हॉटेल,होस्टेलचालक गॅसवर शेकडो विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न लातूर : लातूरची अर्थव्यवस्था ही जशी सोयाबीन, दाळीवर अवलंबुन आहे तशीच ती शहरात शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांकडुन मिळणार्या विविध स्वरुपाच्या उत्पन्नावर अवलंबुन आहे. लातूरातील सर्वात मोठा उद्योग सध्या वस्तीगृह आणि खानावळ आहे. यंदा या व्यवसायावर अगोदरच परिणाम झाला आहे त्यात ह गॅस ची टंचाई म्हणजे दुष्काळत तेरावा महिना अशी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या नाष्टा, जेवणासाठी गॅस कोठुन आणायचा हा मोठा प्रश्न मेस आणि होस्टलचालका समोर निर्माण झाला आहे. लातूरातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. लातूर जिल्ह्यात किमान चारशे खासगी हॉस्टल आहेत. त्यातील ९० टक्के होस्टलचालक मेस सहित पैसे घेतात. तसेच शिकवणी परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल सारख्या मेस आहेत तसेच घरगुती खानावळी, डब्बे पुरवणारे, पोळी भाजी सेंटर चालवणारे अनेक आहेत. लातूरची इडली आणि त्याची वैशिष्ठपुर्ण चटणी यामुळे इडलीशी लातूरचे नवे नाते निर्माण झाले आहे हे इडलीसेंटर चालवणारे सुध्दा शेकड्याच्या संख्येने आहेत. लातूर जिल्हा हॉस्टेल असोसिएशनचे नितीन पवार म्हणाले की, आजचा दिवस गेला उद्याचा कसा जाईल या चिंतेत आम्ही आहोत, उधार उसनवारीवर सध्या मेस चालवत आहोत, नातेवाईक, मित्रा कडुन कांही मदत मिळते का एखाद सिलेंडर मिळेल का यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि मुलांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहोत परंतु अशीच परिस्थिती राहीली तर मेस कशी चालवावी असा आमच्या समोर मोठा प्रश्न आहे. सरकारने वस्तीगृह आणि खानावळीला लागणार्या सिंलेंडर साठी तातडीने निर्णय करुन लातूरच्या विद्यार्थ्यांने जेवण सुरु ठेवले पाहिजे अशी आमची मागणी आहे. लातूर जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या वतीने आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आल आहे. जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, व्यवसायीक गॅस सिंलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या व्यवसायावर किमान १२ हजार कुटंबाचा उदरनिर्वाह आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येउ शकते. लातूरला शिक्षण, व्यापार आणि वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येणार्यांची संख्या मोठी आहे त्यांची सुध्दा मोठी गैरसोय होउन गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होणार आहे त्यामुळे आम्हाला पुर्ववत व्यवसायीक सिंलेंडर मिळण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. हॉटेल व्यवसायीक नगरसेवक प्रविण कस्तुरे म्हणाले की आमची आज बैठक झाली त्यात सर्वांनी अडचणी सांगितल्या आहेत. त्या आम्ही प्रशासना समोर मांडल्या आहेत. गॅस शिवाय हॉटेल चालवणे हे जिकरीचे आहे. चुली किंवा इतर मार्ग अवलंबण्यासाठी जागेचाही मोठा प्रश्न आहे तो कसा सोडवणार? कोण सोडवणार? याचा विचार करावाच लागणार असल्याचे लक्षात आणुन दिले आहे. प्रशासनाला कांहीना कांही मार्ग काढावाच लागेल अन्यथा आम्हाला व्यवसाय करणे शक्य होणार नाही याची जाणीव करुन देण्यात आली आहे. घरगुती गॅस मिळण्यात सध्या तरी कुठलीच अडचण नाही. नोंदणी केल्या नंतर तिन दिवसात घरपोंच सिंलेडर देण्यात येत आहेत. नियमानुसार क्रमवारी नुसार नोंदणीच्या प्राधान्याने सिंलेडर वाटप करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत, ते तपासणही करीत आहेत असे सांगुन गॅस एजन्सीचे मालक भुषण दाते म्हणाले की, सध्या जी एजन्सी समोर गर्दी दिसते ती टंचाईच्या अफवामुळे आणि पुर्ण माहिती नसल्यामुळे होत आहे. जी गर्दी आहे ती सुध्दा आमची बुकिंगच होत नाही यासाठी सुध्दा आहे. परंतु कंपण्यानीच आता एका सिंलेडर नंतर दुसर्या सिंलेंडर साठी पंचेवीस दिवसाची अट घातली आहे त्याची माहिती व्यवस्थीतपणे ग्राहकांना दिली गेलेली नाही त्यामुळे सर्वत्र बुकिंग होत नाही टंचाई आहे असा गैर समज निर्माण होत आहे तो दुर करावा लागणार आहे असे दाते म्हणाले. अत्यावश्यक सेवा साठी कंपण्यानी शासकीय वस्तीगृह, रुग्णालय, आदि साठी एक महिन्यासाठी त्यांना किती सिलेंडर लागतात याची नोंद करुन घेउन माहिती पाठवण्यास सांगितले असल्याचेही दाते यांनी सांगितले.
हॉटेल,होस्टेलचालक गॅसवर शेकडो विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न लातूर : लातूरची अर्थव्यवस्था ही जशी सोयाबीन, दाळीवर अवलंबुन आहे तशीच ती शहरात शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांकडुन मिळणार्या विविध स्वरुपाच्या उत्पन्नावर अवलंबुन आहे. लातूरातील सर्वात मोठा उद्योग सध्या वस्तीगृह आणि खानावळ आहे. यंदा या व्यवसायावर अगोदरच परिणाम झाला आहे त्यात ह गॅस ची टंचाई म्हणजे दुष्काळत तेरावा महिना अशी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या नाष्टा, जेवणासाठी गॅस कोठुन आणायचा हा मोठा प्रश्न मेस आणि होस्टलचालका समोर निर्माण झाला आहे. लातूरातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. लातूर जिल्ह्यात किमान चारशे खासगी हॉस्टल आहेत. त्यातील ९० टक्के होस्टलचालक मेस सहित पैसे घेतात. तसेच शिकवणी परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल सारख्या मेस आहेत तसेच घरगुती खानावळी, डब्बे पुरवणारे, पोळी भाजी सेंटर चालवणारे अनेक आहेत. लातूरची इडली आणि त्याची वैशिष्ठपुर्ण चटणी यामुळे इडलीशी लातूरचे नवे नाते निर्माण झाले आहे हे इडलीसेंटर चालवणारे सुध्दा शेकड्याच्या संख्येने आहेत. लातूर जिल्हा हॉस्टेल असोसिएशनचे नितीन पवार म्हणाले की, आजचा दिवस गेला उद्याचा कसा जाईल या चिंतेत आम्ही आहोत, उधार उसनवारीवर सध्या मेस चालवत आहोत, नातेवाईक, मित्रा कडुन कांही मदत मिळते का एखाद सिलेंडर मिळेल का यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि मुलांच्या जेवणाची व्यवस्था करीत आहोत परंतु अशीच परिस्थिती राहीली तर मेस कशी चालवावी असा आमच्या समोर मोठा प्रश्न आहे. सरकारने वस्तीगृह आणि खानावळीला लागणार्या सिंलेंडर साठी तातडीने निर्णय करुन लातूरच्या विद्यार्थ्यांने जेवण सुरु ठेवले पाहिजे अशी आमची मागणी आहे. लातूर जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या वतीने आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आल आहे. जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, व्यवसायीक गॅस सिंलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या व्यवसायावर किमान १२ हजार कुटंबाचा उदरनिर्वाह आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येउ शकते. लातूरला शिक्षण, व्यापार आणि वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येणार्यांची संख्या मोठी आहे त्यांची सुध्दा मोठी गैरसोय होउन गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होणार आहे त्यामुळे आम्हाला पुर्ववत व्यवसायीक सिंलेंडर मिळण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. हॉटेल व्यवसायीक नगरसेवक प्रविण कस्तुरे म्हणाले की आमची आज बैठक झाली त्यात सर्वांनी अडचणी सांगितल्या आहेत. त्या आम्ही प्रशासना समोर मांडल्या आहेत. गॅस शिवाय हॉटेल चालवणे हे जिकरीचे आहे. चुली किंवा इतर मार्ग अवलंबण्यासाठी जागेचाही मोठा प्रश्न आहे तो कसा सोडवणार? कोण सोडवणार? याचा विचार करावाच लागणार असल्याचे लक्षात आणुन दिले आहे. प्रशासनाला कांहीना कांही मार्ग काढावाच लागेल अन्यथा आम्हाला व्यवसाय करणे शक्य होणार नाही याची जाणीव करुन देण्यात आली आहे. घरगुती गॅस मिळण्यात सध्या तरी कुठलीच अडचण नाही. नोंदणी केल्या नंतर तिन दिवसात घरपोंच सिंलेडर देण्यात येत आहेत. नियमानुसार क्रमवारी नुसार नोंदणीच्या प्राधान्याने सिंलेडर वाटप करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत, ते तपासणही करीत आहेत असे सांगुन गॅस एजन्सीचे मालक भुषण दाते म्हणाले की, सध्या जी एजन्सी समोर गर्दी दिसते ती टंचाईच्या अफवामुळे आणि पुर्ण माहिती नसल्यामुळे होत आहे. जी गर्दी आहे ती सुध्दा आमची बुकिंगच होत नाही यासाठी सुध्दा आहे. परंतु कंपण्यानीच आता एका सिंलेडर नंतर दुसर्या सिंलेंडर साठी पंचेवीस दिवसाची अट घातली आहे त्याची माहिती व्यवस्थीतपणे ग्राहकांना दिली गेलेली नाही त्यामुळे सर्वत्र बुकिंग होत नाही टंचाई आहे असा गैर समज निर्माण होत आहे तो दुर करावा लागणार आहे असे दाते म्हणाले. अत्यावश्यक सेवा साठी कंपण्यानी शासकीय वस्तीगृह, रुग्णालय, आदि साठी एक महिन्यासाठी त्यांना किती सिलेंडर लागतात याची नोंद करुन घेउन माहिती पाठवण्यास सांगितले असल्याचेही दाते यांनी सांगितले.
- सामाजिक बांधिलकी जपत आश्वजीत अनिल गायकवाड यांच्या सेवाकुंड संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शेकडो लिटर ताक आणि पाणी बॉटल्स चे वाटप करण्यात आले1
- Anushka Patil 8208 या Instagram प्रोफाईल वरून सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. कोण म्हणतं पहिलं प्रेम विसरता येत नाही, पण दुसरं प्रेम जर काटा भेटलं ना, तर पहिलं प्रेम झाटा पण आठवत नाही!!...1
- नारी शक्ती बिल होणार पारित, महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम4
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड1
- महात्मा गांधी एज्युकेशन सोसायटी सचिव - तारेक खान दुर्राणीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर इनके 135 वे जयंती के मौके पर दी मुबारकबाद1
- 📍पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय नारीशक्ती वंदन अधिनियम! #नारीशक्तीवंदनअधिनियम #महिलासशक्तीकरण #सशक्तमहिलासशक्तराष्ट्र #NariShaktiVandan #ModiForWomenEmpowerment1