Shuru
Apke Nagar Ki App…
बाबुभाई परीख पूल परिसरात अग्निशमन दलाकडून कावळ्याची सुरक्षित सुटका कोल्हापूर: शहरातील बाबुभाई परीख पूल परिसरात आज मांज्यात अडकलेल्या एका कावळ्याला कोल्हापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिले. मांजामध्ये पाय अडकल्याने हा कावळा झाडावरच अडकून पडला होता. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर अग्निशमन दलाच्या स्टेशन नंबर १ मधील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. झाडाची उंची आणि मांजाचा गुंता लक्षात घेऊन जवानांनी शिताफीने कावळ्यापर्यंत पोहचून त्याची सुटका केली. सुखरूप खाली काढल्यानंतर त्या कावळ्याला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. अग्निशमन दलाच्या या कामगिरीमुळे परिसरातून समाधान व्यक्त होत असून, "माणुसकी अजून जिवंत आहे" अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत.
Journalist Ajay
बाबुभाई परीख पूल परिसरात अग्निशमन दलाकडून कावळ्याची सुरक्षित सुटका कोल्हापूर: शहरातील बाबुभाई परीख पूल परिसरात आज मांज्यात अडकलेल्या एका कावळ्याला कोल्हापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवदान दिले. मांजामध्ये पाय अडकल्याने हा कावळा झाडावरच अडकून पडला होता. या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर अग्निशमन दलाच्या स्टेशन नंबर १ मधील कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. झाडाची उंची आणि मांजाचा गुंता लक्षात घेऊन जवानांनी शिताफीने कावळ्यापर्यंत पोहचून त्याची सुटका केली. सुखरूप खाली काढल्यानंतर त्या कावळ्याला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. अग्निशमन दलाच्या या कामगिरीमुळे परिसरातून समाधान व्यक्त होत असून, "माणुसकी अजून जिवंत आहे" अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- इचलकरंजीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत चौतीस आरोपींना पकडण्यात आले असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहा संपूर्ण बातमी.1
- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६ रोजी होणाऱ्या महा अधिवेशनाच्या निमित्ताने सुरू असलेल्या जय्यत तयारीची पाहणी संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांनी पणजी येथील कला अकादमी परिसरात जाऊन केली. यावेळी गोवा अधिवेशन कोअर कमिटीची बैठक कला अकादमीच्या कार्यालयात पार पडली यावेळी संघटनेचे गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, महाराष्ट्र महासचिव विकास भोसले, केंद्रीय उपाध्यक्ष महेश कुगावकर केंद्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, केंद्रीय महासचिव तेजस राऊत, राज्य उपाध्यक्ष सागर चव्हाण, राज्य प्रसिद्धीप्रमुख धिरज शेळके, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तथा स्मरणिका संपादक भाऊसाहेब फास्के, यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना केंद्रीय अध्यक्ष राजा माने म्हणाले, गोवा येथे होणारे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन हे ऐतिहासिक अधिवेशन होणार असून गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची सर्व टीम अत्यंत नियोजनबद्ध काम करीत असून देशभरातील हजारो संपादक पत्रकार या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असून संघटनेच्या पदाधिकारी व सभासदांनी या अधिवेशनासाठी अधिकृत नाव नोंदणी १५ एप्रिल २०२६ पर्यंत आपापल्या जिल्हाध्यक्ष यांचेकडे करावी. यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील म्हणाले, "गोवा राज्याला ऐतिहासिक व पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे गोवा येथे होणारे अधिवेशन अधिक दर्जेदार व सर्वांच्या ज्ञानात भर पडणारे असे होईल यासाठी आम्ही सर्व आपल्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत." बाईट - राजा माने, राष्ट्रीय अध्यक्ष बाईट - अनिल पाटील, गोवा प्रदेशाध्यक्ष5
- बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा नामांकन अर्ज भरणे पूर्वी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी स्व. अजित पवार यांच्या स्मृति स्थळाचे दर्शन घेतले1
- _विक्रम शिंदे (भोर दि 6 )हडपसर (जिल्हा पुणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ११ हजारपेक्षा अधिक हिंदूंचा ‘हिंदु राष्ट्रा’चा उद्घोष_ *पुण्यभूमीची ओळख पुसण्याचे धर्मांधांचे षडयंत्र हाणून पाडा !* - आमदार टी. राजा सिंह *हडपसर (जिल्हा पुणे)* - हडपसरसारख्या भागात गोहत्या करणारे धर्मांध पोलिसांसमोरच गोरक्षकांना चोप देत आहेत आणि धर्मांध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीवर दगडफेक करत आहेत. स्थिती अशीच राहिली, तर हिंदूंच्या मुलांचे भवितव्य अंध:कारमय आहे. तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीची ओळख पुसण्याचे षडयंत्र हिंदूंनी जागरूक राहून हाणून पाडले पाहिजे. हिंदूंमध्ये सुप्त झालेले क्षात्रतेज त्यांना आता जागृत करावे लागेल, असे आवाहन भाग्यनगर येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजा सिंह यांनी केले. ते ५ एप्रिल या दिवशी हडपसर येथील कै. मारुतराव काळे शाळेचे मैदान, काळे पडळ येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी ११ हजारपेक्षा अधिक हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदूंच्या संघटिपणाचा अविष्कार दाखवून दिला. संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने सभेची सांगता झाली! प्रारंभी शंखनादानंतर सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. पुरोहित श्री. प्रीतम तिखेगुरुजी आणि पुरोहित श्री. अरुण भिसेगावकर गुरुजी यांनी केलेल्या वेदमंत्रपठणामुळे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. सूत्रसंचालन श्री. चैतन्य तागडे यांनी केले, तर समितीच्या कार्याच्या परिचय श्री. पराग गोखले यांनी करून दिला. या सभेत हिंदूंनी विविध प्रसंगांमध्ये स्वरक्षण कसे करावे याची विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. *‘मायनॉरिटी फंड’ बंद करून तो गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरा ! - आमदार टी. राजासिंह* या प्रसंगी आमदार टी. राजासिंह म्हणाले, ‘‘यापुढील काळात हिंदूंनी जातींमध्ये विभाजित न रहाता ‘मी हिंदू’ आहे या भावनेने एकत्र येणे आवश्यक आहे. ज्यांची विचारसरणी ‘गजवा-ए-हिंद’ची आहे, त्यांना हिंदूंना पैसा का म्हणून द्यावा. त्यामुळे धर्मांध-जिहादी यांच्याकडून कोणतीही खरेदी करू नका. धर्मांधांची आर्थिक रसद कापली, तर ‘लव्ह जिहाद’ ‘लँड जिहाद’ आणि धर्मांतराची विषवल्ली आपोआप नष्ट होईल. हिंदूंच्या घामाचा पैसा ‘मायनॉरिटी फंड’च्या नावाने अल्पसंख्यांकांवर उधळला जात आहे. हा निधी तात्काळ बंद करून तो गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वापरावा, अशी आमची मागणी आहे.’’ *हिंदु राष्ट्र ही संकल्पना भारताचा मूळ स्वभाव ! - सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था* हिंदुत्वामुळे देश पिछाडीवर जाईल असा अपप्रचार केला जातो; मात्र हिंदु राष्ट्र ही संकल्पना भारताचा मूळ स्वभाव आहे. असे असले, तरी २ दशकांपूर्वी जिहादी आतंकवाद लपवण्यासाठी हिंदु आतंकवाद, भगवा दहशतवाद असे शब्दप्रयोग हे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दडपण्याचे एक ‘टूलकिट’ होते. त्यामुळे मालेगाव बाँबस्फोट, मडगाव स्फोट प्रकरण, दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश या प्रकरणांत हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यात आले. त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. याच प्रकारे सनातनचे साधक समीर गायकवाड यांना कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात नाहक अटक करण्यात आली. सामान्य शेतकरी कुटुंबातील समीर यांचा तपास यंत्रणांनी केलेला छळ आणि पुरोगाम्यांनी केलेली बदनामी यांमुळे त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्यामुळे त्यांचे झालेले निधन हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. याला हिंदूंनी विरोध केला पाहिजे! *हिंदूंची श्रद्धास्थाने, मंदिरे यांना अपवित्र करणार्या धर्मांधांना प्रतिबंधित करा ! - सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती* पुणे शहरात पुरंदर भागात ‘लँड जिहाद’ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहर आणि जिल्ह्यात अनेक मंदिरांमध्ये मूर्तीची विटंबना होत असून या घटना दडपण्याठी पोलीस धर्मांध आरोपींना माथेफिरू ठरवत आहेत. प्रत्येक घटनेत आरोपी ‘माथेफिरू’, कसा असू शकेल? तरी मंदिरांच्या संदर्भात वारंवार घडणार्या या घटनांमागील मुख्य सूत्रधार शोधून त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे. पोलीस अनेक घटनांमध्ये जीवावर उदार होऊन गोरक्षण करणार्या गोरक्षकांवर खोटे गुन्हे नोंद करून कसायांना मात्र मोकाट सोडत आहे, अशा अनेक तक्रार यापुढील काळात असे प्रकार होता कामा नयेत. पुण्यातील हिंदूंची मंदिरे, सारसबागेत होणारी धर्मांधांची घुसखोरी यांसह अनेक ठिकाणी धर्मांधांची मुजोरी वाढत आहे. तरी धर्मांधांच्या वाढत्या कारवाया रोखून हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर येण्यापासून त्यांना प्रतिबंध करण्यात यावा यांसाठी, तसेच त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी येणार्या १५ दिवसांत एक भव्य आंदोलन घेण्यात येणार आहे. प्रत्येक शहर, गाव येथील बांगलादेशी घुसखोर शोधणे आवश्यक असून या मोहिमेला गती येण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावण्याचा ठराव होणे आवश्यक आहे.’’ *उपस्थित मान्यवर* - माजी सहधर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर, भाजप पुणे कँटोन्मेंटचे सरचिटणीस श्री. समीर शेंडकर, भाजप नगरसेवक श्री. मारुति (आबा) तुपे, भाजप नगरसेवक श्री. राजेंद्र काशिनाथ भिताडे, भाजप नगरसेविका सौ. उज्वला जंगले, भाजप नगरसेविका सौ. प्राची अल्हाट, भाजप पुणे सरचिटणीस श्री. बाळासाहेब घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवृत्ती अण्णा बांदल, शिवसेना नगरसेविका सौ. मोनिका निलेश पवार, शिवसेनेचे नगरसेवक श्री. गणेश कामठे, उरळी देवाची येथील शिवसेना नगरसेविका शारदा भैरु भाडळे (माई) प्रतापगड उत्सव समितीचे श्री. विनायक सणस, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. कल्पना धनंजय हांडे, सौ. सुवर्णा खर्चे, उद्योजक श्री. कृष्णानंद नाईक, हिंदुत्वनिष्ठ श्री. रवींद्र घुले, ह. भ. प. तुषार महाराज चौधरी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुणे जिल्हा संयोजक ह.भ.प. दत्तात्रय चौरघे महाराज *संत* - पू. पप्पाजी पुराणिक, सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) मनिषा पाठक आणि पू. (सौ.) अंजली करंबेळकर, आदरणीय सौ. सरस्वती अमृतकरताई, ‘वेद वासुदेव प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. अजित तुकदेव *विशेष* १. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सनातनच्या ‘विवाहसंस्कार - शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा’ आणि ‘टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा !’ या ग्रंथांच्या मराठी भाषेतील ‘ऑनलाईन’ आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. २. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांनी आमदार टी. राजा सिंह यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चित्र भेट दिले. *हिंदुत्वाच्या कार्यासाठी विशेष योगदान देणार्या धर्मवीरांचा सत्कार - १८ सहस्रपेक्षा अधिक गोवंशांना जीवदान देणारे श्री. ऋषिकेश कामथे यांचा आमदार टी. राजा सिंह यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.1
- राज्यात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि बुवाबाजीच्या नावाखाली होत असलेल्या शोषणाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने आज तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील कुख्यात भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ सोलापूर येथे त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन दहन करण्यात आले. ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) आणि जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पूनम गेट येथे हे आंदोलन पार पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी सांगितले की, राज्यात तंत्र-मंत्र, अंगारे-धुपारे यांच्या नावाखाली महिलांचे व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात शोषण सुरू आहे. अशोक खरात याच्या प्रकरणात अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी व मंत्री सामील असल्याचे समोर येत असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे. संविधानाने अपेक्षित केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याऐवजी काही लोकप्रतिनिधी अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष कॉ. नसीमा शेख यांनी सांगितले की, अशोक खरातसारखे अनेक भोंदू बाबा राज्यातील गावागावांत व शहरांमध्ये कार्यरत असून, ते भोळ्या-भाबड्या नागरिकांचे विविध प्रकारे शोषण करत आहेत. माकपच्या राज्य कमिटी सदस्य तथा माजी नगरसेविका कॉ. नलिनीताई कलबुर्गी यांनीही या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अशोक खरात याची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरण्यात यावी, तसेच या प्रकरणात सामील असलेल्या ३९ आमदारांची नावे जाहीर करून त्यांचे तत्काळ राजीनामे घ्यावेत, असे त्यांनी सांगितले. तसेच, पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याने त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसत असून, ते तातडीने हटवावेत, अशीही मागणी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात कॉ. नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, लिंगाव्वा सोलापुरे, शकुंतला पाणीभाते, अफसाना बेग आदींचा समावेश होता. यावेळी माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. एम. एच. शेख यांनी सांगितले की, पुरोगामी महाराष्ट्राला अंधश्रद्धेची गरज नसून विवेकवाद व वैज्ञानिक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. समाजात आजही अनेक ‘अशोक खरात’ अस्तित्वात असून, त्यांना संपवण्यासाठी विवेकवाद हा एकमेव पर्याय आहे. मुख्य मागण्या: 1. अशोक खरातसह त्याला समर्थन देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. 2. राज्यभरातील भोंदू बाबांविरोधात विशेष मोहीम राबवावी. 3. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा. 4. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तात्काळ तयार करून कठोर अंमलबजावणी करावी. 5. सोशल मीडियावरील अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर बंदी घालावी व नियमनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. 6. अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा २०१३ साठी नियम तातडीने लागू करावेत. या आंदोलनाच्या यशस्वी करण्यासाठी राज्य समिती सदस्य दत्ता चव्हाण, शेवंता देशमुख,ॲड. अनिल वासम, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, हनिफ सारखेड, फातिमा बेग,विल्यम ससाणे, दाऊद शेख, नरेश दुगाणे, दीपक निकंबे, विक्रम कलबुर्गी, अकील शेख,वीरेंद्र पद्मा,बालकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, बापू साबळे, रफिक काझी, बालाजी तुम्मा ,सनी शेट्टी, बजरंग गायकवाड, आदींनी परिश्रम घेतले.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांममध्ये महापालिका व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आले आहे. लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालयातील लिपिक, वॉर्डबॉय, रोखपाल व इतर अशा १० कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.... एका कंत्राटी कर्मचाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आकुर्डी येथील ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालयामधील गैरव्यवहार समोर आला आहे. रुग्णांना देण्यात येणाऱ्या मूळ बिलावर पूर्ण रक्कम दाखविली जात असताना त्याच बिलाच्या कार्बन कॉपीवर मात्र कमी रक्कम नोंदवली जाता प्रत्यक्षात १०० रुपयांच कार्बन कॉपीवर केवळ -उर्वरित रक्कम स्वतःक होती. अशाप्रकारे रुग्णांकडून लहान-ल माध्यमातून तब्बल नऊ अपहार केला असल्या आहे. त्यानंतर सर्वच तपासणी केली. त्यामध रुग्णालयात सुमारे १० अपहार झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.... #पिंपरीचिंचवड #महापालिका #रुग्णालयअपहार #भ्रष्टाचार #आरोग्यव्यवस्था #पोलिसकारवाई #कंत्राटीकर्मचारी #शासकीयरुग्णालय #गैरव्यवहार #पुणेबातम्या #PimpriChinchwad #MunicipalCorporation #HospitalFraud #Corruption #HealthcareSystem #PoliceCase #ContractEmployees #GovernmentHospital #Scam #PuneNews1
- प्रशासकीय भवन परिसरात लावण्यात आलेल्या फलकांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या फलकांवर “अजितदादांचे नावच पुरेसे आहे,” घातकी तटकरे-पटेलची गरज नाही समस्त दादा प्रेमी..! असा उल्लेख करण्यात आला असून तटकरे-पटेल यांचा अप्रत्यक्ष निषेध करण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच हे फलक झळकल्याने या घडामोडींना अधिकच राजकीय रंग चढला आहे. दादा समर्थकांनी या माध्यमातून बारामतीत या तटकरे-पटेलची गरज नसल्याचा स्पष्ट संदेश दिल्याची चर्चा आहे. आता या प्रकरणावर संबंधित नेते काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1