अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश नांदेड :- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगली असून सर्व विभागांना आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्ह्यात वेळोवेळी जनजागृती व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांदरम्यानही महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे अनेक संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जातो. या काळात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणताही बालविवाह घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने दक्ष राहावे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत. बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश नांदेड :- अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगली असून सर्व विभागांना आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्ह्यात वेळोवेळी जनजागृती व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांदरम्यानही महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे अनेक संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जातो. या काळात बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणताही बालविवाह घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने दक्ष राहावे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमित केले आहेत. बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
- नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.1
- Post by Today One Live1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by Jafar tarodekar1
- Post by Mohsin ahmed khan1
- खासदार संजय जाधव यांच्या हस्ते गॅलक्सी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे शुभारंभ1
- Post by Mushtaq Shaikh1
- Post by Today One Live1