राष्ट्रीय लोक अदालतीत 1669 प्रकरणाचा आपसी तडजोडीने निपटारा कौटूंबिक हिंसाचाराच्या 5 प्रकरणांचा लोक अदालतीद्वारे निपटारा प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य 3 कोटी 59 लाख राष्ट्रीय लोक अदालतीत 1669 प्रकरणाचा आपसी तडजोडीने निपटारा कौटूंबिक हिंसाचाराच्या 5 प्रकरणांचा लोक अदालतीद्वारे निपटारा प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य 3 कोटी 59 लाख वर्धा, दि.16 (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा समिती व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा न्यायिक जिल्ह्यामध्ये 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये 1 हजार 669 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली असून तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य 3 कोटी 59 लाख 95 हजार 305 इतके आहे. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपापली बाजु मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. तसेच यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होते. मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोक अदालतमुळे पक्षकारांना मिळते, असे विचार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी विशेष लोक अदालत प्रसंगी व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संजीव सरदार यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यामागील भुमिका याप्रसंगी व्यक्त केली. विशेष लोक अदालतीमध्ये निकाली निघणाऱ्या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. कारण दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असतो. त्यामुळे 'वादापेक्षा समझोता बरा' या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद सामोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावे, असे आवाहन त्यांनी केले. विशेष लोक अदालतीमध्ये जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हातील अधिवक्ता आणि पक्षकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या राष्ट्रीय लोकअदातीत न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरणांपैकी 1 हजार 373 इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. सदरहू तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य 1 कोटी 61 लाख 17 हजार 556 इतके होते. तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणापैकी 296 इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. वाद दाखल पुर्व प्रकरणांमधील तडजोडीचे मुल्य 1 कोटी 98 लाख 77 हजार 749 इतके आहे. या लोकअदालतीची विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या कौटूंबिक हिंसाचाराच्या 5 प्रकरणामध्ये पती पत्नी मध्ये असलेले वाद या लोक अदालतीद्वारे निपटारा करण्यात यश प्राप्त झाले व त्यांनी हसत खेळत आपले संसार करण्याचे ठरविले. असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने कळविण्यात आले आहे. 00000
राष्ट्रीय लोक अदालतीत 1669 प्रकरणाचा आपसी तडजोडीने निपटारा कौटूंबिक हिंसाचाराच्या 5 प्रकरणांचा लोक अदालतीद्वारे निपटारा प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य 3 कोटी 59 लाख राष्ट्रीय लोक अदालतीत 1669 प्रकरणाचा आपसी तडजोडीने निपटारा कौटूंबिक हिंसाचाराच्या 5 प्रकरणांचा लोक अदालतीद्वारे निपटारा प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य 3 कोटी 59 लाख वर्धा, दि.16 (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा समिती व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा न्यायिक जिल्ह्यामध्ये 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये 1 हजार 669 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली असून तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य 3 कोटी 59 लाख 95 हजार 305 इतके आहे. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपापली बाजु मांडण्याची संधी मिळते तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. तसेच यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशाची बचत होते. मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोक अदालतमुळे पक्षकारांना मिळते, असे विचार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी विशेष लोक अदालत प्रसंगी व्यक्त केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव संजीव सरदार यांनी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यामागील भुमिका याप्रसंगी व्यक्त केली. विशेष लोक अदालतीमध्ये निकाली निघणाऱ्या प्रकरणांमुळे पक्षकारांना समाधान लाभते. कारण दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणामध्ये समझोता होत असतो. त्यामुळे 'वादापेक्षा समझोता बरा' या विचारानुसार पक्षकारांनी आपसातील वाद सामोपचाराने लोक अदालतीमध्ये मिटवावे, असे आवाहन त्यांनी केले. विशेष लोक अदालतीमध्ये जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष, जिल्हातील अधिवक्ता आणि पक्षकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या राष्ट्रीय लोकअदातीत न्यायालयामध्ये प्रलंबित प्रकरणांपैकी 1 हजार 373 इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. सदरहू तडजोड झालेल्या प्रकरणांमधील तडजोडीच्या रक्कमेचे मुल्य 1 कोटी 61 लाख 17 हजार 556 इतके होते. तसेच वाद दाखल पुर्व प्रकरणापैकी 296 इतकी प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली. वाद दाखल पुर्व प्रकरणांमधील तडजोडीचे मुल्य 1 कोटी 98 लाख 77 हजार 749 इतके आहे. या लोकअदालतीची विशेष बाब म्हणजे जिल्ह्यातील न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या कौटूंबिक हिंसाचाराच्या 5 प्रकरणामध्ये पती पत्नी मध्ये असलेले वाद या लोक अदालतीद्वारे निपटारा करण्यात यश प्राप्त झाले व त्यांनी हसत खेळत आपले संसार करण्याचे ठरविले. असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने कळविण्यात आले आहे. 00000
- जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे : जुना धामणगांव येथील दलित वस्तीच्या मुख्य मार्गावरील नालीची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नालीमध्ये पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर नालीतील घाण पाणी, गाळ व कचरा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, नालीचे घाण पाणी व गाळ रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नाली व परिसरात पाणी व कचरा साचत असल्याने साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, नालीची योग्य साफसफाई, दुरुस्ती व पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता नालीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती आणि पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- ईतवारा बाजार में अतिक्रमण है2
- वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर मध्ये गोवंशतकरीचा पडदाफाश ठाणेदार संगीता हिलोंडे यांच्या धडक कारवाई ने तस्करांचे धाबे दणाणले *ब्रेकिंग न्यूज - वर्धा* *वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूरमध्ये गोवंश तस्करीचा पर्दाफाश; ठाणेदार संगीता हेलोंडे यांच्या धडक कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले* गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध जनावर वाहतुकीला आळा; पहाटेच्या सुमारास सापळा रचून वाहन जप्त वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या जनावरांच्या अवैध तस्करीला अखेर आळा बसला आहे. याबाबत बजरंग दलाच्यावतीने अनेकदा तक्रारी केल्या होत्या तसेच वृत्तपत्रांमध्ये देखील या बाबत बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या गंभीर बाबीची दखल घेत अखेर आज पहाटे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीला 2 वाजेच्या सुमारास अल्लीपूर मार्गावरून जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार संगीता हेलोंडे यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपली टीम तयार केली आणि अल्लीपूर जवळ सोनेगाव स्टेश सापळा रचला. बुलेरो मालवाहतूक गाडी MH 30 आरडी 63 व पाहणी करण्याकरता एक कार MH 5925 अंधाराचा फायदा घेत येणाऱ्या संशयित वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या वाहनाला चारही बाजूंनी घेरून पकडण्यात यश आले. माल वाहतूक बुलेरो गाडीमध्ये एकूण नऊ जनावरे कत्तलीसाठी नेत होते त्या जनावरांमध्ये दोन गाय कालवड गोरे तीन कालवड चार एकूण नऊ जनावर वाहनात निर्दयतेने कोंबून जनावरे वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ वाहन जप्त करून त्यातील जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत दोन्ही गाडीमध्ये असलेले एकूण चार आरोपी फरार आल्याची प्राथमिक माहिती आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संगीत हेलोंडे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक वर्षात तांदूळकर जमादार अजय रिठे पोलीस शिपाई अजय वानखेडे पंकज कापसे पोलीस शिपाई दिनेश खराबे यांनी केली आहे . जप्त केलेले वाहन पोलीस स्टेशनला लावले आहे व नऊ जनावरे वर्धा येथील करुणा आश्रम मध्ये सोडण्यात आली आहे या धडक कारवाईमुळे अल्लीपूर परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गावकऱ्यांनी ठाणेदार संगीता हेलोंडे व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे गेल्या अनेक दिवसांपासून अल्लीपूर परिसरातून अवैध जनावर वाहतूक होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. आज पहाटे आम्ही केलेल्या कारवाईत वाहन पकडले असून पुढील तपास सुरू आहे. अशा अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी यावेळी सांगितले. सदर कारवाई या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.1
- दहिसर ठाकुरपाड़ा की स्थिति बदहाल! जनप्रतिनिधि क्यों नहीं दे रहे ध्यान? नागरिकों ने बताई अपनी आपबीती Rok Tok Hindustan news imran shaikh [14/09, 15:47] Imran Shaikh: दहिसर ठाकुरपाड़ा इलाके में नागरिकों ने खराब व्यवस्था और स्थानीय समस्याओं को लेकर अपनी आपबीती साझा की। लोगों का सवाल है कि आखिर जनप्रतिनिधि इन समस्याओं पर ध्यान क्यों नहीं दे रहे हैं? नागरिकों ने प्रशासन और जनप्रतिनिधियों से जल्द से जल्द समस्याओं का संज्ञान लेकर उचित कार्रवाई की मांग की है। अब देखना होगा कि जिम्मेदार प्रशासन और जनप्रतिनिधि इस मामले में कब तक कदम उठाते हैं। [14/09, 15:47] Imran Shaikh: #RokTokHindustanNews #Dahisar #ThakurPada #MumbaiNews #CitizenVoice #जनताकीआवाज #LocalNews #CivicIssues #मुंबई1
- जि. प. उच्च प्रा शा भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग पवनी: जि प प्रा शा भोजापूर येथे तब्बल १६० रोपांची परसबाग तयार करण्यात आली मु अ पडवाल सर व राहुल पाटील सर यांच्या परिश्रमाने व वर्ग ४ थी च्या सहकार्याने परसबाग फुलली आहे.1
- तडीपार आरोपीच्या हातात तलवार;गुन्हे शाखेची धडक कारवाई,गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारीसह आरोपीला घेतले ताब्यात1
- कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी परिसरातील विहिरीत आढळल्या मृतदेह1
- जबरी चोरी करणाऱ्या दोन अज्ञातांना अवघ्या काही तासांत बेड्या,नांदगाव पेठ पोलिसांची धडक कारवाई 1