माळशेज घाटातील रस्ता पावसामुळे खचल्याने माळशेज घाट बंद असल्याने स्थानिक व्यवसायावर मोठा परिणाम! घाट कधी सुरू होणार? मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध माळशेज घाट परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ता खचला गेल्याने मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ थांबली असून, पावसाळ्यात पर्यटकांनी गजबजणाऱ्या पर्यटनस्थळांवर सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार वर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे तसेच घाट कधी सुरू होणार याकडे स्थानिक रोजगारांचे लक्ष लागले आहे. पावसाळा सुरू होताच माळशेज घाट, नाणेघाट, कासाराचा नाळा, दुर्गांचा नाळा, थितबी, काळू वॉटरफॉल तसेच परिसरातील विविध धबधबे आणि नैसर्गिक झरे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, माळशेज घाटातील रस्ता पावसामुळे वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना या भागात जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. रस्ता बंद असल्याने पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी पर्यटनावर अवलंबून असलेल्या चहा स्टॉल, वडापाव दुकाने, भजी-पक्वान्नांचे स्टॉल, नाश्त्याच्या टपऱ्या आणि इतर छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीतून या छोट्या व्यावसायिकांना वर्षभराच्या उत्पन्नातील महत्त्वाचा हिस्सा मिळतो. मात्र, सध्या रस्ता बंद असल्याने पर्यटकच नसल्यामुळे अनेक दुकाने व टपऱ्या बंद अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नथू पारधी यांनी दिली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता बंद ठेवण्याच्या निर्णयाचे स्थानिकांकडून समर्थन केले जात असले, तरी रस्त्याची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी आणि वाहतूक सुरक्षितपणे पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व व्यावसायिकांकडून होत आहे. माळशेज घाटातील रस्ता वाहून गेल्याने पर्यटनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच पर्यटनस्थळांवर शांतता पसरली असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक पर्यटन व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे.
माळशेज घाटातील रस्ता पावसामुळे खचल्याने माळशेज घाट बंद असल्याने स्थानिक व्यवसायावर मोठा परिणाम! घाट कधी सुरू होणार? मुरबाड तालुक्यातील प्रसिद्ध माळशेज घाट परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ता खचला गेल्याने मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ थांबली असून, पावसाळ्यात पर्यटकांनी गजबजणाऱ्या पर्यटनस्थळांवर सध्या शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार वर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे तसेच घाट कधी सुरू होणार याकडे स्थानिक रोजगारांचे लक्ष लागले आहे. पावसाळा सुरू होताच माळशेज घाट, नाणेघाट, कासाराचा नाळा, दुर्गांचा नाळा, थितबी, काळू वॉटरफॉल तसेच परिसरातील विविध धबधबे आणि नैसर्गिक झरे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, माळशेज घाटातील रस्ता पावसामुळे वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे पर्यटकांना या भागात जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. रस्ता बंद असल्याने पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी पर्यटनावर अवलंबून असलेल्या चहा स्टॉल, वडापाव दुकाने, भजी-पक्वान्नांचे स्टॉल, नाश्त्याच्या टपऱ्या आणि इतर छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पावसाळ्यात पर्यटकांच्या गर्दीतून या छोट्या व्यावसायिकांना वर्षभराच्या उत्पन्नातील महत्त्वाचा हिस्सा मिळतो. मात्र, सध्या रस्ता बंद असल्याने पर्यटकच नसल्यामुळे अनेक दुकाने व टपऱ्या बंद अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नथू पारधी यांनी दिली आहे. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता बंद ठेवण्याच्या निर्णयाचे स्थानिकांकडून समर्थन केले जात असले, तरी रस्त्याची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी आणि वाहतूक सुरक्षितपणे पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व व्यावसायिकांकडून होत आहे. माळशेज घाटातील रस्ता वाहून गेल्याने पर्यटनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच पर्यटनस्थळांवर शांतता पसरली असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक पर्यटन व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे.
- शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan1
- राबोडी के सागर अपार्टमेंट के नीचे देर रात तक युवक कर रहे हैं खुलेआम नशा स्थानीय लोग परेशान..!1
- 5 अगस्त विधायक जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर शमीम खान के नेतृत्व में एक विशेष जनसेवा कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। मुंब्रा के ज़रूरतमंद नागरिकों एवं विद्यार्थियों को विभिन्न प्रकार की सहायता प्रदान की जाएगी। इसमें बच्चों को लैपटॉप, कंप्यूटर, स्कूल फीस सहायता तथा महिलाओं को सिलाई मशीनें वितरित की जाएंगी। 5 अगस्त विधायक जितेंद्र आव्हाड के जन्मदिन के अवसर पर शमीम खान के नेतृत्व में एक विशेष जनसेवा कार्यक्रम का आयोजन किया जाएगा। मुंब्रा के ज़रूरतमंद नागरिकों एवं विद्यार्थियों को विभिन्न प्रकार की सहायता प्रदान की जाएगी। इसमें बच्चों को लैपटॉप, कंप्यूटर, स्कूल फीस सहायता तथा महिलाओं को सिलाई मशीनें वितरित की जाएंगी।1
- Available for Sale Locality : Mumbra Area (dimensions) : 1035 Property Type : Flat / Apartment Property Condition : New Bedrooms (BHK) : 2 BHK Furnishing : Fully Furnished sanam1
- मोकाट जनावरांनी ग्रामीण भागांसह शहरातही मांडलाय उच्छाद. मुरबाड तालुक्यात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून ग्रामीण भागात शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान करीत आहेत या वर्षी अतिवृष्टीमुळे भाता पिकांची रोपे पाण्यात बुडाल्याने महागडे बियाणे खरेदी करून दुबार पेरणी करणे भाग पडले, सध्या पावसाने साथ दिल्याने भात लावणीच्या कामाला वेग आला आहे, मात्र रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे लावणी केलेल्या भाताचा फडशा पाडीत असल्याने शेतकऱ्यांना नाहक नुकसानीला सामोरं जावे लागत असतानाच कल्याण अहिल्यानगर महामार्गावर मोकाट जनावरे थव्याने ऊभी रहात असल्याने सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागा बरोबर मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या खालील भागात मोकाट जनावरांनी कब्जा केला असुन महसूल कार्यालयात कामा निमित्त येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा ताप सहन करावा लागत आहे, संबंधित भटक्या व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी शेतकरी करीत असुन मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीच्या खाली ठाण मांडून बसलेल्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची ही मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे .1
- पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan पारिवारिक विवाद,बहु प्राची की मौ-त,ससुर गणपत गिरफ्तार || Islamuddin Khan विरार वेस्ट के नारंगी गांव में एक भयानक पारिवारिक झगड़ा सामने आया है।जहां आठ महीने के बच्चे की कस्टडी को लेकर ससुर और 28 साल की बहू के बीच हुए विवाद में बहु की मौत हो गई। इस मामले में बोलिंगज पुलिस ने ससुर के खिलाफ गैर-इरादतन हत्या का केस दर्ज कर उसे हिरासत में ले लिया है। पुलिस के मुताबिक, नारंगी गांव के भगताली में रहने वाले गणपत सखाराम पाटिल (60) पर आरोप है कि वह अपनी बहू प्राची कल्पेश पाटिल (28 इनके बीच जमती नही थी अनबन होते रहता था,गुरुवार सुबह प्राची का भाई विशाल पाटिल उसे उसकी मां के घर ले जाने आया था। उस समय प्राची की आठ महीने की बेटी गणपत पाटिल के कंधों पर थी।मां के घर जाते समय प्राची अपनी बेटी को अपने साथ ले जाने की कोशिश कर रही थी। लेकिन, इस बात पर उसके ससुर और बहू के बीच तीखी बहस हो गई। आरोप है कि बहस के दौरान गणपत पाटिल ने प्राची को ज़ोर से धक्का दिया जिससे वो ज़मीन पर गिर गई और सिर में गंभीर चोट लगने से उसकी मौके पर ही मौ-त हो गई। इस घटना के बाद, मृतक महिला के भाई विशाल पाटिल की शिकायत पर बोलिंगज पुलिस स्टेशन में इंडियन पीनल कोड की धारा 105 (गैर इरादतन हत्या) और 351(2) के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस ने तुरंत आरोपी गणपत पाटिल को हिरासत में ले लिया है और आगे की जांच जारी है1
- मुंब्रा के शिमला पार्क पर लगे नए ट्रैफिक सिग्नल पर क्या बोले वरिष्ठ ट्रैफिक पुलिस निरीक्षक अतुल आयीर? सुनिए पूरा बयान..1
- जंतर मंतर पर लाठी चार्ज से घायल छात्र का वायरल वीडियो।1