Shuru
Apke Nagar Ki App…
कांद्याला बाजारात किंमत नाही; शेतकऱ्यांची भयानक आपबीती समोर कांद्याला बाजारात किंमत नाही; शेतकऱ्यांची भयानक आपबीती समोर कांदा विक्रीस आणल्यानंतर व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दर दिला जात असल्याने शेतकऱ्याचा संयम सुटला. “इतका खर्च करून शेती केली, पण शेवटी मालाला भावच नाही, मग हा माल ठेवून काय उपयोग?” असा संतप्त सवाल करत त्याने कांद्याचा ढीगच चिरडून टाकला. याबरोबरच अनेक शेतकऱ्यांचे हाल
पत्रकार ओमप्रकाश उढाण
कांद्याला बाजारात किंमत नाही; शेतकऱ्यांची भयानक आपबीती समोर कांद्याला बाजारात किंमत नाही; शेतकऱ्यांची भयानक आपबीती समोर कांदा विक्रीस आणल्यानंतर व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दर दिला जात असल्याने शेतकऱ्याचा संयम सुटला. “इतका खर्च करून शेती केली, पण शेवटी मालाला भावच नाही, मग हा माल ठेवून काय उपयोग?” असा संतप्त सवाल करत त्याने कांद्याचा ढीगच चिरडून टाकला. याबरोबरच अनेक शेतकऱ्यांचे हाल
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पोलीस कॉम्प्लेक्स जवळ दुकानाला भीषण आग; आगीमध्ये संपूर्ण साहित्य जळून खाक दुकान मालकाचे लाखोचे नुकसान.. दुकानाच्या आगीने जवळच असलेल्या विद्युत रोहीत्राला सुध्दा लागली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळवले आगीवर नियंत्रण1
- Post by राजश्री दत्तात्रय गवळी1
- *भुवन रेती घाटावर अवैध उपसा जोमात; ठेकेदार–महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताचा आरोप* (एकाच पावतीवर दिवसभर वाळू वाहतूक, कोऱ्या पावत्या आढळल्याने लाखो रुपयांच्या महसूल घोटाळ्याची शक्यता) मंठा तालुक्यातील भुवन येथील रेती घाटावर अवैध रेती उपसा जोमात सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. अधिकृत लिलावधारकाच्या ताब्यात घाट देण्यात आला असला तरी, महसूल कर्मचारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याची चर्चा आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, एकाच रॉयल्टी पावतीवर दिवसभर अनेक फेऱ्या मारल्या जात आहेत. दोन ब्रासच्या पावतीवर चार ब्रासची गाडी, तर चार ब्रासच्या पावतीवर सहा ब्रासपर्यंत वाळू भरली जात असल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक पावत्यांवर तारीख, वेळ आणि ब्रासची नोंदच नसून काही पावत्या कोऱ्या आढळल्या आहेत. या प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.1
- बदनापूर येथील कॅनरा बँकेत ७.३१ कोटींचा डल्ला; मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड जालना: जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळ्याची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, आता बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट सोने गहाण ठेवून आणि मूळ सोन्याची चोरी करून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे. नेमका प्रकार काय? बदनापूर येथील कॅनरा बँकेत दागिन्यांच्या बदल्यात कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरव्यवहार झाला. बँकेच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन (Quarterly Re-evaluation) प्रक्रियेदरम्यान दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि त्यांच्या जागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. असा फुटला घोटाळ्याला वाचा: बँकेच्या धोरणानुसार नियमित तपासणी सुरू होती. तपासणीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आणि काही ठिकाणी बनावट सोने असल्याचे आढळले. बँकेचे अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला 'खरे सोने' असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यास मदत केली. पोलिसांची कारवाई: या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत: बँक मॅनेजर: पोलिसांच्या ताब्यात. सुवर्णकार (प्रवीण बुऱ्हाडे): पोलिसांच्या ताब्यात. एक अधिकारी: अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. "बनावट सोने ठेवून आणि पदाचा गैरवापर करून बँकेचा विश्वासघात करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे." — मच्छिंद्र सुरवसे (पोलीस निरीक्षक, बदनापूर पोलीस ठाणे) 1
- Post by Ramesh Mulgir1
- फटाफट खबरें: 2 मिनट में 20 बड़ी खबरें | 26 अप्रैल 2026 | आज की ताजा खबरें | बीड न्यूज़ आपतक1
- कांद्याला भाव नाही; संतप्त शेतकऱ्याने कांद्यावरच पिकअप फिरवले! शेतकऱ्याच्या घामाची किंमत शून्य; बाजार समितीत संतापाचा स्फोट छत्रपती संभाजीनगर : शेती म्हणजे जुगारच बनली आहे, अशी परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. लासूर बाजार समिती येथे कांद्याला अत्यंत कमी दर मिळाल्याने संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या कांद्यावरच पिकअप वाहन चालवून तो पूर्णतः नष्ट केला. शेतकऱ्याच्या या कृतीमागे केवळ राग नव्हता, तर अनेक दिवसांचा साचलेला संताप होता. शेती पिकवण्यासाठी खत, बियाणे, कीटकनाशके यांचे वाढलेले प्रचंड दर, त्यात वाढती महागाई आणि दिवस-रात्र केलेली मेहनत—या सर्वांचा शेवटी काहीच मोबदला मिळत नसल्याची वेदना या घटनेतून स्पष्ट दिसून आली.1
- पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆1
- भोकरदन नगरपरिषदेचा निर्दयी कारभार! १५ वर्षांपासून 'वनवास', रस्ता झाला, पाईपलाईन आली, पण पाणी मिळेना भोकरदन: एकीकडे देश डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारत असताना, जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातून प्रशासकीय अनास्थेचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील कन्या शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या नागरिकांना गेल्या १५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. रस्ते झाले, पाईपलाईनही टाकली गेली, पण नळाला पाणी मात्र आलेच नाही. अखेर या 'तहानलेल्या' वस्तीतील महिलांचा संयम सुटला असून, नगरपरिषदेच्या ढिम्म कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाईपलाईन असूनही पाणी का नाही? मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात नागरी सुविधांच्या नावाखाली कागदावर घोडे नाचवले जात आहेत. रस्ता आणि पाईपलाईनची कामे पूर्ण झाली असली, तरी केवळ नगरपरिषदेच्या नियोजित दुर्लक्षामुळे या पाईपलाईनमध्ये पाणी सोडले जात नाहीये. परिणामी, इथल्या कष्टकरी नागरिकांना गेल्या दीड दशकापासून दररोज पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. महागाईच्या काळात पाण्यासाठी खिशातून पैसे मोजताना सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. प्रशासन निर्दयी, नगरसेवक 'कुंभकर्ण' झोपेत? या भागातील महिलांनी पाण्यासाठी आजवर अनेकवेळा नगरपरिषदेवर 'हंडा मोर्चा' काढला. प्रशासनाच्या दारात रिकामे हंडे वाजवून आपला रोष व्यक्त केला. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासनापलीकडे नागरिकांच्या हाती काहीही लागले नाही. यावरून भोकरदन नगरपरिषदेचे प्रशासन किती 'निर्दयी' झाले आहे, याची प्रचिती येते. विशेष म्हणजे, ज्यांच्यावर प्रभागाच्या विकासाची जबाबदारी आहे, ते नगरसेवक जणू कुंभकर्णाच्या झोपेत असल्याची टीका आता स्थानिक नागरिक उघडपणे करत आहेत. "आम्ही पंधरा वर्षे झाली पाणी विकत घेतोय. निवडून येण्यापूर्वी हात जोडणारे लोकप्रतिनिधी आता आमचा आवाज ऐकायला तयार नाहीत. नगरपरिषदेला आमच्या हालअपेष्टांचे काहीच देणेघेणे उरले नाहीये का?" — संतप्त महिला रहिवासी नागरिकांचा इशारा जर येत्या काही दिवसांत या परिसरात नियमित पाणीपुरवठा सुरू झाला नाही, तर केवळ मोर्चावर न थांबता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा महिलांनी दिला आहे. आता तरी या कुंभकर्ण झोपेत असलेल्या प्रशासनाला जाग येणार की नागरिक पुन्हा तहानेने व्याकुळ राहणार, हाच मोठा प्रश्न आहे.1