काहीसत्ताधारी नेते अवैध धंद्यात रस घेत असल्यामुळे कार्यकर्ते मुजोर होऊन दहशतवाद माजवित असल्याचे चित्र! "सैंया बने कोतवाल, अब डर काहे का? *महागाव तालुक्यातील गुंज मध्ये उमरखेडच्या भाऊच्या आशीर्वादाने आतंक फैलवून मटका जुगार अवैध धंद्याचे थैमान घालणारा हा सुरेश कोण? आणि त्याच्या ह्या अवैध धंद्याला व आतंकवादाला आश्रय देणारा उमरखेडचा सत्ताधारी राजकीय भाऊ कोण? हा प्रश्न एका वृत्तपत्राच्या बातमी मुळे उपस्थित झाला आहे कारण उमरखेड मध्ये राजकीय अनेक भाऊ आहेत त्यामुळे जनता संभ्रमात आहे महागाव तालुक्यातील गुंज मध्ये सुरेश नावाचा उमरखेड चा भाऊंचा कार्यकर्ता अवैध धंदे करून आतंक फैलावीत असेल तर महागाव तालुक्याची पोलीस काय करीत आहे? कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड काय करीत आहेत?जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक व त्यांची पोलीस गप्प का आहे? सुरेशला साथ देणारा त्या भाऊचा एवढा दरारा ह्या पोलिसावर आहे का? विरोधी राजकीय पक्षाचे नेते हे सर्व सहन का करीत आहेत? महागाव उमरखेड मध्ये रेती माफियांचा उन्माद चालू असताना त्यालाही सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या काही राजकीय नेत्यांचा आश्रय मिळत असल्यामुळे महसूल विभागाचे तहसीलदार उपविभागीय अधिकारी गप्प आहेत रेती माफियाना साथ देणारेसंबंधित काही कर्मचारी महसूल विभाग चालवीत असल्याचे उघड बोलले जात आहे काही स्थानिक होम तहसीलच्या कर्मचाऱ्यांना तर महागाव वरून स्पेशल डेपयु टेशन वर उमरखेडला आणण्यात आल्याचे उघड बोलल्या जात आहे एकच रॉयल्टी पासवर रेतीच्या दहा ट्रिपामारल्या जात असल्याच्या बातम्या गाजत असताना महसूल विभाग व पोलीस विभाग गप्प का आहे? कारण काय तर काही राजकीय नेते देखील या रेतीच्या धंद्यात उघड असून आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी घाट वाटून दिल्याचेही बोलल्या जात आहे रेतीचा हा "महासागर"खुलेआम अवैध रेती विक्री करून "गोपाला गोपाला"म्हणून सत्ताधारीचे नेत्यांच्या आशीर्वादाने संपवल्या जात आहे यावर महसूल विभाग व पोलीस विभाग अंकुश केव्हा ठेवणार? आता काय सर्व जनतेनेच बंद कराव का? काही दिवस बंद झालेले मटके जुगार क्लब पुन्हा चालू होणार असल्याचेही समजते मग बंद कशासाठी केले होते? वाढीव हप्त्यासाठी की आणखी काही? एकूणच पोलीस फक्त कमाईच्या मागे आहेत की काय? हा प्रश्न जनता पोलिसांना व जिल्हा प्रशासनाला विचारीत आहे त्याचे उत्तर उपविभागीय पोलीस अधिकारी ठाणेदार व उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार तर देणार नाहीत कारण त्यांच्या डोळ्यासमोर हे सर्व होत आहे पण याचे जाहीर उत्तर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विकास मीना व पोलीस अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ जिल्ह्याच्या व उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला देतील का? प्लॉटिंगच्या लेआउटच्या धंद्यात देखील बऱ्याच प्रमाणात अवैध प्रकार चालू असून नियमांना व कायद्यांना बगल देऊन हे लेआउटचे धंदे केले जात आहेत नगर परिषदेचे टॅक्स न भरता ही नगरपालिकेकडून काही राजकीय नेत्यांच्या मंजूर नसलेल्या ले-आउटला शासनाच्या निधीतून विकास करून दिल्या जात आहे बांधकामाच्या प्रकरणाची मागितलेली माहिती चार चार महिने दिल्या जात नाही दिलीच तर थातूरमातूर दिल्या जात आहे काही कर्मचारी अधिकाऱ्यावर देखील भारी आहेत काहीनेत्यांचे ऐकून कारभार करीत असल्याचेही बोलले जात आहे मुख्याधिकारी मात्र बघायची भूमिका वठवत आहेत ह्या सगळ्या गलथान कारभाराला कंटाळून जनतेने सत्ता परिवर्तन केले लेकिन अफसोस परिवर्तनाची सुरुवात देखील झाली नाही उलट नगराध्यक्षाचा कारभार स्वीकृत सदस्य पाहत आहेत भाजपाच्या सत्तेतही स्वीकृत नगरसेवक नगरपालिकेचा कारभार पाहत होते त्यावर अनेकदा ओरडणारे विद्यमान सत्ताधारी जनशक्ती पॅनलच्या सत्तेतील स्वीकृत सदस्य प्रत्यक्षात कारभार पाहत आहेत तर नगरसेवकांचे नातेवाईक नगरपालिकेत सतत चकरा मारून आपणच नगरसेवक असल्यागत प्रत्येक विभागात फिरत असल्याची चित्र सत्ता परिवर्तनाच्या ढिसाळ कारभारात दिसत आहे नगरसेवकांच्या नातेवाईकाने कारभारात ढवळाढवळ करू नये या शासनाच्या जीआर ला अर्थ काय? सीईओ गप्प का? नगरसेवकांच्या नातेवाईकाला लुडबुड करण्यापासून थांबवल्या का जात नाही?
काहीसत्ताधारी नेते अवैध धंद्यात रस घेत असल्यामुळे कार्यकर्ते मुजोर होऊन दहशतवाद माजवित असल्याचे चित्र! "सैंया बने कोतवाल, अब डर काहे का? *महागाव तालुक्यातील गुंज मध्ये उमरखेडच्या भाऊच्या आशीर्वादाने आतंक फैलवून मटका जुगार अवैध धंद्याचे थैमान घालणारा हा सुरेश कोण? आणि त्याच्या ह्या अवैध धंद्याला व आतंकवादाला आश्रय देणारा उमरखेडचा सत्ताधारी राजकीय भाऊ कोण? हा प्रश्न एका वृत्तपत्राच्या बातमी मुळे उपस्थित झाला आहे कारण उमरखेड मध्ये राजकीय अनेक भाऊ आहेत त्यामुळे जनता संभ्रमात आहे महागाव तालुक्यातील गुंज मध्ये सुरेश नावाचा उमरखेड चा भाऊंचा कार्यकर्ता अवैध धंदे करून आतंक फैलावीत असेल तर महागाव तालुक्याची पोलीस काय करीत आहे? कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड काय करीत आहेत?जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक व त्यांची पोलीस गप्प का आहे? सुरेशला साथ देणारा त्या भाऊचा एवढा दरारा ह्या पोलिसावर आहे का? विरोधी राजकीय पक्षाचे नेते हे सर्व सहन का करीत आहेत? महागाव उमरखेड मध्ये रेती माफियांचा उन्माद चालू असताना त्यालाही सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या काही राजकीय नेत्यांचा आश्रय मिळत असल्यामुळे महसूल विभागाचे तहसीलदार उपविभागीय अधिकारी गप्प आहेत रेती माफियाना साथ देणारेसंबंधित काही कर्मचारी महसूल विभाग चालवीत असल्याचे उघड बोलले जात आहे काही स्थानिक होम तहसीलच्या कर्मचाऱ्यांना तर महागाव वरून स्पेशल डेपयु टेशन वर उमरखेडला आणण्यात आल्याचे उघड बोलल्या जात आहे एकच रॉयल्टी पासवर रेतीच्या दहा ट्रिपामारल्या जात असल्याच्या बातम्या गाजत असताना महसूल विभाग व पोलीस विभाग गप्प का आहे? कारण काय तर काही राजकीय नेते देखील या रेतीच्या धंद्यात उघड असून आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी घाट वाटून दिल्याचेही बोलल्या जात आहे रेतीचा हा "महासागर"खुलेआम अवैध रेती विक्री करून "गोपाला गोपाला"म्हणून सत्ताधारीचे नेत्यांच्या आशीर्वादाने संपवल्या जात आहे यावर महसूल विभाग व पोलीस विभाग अंकुश केव्हा ठेवणार? आता काय सर्व जनतेनेच बंद कराव का? काही दिवस बंद झालेले मटके जुगार क्लब पुन्हा चालू होणार असल्याचेही समजते मग बंद कशासाठी केले होते? वाढीव हप्त्यासाठी की आणखी काही? एकूणच पोलीस फक्त कमाईच्या मागे आहेत की काय? हा प्रश्न जनता पोलिसांना व जिल्हा प्रशासनाला विचारीत आहे त्याचे उत्तर उपविभागीय पोलीस अधिकारी ठाणेदार व उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार तर देणार नाहीत कारण त्यांच्या डोळ्यासमोर हे सर्व होत आहे पण याचे जाहीर उत्तर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विकास मीना व पोलीस अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ जिल्ह्याच्या व उमरखेड विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला देतील का? प्लॉटिंगच्या लेआउटच्या धंद्यात देखील बऱ्याच प्रमाणात अवैध प्रकार चालू असून नियमांना व कायद्यांना बगल देऊन हे लेआउटचे धंदे केले जात आहेत नगर परिषदेचे टॅक्स न भरता ही नगरपालिकेकडून काही राजकीय नेत्यांच्या मंजूर नसलेल्या ले-आउटला शासनाच्या निधीतून विकास करून दिल्या जात आहे बांधकामाच्या प्रकरणाची मागितलेली माहिती चार चार महिने दिल्या जात नाही दिलीच तर थातूरमातूर दिल्या जात आहे काही कर्मचारी अधिकाऱ्यावर देखील भारी आहेत काहीनेत्यांचे ऐकून कारभार करीत असल्याचेही बोलले जात आहे मुख्याधिकारी मात्र बघायची भूमिका वठवत आहेत ह्या सगळ्या गलथान कारभाराला कंटाळून जनतेने सत्ता परिवर्तन केले लेकिन अफसोस परिवर्तनाची सुरुवात देखील झाली नाही उलट नगराध्यक्षाचा कारभार स्वीकृत सदस्य पाहत आहेत भाजपाच्या सत्तेतही स्वीकृत नगरसेवक नगरपालिकेचा कारभार पाहत होते त्यावर अनेकदा ओरडणारे विद्यमान सत्ताधारी जनशक्ती पॅनलच्या सत्तेतील स्वीकृत सदस्य प्रत्यक्षात कारभार पाहत आहेत तर नगरसेवकांचे नातेवाईक नगरपालिकेत सतत चकरा मारून आपणच नगरसेवक असल्यागत प्रत्येक विभागात फिरत असल्याची चित्र सत्ता परिवर्तनाच्या ढिसाळ कारभारात दिसत आहे नगरसेवकांच्या नातेवाईकाने कारभारात ढवळाढवळ करू नये या शासनाच्या जीआर ला अर्थ काय? सीईओ गप्प का? नगरसेवकांच्या नातेवाईकाला लुडबुड करण्यापासून थांबवल्या का जात नाही?
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- रस्त्याच्या मधोमध विद्युत खांब; हिमायतनगरमध्ये अपघाताचा धोका! हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या मुख्य रस्त्यावर मधोमध उभे असलेले विद्युत खांब नागरिकांच्या जीवाला धोका ठरत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण विभागाकडून अद्याप ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने खांब न हटवता काम पूर्ण केल्याने सध्या वाहनांची ये-जा अडचणीत आली आहे. अनेक अपघात घडून काहींना गंभीर दुखापत व अपंगत्वही आले असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी यापूर्वी उपोषण केल्यानंतर खांब हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दीड महिना उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणारी ही समस्या सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Nanded #RoadSafety #Mahavitaran #PublicIssue BreakingNews MaharashtraNews TrafficProblem1
- हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. २०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी न्यायापासून वंचित निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक १७ एप्रिल नांदेड: शहरातील जलाराम मंदिर, दिलीप सिंग कॉलनी परिसरात अचानक विद्युत वाहक तार तुटल्याची घटना घडली. भरवस्तीत तार तुटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक तुलजाराम यादव यांच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला आहे. दिलीप सिंग कॉलनी भागात विद्युत तार तुटल्याची तक्रार स्थानिकांनी नगरसेवक तुलजाराम यादव यांच्याकडे केली होती. तक्रारीचे गांभीर्य ओळखून यादव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना पाचारण केले. नगरसेवक यादव स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून दुरुस्तीचे काम पूर्ण करून घेतले. विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने आणि धोका टळल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून नगरसेवकांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by Today One Live1
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीने वेधले लक्ष! हिमायतनगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभाग नोंदवला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भगव्या झेंड्यांनी सजलेली ही मिरवणूक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मिरवणूक उत्साहात पार पडली. #DrBabasahebAmbedkarJayanti #जयभीम #Himayatnagar #AmbedkarJayanti #BhimJayanti SocialUnity Maharashtra NewsUpdate Trending ViralNews1
- Post by Nandkumar Motiram Totewad1