Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती संभाजीनगरात अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; ३०.२९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न सुरक्षा विभागाने मोठी धडक कारवाई करत तब्बल ३० लाख २९ हजार ४९३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे मोती कारंजा, मोंढा आणि नवाबपुरा परिसरात दोन स्वतंत्र पथकांनी एकाचवेळी छापे टाकले. कारवाईदरम्यान विविध नामांकित ब्रँडचा प्रतिबंधित साठा ताब्यात घेण्यात आला. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास अन्न सुरक्षा विभागाकडून सुरू आहे.
Marathi News Point
छत्रपती संभाजीनगरात अन्न सुरक्षा विभागाची धडक कारवाई; ३०.२९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न सुरक्षा विभागाने मोठी धडक कारवाई करत तब्बल ३० लाख २९ हजार ४९३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे मोती कारंजा, मोंढा आणि नवाबपुरा परिसरात दोन स्वतंत्र पथकांनी एकाचवेळी छापे टाकले. कारवाईदरम्यान विविध नामांकित ब्रँडचा प्रतिबंधित साठा ताब्यात घेण्यात आला. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास अन्न सुरक्षा विभागाकडून सुरू आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- खासदार डॉ कल्याणराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली मस्तगढ येथे कॅंडल मार्च शिक्षाण मंत्रीचा राजीनामा विद्यार्थीचे संघर्षाला यश1
- भोकरदन येथे चोरीस गेलेल्या **₹9 लाखांपैकी ₹8.80 लाखांची रोख रक्कम** मध्य प्रदेशातून जप्त भोकरदन येथे चोरीस गेलेल्या **₹9 लाखांपैकी ₹8.80 लाखांची रोख रक्कम** मध्य प्रदेशातून जप्त करण्यात आली असून **तीन आरोपींना अटक** करण्यात आली आहे. 23 जुलै रोजी बँकेतून काढलेली रक्कम पिकअप वाहनातून चोरट्यांनी लंपास केली होती. सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्य प्रदेशातील आरोपींना जेरबंद केले. आरोपींकडून **₹8.80 लाखांची रोख रक्कम** जप्त करण्यात आली असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे व भोकरदन पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.1
- दिवसाढवळ्या 9 लाखांची रक्कम लंपास, भोकरदन पोलिसांची धडाकेबाज कारवाई . मध्य प्रदेशातून 8 लाख 80 हजार हस्तगत, 3 आंतरराज्य चोरटे गजाआड महिलांचा विश्वास परत मिळवला बचत गटाच्या महिलांनी पोलिसांचा केला सत्कार भोकरदन शहर आणि परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या 9 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाचा भोकरदन पोलिसांनी अवघ्या 5 दिवसांत छडा लावला आहे. मध्य प्रदेशातील राजगड आणि गुणा जिल्ह्यातून 3 आंतरराज्य चोरट्यांना अटक करून 8 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. या धडाकेबाज कारवाईने कोटा जहागीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या महिलांचा जीव भांड्यात पडला असून त्यांनी पोलिसांचा सत्कार करून आभार मानले दि. 23 जुलै 2026 रोजी दुपारी 4 ते 4.30 च्या सुमारास कोटा जहागीर येथील जय योगेश्वर बचत गटाच्या महिला बबीता भागाजी इच्चे वय 40 या भारतीय स्टेट बँक भोकरदन शाखेतून बचत गटाचे 9 लाख रुपये काढून त्यांच्या पिकअप वाहन क्रमांक MH-21-BH-0504 मध्ये ठेवून भोकरदन ते जाफ्राबाद रोडवरील रत्नमाला लॉनजवळ चहा पिण्यासाठी थांबल्या. काही क्षणांतच अज्ञात चोरट्यांनी वाहनाची डावी बाजूची काच फोडून आतील रोख रक्कम लंपास केली. या घटने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. गुन्हा दाखल होताच मा. पोलीस अधीक्षक श्री. तेघबीरसिंह संधू, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. किरण बिडवे यांनी विशेष पथक तयार केले. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच SBI बँक आणि परिसरातील CCTV फुटेज तपासले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरटे मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील गुलखेडी येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक राहुल बांगर, संतोष बनकर, पोलीस अंमलदार यांच्या पथकाने तात्काळ मध्य प्रदेशात धाव घेऊन 3 आरोपींना ताब्यात घेतले. 1.राहुल उत्तम सिसोदीया वय 22, रा. गुलखेडी, ता. पचोर, जि. राजगड 2.कालू उर्फ शिवप्रसाद सिसोदीया, रा. कडीया, ता. पचोर, जि. राजगड 3.कल्लू उर्फ जगप्रकाश सांसी वय 25, रा. मुगावली, ता. गुणा, जि. अशोकनगर आरोपींकडून 8 लाख 80 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले पोलिसांच्या तपासात समोर आले की, हे आरोपी टोळीने काम करतात. एकजण बँकेत आणि सोन्याच्या दुकानात रेकी करतो, तर दुसरा वाहनासह बाहेर लक्ष ठेवतो. गुन्हा करून ते लगेच लॉजवर थांबत नाहीत आणि मोटारसायकलसह हेल्मेटचा वापर करतात पोलिसांनी हस्तगत केलेली रक्कम आज भोकरदन पोलीस स्टेशनच्या आवारात बचत गटाच्या महिलांना परत करण्यात आली. पैसे परत मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. महिलांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बचत गटाच्या महिला म्हणाल्या, आमची आयुष्यभराची पुंजी होती. पोलीसांनी ती परत मिळवून दिली. आमचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. या प्रकरणानंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मोठी रक्कम एकट्याने घेऊन जाऊ नये. शक्यतो ऑनलाईन व्यवहार करावा. रक्कम उघडपणे दाखवू नये. बँकेतून पैसे काढल्यानंतर थेट घरी किंवा ऑफिसला जावे. निर्जन ठिकाणी वाहन थांबवू नये. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ 112 किंवा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. या यशस्वी कारवाईबद्दल मा. पोलीस अधीक्षक तेघबीरसिंह संधू यांनी संपूर्ण भोकरदन पोलीस टीमचे कौतुक केले आहे. इसरारखान पठाण पत्रकार भोकरदन तर्फे भोकरदन पोलिसांच्या या तत्पर आणि व्यावसायिक कामगिरीचे अभिनंदन!4
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती – सहकार आयुक्त दीपक तावरे 🚨 ब्रेकिंग न्यूज | वास्तव न्यूज मराठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची माहिती – सहकार आयुक्त दीपक तावरे1
- शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट; नियमावलीवर न्यायालयाचा भर, सुनावणी तीन आठवड्यांनी शहीद सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली असून प्रकरणाच्या पुढील कार्यपद्धतीबाबत महत्त्वाची चर्चा झाली. यापूर्वीच्या दोन निर्णयांमध्ये शासनाचे जीआर न्यायालयाने अमान्य केले होते, तर 12 जूनच्या आदेशात न्यायालयाने स्वतः नियमावली तयार करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर शासनाने स्वतंत्र ठराव सादर करून कायदा करण्याची आवश्यकता नसल्याचे नमूद केले. मात्र, याचिकाकर्त्यांनी या ठरावाला नियमांशिवाय कायदेशीर वैधता नसल्याचा आक्षेप नोंदवला. या मुद्द्यावर न्यायालयाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर निश्चित केली आहे. पुढील सुनावणीत एसआयटीने प्रकरणाचा तपास कोणत्या पद्धतीने करावा याबाबत न्यायालय मार्गदर्शक नियमावली तयार करण्याची शक्यता आहे. दोन वर्षे उलटूनही प्रकरणात ठोस प्रगती न झाल्याने तपासाला गती देण्याची मागणीही न्यायालयासमोर करण्यात आली.1
- जागतिक कावीळ दिनानिमित्त जनजागृतीचे आवाहन; वेळेवर निदान आणि उपचारच ठरतील जीव वाचविण्याचा प्रभावी उपाय. २८ जुलै जागतिक कावीळ दिन : स्वच्छ पाणी, लसीकरण आणि जनजागृतीनेच कावीळमुक्त समाज शक्य!.. जागतिक कावीळ दिनानिमित्त जनजागृतीचे आवाहन; वेळेवर निदान आणि उपचारच ठरतील जीव वाचविण्याचा प्रभावी उपाय. २८ जुलै जागतिक कावीळ दिन : स्वच्छ पाणी, लसीकरण आणि जनजागृतीनेच कावीळमुक्त समाज शक्य!.. आज दिनांक 28 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : दरवर्षी २८ जुलै रोजी जगभरात जागतिक कावीळ दिन साजरा केला जातो. कावीळ (व्हायरल हिपॅटायटिस) हा यकृतावर परिणाम करणारा विषाणूजन्य आजार असून, वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते, असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी केले आहे.1
- आपण कार्यक्रम आयोजित केला होता तो अतिशय उत्तम होता असेच कार्यक्रम आपल्या हातुन होत व जेनशेवा घडो हिच प्रार्थना करतो नाशिक च्या सर्वाच्या सु खा दु खा आवर्जुन सहभागी होत असतात मॅडम मंजुषा जगताप ताई चे किती ही कवतुक केले व किती ही शुभ ईच्छा दिल्यात त्या कमीच असणार आहे शुभ चिंतक श्री दिलीप शिवाजी पाटील नाशिक मो 83084639681
- जालना शहरात रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पस शाळा समोर युवकाचा निर्घृण खून; धारदार शस्त्राने सपासप वार, शहरात खळबळ मयूर मेंदळे (24) या युवकाचा मृत्यू; खुनाचे कारण आणि आरोपींचा शोध अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू जालना शहरात रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पस शाळा समोर युवकाचा निर्घृण खून; धारदार शस्त्राने सपासप वार, शहरात खळबळ मयूर मेंदळे (24) या युवकाचा मृत्यू; खुनाचे कारण आणि आरोपींचा शोध अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू आज दिनांक 28 मंगळवार रोजी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील मल्टीपर्पस शाळा समोर मंगळवारी रात्री 10 ते 10.30 वाजेच्या सुमारास एका 24 वर्षीय युवकावर अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.1