आर्णी येथे जगतगुरु संत रविदास महाराज यांची जयंती उत्सव साजरी आर्णी येथील गुरु रविदास बहुउदेशिय संस्थाच्या वतीने जगतगुरु संत रविदास महाराज यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमा निमित्य संत रविदास नगर येथुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.त्या नंतर रेणुका मंगल कार्यालय येथे कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर उध्दव वाडेकर, सत्कारमूर्ती म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. श्री. नालंदाजी भरणे साहेब , उपनगराध्यक्ष मा.श्री.निलेशभाऊ गावंडे व यवतमाळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. स्वाती अभिलाष खंडारे , कार्यक्रमाचे उदघाटक आर्णी चे ठाणेदार मा.श्री.निलेश सुरटकर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सुरेश खंडारे, श्री.हरीभाऊ खंडारे, श्री.देवानंद पांढरे प्रमुख वक्ते मा.श्री.गजानन घुबडे हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत वानखडे यांनी केले त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. त्या नंतर मा.श्री.गजानन घुबडे यांनी गुरू रविदास महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी दलित मित्र लक्ष्मणराव कोरटकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ श्री.रमेश कोरटकर यांच्याकडुन छोट्या छोट्या चिमुकल्यांच्या भाषणाला बक्षीस देण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन सौ दीक्षा गोडवे आभार अनिल खंडारे यांनी केले.या कार्यक्रमाला गुरु रविदास महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती लिलाबाई वानरे, गुरु रविदास युवा मंच अध्यक्ष रोहित पाटील यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल खंडारे,राजु वाडेकर, संतोष पाचखंडे, गणेश पांढरे, संतोष गोडवे, मनोज माघाडे, निळकंठ पाटेकर, गजानन गोडवे, दिपक वानरे, संतोष र.पाचखंडे, श्रावण सोनटक्के, विजय वासनिक, भास्कर भोकरे, राजु धाडवे, विशाल वाडेकर,वैभव माघाडे, प्रतिक वाडेकर, विक्रांत नाचणे ,शुभम वाडेकर, राहुल पानझडे, साई वानखडे,लखन भोकरे,उमेश गोडवे, अनिकेत खंडारे,चंचल इंगळे,निता खंडारे, सोनू पाचखंडे, सारिका गोडवे, सविता वाडेकर, रिमा गोडवे,वनिता वाडेकर, स्वाती वानखडे, यांनी परीश्रम घेतले
आर्णी येथे जगतगुरु संत रविदास महाराज यांची जयंती उत्सव साजरी आर्णी येथील गुरु रविदास बहुउदेशिय संस्थाच्या वतीने जगतगुरु संत रविदास महाराज यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमा निमित्य संत रविदास नगर येथुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.त्या नंतर रेणुका मंगल कार्यालय येथे कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर उध्दव वाडेकर, सत्कारमूर्ती म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. श्री. नालंदाजी भरणे साहेब , उपनगराध्यक्ष मा.श्री.निलेशभाऊ गावंडे व यवतमाळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. स्वाती अभिलाष खंडारे , कार्यक्रमाचे उदघाटक आर्णी चे ठाणेदार मा.श्री.निलेश सुरटकर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सुरेश खंडारे, श्री.हरीभाऊ खंडारे, श्री.देवानंद पांढरे प्रमुख वक्ते मा.श्री.गजानन घुबडे हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत वानखडे यांनी केले त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. त्या नंतर मा.श्री.गजानन घुबडे यांनी गुरू रविदास महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी दलित मित्र लक्ष्मणराव कोरटकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ श्री.रमेश कोरटकर यांच्याकडुन छोट्या छोट्या चिमुकल्यांच्या भाषणाला बक्षीस देण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन सौ दीक्षा गोडवे आभार अनिल खंडारे यांनी केले.या कार्यक्रमाला गुरु रविदास महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती लिलाबाई वानरे, गुरु रविदास युवा मंच अध्यक्ष रोहित पाटील यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल खंडारे,राजु वाडेकर, संतोष पाचखंडे, गणेश पांढरे, संतोष गोडवे, मनोज माघाडे, निळकंठ पाटेकर, गजानन गोडवे, दिपक वानरे, संतोष र.पाचखंडे, श्रावण सोनटक्के, विजय वासनिक, भास्कर भोकरे, राजु धाडवे, विशाल वाडेकर,वैभव माघाडे, प्रतिक वाडेकर, विक्रांत नाचणे ,शुभम वाडेकर, राहुल पानझडे, साई वानखडे,लखन भोकरे,उमेश गोडवे, अनिकेत खंडारे,चंचल इंगळे,निता खंडारे, सोनू पाचखंडे, सारिका गोडवे, सविता वाडेकर, रिमा गोडवे,वनिता वाडेकर, स्वाती वानखडे, यांनी परीश्रम घेतले
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे श्री संत मारोती महाराज मंदिरात दहीहंडी आणि काला वाटप करण्यात आलं. श्री संत मारोती महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.1
- दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात सोमवार दि. १६ फेब्रुवारीला उशिरा रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शाम श्रावण टारपे (वय ५७, रा. कावेरी नगर, दारव्हा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. घटना १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.१० ते ११.२० दरम्यान घडली. तक्रारदार यांचा पुतण्या गौरव प्रकाश टारपे (वय २६, रा. कावेरी नगर) हा घराजवळ असताना आरोपींनी त्याच्याशी वाद घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी राफ्टरने त्याच्या डोक्यावर व शरीरावर प्रहार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गौरव गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मारहाणीचा व्हिडिओ दिवसभर समाजमाध्यमांवर व्हायरल होत होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास दारव्हा पोलीस करीत आहेत. सदर घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असून दारव्हा ठाणेदार यांना शहरातील काही सामाजिक संघटनाणी रात्री ७. ३० वाजता निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली.2
- *“धानोरा विकासकामांचा भांडाफोड; जलसंधारण घोटाळ्यावर जि.प. प्रशासन कोंडीत!”* - जि.प. यवतमाळसमोर आमरण उपोषणाला सुरवात! उमरखेड : धानोरा (सा), ता. उमरखेड येथील कथित विकासकामांतील गैरव्यवहार आणि जलसंधारण विभागातील अनियमिततेच्या गंभीर आरोपांमुळे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे. सोमवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२६) पासून जिल्हा परिषद यवतमाळ कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून प्रशासनावर थेट कारवाईचा दबाव वाढला आहे. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा या आमरण उपोषणात रामदास अंबादास कांबळे (अध्यक्ष, संयुक्त पत्रकार संघ), शेख इरफान शेख इसा (कार्याध्यक्ष) आणि सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी (उपाध्यक्ष) सहभागी झाले आहेत त्यांनी जि.प. कार्यालयासमोर “दोषींवर कारवाई झाल्याशिवाय माघार नाही” असा स्पष्ट इशारा दिला. *धानोरा प्रकरणातील आरोप गंभीर* उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप थेट जनहिताशी निगडित असून त्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल गैरव्यवहार, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम न करता बिले काढल्याचा आरोप, सार्वजनिक शौचालयाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत तक्रारींकडे दुर्लक्ष यांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांत चौकशी व कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. *जलसंधारण विभागावर लाखोंच्या भ्रष्टाचाराचा ठपका* जि.प. उपविभाग पुसद येथे कार्यरत उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे यांच्या कार्यकाळात पुसद, दिग्रस, उमरखेड व महागाव तालुक्यांतील विकासकामांत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. धरण–तलाव गाळ उपसा योजनेत अनियमितता,वीटभट्टी धारकांना नियमबाह्य माती परवाने, संबंधित अधिकाऱ्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ निलंबन आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. *तक्रारींनंतरही कारवाई नाही* १७ डिसेंबर २०२५ रोजी लेखी निवेदन, ९ जानेवारी २०२६ रोजी स्मरणपत्र आणि ३० जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व ग्रामविकास मंत्र्यांना ई-मेलद्वारे तसेच प्रत्यक्ष तक्रार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. “दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उपोषणादरम्यान काही अनुचित घडल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा देत उपोषणकर्त्यांनी उपोषण तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान जि.प. कार्यालया समोर सुरू असलेल्या आमरण उपोषणातील गंभीर आरोपांवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- Post by Sharad Dayedar1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 🕉️📖 महाशिवरात्री विशेषांकाचे दिमाखदार विमोचन! 📖🕉️ महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त हिमायतनगरमध्ये सुरू असलेल्या भक्तिमय वातावरणात “श्रमिक लोकराज्य” दैनिकाच्या महाशिवरात्री उत्सव 2026 विशेषांकाचे उत्साहात विमोचन संपन्न झाले. या विशेषांकाचे प्रकाशन माजी आमदार मा. माधवराव पाटील जवळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यास मंदिर कमिटी पदाधिकारी, नगरपरिषद प्रतिनिधी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्म, संस्कृती आणि समाजमनाचे दर्शन घडवणारा हा विशेषांक वाचकांसाठी पर्वणी ठरत आहे. 🙏 #श्रमिकलोकराज्य #महाशिवरात्रीविशेषांक #Mahashivratri2026 #हिमायतनगर #दैनिकविमोचन धार्मिकउत्सव ShivBhakti MediaNews NNLDigitalMedia1
- अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची छत्री तलावाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी1
- Post by Sharad Dayedar1