मराठा सेवक योगेश कदम यांच्यावर भ्याड हल्ला; दोषींवर तात्काळ कारवाईची समाजाची मागणी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात सामाजिक चळवळींमध्ये व मराठा आरक्षण लढ्यात कायम सक्रिय असणारे मराठा सेवक योगेश कदम यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी भ्याड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून समाजातील विविध स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. योगेश कदम हे मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असून आरक्षणाच्या लढ्यातही ते सक्रिय भूमिका बजावत आहेत. अशा व्यक्तीवर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नसून संपूर्ण समाजाच्या भावनांवर आघात असल्याची भावना व्यक्त होत आहे. या हल्ल्यामागे कोणताही व्यक्ती असो, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठा समाजासह सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी समाजाची तीव्र भावना आहे. दरम्यान, नांदेड पोलिसांना देखील या प्रकरणात जलद आणि निष्पक्ष तपास करून दोषींना न्यायालयासमोर उभे करण्याचे तगडे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेचा सर्व स्तरांतून जाहीर निषेध करण्यात येत असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.
मराठा सेवक योगेश कदम यांच्यावर भ्याड हल्ला; दोषींवर तात्काळ कारवाईची समाजाची मागणी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात सामाजिक चळवळींमध्ये व मराठा आरक्षण लढ्यात कायम सक्रिय असणारे मराठा सेवक योगेश कदम यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी भ्याड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून समाजातील विविध स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. योगेश कदम हे मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असून आरक्षणाच्या लढ्यातही ते सक्रिय भूमिका बजावत आहेत. अशा व्यक्तीवर झालेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नसून संपूर्ण समाजाच्या भावनांवर आघात असल्याची भावना व्यक्त होत आहे. या हल्ल्यामागे कोणताही व्यक्ती असो, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठा समाजासह सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी समाजाची तीव्र भावना आहे. दरम्यान, नांदेड पोलिसांना देखील या प्रकरणात जलद आणि निष्पक्ष तपास करून दोषींना न्यायालयासमोर उभे करण्याचे तगडे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेचा सर्व स्तरांतून जाहीर निषेध करण्यात येत असून, दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती यांच्या औचित्याने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड शहर शाखेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. नवीन कवठा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप5
- आकांक्षा गायकवाड यांच्या आई वडिलांचे साखळी उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड1
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष! हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली. #DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews1
- Post by Today One Live1
- Post by सारथी महाराष्ट्र न्यूज1
- Post by Mohsin ahmed khan1
- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- 🚩 जय श्रीराम! जय हनुमान! 🚩 हिमायतनगर-वाढोणा शहरात श्रीराम नवमी व हनुमान जन्मोत्सव निमित्त दि. १८ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पावन निमित्ताने मुन्नाभाऊ अनगुलवार यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भक्तिमय वातावरणात सहभागी व्हा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या! #JaiShriRam #HanumanJayanti #RamNavami #Himayatnagar #Wadhona Mahaprasad ReligiousEvent Maharashtra Trending1