*ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त सामुदायिक विवाह हसनैन चॅरिटेबल ट्रस्टची दहा वर्षाची परंपरा कायम* *ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हसनैन चॅरिटेबल ट्रस्टची दहा वर्षाची परंपरा कायम* सामुदायिक विवाह सोहळ्यात ११ मुस्लिम जोडपी विवाहबद्ध सामाजिक उपक्रमाचे दहावे वर्ष जगाला शांती,प्रेम आणि माणुसकीचा संदेश देणारे मुस्लिम धर्मीयांचे धर्मगुरू प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद-ए-मिलादुन्नबी सण उत्साहात सजरा करण्यात आला.या निमित्ताने गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेली सामुदायिक विवाह सोहळ्याची सामाजिक परंपरा यंदाही हसनैन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कायम ठेवण्यात आली.(दिनांक २६ ऑगस्ट बुधवार) रोजी मोहम्मदी जुलूस सांगता झाल्यानंतर शहरातील जी.पी.हॉल येथे हसनैन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात सामान्य कुटुंबातील एकूण ११ मुस्लिम जोडपी विवाहबद्ध झाली.उपस्थित मौलानानी खुदबा नीकाहाचे पठण करत विवाह संपन्न केले. मागील दहा वर्षांपासून हसनैन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याने या सामाजिक कार्याचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे.विवाहबद्ध झालेल्या सर्व ११ नवदांपत्यांना हसनैन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मनी मंगळसूत्रासह संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले.विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वधू-वरांच्या नातेवाईकांसह मान्यवर आणि पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना आधार देण्याचा मानस असल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या सामुदायिक विवाह सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आ.डॉ.रत्नाकरराव गुट्टे,गटनेते ॲड. मिथिलेश केंद्रे,उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर,भाजपा नेते संतोष मुरकुटे,रत्नाकर शिंदे,बाबा पटेल,नगरसेवक संदीप सानप,नगरसेवक प्रतिनिधी सय्यद चॉद,सय्यद सिराज,काँग्रेस शहराध्यक्ष शेख युनुस,नगरसेवक ॲड.कलीम शेख,इकबाल चाऊस,इफतेखार सिद्दीकी,नगरसेवक प्रतिनिधी नसीर अहमद,नगरसेवक साबेर शेख यांच्यासह संजरी ग्रुप,कुरेशी बिरादरी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी आ.डॉ.गुट्टे यांनी नवदांपत्यांना शुभेच्छा देत हसनैन चॅरिटेबल ट्रस्टच्या गेल्या दहा वर्षांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हसनैन कमेटीचे अध्यक्ष शेख मुकर्रम, उपाध्यक्ष शेख नदीम,सचिव शेख शरीफ,सय्यद समीर,महम्मद,पप्पू शेख यांच्यासह हसनैन कमेटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
*ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त सामुदायिक विवाह हसनैन चॅरिटेबल ट्रस्टची दहा वर्षाची परंपरा कायम* *ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त हसनैन चॅरिटेबल ट्रस्टची दहा वर्षाची परंपरा कायम* सामुदायिक विवाह सोहळ्यात ११ मुस्लिम जोडपी विवाहबद्ध सामाजिक उपक्रमाचे दहावे वर्ष जगाला शांती,प्रेम आणि माणुसकीचा संदेश देणारे मुस्लिम धर्मीयांचे धर्मगुरू प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद-ए-मिलादुन्नबी सण उत्साहात सजरा करण्यात आला.या निमित्ताने गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेली सामुदायिक विवाह सोहळ्याची सामाजिक परंपरा यंदाही हसनैन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कायम ठेवण्यात आली.(दिनांक २६ ऑगस्ट बुधवार) रोजी मोहम्मदी जुलूस सांगता झाल्यानंतर शहरातील जी.पी.हॉल येथे हसनैन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात सामान्य कुटुंबातील एकूण ११ मुस्लिम जोडपी विवाहबद्ध झाली.उपस्थित मौलानानी खुदबा नीकाहाचे पठण करत विवाह संपन्न केले. मागील दहा वर्षांपासून हसनैन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असल्याने या सामाजिक कार्याचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे.विवाहबद्ध झालेल्या सर्व ११ नवदांपत्यांना हसनैन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मनी मंगळसूत्रासह संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले.विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वधू-वरांच्या नातेवाईकांसह मान्यवर आणि पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना आधार देण्याचा मानस असल्याचे ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या सामुदायिक विवाह सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आ.डॉ.रत्नाकरराव गुट्टे,गटनेते ॲड. मिथिलेश केंद्रे,उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर,भाजपा नेते संतोष मुरकुटे,रत्नाकर शिंदे,बाबा पटेल,नगरसेवक संदीप सानप,नगरसेवक प्रतिनिधी सय्यद चॉद,सय्यद सिराज,काँग्रेस शहराध्यक्ष शेख युनुस,नगरसेवक ॲड.कलीम शेख,इकबाल चाऊस,इफतेखार सिद्दीकी,नगरसेवक प्रतिनिधी नसीर अहमद,नगरसेवक साबेर शेख यांच्यासह संजरी ग्रुप,कुरेशी बिरादरी सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी आ.डॉ.गुट्टे यांनी नवदांपत्यांना शुभेच्छा देत हसनैन चॅरिटेबल ट्रस्टच्या गेल्या दहा वर्षांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हसनैन कमेटीचे अध्यक्ष शेख मुकर्रम, उपाध्यक्ष शेख नदीम,सचिव शेख शरीफ,सय्यद समीर,महम्मद,पप्पू शेख यांच्यासह हसनैन कमेटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
- पारध में ईद-ए-मिलाद पर बड़ा रक्तदान शिविर! युवाओं ने पेश की भाईचारे की मिसाल AQS NEWS "पैगंबर साहब का जीवन इंसानियत का संदेश"— पारध में रक्तदान शिविर में उमड़ा जनसैलाब AQS NEWS #AQSNews #Pardh #Bhokardan #JashneEidMiladUnNabi #BloodDonationCamp #SocialUnity #MaharashtraNews #aqsnews #sillod #anisqureshisillod1
- चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथील विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार; माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार उद्घाटन केदारखेडा (प्रतिनिधी: बी. के. धसाळ): भोकरदन तालुक्यातील मौजे चिंचोली, देऊळगाव ताड आणि बोरगाव तारू या गावांमध्ये विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, भाजप ग्रामीण जालना जिल्हाध्यक्ष तथा अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष मा. आ. श्री. नारायण कुचे भूषवणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भोकरदन-जाफ्राबाद विधानसभेचे आमदार तथा पंचायतराज समिती प्रमुख मा. आ. श्री. संतोष रावसाहेब पाटील दानवे उपस्थित राहणार आहेत. तसेच गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, गटशिक्षणाधिकारी गजानन वाळके, उपअभियंता (बांधकाम विभाग जि.प.) राहुल लखापती, उपअभियंता (महावितरण) शरद चेचर आणि राजूरचे मंडळ अध्यक्ष गजानन पा. नागवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन होणारी प्रमुख विकास कामे: चिंचोली: ग्रामपंचायत इमारत बांधकाम (निधी: ₹२५ लक्ष) चिंचोली: शाळा खोली बांधकाम (निधी: ₹१२ लक्ष) देऊळगाव ताड: आंबेडकर नगर येथे सिंगल फेज रोहित्र उभारणे (निधी: ₹१० लक्ष) बोरगाव तारू: गौतम नगर येथे सिंगल फेज रोहित्र उभारणे (निधी: ₹१२ लक्ष) एकूण लाखो रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण होणार असून, या सोहळ्यास चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथील नागरिक, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच सौ. मिनाताई रविंद्र शेळके, उपसरपंच श्री. लक्ष्मण नामदेव घोलप आणि सर्व विनीत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथील विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार; माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार उद्घाटन केदारखेडा (प्रतिनिधी: बी. के. धसाळ): भोकरदन तालुक्यातील मौजे चिंचोली, देऊळगाव ताड आणि बोरगाव तारू या गावांमध्ये विविध विकास कामांचा भव्य उद्घाटन समारंभ शुक्रवार, दिनांक २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, भाजप ग्रामीण जालना जिल्हाध्यक्ष तथा अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष मा. आ. श्री. नारायण कुचे भूषवणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भोकरदन-जाफ्राबाद विधानसभेचे आमदार तथा पंचायतराज समिती प्रमुख मा. आ. श्री. संतोष रावसाहेब पाटील दानवे उपस्थित राहणार आहेत. तसेच गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, गटशिक्षणाधिकारी गजानन वाळके, उपअभियंता (बांधकाम विभाग जि.प.) राहुल लखापती, उपअभियंता (महावितरण) शरद चेचर आणि राजूरचे मंडळ अध्यक्ष गजानन पा. नागवे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. उद्घाटन होणारी प्रमुख विकास कामे: चिंचोली: ग्रामपंचायत इमारत बांधकाम (निधी: ₹२५ लक्ष) चिंचोली: शाळा खोली बांधकाम (निधी: ₹१२ लक्ष) देऊळगाव ताड: आंबेडकर नगर येथे सिंगल फेज रोहित्र उभारणे (निधी: ₹१० लक्ष) बोरगाव तारू: गौतम नगर येथे सिंगल फेज रोहित्र उभारणे (निधी: ₹१२ लक्ष) एकूण लाखो रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण होणार असून, या सोहळ्यास चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथील नागरिक, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच सौ. मिनाताई रविंद्र शेळके, उपसरपंच श्री. लक्ष्मण नामदेव घोलप आणि सर्व विनीत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.1
- आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे संघर्ष समितीतर्फे खान्देशस्तरीय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जळगावात सत्कार1
- आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते आईवडिलांनी मुलावर योग्य संस्कार दिले तर...कीर्तनकार ह भ प विष्णु सास्ते1
- जलगाव जिल्हे मे एक औरत को नहाते हुए छेड रहा था एक आदमी उसे पकड के चारो तरफ से की पिटाई जलगाव लेटेस्ट न्यूज #जलगावन्यूज #जळगावजिल्हा #viralnewz #shuruapp1
- नेपाल का जलप्रलय भारत के दरवाजे पर! बिहार-UP में हाई अलर्ट, कोसी-गंडक मचा सकती हैं तबाही1
- kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS kya sahaba ne milad manaya tha kya sahaba ne Eid milad manaya tha #eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal1
- ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता 🚨 ब्रेकिंग न्यूज 🚨 नेपाळमध्ये भीषण महापूर; १५७ जणांचा मृत्यू, ४०० हून अधिक बेपत्ता काठमांडू : नेपाळ-चीन सीमेवरील भोटेकोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या माहितीनुसार आतापर्यंत १५७ जणांचे मृतदेह सापडले असून ४०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. पुरामुळे रस्ते, पूल, घरे आणि वीज प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये परदेशी नागरिकांचाही मोठा समावेश असून १३३ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची ताजी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हिमनदीचा मोठा भाग कोसळल्याने नदीत माती, दगड आणि पाण्याचा प्रचंड लोंढा निर्माण झाला असावा. या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे. बचाव पथके, सुरक्षा दल आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.1