logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आरडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्मशानभूमीत मृतदेह ठेवण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी वापरला जाणारा ‘पाळणा’ अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते शरद जगधने यांनी केला आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन, संबंधित वार्ड सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष होत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. जगधने यांनी स्पष्ट केले की, जिवंतपणी माणसाला सन्मान मिळणे आवश्यक आहेच, पण मृत्यूनंतरही त्याच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार होणे ही समाज आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, आरडगाव स्मशानभूमीतील सध्याची परिस्थिती पाहता मृतांच्या सन्मानालाच तिलांजली दिली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्मशानभूमीतील हा ‘पाळणा’ पूर्णपणे मोडकळीस आलेला असून, त्याची तातडीने दुरुस्ती करणे किंवा नवीन व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावाच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात आणि निधी खर्च झाल्याचे दावे केले जातात; पण स्मशानभूमीसारख्या मूलभूत आणि संवेदनशील ठिकाणाची अशी अवस्था असेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, शरद जगधने यांनी ग्रामपंचायतीने तात्काळ या प्रश्नाची दखल घेऊन स्मशानभूमीतील ‘पाळण्याची’ दुरुस्ती करावी अथवा नवीन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, ग्रामस्थांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मृतांचा सन्मान राखणे ही केवळ सामाजिकच नव्हे तर नैतिक जबाबदारी असून, आरडगाव ग्रामपंचायत या प्रश्नावर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले आहे.

5 hrs ago
user_पत्रकार, चंद्रकांत जगधने
पत्रकार, चंद्रकांत जगधने
Photographer राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र•
5 hrs ago

आरडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्मशानभूमीत मृतदेह ठेवण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी वापरला जाणारा ‘पाळणा’ अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते शरद जगधने यांनी केला आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन, संबंधित वार्ड सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष होत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. जगधने यांनी स्पष्ट केले की, जिवंतपणी माणसाला सन्मान मिळणे आवश्यक आहेच, पण मृत्यूनंतरही त्याच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार होणे ही समाज आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, आरडगाव स्मशानभूमीतील सध्याची परिस्थिती पाहता मृतांच्या सन्मानालाच तिलांजली दिली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्मशानभूमीतील हा ‘पाळणा’ पूर्णपणे मोडकळीस आलेला असून, त्याची तातडीने दुरुस्ती करणे किंवा नवीन व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस

कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावाच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात आणि निधी खर्च झाल्याचे दावे केले जातात; पण स्मशानभूमीसारख्या मूलभूत आणि संवेदनशील ठिकाणाची अशी अवस्था असेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, शरद जगधने यांनी ग्रामपंचायतीने तात्काळ या प्रश्नाची दखल घेऊन स्मशानभूमीतील ‘पाळण्याची’ दुरुस्ती करावी अथवा नवीन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, ग्रामस्थांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मृतांचा सन्मान राखणे ही केवळ सामाजिकच नव्हे तर नैतिक जबाबदारी असून, आरडगाव ग्रामपंचायत या प्रश्नावर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आरडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्मशानभूमीत मृतदेह ठेवण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी वापरला जाणारा ‘पाळणा’ अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते शरद जगधने यांनी केला आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन, संबंधित वार्ड सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष होत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. जगधने यांनी स्पष्ट केले की, जिवंतपणी माणसाला सन्मान मिळणे आवश्यक आहेच, पण मृत्यूनंतरही त्याच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार होणे ही समाज आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, आरडगाव स्मशानभूमीतील सध्याची परिस्थिती पाहता मृतांच्या सन्मानालाच तिलांजली दिली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. स्मशानभूमीतील हा ‘पाळणा’ पूर्णपणे मोडकळीस आलेला असून, त्याची तातडीने दुरुस्ती करणे किंवा नवीन व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावाच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात आणि निधी खर्च झाल्याचे दावे केले जातात; पण स्मशानभूमीसारख्या मूलभूत आणि संवेदनशील ठिकाणाची अशी अवस्था असेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, शरद जगधने यांनी ग्रामपंचायतीने तात्काळ या प्रश्नाची दखल घेऊन स्मशानभूमीतील ‘पाळण्याची’ दुरुस्ती करावी अथवा नवीन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, ग्रामस्थांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मृतांचा सन्मान राखणे ही केवळ सामाजिकच नव्हे तर नैतिक जबाबदारी असून, आरडगाव ग्रामपंचायत या प्रश्नावर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले आहे.
    2
    आरडगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्मशानभूमीत मृतदेह ठेवण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी वापरला जाणारा ‘पाळणा’ अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते शरद जगधने यांनी केला आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन, संबंधित वार्ड सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक यांचे दुर्लक्ष होत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. जगधने यांनी स्पष्ट केले की, जिवंतपणी माणसाला सन्मान मिळणे आवश्यक आहेच, पण मृत्यूनंतरही त्याच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार होणे ही समाज आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, आरडगाव स्मशानभूमीतील सध्याची परिस्थिती पाहता मृतांच्या सन्मानालाच तिलांजली दिली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्मशानभूमीतील हा ‘पाळणा’ पूर्णपणे मोडकळीस आलेला असून, त्याची तातडीने दुरुस्ती करणे किंवा नवीन व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गावाच्या विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जातात आणि निधी खर्च झाल्याचे दावे केले जातात; पण स्मशानभूमीसारख्या मूलभूत आणि संवेदनशील ठिकाणाची अशी अवस्था असेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर, शरद जगधने यांनी ग्रामपंचायतीने तात्काळ या प्रश्नाची दखल घेऊन स्मशानभूमीतील ‘पाळण्याची’ दुरुस्ती करावी अथवा नवीन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, ग्रामस्थांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मृतांचा सन्मान राखणे ही केवळ सामाजिकच नव्हे तर नैतिक जबाबदारी असून, आरडगाव ग्रामपंचायत या प्रश्नावर किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले आहे.
    user_पत्रकार, चंद्रकांत जगधने
    पत्रकार, चंद्रकांत जगधने
    Photographer राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • येवल्यातील हरिभाऊ ठाकूर यांच्या मक्याच्या खळ्यावर आज साडेचार फूट लांबीचा अत्यंत विषारी इंडियन कोब्रा (नाग) आढळल्याने परिसरात मोठी घबराट पसरली. खळ्यावर मका काढण्याचे अथवा आवराआवरीचे काम सुरू असताना अचानक हा मोठा नाग समोर आल्याने कामगारांची धावपळ उडाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हरिभाऊ ठाकूर यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून स्थानिक सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी कसलाही विलंब न करता मक्याच्या खळ्यावर धाव घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि शांततेने, नागाला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. साडेचार फुटी जहाल विषारी कोब्रा नाग पकडल्याने ठाकूर परिवार आणि उपस्थित नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. यानंतर दीपक सोनवणे यांनी वनविभागाच्या नियमांनुसार या नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले. सोनवणे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि धाडसाबद्दल ठाकूर परिवारासह ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
    1
    येवल्यातील हरिभाऊ ठाकूर यांच्या मक्याच्या खळ्यावर आज साडेचार फूट लांबीचा अत्यंत विषारी इंडियन कोब्रा (नाग) आढळल्याने परिसरात मोठी घबराट पसरली. खळ्यावर मका काढण्याचे अथवा आवराआवरीचे काम सुरू असताना अचानक हा मोठा नाग समोर आल्याने कामगारांची धावपळ उडाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हरिभाऊ ठाकूर यांनी तात्काळ प्रसंगावधान राखून स्थानिक सर्पमित्र दीपक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र दीपक सोनवणे यांनी कसलाही विलंब न करता मक्याच्या खळ्यावर धाव घेतली. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि शांततेने, नागाला कोणतीही इजा न पोहोचवता सुरक्षितरीत्या रेस्क्यू केले. साडेचार फुटी जहाल विषारी कोब्रा नाग पकडल्याने ठाकूर परिवार आणि उपस्थित नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

यानंतर दीपक सोनवणे यांनी वनविभागाच्या नियमांनुसार या नागाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडून दिले. सोनवणे यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल आणि धाडसाबद्दल ठाकूर परिवारासह ग्रामस्थांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • येवला-मनमाड रस्त्यावरच्या कामात गंभीर त्रुटी समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या 'साईड पट्टा' भरण्यासाठी मुरमाऐवजी निकृष्ट दर्जाची माती वापरली जात आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या निकृष्ट मातीमुळे पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो, परिणामी वाहने घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. इतकेच नाही, तर पाऊस थांबून ऊन पडल्यास याच मातीची प्रचंड धूळ उडते. ही धूळ विशेषतः दुचाकी चालकांच्या डोळ्यात जात असल्याने, रस्त्यावर अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे.
    1
    येवला-मनमाड रस्त्यावरच्या कामात गंभीर त्रुटी समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या 'साईड पट्टा' भरण्यासाठी मुरमाऐवजी निकृष्ट दर्जाची माती वापरली जात आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

या निकृष्ट मातीमुळे पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो, परिणामी वाहने घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. इतकेच नाही, तर पाऊस थांबून ऊन पडल्यास याच मातीची प्रचंड धूळ उडते. ही धूळ विशेषतः दुचाकी चालकांच्या डोळ्यात जात असल्याने, रस्त्यावर अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे.
    user_Janardhan nitin jadhav
    Janardhan nitin jadhav
    Local News Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, औचित्याच्या मुद्द्याद्वारे पैठण मतदारसंघातील बिडकीन गावात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. बिडकीनमधील १९ तरुण गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेले असताना, समुद्रात बुडून त्यापैकी हिमांशू कांबळे, प्रेम आदमने, आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे आणि आनंद नरवडे या ५ तरुणांचा मृत्यू झाला. मृत पावलेले हे तरुण आपापल्या कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने, या घटनेमुळे संबंधित कुटुंबे पूर्णपणे कोलमडली आहेत. दरम्यान, मृतदेह शोधण्याच्या कामात राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत आणि प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. या पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी शासनाने तातडीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
    1
    राज्याच्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, औचित्याच्या मुद्द्याद्वारे पैठण मतदारसंघातील बिडकीन गावात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले. बिडकीनमधील १९ तरुण गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेले असताना, समुद्रात बुडून त्यापैकी हिमांशू कांबळे, प्रेम आदमने, आदित्य राऊत, अनिकेत हिवराळे आणि आनंद नरवडे या ५ तरुणांचा मृत्यू झाला.

मृत पावलेले हे तरुण आपापल्या कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने, या घटनेमुळे संबंधित कुटुंबे पूर्णपणे कोलमडली आहेत. दरम्यान, मृतदेह शोधण्याच्या कामात राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत आणि प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. या पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी शासनाने तातडीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी पालकांना आपल्या मुलींच्या सोशल मीडियावरील हालचालींवर नियमितपणे लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणे, वैयक्तिक माहिती शेअर करणे आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे, असा सल्ला त्यांनी दिला. सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्यामुळे, पालकांनी मुलांशी सतत संवाद साधणे आणि त्यांना सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर कसा करावा, याबद्दल योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे चाऊस यांनी नमूद केले. तसेच, कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांशी किंवा सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
    1
    पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी पालकांना आपल्या मुलींच्या सोशल मीडियावरील हालचालींवर नियमितपणे लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणे, वैयक्तिक माहिती शेअर करणे आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळावे, असा सल्ला त्यांनी दिला. सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्यामुळे, पालकांनी मुलांशी सतत संवाद साधणे आणि त्यांना सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर कसा करावा, याबद्दल योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे चाऊस यांनी नमूद केले. तसेच, कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांशी किंवा सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
    user_Salman Fayyaz khan
    Salman Fayyaz khan
    Video editing service खुलदाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी 'ऑपरेशन ऑल आऊट' ही विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत, पोलिसांनी एकाच रात्रीत तब्बल दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई केली आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी 'ऑपरेशन ऑल आऊट' ही विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत, पोलिसांनी एकाच रात्रीत तब्बल दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची मोठी कारवाई केली आहे.
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर येथील सिडको परिसरातील फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स प्रीस्कूलमध्ये एक गंभीर घटना समोर आली आहे, जिथे २३ महिन्यांच्या एका विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्याकडून मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून, त्यात दोन लहान मुलांमध्ये बराच वेळ वाद आणि झटापट सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या संपूर्ण प्रकारादरम्यान शाळेतील शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांकडून कोणताही तत्काळ हस्तक्षेप झाल्याचे फुटेजमध्ये दिसत नाही. मारहाण झालेल्या मुलाला घरी आणल्यानंतर त्याच्या चेहरा, नाक, ओठ आणि शरीरावर मारहाणीच्या स्पष्ट खुणा आढळून आल्या. शाळा प्रशासनाने सुरुवातीला समाधानकारक माहिती दिली नाही आणि सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यासही टाळाटाळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा आणि लहान मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पालक मयूर बोरसे यांनी दिली आहे.
    4
    छत्रपती संभाजीनगर येथील सिडको परिसरातील फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स प्रीस्कूलमध्ये एक गंभीर घटना समोर आली आहे, जिथे २३ महिन्यांच्या एका विद्यार्थ्याला दुसऱ्या विद्यार्थ्याकडून मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले असून, त्यात दोन लहान मुलांमध्ये बराच वेळ वाद आणि झटापट सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

या संपूर्ण प्रकारादरम्यान शाळेतील शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांकडून कोणताही तत्काळ हस्तक्षेप झाल्याचे फुटेजमध्ये दिसत नाही. मारहाण झालेल्या मुलाला घरी आणल्यानंतर त्याच्या चेहरा, नाक, ओठ आणि शरीरावर मारहाणीच्या स्पष्ट खुणा आढळून आल्या. शाळा प्रशासनाने सुरुवातीला समाधानकारक माहिती दिली नाही आणि सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यासही टाळाटाळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

या प्रकरणी निष्काळजीपणा आणि लहान मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल शाळेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पालक मयूर बोरसे यांनी दिली आहे.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • उद्योग मंत्री उदय सामंत आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत माहिती दिली की, नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात लवकरच अत्याधुनिक कृषीमाल विक्री केंद्र आणि शीतगृह (कोल्ड स्टोरेज) उभारले जाईल. आमदार पंकज भुजबळ यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडताना सांगितले की, नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व फळांचे उत्पादन होते. परंतु, स्थानिक पातळीवर अत्याधुनिक विक्री केंद्रांच्या अभावी शेतकऱ्यांना आपला कृषीमाल मुंबई व इतर दूरच्या बाजारपेठेत न्यावा लागतो, ज्यामुळे त्यांचा वाहतूक खर्च वाढतो. तसेच, शीतगृहाअभावी नाशवंत मालाचे मोठे नुकसान होते. शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांसाठी एकाच छताखाली हक्काची बाजारपेठ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, मंत्री महोदयांनी आश्वासन दिले की, या प्रकल्पासाठी नाशिक मनपा आयुक्तांकडून तातडीने सविस्तर प्रस्ताव मागवला जाईल आणि त्यासाठी विशेष निधी उपलब्ध केला जाईल. हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यासाठी संयुक्त बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    1
    उद्योग मंत्री उदय सामंत आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत माहिती दिली की, नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात लवकरच अत्याधुनिक कृषीमाल विक्री केंद्र आणि शीतगृह (कोल्ड स्टोरेज) उभारले जाईल.

आमदार पंकज भुजबळ यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडताना सांगितले की, नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला व फळांचे उत्पादन होते. परंतु, स्थानिक पातळीवर अत्याधुनिक विक्री केंद्रांच्या अभावी शेतकऱ्यांना आपला कृषीमाल मुंबई व इतर दूरच्या बाजारपेठेत न्यावा लागतो, ज्यामुळे त्यांचा वाहतूक खर्च वाढतो. तसेच, शीतगृहाअभावी नाशवंत मालाचे मोठे नुकसान होते. शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांसाठी एकाच छताखाली हक्काची बाजारपेठ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत, मंत्री महोदयांनी आश्वासन दिले की, या प्रकल्पासाठी नाशिक मनपा आयुक्तांकडून तातडीने सविस्तर प्रस्ताव मागवला जाईल आणि त्यासाठी विशेष निधी उपलब्ध केला जाईल. हा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्यासाठी संयुक्त बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.