पापरी व खंडाळी परिसरातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार :- अमित ठाकरे मोहोळ :- पापरी व खंडाळी परिसरात वादळी वाऱ्याने व गारपिटीने शेतकऱ्यांच्या बागायती शेती व फळबागेचे नुकसानीची पाहणी करता मनसेचे अमित साहेब ठाकरे स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच त्यांच्या व्यथा समजून घेतल्या आणि मुख्यमंत्री दरबारी नक्कीच जाऊन याविषयी त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असा शब्द दिला. यावेळी पापरीतील शेतकरी बाबुराव भोसले, अजित भोसले, सतीश (आबा) भोसले, गणेश भोसले, सिद्धेश्वर लोंढे, रमेश टेकाळे, गणेश लोंढे, विशाल घागरे, तसेच खंडाळीतील शेतकरी पप्पू मुळे, शंकर श्रीखंडे, मुळे सर, बाळासाहेब मुळे व इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, विद्यार्थी सेना सरचिटणीस गजानन भाऊ काळे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, विनायक महेंद्रकर, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे-पाटील, मोहोळ तालुका कैलास बापू खडके, शाहूराजे देशमुख, विष्णुपंत गायकवाड, शशिकांत पाटील उपस्थित होते.
पापरी व खंडाळी परिसरातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार :- अमित ठाकरे मोहोळ :- पापरी व खंडाळी परिसरात वादळी वाऱ्याने व गारपिटीने शेतकऱ्यांच्या बागायती शेती व फळबागेचे नुकसानीची पाहणी करता मनसेचे अमित साहेब ठाकरे स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच त्यांच्या व्यथा समजून घेतल्या आणि मुख्यमंत्री दरबारी नक्कीच जाऊन याविषयी त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असा शब्द दिला. यावेळी पापरीतील शेतकरी बाबुराव भोसले, अजित भोसले, सतीश (आबा) भोसले, गणेश भोसले, सिद्धेश्वर लोंढे, रमेश टेकाळे, गणेश लोंढे, विशाल घागरे, तसेच खंडाळीतील शेतकरी पप्पू मुळे, शंकर श्रीखंडे, मुळे सर, बाळासाहेब मुळे व इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, विद्यार्थी सेना सरचिटणीस गजानन भाऊ काळे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, विनायक महेंद्रकर, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे-पाटील, मोहोळ तालुका कैलास बापू खडके, शाहूराजे देशमुख, विष्णुपंत गायकवाड, शशिकांत पाटील उपस्थित होते.
- सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- Post by कर्जत लाईव्ह1
- लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर, लातूर मनपा चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.1
- ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.1
- लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.1
- --- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ----- “रात्री पाणी देताना जीव धोक्यात” --- सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका या सारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली. ----- सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. --- डॉ.श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजने अंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण या सारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे. -----1
- Post by AapTak Hindi News Channel1