आटपाडी तालुक्यातील ओमशांती कॉलनी परिसरात राहत्या घराजवळील गोठ्यात बांधलेली खिलार गाय आणि मुन्हा जातीची म्हैस चोरट्याने पळवून नेली. आटपाडी गोठ्यातून गाय-म्हैस लंपास आटपाडी : तालुक्यातील ओमशांती कॉलनी परिसरात राहत्या घराजवळील गोठ्यात बांधलेली खिलार गाय आणि मुन्हा जातीची म्हैस चोरट्याने पळवून नेली. ही घटना ९ सप्टेंबरच्या रात्री ते १० सप्टेंबरच्या पहाटेदरम्यान घडली. यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत दादा महादेव सागर (वय ६०, रा. ओमशांती कॉलनी, आटपाडी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. ९ सप्टेंबररोजी रात्री दहाच्या सुमारास सागर यांनी आपली जनावरे गोठ्यात बांधली होती. १० सप्टेंबररोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ते गोठ्यात गेले असता जनावरे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्याने गोठ्यात प्रवेश करून ३० हजार रुपये किमतीची ३ वर्षे वयाची पांढऱ्या रंगाची खिलार गाय आणि ३० हजार रुपये किमतीची साडेतीन वर्षे वयाची काळ्या रंगाची मुऱ्हा जातीची म्हैस चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत
आटपाडी तालुक्यातील ओमशांती कॉलनी परिसरात राहत्या घराजवळील गोठ्यात बांधलेली खिलार गाय आणि मुन्हा जातीची म्हैस चोरट्याने पळवून नेली. आटपाडी गोठ्यातून गाय-म्हैस लंपास आटपाडी : तालुक्यातील ओमशांती कॉलनी परिसरात राहत्या घराजवळील गोठ्यात बांधलेली खिलार गाय आणि मुन्हा जातीची म्हैस चोरट्याने पळवून नेली. ही घटना ९ सप्टेंबरच्या रात्री ते १० सप्टेंबरच्या पहाटेदरम्यान घडली. यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत दादा महादेव सागर (वय ६०, रा. ओमशांती कॉलनी, आटपाडी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. ९ सप्टेंबररोजी रात्री दहाच्या सुमारास सागर यांनी आपली जनावरे गोठ्यात बांधली होती. १० सप्टेंबररोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ते गोठ्यात गेले असता जनावरे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्याने गोठ्यात प्रवेश करून ३० हजार रुपये किमतीची ३ वर्षे वयाची पांढऱ्या रंगाची खिलार गाय आणि ३० हजार रुपये किमतीची साडेतीन वर्षे वयाची काळ्या रंगाची मुऱ्हा जातीची म्हैस चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत
- दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी आमदार रोहित पाटील यांचे तासगावच्या गणरायाला साकडे दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी आमदार रोहित पाटील यांचे तासगावच्या गणरायाला साकडे अंजनी ते तासगाव पायी प्रवास; महिला व शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघावर यंदा दुष्काळाचे संकट येऊ नये, शेतकरी बांधवांना चांगला पाऊस मिळावा आणि शेती हिरवीगार व्हावी, यासाठी आमदार रोहित आर. आर. पाटील यांनी आज अंजनी ते तासगाव असा पायी प्रवास करत तासगावच्या गणरायाच्या चरणी साकडे घातले. या पायी प्रवासात मोठ्या संख्येने महिला, शेतकरी बांधव, युवक, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. महिला व शेतकरी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद या पायी प्रवासाला मिळाला. दुष्काळाचे संकट टळावे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला यंदा पावसाची साथ मिळावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तासगाव येथे गणरायाचे दर्शन घेऊन आमदार रोहित पाटील यांनी मतदारसंघातील शेतकरी बांधवांच्या वतीने चांगला पाऊस पडावा, पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे आणि दुष्काळाचे सावट दूर व्हावे, यासाठी प्रार्थना केली. यावेळी बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले, “आज शेतकरी मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. पावसाचे अनिश्चित वातावरण, पाण्याची कमतरता आणि शेतीसमोरील वाढते संकट पाहता शासनाने तातडीने शेतकऱ्यांसाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. शासनाने वेळीच ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्यास आम्ही तयार आहोत.” शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. या पायी प्रवासामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतची आस्था, श्रद्धा आणि संघर्षाची भूमिका एकाच वेळी अधोरेखित झाली.1
- पोसेवाडी येथील भगवान जाधव हे इको फ्रेंडली गणपती बनवण्यात मग्न खानापूर तालुक्यातील पोसेवाडी येथील भगवान जाधव लक्ष्मी नारायण पुरातन वस्तू संग्रहालयाचे मालक आहेत हे सध्या गणपती उत्सव काळात निसर्ग फाऊंडेशन माध्यमातून इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे काम चालू असून ह्या गणपतीला खानापूर घाट माथ्यावर बरेच मागणी आहे यामुळे दूषित वातावरण होणार नाही व भाविकांनी घरगुती मातीपासून बनवलेला गणपती आपल्या घरी विराजमान करावा असे आवाहन भगवान जाधव यांनी केले1
- गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.... जल्लोष साजरा करताय पण एकदा हा व्हिडिओ नक्की बघा!1
- Post by E city news network1
- उत्साह, आनंद, प्रसन्न वातावरणात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत..1
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलिसांचा शहरात रूट मोर्चा1
- निंबू विक्रेत्यापासून यशस्वी उद्योजक आणि समाजसेवकापर्यंत रवींद्र कांबळेंचा प्रेरणादायी प्रवास! संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उभे केले यश; शासकीय रुग्णालयातील रुग्णांना नियमित जेवणदान, गोरगरिबांना मदतीचा हात विशेष प्रतिनिधी : परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवता येते, हे रवींद्र कांबळे यांच्या जीवनप्रवासातून दिसून येते. निंबू विक्रीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून प्रेरणादायी ठरला आहे. संघर्षाच्या काळात आलेल्या अनेक अडचणींवर मात करत रवींद्र कांबळे यांनी व्यवसायात स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र, यश मिळाल्यानंतरही त्यांनी समाजाशी असलेली नाळ कायम जपली आहे. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ते दररोज अविरतपणे जेवणदान करतात. तसेच गरजू आणि गोरगरिबांना आपल्या परीने मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ संघर्षातून यशस्वी होण्याची कहाणी नसून, ‘स्वतःच्या प्रगतीसोबत समाजासाठीही काहीतरी करण्याची’ प्रेरणा देणारा आहे. रवींद्र कांबळे यांच्या याच संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित ही डॉक्युमेंट्री तयार करण्यात आली आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, यशाचा प्रवास आणि समाजसेवेची भावना जाणून घेण्यासाठी ही डॉक्युमेंट्री नक्की पाहा. 🎥 संपूर्ण प्रेरणादायी डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी YouTube व्हिडिओला भेट द्या. पोलीस फ्लॅश न्यूज | तपास 24 न्यूज1
- सुप्रिया ताई सुळे यांनी 2018 मध्ये अजीतदादा पवार यांच्या बरोबर मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतलेले तो व्हिडिओ सुप्रियाताई यांनी केला व्हायरल सुप्रिया ताई सुळे यांनी 2018 मध्ये अजीतदादा पवार यांच्या बरोबर मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतलेले तो व्हिडिओ सुप्रियाताई यांनी केला व्हायरल1