जिओच्या अनास्थेचा कळस ! बोडखा बुद्रुकमध्ये नेटवर्कचा बोजबारा जिओच्या अनास्थेचा कळस ! बोडखा बुद्रुकमध्ये नेटवर्कचा बोजबारा घनसावंगी तालुक्यातील बोडखा बुद्रुक परिसरात जिओ कंपनीच्या मनमानी कारभाराने कहर केला असून, येथील संतप्त ग्राहकांना अक्षरशः नेटवर्कसाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. खिशातून भरमसाठ पैसे मोजून 5G चे रिचार्ज मारल्यानंतरही प्रत्यक्षात 4G चे साधे नेटवर्क मिळत नसल्याने, जिओने ग्राहकांच्या विश्वासाला काळीमा फासला आहे. कॉलिंग खंडित होणे, इंटरनेट सतत गुल होणे आणि ऑनलाइन व्यवहारांचे तीन तेरा वाजत असल्याने बोडखावासीयांचा संयम आता सुटला आहे. आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ऑनलाइन शिक्षण, डिजिटल पेमेंटपासून ते अगदी गुगल पे, फोन पे आणि एआयच्या वापरापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी हायस्पीड इंटरनेटची गरज असते. मात्र, बोडखा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नेटवर्क गायब असल्यामुळे संपूर्ण जीवनच ठप्प झाले आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर सतत 'नेटवर्क एरर'चा संदेश झळकत असून, महत्त्वाच्या क्षणी साधे फोनही लागत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. अधिकारी करतात टोलवा-टोलवी ! 5G च्या नावाखाली ग्राहकांची सर्रास आर्थिक लूट या गंभीर समस्येबाबत जेव्हा संबंधित जिओच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्यांची बेजबाबदार अनेकदा फोन उचलले वृत्ती उघड होते. जात नाहीत; आणि जर चुकून फोन लागलाच, तर हे माझे काम नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला, अशी उद्धट उत्तरे देऊन जबाबदारी झटकली जात आहे. ग्राहकांच्या पैशांवर पोसलेल्या या मुजोर अधिकाऱ्यांच्या या वागणुकीमुळे नागरिकांचा पारा आणखीच चढला आहे. सिम पोर्ट करण्याचा सज्जड इशारा ! जिओचे सर्वाधिक ग्राहक या तालुक्यात असतानाही कंपनीकडून बोडखा परिसरातील नेटवर्क समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. आता ही अरेरावी खपवून घेतली जाणार नाही. कंपनीने तातडीने या भागात नेटवर्कची पाहणी करून 5G सेवा सुरळीत न केल्यास, बोडखा बुद्रुकमधील सर्व संतप्त ग्रामस्थ आमची दिशाभूल करणाऱ्या जिओ कंपनीचे सिमकार्ड तात्काळ दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट (Port) केल्याशिवाय राहणार नाहीत, असा आक्रमक इशारा देण्यात आला आहे.
जिओच्या अनास्थेचा कळस ! बोडखा बुद्रुकमध्ये नेटवर्कचा बोजबारा जिओच्या अनास्थेचा कळस ! बोडखा बुद्रुकमध्ये नेटवर्कचा बोजबारा घनसावंगी तालुक्यातील बोडखा बुद्रुक परिसरात जिओ कंपनीच्या मनमानी कारभाराने कहर केला असून, येथील संतप्त ग्राहकांना अक्षरशः नेटवर्कसाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. खिशातून भरमसाठ पैसे मोजून 5G चे रिचार्ज मारल्यानंतरही प्रत्यक्षात 4G चे साधे नेटवर्क मिळत नसल्याने, जिओने ग्राहकांच्या विश्वासाला काळीमा फासला आहे. कॉलिंग खंडित होणे, इंटरनेट सतत गुल होणे आणि ऑनलाइन व्यवहारांचे तीन तेरा वाजत असल्याने बोडखावासीयांचा संयम आता सुटला आहे. आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ऑनलाइन शिक्षण, डिजिटल पेमेंटपासून ते अगदी गुगल पे, फोन पे आणि एआयच्या वापरापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी हायस्पीड इंटरनेटची गरज असते. मात्र, बोडखा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नेटवर्क गायब असल्यामुळे संपूर्ण जीवनच ठप्प झाले आहे. मोबाईलच्या स्क्रीनवर सतत 'नेटवर्क एरर'चा संदेश झळकत असून, महत्त्वाच्या क्षणी साधे फोनही लागत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. अधिकारी करतात टोलवा-टोलवी ! 5G च्या नावाखाली ग्राहकांची सर्रास आर्थिक लूट या गंभीर समस्येबाबत जेव्हा संबंधित जिओच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्यांची बेजबाबदार अनेकदा फोन उचलले वृत्ती उघड होते. जात नाहीत; आणि जर चुकून फोन लागलाच, तर हे माझे काम नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला, अशी उद्धट उत्तरे देऊन जबाबदारी झटकली जात आहे. ग्राहकांच्या पैशांवर पोसलेल्या या मुजोर अधिकाऱ्यांच्या या वागणुकीमुळे नागरिकांचा पारा आणखीच चढला आहे. सिम पोर्ट करण्याचा सज्जड इशारा ! जिओचे सर्वाधिक ग्राहक या तालुक्यात असतानाही कंपनीकडून बोडखा परिसरातील नेटवर्क समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. आता ही अरेरावी खपवून घेतली जाणार नाही. कंपनीने तातडीने या भागात नेटवर्कची पाहणी करून 5G सेवा सुरळीत न केल्यास, बोडखा बुद्रुकमधील सर्व संतप्त ग्रामस्थ आमची दिशाभूल करणाऱ्या जिओ कंपनीचे सिमकार्ड तात्काळ दुसऱ्या नेटवर्कवर पोर्ट (Port) केल्याशिवाय राहणार नाहीत, असा आक्रमक इशारा देण्यात आला आहे.
- कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त*....... * कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त* -------------------------- -:बदनापूर पोलिसांची कारवाई बदनापूर शहरातील SBI बँकेतून दिनांक 04/09/2026 रोजी फिर्यादी - नामे विष्णु कुंडलीकराव कोल्हे रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना यांनी 10 लाख रुपये काढून आपल्या कारमध्ये घेऊन जात असताना त्यावर चोरट्यांनी पाळत ठेवून फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून धोपटेश्वर शिवरातील धोपटेश्वर ते देवगाव रोडवर आपली कार उभी करून शेतात जाऊन परत आले असता कारच्या मागील दरवाजाचे काच तुटलेले दिसले असता गाडीतील रक्कम दिसेनाशी झाली. त्यानंतर फिर्यादी विष्णु कुंडलीकराव कोल्हे वय 49 वर्ष रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना हे पोलिस स्टेशन बदनापूर येथे येऊन रिपोर्ट दिल्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन २ टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेज चेक केले तसेच तांत्रिक तपास केला असता एक मोटार सायकल वर दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून कारची काच फोडून पैसे चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे 1) गुंजी चालराजु जबराज 2) गुड्डेटी विनोत प्रभुदास दोन्ही रा. कपरला टिपा. ता. बिटरगुंटा जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, या आरोपीस अटक करणे कामी तपास पथक यांना आंध्र प्रदेश येथे रवाना करून आरोपी चा शोध घेतला असता मिळून आला नाही, परंतु त्याच्या राहत्या घरातून चोरीस गेलेले 6 लाख रुपये जप्त करण्यास तपास पथक यांना यश प्राप्त झाले आहे. बाकी आरोपी व उर्वरीत रक्कम यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. श्री. तेघबिर सिंह संधु साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. विक्रम साळी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना, मा. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, जालना यांचे मार्गदर्शनाखाली १) एम. टी. सुरवसे, पोलिस स्टेशन पोलीस ठाणे बदनापूर, २) पोउपनि एस. आर.कुकलारे, ३) पोहेकॉ/671 ए.एस.दासर, ४) पोको/227 भडंगे, ५) पोको/342 पी. के. गोलवाल, ६) पोको/1699 एस. जे. तडवी यांनी केली आहे.1
- बोरगाव सारवणीत राज्यमंत्री दर्जा प्राप्त मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांचा भव्य नागरी सत्कार | AQS NEWS इनामूल उलूम उर्दू हायस्कूलच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन; मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांची उपस्थिती | AQS NEWS1
- माजी मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड शहरात तरुणांच्या रोजगारासाठी पैठणी उद्योग सुरू करणार कापसे पैठणी कंपनीला भेट सिल्लोड सोयगाव मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी येवला येथील कापसे पैठणी उद्योग येथे भेट देत पैठणी उद्योगाची माहिती घेतली1
- चाँद के पास चमक रहा था एक बेहद तेज़ रोशनी वाला “तारा” लेकिन असली राज़ जानकर आप भी हैरान रह जाएंगे...1
- भोकरदन शहरात शहीद स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी मांडला ठराव माजी सैनिकांच्या मागणीला मिळाला न्याय भोकरदन इसरारखान पठाण भोकरदन नगर परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या मागणीला मान देऊन भोकरदन शहरात ‘शहीद स्मारक’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. हा महत्त्वपूर्ण ठराव नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी सभागृहात मांडला. सभेदरम्यान हातात ठरावाची प्रत घेऊन उभे राहत रणवीर सिंग देशमुख यांनी भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या देशाकरता जे जवान शहीद होतात... त्या शहिदांकरता आपल्या तालुक्यात कुठंही स्मारक नाही. नगरपालिकेच्या ठिकाणी पैसा आहे, तर तो आपल्या काळात आपण सर्वांनी हात वर करून हा ठराव मंजूर करावा. रणवीरसिंग देशमुख यांनी मांडलेल्या या ठरावाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांनी तत्काळ पाठिंबा दर्शवला. नगराध्यक्षा सौ. समरीन नाज बेग वसीम मिर्झा आणि उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जाधव यांनी ठरावाला संमती देत हा निर्णय एकमताने पारित केला. या ठरावाचे अनुमोदक म्हणून कदीर बापू यांचे नाव जाहीर करण्यात आले. ठराव मंजूर झाल्यानंतर बोलताना नगरसेवक रणवीर सिंग देशमुख म्हणाले, आज भोकरदन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन भोकरदन शहरात शहीद स्मारक व्हावे याकरिता या सभेत जागा मागणीचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा यांनी सर्व संमतीने ठराव मंजूर केला. अनुमोदक म्हणून कदीर बापू सह सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. सभेच्या व्हिडिओमध्ये दिसते की, नगरसेवक रणवीर सिंग देशमुख कागदपत्र हातात घेऊन ठरावाचे वाचन करत आहेत. सभागृहात नगरसेवक पांढऱ्या वेशात बसलेले असून, अधिकारी वर्ग समोर टेबलवर उपस्थित आहे. ठराव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी हात वर करून एकमताने संमती दर्शवली हा ठराव मंजूर झाल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून शहीद स्मारकासाठी योग्य जागेची निवड, आराखडा व निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भोकरदन तालुक्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास माजी सैनिक संघटना व नागरिकांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात आतापर्यंत शहीद जवानांसाठी स्वतंत्र स्मारक नसल्याची खंत अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी उचललेल्या या पावलामुळे शहीद कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान झाला असून, येणाऱ्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. स्मारकाच्या कामास लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती नगर परिषद सूत्रांनी दिली.1
- मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे यांची प्रतिक्रिया मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांची प्रतिक्रिया1
- श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन... श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन...1
- सिल्लोड वडोद चाथा येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद सिल्लोड तालुक्यातील वडोद साठा येथे विजेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदरील घटने प्रकरणे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे1