ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार ठरणारी हेल्प लाईन ‘एल्डर लाईन १४५६७’ सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ही सेवा जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवली जात आहे. गरजू ज्येष्ठ नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी १४५६७ या क्रमांकावर संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शाह यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. “घरात असूनही एकटे आहोत…”, “मुलगा परदेशात आहे…”, “नातेवाईकांनी घराबाहेर काढले…” अशा वेदनादायक अनुभवांची कहाणी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ज्येष्ठ नागरिक ‘एल्डर लाईन १४५६७’ या हेल्पलाईनवर मोकळेपणाने मांडत आहेत. ज्येष्ठांच्या अडचणी ऐकून घेणारी, त्यांना मार्गदर्शन व प्रत्यक्ष मदत देणारी ही सेवा आज अनेकांसाठी आधारवड ठरत आहे. “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन जनसेवा फाउंडेशन गेल्या ३७ वर्षांपासून सातत्याने समाजसेवेचे कार्य करत आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गरीब, आजारी, वृद्ध, अपंग, निराधार, महिला तसेच गरीब मुला-मुलींसाठी विविध कल्याणकारी प्रकल्प राबवले जात आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जाही प्राप्त झाला आहे. *महाराष्ट्रातील उल्लेखनीय कामगिरी* ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या ‘एल्डर लाईन १४५६७’ या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईनवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक कॉल्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष हस्तक्षेप करून ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ मदत करण्यात आली आहे *हेल्पलाईनद्वारे मिळणाऱ्या प्रमुख मोफत सेवा* *माहिती सेवा:* आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृहे, वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर्स याबाबत सविस्तर माहिती. *मार्गदर्शन:* कायदेशीर, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत सल्ला, पेन्शन योजना, तसेच ज्येष्ठ नागरिकांचे चरितार्थ व कल्याण अधिनियम २००७ संदर्भातील माहिती. *भावनिक आधार:* मानसिक ताण, चिंता, एकटेपणा, नैराश्य यावर समुपदेशन व आधार. *संरक्षण व पुनर्वसन:* छळ, बेघरपणा किंवा अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत, कुटुंबीयांशी संवाद, पोलीस प्रशासनाशी समन्वय व आवश्यक ते पुनर्वसन. ‘एल्डर लाईन १४५६७’ ही केवळ एक हेल्पलाईन नसून, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्वासाचा हात आणि सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे गरजेचे आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शाह सांगतात.
ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार ठरणारी हेल्प लाईन ‘एल्डर लाईन १४५६७’ सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईन देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ही सेवा जनसेवा फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवली जात आहे. गरजू ज्येष्ठ नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी १४५६७ या क्रमांकावर संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शाह यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. “घरात असूनही एकटे आहोत…”, “मुलगा परदेशात आहे…”, “नातेवाईकांनी घराबाहेर काढले…” अशा वेदनादायक अनुभवांची कहाणी महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ज्येष्ठ नागरिक ‘एल्डर लाईन १४५६७’ या हेल्पलाईनवर मोकळेपणाने मांडत आहेत. ज्येष्ठांच्या अडचणी ऐकून घेणारी, त्यांना मार्गदर्शन व प्रत्यक्ष मदत देणारी ही सेवा आज अनेकांसाठी आधारवड ठरत आहे. “मानवसेवा हीच ईश्वरसेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन जनसेवा फाउंडेशन गेल्या ३७ वर्षांपासून सातत्याने समाजसेवेचे कार्य करत आहे. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गरीब, आजारी, वृद्ध, अपंग, निराधार, महिला तसेच गरीब मुला-मुलींसाठी विविध कल्याणकारी प्रकल्प राबवले जात आहेत. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेला संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जाही प्राप्त झाला आहे. *महाराष्ट्रातील उल्लेखनीय कामगिरी* ऑगस्ट २०२१ पासून सुरू झालेल्या ‘एल्डर लाईन १४५६७’ या राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाईनवर आतापर्यंत ४ लाखांहून अधिक कॉल्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष हस्तक्षेप करून ज्येष्ठ नागरिकांना तात्काळ मदत करण्यात आली आहे *हेल्पलाईनद्वारे मिळणाऱ्या प्रमुख मोफत सेवा* *माहिती सेवा:* आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृहे, वृद्धाश्रम, डे-केअर सेंटर्स याबाबत सविस्तर माहिती. *मार्गदर्शन:* कायदेशीर, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत सल्ला, पेन्शन योजना, तसेच ज्येष्ठ नागरिकांचे चरितार्थ व कल्याण अधिनियम २००७ संदर्भातील माहिती. *भावनिक आधार:* मानसिक ताण, चिंता, एकटेपणा, नैराश्य यावर समुपदेशन व आधार. *संरक्षण व पुनर्वसन:* छळ, बेघरपणा किंवा अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत, कुटुंबीयांशी संवाद, पोलीस प्रशासनाशी समन्वय व आवश्यक ते पुनर्वसन. ‘एल्डर लाईन १४५६७’ ही केवळ एक हेल्पलाईन नसून, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्वासाचा हात आणि सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठी ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे गरजेचे आहे, असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शाह सांगतात.
- अंदरसूलच्या एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन प्रतिनिधी सचिन वखारे येवला येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे (एम.एस.जी.एस.) इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शितल तुषार भागवत उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सहकार व शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिक्षक अमोल आहेर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी स्कूलच्या वतीने डॉ. शितल भागवत, संतोष घोडेराव, शब्बीर इनामदार, सागर पाठक, हितेश दाभाडे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सौम्या एंडाईत, देवांश देशमुख, प्राजक्ता सोमासे यांनी भाषणे केली, तर खदीजा खान, वैष्णवी पाराटे, स्तुती पांडे, जानवी देशमुख व कवयित्री शोभा निकम यांनी कविता सादर केल्या. प्रमुख पाहुण्या डॉ. शितल भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "मुलींनी राजमाता जिजाऊंसारखे निडर व स्वावलंबी बनावे आणि त्यांचा आदर्श आपल्या जीवनात आणावा." अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास संस्थेचे सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड, संचालक आकाश सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, डॉ. सुवर्णा कडलक यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी केले तर आभार दीपक खैरनार यांनी मानले.1
- शिखाडे वणी येथे जंगम पेट्रोलपंपाजवळ गोरक्षकांनी वाचवले ६३ गायींचे जीव1
- बेलापूर बु गावातील मेन टाकी फिल्टर प्लांट पिण्या साठी पुरवठा होत असलेल्या वॉटर फिल्टर प्लांट ची झालेली दुरावास्ता पम्प हाऊस मध्ये पडल्या आहेत बियर च्या बाटल्या तुरटीवर गुटखा खाऊन थुंकलेले आणि पाण्यात शेवळ आणि झाडांचा पाला पाचोळा पडलेला कित्याक दिवसाची तुराती ची काळजी घेताना ग्रामपंचायत प्रशासन व प्यानल बोर्ड उघड्या वायर आणि त्याच्या जवळ पडलेले भंगार आणि त्यात ठेवलेल्या TCL च्या गोण्या ग्रामसेवक म्हणतात हे काम टेक्निकलं माणसाचे माझे नाही. असे हुशार आणि होतकरू ग्रामसेवक लाभले आहेत ग्रामपंचायत बेलापूर ला आणि पहा हा बेलापूर ऐनतपूर खटकळी गावठाण,रामगड, खटोड कॉलनी, कोल्हार रोड, पाहुणे नगर, तुकाराम नगर, सातभाई वस्ती, चांद नगर, शेलार वाडा, व संपूर्ण गावात ह्या स्वरूपाचा पाणी पुरवठा करत आहे ग्रामपंचायत बेलापूर बु आणि लिकेजवर भरमसाठ खरच करून लिकेज कुठले काढले हे कळण्यास तयार नाही एका महिन्यात JCB चे बिल होते 38 हजार एवढे चालले कुठे किती लिकेज संपूर्ण गाव उकरून परत बुजवत आहेत का काय हा सवाल ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांचा8
- Post by M Veer1
- किसान की आवाज हू मे!1
- हेडलाइन: वार्ड क्रमांक 95 से शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट के उम्मीदवार एडवोकेट हरी शास्त्री को मिला ज़बरदस्त जनसमर्थन विस्तृत समाचार: मुंबई के वार्ड क्रमांक 95 में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट के उम्मीदवार एडवोकेट हरी शास्त्री को जनता का भारी समर्थन मिलता नज़र आ रहा है। चुनावी जनसंपर्क अभियान के दौरान एडवोकेट हरी शास्त्री ने वार्ड के विभिन्न इलाकों का दौरा कर स्थानीय नागरिकों से सीधा संवाद किया और उनकी समस्याओं को गंभीरता से सुना। इस दौरान स्थानीय नागरिकों ने सड़क, पानी, साफ़-सफाई, स्वास्थ्य सेवाएं और युवाओं के रोजगार जैसे मुद्दों को प्रमुखता से सामने रखा। एडवोकेट हरी शास्त्री ने सभी समस्याओं के समाधान का भरोसा दिलाते हुए कहा कि जनता की आवाज़ को मनपा और सदन तक मजबूती से पहुंचाना ही उनकी पहली प्राथमिकता होगी। जनता ने उनके सरल स्वभाव, साफ़ छवि और सामाजिक कार्यों के अनुभव की सराहना करते हुए खुलकर समर्थन जताया। कई नागरिकों ने कहा कि एडवोकेट हरी शास्त्री ही ऐसे उम्मीदवार हैं जो वार्ड के विकास को नई दिशा दे सकते हैं। पूरे वार्ड में चुनाव को लेकर उत्साह का माहौल है और जिस तरह से लोगों का समर्थन मिल रहा है, उससे यह साफ़ दिखाई दे रहा है कि वार्ड 95 में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट की स्थिति मज़बूत होती जा रही है। जनसमर्थन के इस बढ़ते कारवां से चुनावी मुकाबला और भी दिलचस्प बन गया है।1
- SpiceJet Faces Serious Allegations as Passenger Files ₹1 Crore Defamation Complaint in Varanasi #SpiceJet #SpiceJetNews #FlightDiversion #AviationNews #PassengerRights #AirlineNegligence #MentalHarassment #DefamationCase #VaranasiNews #LucknowAirport #BreakingNews #IndianAviation #स्पाइसजेट #यात्रीअधिकार #एयरलाइनलापरवाही #वाराणसीखबर #लखनऊ #ब्रेकिंगन्यूज़ #यात्रीपरेशान #हककीआवाज़ #SpiceJetFlight #SG329 #VaranasiBreaking1
- सावधान ! नायलॉन मांजा विकणाऱ्यांचे धाबे दणाणले; येवल्यात शहर पोलिसांकडून १०४ रोलचा साठा जप्त. प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1