे या रस्त्यावर विद्यार्थी वर्गाची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सायकल आणि दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे अपघात रोजचेच झाले आहेत. एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा प्रशासन करत आहे का? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. प्रशासकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे मौन स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या 'गलथान' कारभारामुळे परिस्थिती 'जैसे थे' आहे. दुसरीकडे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मतं मागणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही या समस्येकडे पाठ फिरवली असून, ते ही समस्या सोडवण्यात हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांना सोसावा लागतोय शारीरिक व आर्थिक फटका रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना पाठीचे आणि मणक्याचे आजार जडत असून, वाहनांच्या देखभालीचा खर्चही वाढला आहे. धुळीमुळे फुफुसाचे आजार वाढत असून , पायी चालणाऱ्या नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. "आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. हा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल." — स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आता तरी स्थानिक प्रशासन झोपेतून जागे होऊन या रस्त्याची दुरुस्ती करणार का, की नागरिकांना अशाच हालचाकीत प्रवास करावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1