Shuru
Apke Nagar Ki App…
जबरी चोरी करणाऱ्या दोन अज्ञातांना अवघ्या काही तासांत बेड्या,नांदगाव पेठ पोलिसांची धडक कारवाई
Amravati News Update
जबरी चोरी करणाऱ्या दोन अज्ञातांना अवघ्या काही तासांत बेड्या,नांदगाव पेठ पोलिसांची धडक कारवाई
More news from महाराष्ट्र and nearby areas
- माना फाट्यावर प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग! | एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट मूर्तिजापूर तालुक्यातील माना फाटा येथे प्लास्टिकच्या दाण्यांनी भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी, १५ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. गुजरातमधील दहेज येथून प्लास्टिकचे दाणे घेऊन कलकत्त्याच्या दिशेने जाणाऱ्या NL 01 AJ 4266 क्रमांकाच्या ट्रकच्या एसी केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. माना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत ट्रकच्या एसी केबिनचे मोठे नुकसान झाले असून प्लास्टिकच्या दाण्यांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने चालकासह कोणालाही दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला. 📍 घटनास्थळ: माना फाटा, मूर्तिजापूर तालुका, अकोला 🚛 ट्रक: NL 01 AJ 4266 🔥 प्राथमिक कारण: एसी केबिनमधील शॉर्टसर्किट इंडिया न्यूज आर सेवन | भारताची आवाज उपसंपादक मोहम्मद रिज़वान सिद्दिकी, मूर्तिजापूर बातमी आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.1
- जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल जुना धामणगांव दलित वस्ती कडे जाणाऱ्या मार्गावरील नालीची समस्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात पावसाचे पाणी व गाळ थेट मुख्य रस्त्यावर; विद्यार्थी, वृद्धांसह नागरिकांचे हाल प्रतिनिधी : संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे : जुना धामणगांव येथील दलित वस्तीच्या मुख्य मार्गावरील नालीची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नालीमध्ये पावसाचे पाणी अथवा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर नालीतील घाण पाणी, गाळ व कचरा थेट मुख्य रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. तसेच शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांनाही याच मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, नालीचे घाण पाणी व गाळ रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांना त्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला असून, दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय नाली व परिसरात पाणी व कचरा साचत असल्याने साप तसेच इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, नालीची योग्य साफसफाई, दुरुस्ती व पाण्याचा सुरळीत निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संबंधित विभागाने केवळ तात्पुरती साफसफाई न करता नालीची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर येणार नाही, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नालीची स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती आणि पाण्याच्या योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- मंजूर झालेले सोलर संबंधित सोलर कंपनीने बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सोलर तात्काळ बसून देण्याची सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांची महावितरण कडे मागणी मंजुर सोलर परंतु न बसवल्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्या अभावी नुकसान! (शेतकऱ्यांनी वर्ग संबंधित ऑफिसमध्ये मारतात चक्ररा) तात्काळ सोलर बसवावे जाधव यांनी केली मागणी, मालेगाव प्रतिनिधी,दि,१५:- पावसाने तर मारली दांडी परंतु सोलर व महावितरण अधिकारी पण देत आहेत उडवा उडी चे उत्तर, पाण्याअभावी शेतकऱ्यांचे शेतातील हळद सोयाबीन इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात होत आहे नुकसान शासन दरबारी शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलर सह इतर योजना असल्या तरी मात्र पात्र लाभार्थ्यांनी दोन दोन तीन तीन महिने पूर्वी लागणारी कागदपत्रे व सोलर साठी लागणारी रक्कम ची भरणा केली परंतु अद्यापही त्यांना सोलर कंपनी मार्फत सोलर तसेच महावितरण कंपनीकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत असून खंत शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत, मालेगाव तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध सोलर कंपन्याकडे ऑनलाइन अर्ज केले आहेत, अमानी येथील शेतकरी राजू भिमराव गवळी,व अनिल गंगाराम जाधव यांनी मागील दोन - महीन्यापृर्वी सोलर साठी,ओस्वाल कंपनी साठी ऑनलाइन अर्ज केला तसेच लागणारी रक्कम सुद्धा भरली परंतु अद्याप यांच्या शेतात बोरवर सोलर बसवण्यात आले नसल्याने यांचे हळद ,सोयाबीन इतर पिक वाळून चालले यांनी मालेगाव महावितरण कंपनीकडे तसेच वाशिम कंपनीकडे चकरा मारून परेशान झाले असता आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी महावितरणचे अधीक्षक अभियंता मंडळ कार्यालय वाशिम संदीप दत्तात्रेय दरवडे यांची प्रत्यक्ष भेट सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव तसेच शेतकरी राजु गवळी यांनी घेतली असता, त्यांनी संबंधित महावितरणचे उपकार्यकारी अभियंता व्हि बी चव्हाण, तसेच ओसवाल कंपनीचे विनोद ब्रह्मेकर यांच्याशी संपर्क साधून या शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात सांगितले, याबाबत ओबीसी सेलचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख विवेक गवळी यांनी सुद्धा दूरध्वनीवरून साहेबांशी संपर्क साधून विचारणा केली, सामाजिक कार्यकर्ते अनिल जाधव यांनी थेट महावितरण चे वरिष्ठ अधीक्षक दरवडे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली व त्यांनी तात्काळ दाखल घेऊन दोनच दिवसात सोलर बसवल्या जातील असे यावेळी जाधव यांना सांगितले, जाधव यांनी महावितरण व सोलर कंपनी वाले शेतकऱ्याकडून पैशाची मागणी देखील करतात असे सांगितले असता, दरवडे म्हणाले ज्यांनी पैशाची मागणी केली असेल त्यांना डायरेक्ट लाच लुचपत विभागाकडे तक्रार करून पकडून द्या , काही शेतकरी तर आमचे अधिकाऱ्यांचे पाय धरायचे राहिले हो साहेब असे म्हणाले तेव्हा या बाबीची तात्काळ दखल घेऊन पात्र परंतु सोलर पासून वंचित असलेले सर्व शेतकऱ्यांचे सोलर तात्काळ बसून द्यावे अशी मागणीही अनिल जाधव यांनी यावेळी केली2
- अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोली जहागीर शेतशिवारात बिबट्याची दहशत; शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण कुत्र्याची शिकार; दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शितशिवारात गायीचीही शिकार केल्याची घटना! अकोट तालुका प्रतिनिधी... अकोट तालुक्यातील अकोली जहागीर परिसरातील शेतशिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजूर वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्याने आकोली जहांगीर शेतशिवारात एका कुत्र्याची शिकार केली असून, दोन-तीन दिवसांपूर्वी रुईखेड शेतशिविरात एका गायीचीही शिकार सुद्धा केल्याची घटना घडल्याचे येथील नागरीकांन कडुन सांगण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांमध्ये चिंतेचे व भिंतीचे वातावरण आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने भविष्यात मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने तातडीने या परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून जोर धरत आहे.2
- आमच्या गावाची स्वच्छता आमच्या dalambi गावामध्ये खूप प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. ओला कचरा सुखा कचरा आणि घरातील wastage कचरा यामुळे गावात बिमारी च प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.3
- तडीपार आरोपीच्या हातात तलवार;गुन्हे शाखेची धडक कारवाई,गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारीसह आरोपीला घेतले ताब्यात1
- जबरी चोरी करणाऱ्या दोन अज्ञातांना अवघ्या काही तासांत बेड्या,नांदगाव पेठ पोलिसांची धडक कारवाई 1
- कृषी उत्पन्न बाजार समिती आर्वी परिसरातील विहिरीत आढळल्या मृतदेह1