लोकसहभागातून गाव समृद्धीकडे! बोरखेडीत 'माझी शाळा' उपक्रमाचा दिमाखदार सोहळा! विद्यार्थ्यांना डिजिटल शैक्षणिक साहित्य,गणवेश आणि क्रीडा साहित्याचे वितरण सेनगाव/विश्वनाथ देशमुख स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांनी आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाच्या संदेशाने प्रेरित होऊन सेनगाव तालुक्यातील बोरखेडी (जी) येथे एका अभूतपूर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जय भोले युवा परिवर्तन मित्र मंडळाच्या वतीने ‘लोकसहभागातून गाव समृद्धीकडे’ या संकल्पनेअंतर्गत ‘माझी शाळा’ हा स्तुत्य उपक्रम १५ सप्टेंबर मंगळवार रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. शाळा ही केवळ ज्ञानाचे मंदिर नसून उज्ज्वल भविष्य घडविण्याची कार्यशाळा आहे, हा विचार या उपक्रमातून गावकऱ्यांनी कृतीत आणून दाखवला.या गौरवपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.सुभाषराव हराळ पाटील होते,तर प्रमुख पाहुण्या म्हणून सेनगावच्या गटशिक्षणाधिकारी सौ.कविता गीते मॅडम उपस्थित होत्या. आधुनिक शिक्षणाची आणि क्रीडागुणांची सांगड विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि त्यांच्यातील क्रीडागुणांचा विकास व्हावा,या उदात्त हेतूने कपडशिंगी केंद्रातील विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षकवृंद आणि गावातील नागरिकांच्या उत्स्फूर्त लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बोरखेडी (जी) येथील विद्यार्थ्यांना डिजिटल शैक्षणिक साहित्य,शालेय गणवेश आणि क्रीडा साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.डिजिटल साहित्यामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे.'माझी शाळा, माझी जबाबदारी' या उपक्रमाच्या माध्यमातून समाजमनात ‘माझी शाळा,माझी जबाबदारी’ हा मोलाचा संदेश रुजवण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हेच सर्वोत्तम माध्यम असून, त्यासाठी गावकऱ्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाचे सामर्थ्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल,असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.थय भोले युवा परिवर्तन मित्र मंडळ बोरखेडी (जी) यांनी राबविलेल्या या सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे आणि गावकऱ्यांच्या कौतुकास्पद पुढाकाराचे सर्व स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे. लोकसहभागातून गाव समृद्धीकडे नेणाऱ्या या ऐतिहासिक पावलाला संपूर्ण जिल्ह्यातून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
लोकसहभागातून गाव समृद्धीकडे! बोरखेडीत 'माझी शाळा' उपक्रमाचा दिमाखदार सोहळा! विद्यार्थ्यांना डिजिटल शैक्षणिक साहित्य,गणवेश आणि क्रीडा साहित्याचे वितरण सेनगाव/विश्वनाथ देशमुख स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी विचारांनी आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनाच्या संदेशाने प्रेरित होऊन सेनगाव तालुक्यातील बोरखेडी (जी) येथे एका अभूतपूर्व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जय भोले युवा परिवर्तन मित्र मंडळाच्या वतीने ‘लोकसहभागातून गाव समृद्धीकडे’ या संकल्पनेअंतर्गत ‘माझी शाळा’ हा स्तुत्य उपक्रम १५ सप्टेंबर मंगळवार रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. शाळा ही केवळ ज्ञानाचे मंदिर नसून उज्ज्वल भविष्य घडविण्याची कार्यशाळा आहे, हा विचार या उपक्रमातून गावकऱ्यांनी कृतीत आणून दाखवला.या गौरवपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.सुभाषराव हराळ पाटील होते,तर प्रमुख पाहुण्या म्हणून सेनगावच्या गटशिक्षणाधिकारी सौ.कविता गीते मॅडम उपस्थित होत्या. आधुनिक शिक्षणाची आणि क्रीडागुणांची सांगड विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि त्यांच्यातील क्रीडागुणांचा विकास व्हावा,या उदात्त हेतूने कपडशिंगी केंद्रातील विविध शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षकवृंद आणि गावातील नागरिकांच्या उत्स्फूर्त लोकसहभागातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बोरखेडी (जी) येथील विद्यार्थ्यांना डिजिटल शैक्षणिक साहित्य,शालेय गणवेश आणि क्रीडा साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.डिजिटल साहित्यामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक पद्धतीने शिक्षण घेता येणार आहे.'माझी शाळा, माझी जबाबदारी' या उपक्रमाच्या माध्यमातून समाजमनात ‘माझी शाळा,माझी जबाबदारी’ हा मोलाचा संदेश रुजवण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हेच सर्वोत्तम माध्यम असून, त्यासाठी गावकऱ्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागाचे सामर्थ्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल,असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.थय भोले युवा परिवर्तन मित्र मंडळ बोरखेडी (जी) यांनी राबविलेल्या या सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे आणि गावकऱ्यांच्या कौतुकास्पद पुढाकाराचे सर्व स्तरातून प्रचंड कौतुक होत आहे. लोकसहभागातून गाव समृद्धीकडे नेणाऱ्या या ऐतिहासिक पावलाला संपूर्ण जिल्ह्यातून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.
- आजेगाव येथे पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना सेनगाव तालुक्यातील आजेगाव या ठिकाणी पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून मागील चार वर्षापासून आजेगाव येथील रवी चौधरी हा विद्यार्थी दरवर्षी नैसर्गिक पद्धतीने पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करतो. रवी चौधरी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सदर वृक्ष गजानन गणेश मंडळाचा पर्यावरण पूरक देखावा बघण्यासाठी व पर्यावरण पूरक मूर्ती असलेल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. कराल झाडावर माया तर मिळेल घनदाट छाया,वृक्षवल्ली आम्हा सोयरे. करा संकल्प जलसंवर्धनाचा,मार्ग सुकर करा उद्याच्या भविष्याचा. अशा विविध प्रकारचे पर्यावरण रक्षणाचे संदेश गणेश मंडळाकडून देण्यात आले आहेत मागील चार वर्षापासून आजेगावात पर्यावरण पूरक गणेश मंडळाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे संदेश देण्यात येत आहेत तसेच सर्व नागरिकांनी पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन देखील रवी चौधरी यांनी केले. सेनगाव तालुक्यामध्ये पर्यावरण पूरक वृक्ष गजानन गणेश मंडळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विविध प्रकारचे वृक्ष लागवड करून आकर्षक देखावा गणपती जवळ करण्यात आला असून रवी चौधरी यांच्या या उत्कृष्ट स्तुत्य उपक्रमावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.1
- रिसोड तहसीलदार बनल्या रिल्स स्टर ... रोहित पवार.........1
- घरोघरी गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमण , गणेश उत्सव साजरा1
- मुलींच्या शिक्षणाचे ध्येय बाळगत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या 47 वर्षीय महिलेचा तहसिलदारांच्या हस्ते सत्कार मुलींच्या शिक्षणाचे ध्येय उराशी बाळगून साडी परिधान करून, अनवानी पायी चालत जाऊन आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी संघर्ष करत कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथील रमाबाई अशोक रणवीर या 47 वर्षीय महिलेने अंबाजोगाई येथेअमृत दौड़ मॅरेथॉन स्पर्धा जिंकून भल्या भल्या प्रशिक्षित मुलीना लाजवेल अशी मोलाची कामगिरी केली आहे.या पार्श्वभूमीवर कळमनुरीचे तहसीलदार यांनी सोमवारी रमाबाई च्या घरी भेट देऊन सत्कार करून अभिनंदन केले . रमाबाई रणवीर हया अत्यंत गरिब कुटुंबातील महिला आहे .मोलमजुरी करून ती आपली उपजीविका धकवत असते, तिला दोन मुलीच आहेत .याच मजुरीच्या पैशातून ती आपल्या दोन मुलींचे शिक्षण पूर्ण करीत आहे .2012 मध्येच नवऱ्याने साथ सोडली,तेव्हा पासून त्या एकट्या पडल्या आहेत . हालाखीची कठीण परिस्थिती असताना ही तिने आपल्या एका मुलीला नांदेडला शिक्षणाला, तर दुसऱ्या मुलीला अंबाजोगाई येथे एका अकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेण्याकरता ठेवले आहे .त्याच अकॅडमी मध्ये त्या स्वयंपाक करण्याचे काम करित होत्या .त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याकरता भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्त आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या कौशल्याने स्पर्धा जिंकली .या पार्श्वभूमीवर कळमनुरी तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी पोत्रा या ठिकाणी येऊन रमाबाई रणवीरचा सत्कार करून अभिनंदन केले आहे .त्यावेळी रमाबाईला घरकुल, शौचालय,या सह सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार कांबळे यांनी दिले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत अधिकारी शिवशंकर गुट्टे, पोलीस पाटील अनुराधा मारकोळे, रवी कांबळे,रघूनाथ पाटील, जिजाराम मुलगीर, श्रीकांत मुलगीर,वैभव मुलगीर, रघूनाथ गुहाडे, शामराव रायपुरे, गजानन राणगिरे, विक्रम रणवीर, सोपान रणवीर, डॉ. कैलास रणवीर ,शिवाजी मुलगीर, डॉ. मिलींद रणवीर यांच्या सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .1
- वाहेगावात विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप; शिक्षणासोबत वृक्षसंवर्धनाचा संदेश.. . . . . .1
- सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा रूट मार्च; शहरात चोख बंदोबस्त1
- जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे; शेतकरी वर्ग आक्रमक प्रस्तावित शक्ती पिठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी शेतकरी वर्ग आक्रमक झाले असल्याचे दिसून आले चोंडी येथे शेतकरी बांधवांनी तिव्र विरोध दर्शविला1